<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss'><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479</id><updated>2009-12-19T02:51:56.842+04:00</updated><title type='text'>माझे दोन पैसे</title><subtitle type='html'>माणसं लिहिताहेत, माणसं वाचताहेत... त्यात माझे हे २ पैसे (2 penny worth)</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default?start-index=26&amp;max-results=25'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>29</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-7556604904498466057</id><published>2009-11-13T00:03:00.000+04:00</published><updated>2009-11-13T00:07:00.116+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवासवर्णन'/><title type='text'>परवशता पाश दैवे... ३</title><content type='html'>&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s400/DSC01279.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #990066;"&gt;ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.misalpav.com/node/10097" title="परवशता पाश दैवे... भाग १" target="_blank"&gt;परवशता पाश दैवे... भाग १ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/10140" title="भाग २" target="_blank"&gt;भाग २ &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;किती वेळ गाडी धावत होती कोणास ठाऊक. गाडी सरळ एका रेषेत भरधाव चालली होती. पण अचानक गाडीचा वेग बराच मंदावला, गाडीने एक वळण घेतले आणि याची तंद्री भंगली. अंग आंबून गेलं होतं. दोन्ही बाजूला माडाची झाडं दिसत होती. आणि त्या झाडांच्या गर्दीतून निळ्या पाण्यावर नाचणार्‍या शुभ्र फेसाळ लाटा दिसायला लागल्या होत्या. अटलांटिकचे पहिले दर्शन सुखावून गेले. एकदम पिक्चर पर्फेक्ट. आपण कुठे चाललो आहोत याचे पूर्ण विस्मरण झालेले. गाडी तशीच एका गावात शिरली. गाव अगदी आपल्या गोव्यात असल्यासारखे. माणसांचे दिसणे सोडले तर अगदी गोव्यात असल्याची अनुभूती. कोळ्यांची वस्ती प्रामुख्याने असल्याच्या खुणा आणि वास, अगदी जागोजागी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2eiibYQTI/AAAAAAAABY4/TlObbSPnGsw/s800/DSC00075.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2enaasYoI/AAAAAAAABZA/7W9SLWQMz_c/s800/DSC00076.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गावातून जाताजाता गाडीने एकदम एक वळण घेतले, अगदी छोट्याशा खाडीवरचा चिमुकला पूल ओलांडला आणि धाडकन समोर एक महाकाय, प्रचंड पांढरी इमारत उभी राहिली. बघणार्‍याला दडपून टाकेल अशी....&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हिअर वुई आर!!! एल्मिना कॅसल!!!" ड्रायव्हर म्हणाला. एका मोठ्या मैदानात गाडी उभी राहिली आणि सगळे बाहेर पडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2bdGtnzII/AAAAAAAABW8/DknLCjUJipA/s800/DSC00044.JPG" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एल्मिना (एल मिना, El Mina in Portuguese language) ... मानवी इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट आणि महत्वाच्या कालखंडाचा मूक साक्षीदार. अगदी भव्य अशी पांढरी, लालसर कौलं असलेली, अगदी युरोपियन वळणाची इमारत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पंधराव्या शतकाच्या मध्यावर, उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगिज दर्याचे राजे होते. बलाढ्य आरमाराच्या आणि नौकानयनाच्या वारशाच्या जोरावर ते जग पादाक्रांत करायला नुकतेच बाहेर पडत होते. आफ्रिका आणि भारतातून निघणारा सोन्याचा धूर त्यांना खुणावत होता. धर्मप्रसाराचं अधिकृत आणि पवित्र कर्तव्यही अंगावर होतंच. आफ्रिकेच्या किनार्‍या-किनार्‍याने त्यांची समुद्री भटकंती चालू होती. अशातच त्यांची जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर, एल्मिनाच्या जवळपास, साधारण इ.स. १४७१ च्या सुमारास येऊन थडकली. सुरूवातीला बरीच वर्षं जम बसवण्यात आणि स्थानिक लोकांशी मैत्री करण्यात गेला. हळूहळू व्यापार वाढला. कायम स्वरूपी तळ उभारण्याची गरज पडू लागली आणि एल्मिना कॅसल इ.स. १४८२च्या सुमारास बांधून झाला, तो अजून उभा आहे. काळाच्या ओघात मालक बदलले... पोर्तुगिज गेले डच आले, डच गेले इंग्रज आले, आता तर गोरेच गेले आणि स्थानिक लोकांची मालकी आहे... व्यापाराचेही स्वरूप बदलले... सोन्याचे साठे जाऊन माणसांचे साठे आले... तब्बल चारशे वर्षे करोडो अभागी जीव दास्यात ढकलले गेले... सध्या टुरिझम नामक व्यापार जोरात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एल्मिनाने सगळे बघितले आणि अजूनही शांतपणे उभा आहे... पुढे येणार्‍या बदलांची वाट बघत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2X4h4JthI/AAAAAAAABUw/L6uSsG8cKh4/s800/DSC01303.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किल्ल्यामधे शिरण्यासाठी फक्त एकच दार आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला एका आत एक असे दोन खंदक आहेत. खंदक बरेच खोल आणि भरपूर रूंद आहेत. या खंदकात पाणी सोडलेले असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2X-91ROeI/AAAAAAAABU0/-R2_MjfyYiA/s800/DSC01304.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खंदकावरील एकमेव लाकडी पूलाची उघडबंद हालचाल यंत्राच्या सहाय्याने होत असे. पूल बंद झाला की आत शिरणे अशक्य.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत शिरल्या शिरल्या एक छोटेसे स्वागतकक्ष आहे. माफक किंमतीत सर्व परिसर फिरायचे तिकीट घ्यायचे. सगळा किल्ला हिंडून फिरायला गाईड्स नेमलेले आहेत. हे गाईड्स इतर कोणत्याही ऐतिहासिक स्थळांच्या गाईड्ससारखे एक नंबर बोलबच्चन असतात. पण त्यांच्या बरोबरच आत फिरावे... त्याशिवाय तिथल्या जागांचे वैशिष्ट्य कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2dvY_KUZI/AAAAAAAABYU/Bc5qAAjD9-M/s800/DSC00066.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत शिरल्याशिरल्या एक मोकळे पटांगण आहे. पटांगणाच्या चारही बाजूला किल्ल्याच्या इमारती आणि तटबंदी आहे. या पटांगणाच्या एका बाजूला दिसते आहे ती इमारत मुख्य इमारत. तिथे किल्ल्याच्या गव्हर्नराचे कार्यालय आणि खाजगी निवास इत्यादी होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2ZXGk2OVI/AAAAAAAABVs/L3HSY8cxcr4/s800/DSC01318.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पटांगणाचे दुसर्‍या बाजूने दृष्य. समोर दिसत असलेली इमारत पोर्तुगिज काळात कॅथलिक चर्च होती. पुढे डच आले... ते कट्टर कॅथलिकविरोधी. त्यांनी त्या इमारतीत वाचनालय आणि इतर काही कार्यालये थाटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2UXFOPC6I/AAAAAAAABSw/9FM0zcGlSOI/s800/DSC01273.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किल्ल्यामधे स्त्री आणि पुरूष बंद्यांसाठी वेगवेगळ्या कोठड्या होत्या. एकावेळी साधारणपणे चारशे ते पाचशे माणसं या कोठड्यातून ठेवली जात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2UblyqWtI/AAAAAAAABS0/XhRQsxZJrDA/s800/DSC01274.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका अंधार्‍या, भुयारासारख्या बोळकांडीतून किल्ल्याची सफर सुरू होते. या वाटेवर मिट्ट काळोख. दिवसाउजेडी सुद्धा काही दिसणार नाही. कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे उजेड वाटतोय. अन्यथा सगळे अंदाजाने पाऊल टाकत, बिचकत चालले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2UjdBZWdI/AAAAAAAABS4/IVwPZiUIbnM/s800/DSC01275.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2c7L7uCsI/AAAAAAAABXs/XFkucve6nuw/s800/DSC00056.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बायकांसाठीची कोठडी. आणि त्याआधीच्या छायचित्रात त्या कोठडीचे प्रवेशद्वार. या कोठडीत सर्व वयाच्या बायका आणि मुली ठेवलेल्या असत. मोठ्या मुशिलीने साठ सत्तर बायका मावतील, तिथे साधारण दोन-अडिचशे बायका अगदी सहजी कोंडल्या जात!!! कायम अंधार... समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट खारी हवा... कुबट वास... आजही त्या कोठडीत पाच मिनिटे उभे राहणे मुश्किल होते. कैदी इथे साधारण दीड दोन महिने राहत असत... जहाज येई पर्यंत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s800/DSC01279.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोठडीतून एवढे एकच दृष्य दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2Uq-UoTfI/AAAAAAAABS8/QHBfqMoM81g/s800/DSC01276.JPG" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाईड विचारतो, "हे काय आहे? कोणी ओळखणार का? प्रयत्न करा." सगळे विचार करत असतात. कोणालाच नीट ओळखता येत नाही. गाईड सांगतो... "मेहेरबान गोर्‍या लोकांनी आतल्या बायका मरू नयेत म्हणुन बनवलेले हे एक व्हेंटिलेटर आहे. वरची मोकळी हवा खाली कोठडीत यावी म्हणून. फक्त एकच लोचा आहे. हे व्हेंटिलेटर वर दारूगोळा ठेवायच्या खोलीत उघडते. त्यामुळे कायम तिथली दूषित हवा इथे खाली येत असे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2Y1DIb_-I/AAAAAAAABVU/z1bd4CDZ45o/s800/DSC01312.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बायकांच्या कोठडीबाहेरचे छोटे पटांगण. मोकळी जागा. रोज संध्याकाळी बायकांना इथे जमवले जात असे. हे छायाचित्र जिथून काढले आहे तिथे गव्हर्नर उभा राहत असे आणि निवड करत असे. मग त्या निवडलेल्या स्त्रीला इतर खास गुलाम बायका छान आंघोळ वगैरे घालून, सजवून गव्हर्नराच्या खोलीत पाठवत असत. औटघटकेची राणी. घटका संपली की राणीची परत दासी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2ZAX63dyI/AAAAAAAABVc/MBqNcItMTO4/s800/DSC01314.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;निवडलेल्या स्त्रीला इतरांपासून वेगळे करून वर न्यायचा मार्ग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज हे ऐकायला भयंकर वाटते. पण तेव्हा या अमानुष यातनांमधून सुटायचा हा एकमेव मार्ग असायचा या स्त्रियांसाठी. अशा गोर्‍या लोकांनी उपभोगलेल्या स्त्रिया जर का गरोदर राहिल्या तर त्यांचे नशिबच पालटून जायचे. अशा गरोदर स्त्रिया वेगळ्या काढून त्यांना गावात दुसरीकडे चांगल्या व्यवस्थेत ठेवत. त्यांच्यासाठी खास सोयी असत. त्यांच्या मुलांना गोरे लोक आपले नाव देत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण वगैरे मिळत असे. आजही एल्मिना परिसरात डच / इंग्लिश / स्कँडिनेव्हियन आडनावे असलेली आणि रंगाने खूप उजळ असलेली खूप मोठी प्रजा सुखेनैव नांदत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2VfCkxMEI/AAAAAAAABTc/GfAlE1bkfhA/s800/DSC01284.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाठाळपणा करणार्‍या बायकांना पायात असे जड लोखंडी गोळे बांधून दिवस दिवस उभे करत असत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्या प्रकारात बरेच बंदी दगावत असत. साहजिकच असा प्रश्न पडतो की ज्या लोकांना विकून पैसा कमवायचा त्यांना असे मारून नुकसानच ना? मग तरीही असे का व्हायचे? &lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. मुख्य उत्तर हे की या कैद्यांचं मनोधैर्य खच्ची करणे. त्यांच्यामधून बंडाची भावना कायमची हद्दपार करणे, मानसिक दृष्ट्या त्यांना पूर्णपणे निर्बल करणे हा एक फार मोठा महत्वाचा भाग असे. दुसरे असे की, या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले बंदी अगदी चिवट आणि उत्तम प्रतीचे असत. अशा गुलामांना जास्त भाव येत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्या प्रकाराला 'ब्रेकिंग डाऊन' म्हणत. रानटी घोड्यांना माणसाळवायच्या प्रकाराला पण 'ब्रेकिंग डाऊन'च म्हणतात !!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2Vyy5JniI/AAAAAAAABac/CFyeLmWDYGI/s800/DSC01287.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2WFO7o4XI/AAAAAAAABT4/4iW6oTTdgMg/s800/DSC01290.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा रितीने पूर्णपणे खच्ची झालेले कैदी संपूर्णपणे 'मवाळ' होऊन आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट बघत शांत बसून असत. एक दिवस जहाज येई. मग लगेच 'सामान' जहाजात भरायची लगबग सुरू होई. या दरवाज्यातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होई... कधीही न परतण्यासाठी. या दरवाजातून गेल्यावर एक खोली आहे. बंदी निमूटपणे एकामागोमाग चालत राहत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2WNqbzs2I/AAAAAAAABak/e8ZXVVmS7qY/s800/DSC01291.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरा दरवाजा. मग अजून एक लहान अंधारी खोली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2W7Ntom-I/AAAAAAAABUE/ow4cHAeNCFo/s800/DSC01293.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिसरा दरवाजा. मग शेवटची खोली. शेवटचा दरवाजा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2XCDfzI_I/AAAAAAAABZw/cdmMB59aJn4/s800/DSC01294.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटचा दरवाजा. डोअर ऑफ नो रिटर्न. इथून बंद्यांना लहान होड्यांमधे बसवून जहाजापर्यंत नेले जाई.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे येई पर्यंत बहुतेक कैद्यांना आपले भवितव्य समजलेले असे. इथेच त्यांचा आफ्रिकेच्या भूमीला शेवटचा स्पर्श. कित्येकदा आख्खी कुटुंबच्या कुटुंब पकडली गेली असत. इथे शेवटची ताटातूट, शेवटची भेट. या नंतर स्त्रिया आणि पुरूष परत वेगळे वेगळे 'स्टोअर' केले जात जहाजात. आणि मग जहाज अमेरिकेत पोचले की थेट विक्रीच. कायमची ताटातूटच. शिवाय, कित्येक लोकांना जहाज, समुद्र वगैरे माहितच नसत. असे लोक समुद्राच्या इतक्या जवळून दर्शनाने आणि होडीच्या हलण्याने बिथरून जात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2dN5D60zI/AAAAAAAABX4/mpX4zc0CnHA/s800/DSC00059.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिका खंडातील कृष्णवर्णिय लोकांच्या दृष्टीने आज या स्थळाला, विशेषत: या शेवटच्या खोलीला एका तिर्थस्थळाचे स्वरूप आले आहे. खास करून या शेवटच्या दालनात वातावरण अगदी गंभीर असते... कोणी फारसे बोलत नाही. सगळेच नि:शब्द असतात. प्रत्येकजण त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना करायच्या प्रयत्नात असतो. भेट देणारे कृष्णवर्णिय, आपल्या न बघितलेल्या पूर्वजांच्या स्मृतीने, त्यांच्या अनाम वेदनेने व्यथित होऊन रडत असतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतात. फार वेळ उभे राहवत नाही तिथे. खायला उठते... गर्दी असूनही. कधी तिथून बाहेर पडतो असे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2YNfI20tI/AAAAAAAABU8/NIKvSBsFmjA/s800/DSC01306.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2YT66zzlI/AAAAAAAABVA/VijwmG9LRTE/s800/DSC01307.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या चार खांबांवर धक्का होता... तिथे जहाजं नांगरून पडत. छायाचित्र शेवटच्या दारात उभे राहून काढले आहे. त्या काळी पाणी या दारापर्यंत होते. तिथे बोटीत बसवून बंदी जहाजाकडे रवाना केले जात. गेल्या पाच सहाशे वर्षात समुद्र मागे हटला आहे आणि शेवटच्या दारापासून धक्क्यापर्यंत आता वाळू आहे नुसती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच छायाचित्रात अगदी मागे एक जमिनीचा सुळका दिसतो आहे. त्या जमिनीच्या टोकावर केप कोस्ट नावाचा इंग्रजांनी वसवलेला स्लेव्ह कॅसल आहे. डचांची आणि इंग्रजांची जबर दुश्मनी होती इथे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा इथून बाहेर पडलं की बाकीचा किल्ला अगदी यंत्रवत फिरून होतो. कोणताही संवेदनक्षम माणूस त्या कोठड्या आणि ती शेवटची खोली बघून आल्यावर बाकीचे काही बघण्याच्या अवस्थेत असू शकत नाही. तरीही गाईडच्या मागे मागे फिरतोच हा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2XI2VT5aI/AAAAAAAABUM/O_KHZKbRQso/s800/DSC01295.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे एका गव्हर्नराला पुरले आहे. त्याचा मृत्यू इथेच झाला. त्याच्या स्मरणार्थ लिहिलेला हा लेख. त्यात त्याचे वर्णन 'दयाळू, न्यायी आणि पापभीरू' (काइंड, जस्ट अँड गॉडफिअरिंग) असे केले आहे !!!!!!!!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2ZRPwArtI/AAAAAAAABVo/UpxjyX36324/s800/DSC01317.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गव्हर्नराचे निवासस्थान / शयनकक्ष... रंगल्या रात्री अशा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;युरोपियन आले. स्थिरस्थावर झाले. त्यांनी हळूहळू व्यापार वाढवला. अगदी माणसांचा व्यापार मांडला. एक नाही दोन नाही... तब्बल चार शतके हा व्यापार अव्याहत चालू होता. हा व्यापार त्रिकोणीय होता. युरोपातून तयार सामान आफ्रिकेत येई. हा फर्स्ट पॅसेज. ते सामान स्थानिक राजे घेत आणि त्याबदल्यात पकडलेले युध्दकैदी आणि पळवून आणलेले इतर बंदी युरोपियनांना देत. हा व्यापार बार्टर पध्दतीचा होता. हे गुलाम मग अमेरिकेत नेले जात असत, या आफ्रिका ते अमेरिका प्रवासाला मिडल पॅसेज म्हणत. गुलामांची विक्री करून त्या जागी वसाहतींमधे तयार झालेला कच्चा माल म्हणजे कापूस आणि साखर इत्यादी युरोपात नेले जात असे. हा फायनल पॅसेज.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरूवातीला या सामानाच्या बदल्यात आफ्रिकेतून सोने घेत असत गोरे लोक. पण पुढे अमेरिकेत वसाहती उभ्या राहिल्या. आधी पोर्तुगिज / स्पॅनिश लोकांनी प्रचंड मोठे भूभाग पादाक्रांत केले, मागोमाग इंग्रज आणि फ्रेंच आले. या नवीन वसाहतींमधे कापसाचे, उसाचे मोठमोठे मळे उभे राहिले. त्यासाठी मनुष्यबळ लागायला लागले. सुरूवातीला अमेरिकेतील स्थानिक लोकांना गुलाम बनवून काम करून घेणे सुरू झाले, पण हे स्थानिक लोक अतिश्रमामुळे आणि नवीन आलेल्या रोगराईमुळे लवकरच जवळपास नष्ट झाले. तेव्हा हा आफ्रिकेतून गुलाम आणायचा व्यापार फोफावला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हा व्यापार अधिकृतरित्या चालू होता. आधी पोर्तुगिज मग डच आणि नंतर इंग्रजांनी या व्यापारावर वर्चस्व गाजवले. गुलामांचा व्यापार बंद व्हायची दोन मुख्य कारणे सांगितली जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक, मध्ययुगात युरोपात झालेल्या ज्ञानक्रांती (रेनेसां) मुळे एकोणिसावे शतक उजाडता उजाडता अनेक समाजशास्त्रज्ञांनी / सुधारकांनी, या अमानुष व्यापाराला विरोध सुरू केला. ब्रिटनमधे अ‍ॅबॉलिशनची मोठी चळवळ उभी राहिली. दुसरे असे की, याच सुमारास युरोपात झालेल्या औद्योगिक आणि यंत्र क्रांतीमुळे शेती यंत्रांच्या सहाय्याने होऊ लागली. मोठमोठे मळे पिकवण्यासाठी माणसांची तितकीशी गरज नाही राहिली. त्यामुळे गुलामांची मागणी हळूहळू कमी होत गेली. या दोन महत्वाच्या कारणांमुळे हा व्यापार हळूहळू बंद झाला. अर्थात हे सगळे पूर्णपणे बंद होण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ढोबळमानाने, असा अंदाज केला जातो की एकूण ६ कोटी आफ्रिकन या व्यापाराकरिता पकडले गेले. त्यातले अंदाजे २ करोड लोक जहाजात चाढायच्या आधीच छळामुळे मृत्यू पावले. अंदाजे २ करोड लोक जहाजांवर, मिडल पॅसेज (अवधी साधारण अडिच महिने) मधे, मरण पावले. त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून देण्यात येत. आणि फक्त २ करोड लोक अमेरिकेत पोचले. या २ करोडमधील एक फार मोठा हिस्सा, एल्मिना आणि केप कोस्ट मधून पाठवला गेला आहे. त्या दृष्टीने या दोन स्थळांचे महत्व जास्त आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक समजूत अशी की हा व्यापार प्रामुख्याने गोर्‍या लोकांनी केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की यात गोर्‍यांबरोबर स्थानिक काळे लोकही बरोबरीने सहभागी होते. स्थानिक टोळ्यांचे म्होरके / राजे (यांना आज 'चीफ' असे संबोधले जाते.) आपापसात सतत लढत आणि युध्दकैदी गुलाम म्हणून आणत. पुढे हे युध्दकैदी गोर्‍यांना विकले जाऊ लागले. किंबहुना गोर्‍यांना विकायला कैदी हवेत म्हणूनच युद्धं व्हायला लागली. त्यात, युरोपियन लोकांनी आफ्रिकेत बंदूक हे एक नवीन शस्त्र आणले. ते स्थानिक चीफ्सना विकले. आज असे म्हणतात की बंदूक हा एक खूप मोठा घटक ठरला या व्यापारात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरं तर आफ्रिकेत गुलामगिरीची प्रथा पूर्वापार होती. पण हे गुलाम काही झाले तरी आफ्रिकेत, बहुतेक वेळा आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावात राहत. त्यांना काही प्राथमिक असे अधिकारही असत. हुशारीच्या जोरावर ते आयुष्यात पुढे येऊ शकत. पण अ‍ॅटलांटिक गुलाम व्यापारामुळे हे गुलाम आपल्या भूमीपासून, संस्कृतींपासून, कुटुंबांपासून समूळ 'तुटले'. आणि हेच तुटलेपण हा या व्यापारातील अमानुषपणाचा कळस आहे. थोडक्यात म्हणजे, त्यांचे माणूसपण पूर्णपणे नाकारले गेले आणि त्यांना पशूंच्या पातळीवर आणले गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या व्यापाराचे अनेकविध आणि अतिशय दूरगामी परिणाम आफ्रिकेवरच नव्हे तर आख्ख्या जगावरच झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिला परिणाम म्हणजे, आफ्रिकेतून जे लोक गुलाम म्हणून पाठवले गेले ते सगळेच्या सगळे तरूण अथवा वाढत्या वयातली मुलं असे होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर असे लोक बाहेर पाठवले गेले त्यामुळे स्थानिक शेती अथवा उद्योगधंद्यांवर अतोनात वाईट परिणाम झाले. या लोकांत बरेचसे कुशल कारागिर होते, कलाकार होते. हे सगळे थांबलेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरे म्हणजे, आफ्रिकेचा हा भाग सोन्यासाठी प्रसिध्द होता. युरोपियनांनी या भागावर कब्जा केला आणि सोने अक्षरशः लुटले. 'बार्टर सिस्टिम' प्रमाणे इतर माल देऊन टनावारी सोने लंपास केले. त्यायोगे तत्कालिन युरोपियन राजसत्ता गब्बर झाल्या. त्यांची अर्थव्यवस्था वाढली. त्या जोरावर जागतिक वसाहतवाद अजून जोमाने फोफावला. आफ्रिकेतले सोने नसते मिळाले तर या राजसत्तांना एवढे वर येणे तितकेसे सोपे गेले नसते. आजही बरेच वेळा आफ्रिकन राजकारणी लोक या दोन्ही नुकसानांची भरपाई प्रगत आणि समृध्द राष्ट्रांनी करावी अशी मागणी करताना दिसतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिसरा परिणाम असा की साधारण गेल्या पाचेकशे वर्षांपासून आफ्रिकेबाहेरच्या जगाला आफ्रिका म्हणजे रानटी, असुसंस्कृत, राक्षसी लोकांचा प्रदेश अशीच ओळख आहे. याला कारणीभूत म्हणजे तत्कालिन प्रगत जगात काळे लोक फक्त गुलामांच्या स्वरूपातच आले होते. त्यामुळे तीच ओळख होती. गोर्‍या लोकांनी जसजसे जग पादाक्रांत केले त्यांनी त्यांची संस्कृती / विचार / शिक्षणपध्दती सगळीकडे पोचवली. त्यामुळे आपल्यासारख्या आशियाई देशांना प्रामुख्याने आफ्रिका तशीच वाटायला लागली. पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. युरोपियन लोकांच्या आगमना पूर्वी आफ्रिकेतही मोठमोठी साम्राज्ये होती. त्यांचे अनुशासन, शासनपध्दती इत्यादी अगदी प्रगत होती. स्थानिक कारागिर होते आणि त्यांच्या कला होत्या. आफ्रिकन्स म्हणजे फक्त रानटी टोळ्या वगैरे समजुती निखालस खोट्या आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा आफ्रिका हळूहळू पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊ लागली तसतशी या अमानवी व्यापाराबद्दल नुकसानभरपाईची मागणी व्हायला लागली. या व्यापारावर संशोधन होऊ लागले. साहजिकच या व्यापारात गोर्‍यांच्या बरोबरीने स्थानिक काळ्या लोकांच्या टोळ्यांनी बजावलेली भूमिका उठून दिसायला लागली. या सगळ्याचे प्रायश्चित्त म्हणून आणि जबाबदारीची स्विकृती म्हणून स्थानिक लोकांनी ही पाटी तिथे बसवली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2XSC6PpnI/AAAAAAAABUU/43gisKtIpbY/s800/DSC01297.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;मनोगत&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेन्साह, अगोसी, अनानी, आकोसिवा यांचं पुढे काय झालं? &lt;br /&gt;&lt;br /&gt;सोप्पंय हो, इतर करोडो मेन्साह, अगोसी, अनानी आणि आकोसिवा यांचं पुढे जे झालं तेच... एक तर मिडल पॅसेजचा प्रवास सहन न झाल्याने माशांचं खाद्य बनणे किंवा मृत्यूची कृपा होऊन जीवनाच्या शापातून सुटका होई पर्यंत तो शाप भोगत राहणे. तिसरा काही पर्याय नव्हताच. नियतीची पकड चिरेबंदी होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्व प्रकारात गुलामांचे माणसातून पशूत रूपांतर केले गेले असे म्हणले जाते, पण मला तर वाटते की माणसातून पशूत रूपांतर खरे तर हा व्यापार करणार्‍यांचेच झाले होते. अन्यथा खाली जिथे शे-दीडशे माणसे अशी जेरबंद करून ठेवली होती तिथे बरोब्बर त्याच्याचवरच्या खोलीत चर्च बनवून प्रभूची आळवणी करण्याची हिंमत माणुसकी जरातरी शिल्लक असणार्‍यांची होऊच शकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल, पण इथे तसे नाही. देवीच्या पुराणांमधून एक गोष्ट आहे... एक राक्षस असतो, लढाईत त्याच्या रक्ताचे जितके थेंब जमिनीला लागतील तितक्या थेंबांपासून त्याची एक एक प्रतिकृती तयार होते. तसेच, वर्षानुवर्षे... एक गोरा गेला की दुसरा आला असे चक्र चालू राहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारणपणे नविन ठिकाण बघितल्यावर जालावर फोटो टाकणे, प्रवासवर्णन वगैरे लिहिणे असे प्रकार आपण करतो. तसं (म्हणजे तेवढंच) खरं तर इथेही करता आलं असतं. पण मला नुसते फोटोच टाकायचे नव्हते तर हा सगळा 'अनुभव'च तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. आणि तुम्हाला वाचताना आलेली अस्वस्थता बरोबर घेऊन फोटो बघितल्याशिवाय तो अनुभव येणार नाही असे वाटल्याने आधीचे दोन भाग टाकले आहेत. त्यात वापरलेली नावं, व्यक्तिरेखा आणि त्यांचे अनुभव काल्पनिक तर नाहीत, पण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. म्हणूनच सुरूवातीलाच लिहिले आहे की ही कथा नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता एवढंच...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वे जना: सुखिनो भवन्तु   ...   तथास्तु |&lt;br /&gt;सर्वे जना: सुखिनो भवन्तु   ...   तथास्तु |&lt;br /&gt;सर्वे जना: सुखिनो भवन्तु   ...   तथास्तु |&lt;br /&gt;&lt;br /&gt;ॐ शांति: शांति: शांति: |&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-7556604904498466057?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/7556604904498466057/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=7556604904498466057' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7556604904498466057'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7556604904498466057'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/11/blog-post_13.html' title='परवशता पाश दैवे... ३'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s72-c/DSC01279.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-1097038644169147800</id><published>2009-11-11T23:40:00.000+04:00</published><updated>2009-11-11T23:45:50.817+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवासवर्णन'/><title type='text'>परवशता पाश दैवे... २</title><content type='html'>&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s400/DSC01279.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #990066;"&gt;ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.misalpav.com/node/10097" title="परवशता पाश दैवे... भाग १" target="_blank"&gt;परवशता पाश दैवे... भाग १ &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;मेन्साह&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला. कोणीतरी माझ्या तोंडात बोळा कोंबला. मला दोरीने घट्ट बांधले. मी सुटायची खूप धडपड केली. पण त्या राक्षसांच्या शक्तीपुढे माझे काहीच चालले नाही. मी खूप झटापट केल्याने अगदी थकून गेलो. मला अगोसीचा आवाज येत नव्हता पण ती पण खूप धडपड करत होती बहुतेक. शेवटी त्या माणसाने खूप जोरात मारले मला आणि मी अगदी निपचित झालो. माझ्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भानच सुटले होते जणू. त्या माणसाने मला खांद्यावर टाकले आणि चालू लागला. मी जवळ जवळ बेशुध्दच झालो होतो. मला जाग आली तेव्हा मी एका मोठ्या घरात होतो. तिथे खूप अंधार होता. मला खूप भिती वाटत होती. डोळे अंधाराला सरावले तसे मला दिसले की त्या खोलीत माझ्यासारखीच अजून बरीचशी मुले होती. सगळेच अगदी भेदरलेले. काही तर माझ्यापेक्षाही लहान. मला अगोसी मात्र कुठेच दिसत नव्हती. काही मुले जागी होती. काही बहुतेक माझ्यासारखीच गलितगात्र होऊन पडली होती. बोलत मात्र कोणीच नव्हते. नुसतेच एकमेकांकडे बघत होते. थोडा वेळ असाच गेला, मी थोडा धीर करून बाजूच्या मुलाशी बोलायला गेलो तर माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. हातपायही हलेनात. माझ्या लक्षात आले की तोंडात अजूनही बोळा आहे आणि हात पाय बांधलेले आहेत. मी काहीच करू शकत नव्हतो. चूपचाप पडून राहण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. सारखे रडायला येत होते. आईची आठवण येत होती. अगोसीचे काय झाले? ती पण इथेच आहे का? आमच्या गायब व्हायच्या दु:खाने घरी काय झाले असेल? माझ्या वेड्या साहसामुळे मी आणि अगोसी दोघेही चांगलेच अडकलो होतो. मी स्वतःला शिव्याशाप देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असा बराच वेळ गेला. बाहेर रात्र आहे की दिवस आहे हे पण कळत नव्हते. तेवढ्यात खोलीचे दार उघडले आणि दोनतीन माणसे आत आली. आत आल्या आल्या त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारायला सुरूवात केली. काय चालले आहे काहीच कळत नव्हते. सगळी मुलं नुसती कळवळत होती. काही काहींनी तर तिथेच कपडे ओले केले. नुसती घाण झाली होती. थोडा वेळ असं मारल्यावर त्यांनी एका एका मुलाच्या तोंडातला बोळा काढून त्याला खायला द्यायला सुरूवात केली. काही मुलांनी खायला नकार दिला त्यांना तोंडात बोळा घालून परत खूप मारले. ते बघून बाकीच्यांनी निमूटपणे तोंडात कोंबलेले गिळले. सगळा प्रकार संपवून ते लोक परत खोली बंद करून निघून गेले. असे बरेच वेळा झाले. बाहेर दिवस रात्र येत होते जात होते, आम्ही त्या सगळ्याच्या पलिकडे गेलो होतो. विचार करून करून थकलो आणि नुसते ग्लानीत पडून राहत होतो. मधेच आमच्यात दोन चार नवीन मुलांची भर पडत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा मात्र दार उघडले, खायला दिले आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढले. आज काही तरी नवीन घडत होते. अजून बर्‍याच खोल्या होत्या आणि त्यातूनही बरीच मुलं बाहेर आली. बाहेर रात्र होती. सगळ्यांना एका रांगेत उभे करून चालायला सुरूवात केली. तेवढ्यात मला अगोसी दिसली. बाप रे!!! कशी दिसत होती!!! मी तर ओळखलेच नसते. पण तिने पण बघितले नेमके माझ्याकडे आणि तिचे डोळे चमकले त्या बरोब्बर मला ओळख पटली. पण मी काय करू शकत होतो? काहीच नाही. नशिबाने काय वाढून ठेवले होते पुढ्यात, काहीच कळत नव्हते. नक्कीच काहीतरी पाप केले असणार आम्ही दोघांनी, या सगळ्याच मुलांनी, म्हणून हे असं झालं होतं. नक्कीच. आम्हाला बहुतेक त्या माणसं खाणार्‍या राक्षसांच्या गावी नेत होते बहुतेक. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चालण्यात जरा जरी उशिर झाला तरी लगेच चाबकाचे फटके पडत होते. रात्रभर चालत होतो आम्ही बहुतेक. बराच वेळ असे चालल्यावर अजून एक घर आले. परत तेच. तिथे एका खोलीत कोंडले आम्हाला. परत अंधार. परत मार. परत ते जबरदस्तीचे खाणे. तोंडात बोळा. उजेड पाहून तर किती दिवस झाले होते कोणास ठाऊक. पण अगोसी अजून जिवंत आहे आणि इथेच आहे हे समाधान होते. आणि तिच्यासाठी तरी हे सगळे सहन करणे भाग होते. संधी मिळताच इथून पळून जाऊ तिला घेऊन. सतत मनाला हेच बजावत होतो मी. जसजसे दिवस जात होते, माझेच मन कच खाऊ लागले, पण पळून जायच्या नुसत्या विचारानेच बरे वाटायचे. म्हणून मी सतत तोच विचार करायचो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीचा प्रवास, परत मुक्काम, परत थोड्या दिवसांनी रात्रीचा प्रवास... किती दिवस गेले कुणास ठाऊक. एका रात्री.... एक खूप मोठे पांढरे घर आले. आणि त्याच्या बाजूला खूप मोठ्ठे पाणी होते. त्या पाण्याचा आवाज खूप होता. वाराही खूप होता. मी तर एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं. आम्हाला त्या घरात नेलं. तिथे बघतो तर माझी खात्रीच पटली. आपण नक्कीच राक्षसांच्या घरी आलो आहोत. सगळे राक्षस कसे अगदी धिप्पाड आणि पांढरेशुभ्र. त्यांचे चेहरे पण अगदी वेगळेच. भयानक. त्यांना बघून बर्‍याच मुलांची तर बोबडीच वळली. काही बेशुध्द पडली. आम्हाला परत एकदा एका मोठ्या खोलीत नेलं आणि बंद केलं. मधून मधून अगोसी दिसत होती. तेवढंच बरं वाटायचं. आईची लाडकी पोरगी, पण काय अवस्था झाली होती तिची !!! आईने बघितलं असतं तर जीवच दिला असता तिने. इथून पळून जाऊ तेव्हा आधी तिला नीट खाऊ पिऊ घालायचे आहे आणि जरा तब्येत नीट करून घरी न्यायचे. नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या खोलीत आम्ही होतो तिथे आमच्या सारखे अजून बरेच लोक होते. पण हे मोठे लोक होते. चांगले आडदांड, हट्टेकट्टे. बाप रे !!! म्हणजे हे राक्षस मोठ्या लोकांना पण खातात की काय? आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. तोंडातले बोळे काढले तरी कोणीच बोलत नव्हते. बोलायची सवयच गेली होती. आणि खूप भितीही वाटत होती. हळूहळू ते मोठे लोक बोलायला लागले. पण त्यातल्या बहुतेकांची भाषाच समजत नव्हती. मग सगळे नुसतेच गप्प बसले. पुढे काय होणार याची बहुधा कोणालाच कल्पना नव्हती. हताश होऊन बसले होते सगळे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;अनानी&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिले एक दोन फटके अंगावर पडले तेव्हा जाणवलंच नाही. पण मारणारा मारतच राहिला. असह्य झालं. कसा तरी उठून उभा राहिलो. दिवस उजाडला होता. पण मला मात्र डोळ्यापुढे अंधारच जाणवत होता. पावलं अडखळत होती. सुदैवाने फार चालावे नाही लागले. अशांतींचा तळ जवळच होता. तिथे सगळ्यांना नेऊन बसवले. सगळ्या श्रमाने पोटात नुसता खड्डा पडला होता. भूक लागली होती. थोड्या वेळाने एक माणूस आला आणि त्याने थोडेसे अन्न जमिनीवर फेकले आणि तो चालता झाला. ते तुकडे मिळवायला नुसती मारामारी झाली. जगायचं असेल तर अन्न मिळवलंच पाहिजे!!! मी पण घुसलो त्या गर्दीत आणि थोडेसे धुळीने माखलेले का होईना पण खाऊ शकेन असे तुकडे मिळाले. पाण्याचा हौद मात्र मोठा होता. पोटभर पाणी प्यायलो. आत्ता पर्यंत थोडा जीवात जीव आला होता. आजूबाजूला कोणी ओळखीचे चेहरे दिसताहेत का ते बघत होतो. माझ्या बरोबर गावातून आलेले चारपाच जण दिसले. त्यांच्या जवळ सरकलो. त्यांचीही अवस्था काही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळेच दमले होते, त्यापेक्षाही आता पुढे काय याचाच विचार चालू होता. हे अशांती म्हणजे फारच भयंकर लोक. अतिशय क्रूर. यांना सतत काही ना काही कारणाने बळी द्यायला माणसं लागतात. आजूबाजूच्या राज्यातून माणसं पळवतात त्यासाठी हे लोक. माझी तर खात्रीच पटली की आपलंही आता हेच होणार. आईची, घरची खूप आठवण आली. गाव डोळ्यासमोर दिसायला लागला. पण योग्य संधीची वाट बघत गप्प बसावे लागणार हे तर स्पष्टच दिसत होते समोर. भेटलेल्या लोकांशी हळूच बोलत बसलो. सगळ्यांचे म्हणणे माझ्यासारखेच पडले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढचे दोनचार दिवस अशांती असेच आमच्यासारखे अजून लोक पकडून आणत होते. आणि आमची संख्या वाढत होती. अन्नाचे तर हालच होते. नुसत्या पाण्यावर दिवस काढत होतो आम्ही. चौथ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना एका जाड दोरखंडाने बांधले आणि एका मागोमाग एक असे बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. भयानक उन्हाळा होता. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. आणि जंगलातून जाताना अजूनच त्रास होत होता. रस्त्यात कुठे साप तर कुठे अजून काही आडवे येत होते. चालणे फार जिकिरीचे होत होते. तसेच पाय ओढत चाललो होतो आम्ही. आमच्या आजूबाजूला सारखे अशांती सैनिक चालत होते. एखादा माणूस थोडातरी अडखळला किंवा हळू चालायला लागला की सगळी रांगच अडखळायची. आणि मग नुसता चाबकांचा वर्षाव चालू!!! &lt;br /&gt;&lt;br /&gt;देवा, हे लोक काय सैतान आहेत की राक्षस? मला वाचव देवा....&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात रांगेच्या पुढून खूप आवाज ऐकायला यायला लागले. सगळ्यांना थांबवण्यात आलं. बराच वेळ आरडाओरडा ऐकू येत होता. शेवटी एक जोराची किंचाळी ऐकू आली आणि सगळाच आवाज बंद झाला. थोड्या वेळाने एक-दुसर्‍या कडून कळले की पुढे एकाने तो दोरखंड धारदार दगडाने हळूहळू तोडून पळायचा प्रयत्न केला होता. त्याच्या दुर्दैवाने तो दोरखंड तुटायच्या आतच काही सैनिकांच्या ते लक्षात आले. त्या माणसाला वेगळे काढून खूप मारले आणि मग त्याचे हात पाय तोडून त्याला तसेच, जिवंतच, रस्त्याच्या बाजूला टाकून दिले. पुढे जात असताना सगळ्या लोकांच्या नजरेस तो पडेल असा ठेवला त्याला, बाकीच्यांची हिंमत होऊ नये म्हणून. वेदनेने जवळजवळ बेशुध्दच झाला होता तो. आणि आम्ही गेल्यावर थोड्याच वेळात रक्ताच्या वासाने आलेल्या कोणत्यातरी जनावराने त्याला खाल्ला असणार. पण आता वाटतं, नशिबवान होता, सुटला बिचारा. थोडक्यात सुटला. पुढचे भोग तरी टळले त्याचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तीन दिवस सतत चालल्यावर आम्ही अशांतींच्या मोठ्या गावात पोचलो. गावातली पोरंसोरं आमची मिरवणूक बघायला जमली. आमच्या मागे ओरडत चालली होती. कोणी मधेच दगडं मारत होते. सैनिक त्यांना पिटाळत होते आणि पोरं परत परत जवळ येत होती. एकदाचे आम्ही अजून एका मोठ्या मैदानात पोचलो. तिथे असेच आमच्यासारखे बरेच लोक आधीच बसवलेले होते. चारी बाजूंना मोठे कुंपण आणि सैनिकांचा पहारा. आता मात्र हळूहळू माझं मन कच खाऊ लागलं होतं. पळून जायची जी काही थोडी फार आशा होती ती मावळायला लागली होती. रात्री खायला काहीच मिळालं नाही. पाणीही नव्हतं इथे. भुकेने ग्लानी आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळ झाली. तेवढ्यात मैदानाचे दार उघडले आणि जे काही दिसलं त्यामुळे तर बहुतेक लोक पार घाबरून गेले. काही अशांती सैनिक आत आले आणि त्यांच्या मागोमाग दोनतीन उंच, धिप्पाड पण पांढरेफटक कातडी असलेली माणसं आत आली. त्यांचे केस पण वेगळेच होते. त्यांनी अंगात रंगीबेरंगी कपडे घातले होते. असली माणसं मी कधीच बघितली नव्हती. माझी खात्री पटली, हे नक्कीच राक्षस आहेत आणि या महाभयानक अशांती लोकांनी त्यांच्याशी मैत्री केली आहे. याच लोकांना ते माणसं खायला देत असणार. मी डोळे मिटून घेतले. ती माणसं सगळ्यांच्या जवळ जाऊन जाऊन त्यांचे हात, पाय, दात, डोळे बघत होते. सगळ्यांची तपासणी झाली. ते राक्षस माझ्याजवळ आले तेव्हा मला नुसता घाम फुटला होता. एकमेकांशी काहीतरी बोलत होते ते सगळेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळाने सगळ्यांना खायला दिलं आणि परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. पळून जायची खूप इच्छा होत होती. पण तो विचार मनात आला की तो हातपाय तोडलेला माणूस डोळ्यासमोर यायचा आणि सगळं अवसानच गळून पडायचं.  यावेळी आम्ही जवळजवळ पाचसहा दिवस चालत होतो. बरेच दिवस चालल्यानंतर एक दिवस एकदम खूप मोठं पाणी डोळ्यासमोर आलं. एवढं पाणी मी कधीच बघितलं नव्हतं. त्या पाण्याजवळ खूप मोठं पांढर्‍या  रंगाचं घर होतं. आणि तिथे त्या पांढर्‍या राक्षसांचे अजून बरेच भाऊबंद उभे होते. सगळीकडे नुसते राक्षसच राक्षस. ते मोठ्ठं पाणी सारखं जोरात त्या घरावर आपटत होतं आणि त्याचा खूप आवाज होत होता. आम्हाला बघताच ते सगळे राक्षस ओरडायला लागले. एवढी माणसं खायला मिळणार म्हणून बहुतेक खुश झाले असावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हाला त्या घरात नेलं आणि एक भल्या मोठ्या अंधार्‍या खोलीत ढकललं. सगळे नुसतेच दमून पडले होते. कोणीही बोलत नव्हतं. हलत सुद्धा नव्हतं. पुढे काय होणार ते सगळ्यांनाच कळलं होतं. आता हे राक्षस आम्हाला खाणार. मनात निराशा दाटून आली होती. देवा... आईला सुखरूप ठेव. तिला कोणीच नाही माझ्याशिवाय. आत्ता पर्यंत इतके दिवसांत तिचं काय झालं असेल? माझ्या गायब होण्याने तिला किती त्रास झाला असेल? &lt;br /&gt;&lt;br /&gt;आई... आई... आई... आई... !!!!!!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;आकोसिवा&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे काय झालं कळलंच नाही. जाग आली तेव्हा मी एका मोठ्या खोलीत होते आणि तिथे अजून बर्‍याच बायका होत्या. आणि त्यात अगदी लहान लहान मुली पण होत्या. बहुतेक जणी सुन्न झाल्यासारख्या गप्प बसल्या होत्या. काही लहान मुली रडत होत्या. काही बायका जमेल तसे त्यांना शांत करत होत्या. सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. बहुतेक मलापण. हात पाय जास्त हलवता येत नव्हते. अंगात त्राणच नव्हते. किती दिवस मधे गेले होते कुणास ठाऊक. बाहेर रात्र आहे की दिवस तेसुध्दा कळत नव्हतं. मला एकदम माझ्या बाळाची आठवण आली. बाळ!!!!! काय झालं असेल त्याचं? भुकेने तडफडलं असेल. कोमी बिचारा एकटा काय करू शकेल त्याचं? मनात नुसती तडफड चालू होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाळा!!! मी आले रे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मधनंच त्या खोलीचं दार उघडायचं आणि एक माणूस काही खाणं आत टाकायचा. ते तुकडे ज्यांच्या जवळ पडतील ते भाग्यवान. दोन तीन दिवस असेच गेले. भुकेने, विचारांनी डोकं थकून गेलं होतं. एक दिवस ती माणसं आत आली आणि सगळ्यांना दोरखंडाने गच्च बांधून टाकले. आणि बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. किती दिवस चालत होतो माहित नाही. पण चालताना मधे मधे बर्‍याच बायका खाली पडायच्या. त्यांच्या कडे ढुंकूनही न बघता त्या लोकांनी आम्हाला चालवतच ठेवले. काय झाले असेल त्या बायकांचे? बाप रे!!! विचारही करवत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस चालता चालता मला एकदम एका झाडाखाली माझं बाळ दिसलं. काही समजायच्या आतच मी त्या झाडाकडे धाव घेतली. त्याच क्षणी मोठा काडकन् आवाज झाला आणि माझ्या पाठीवर आगीचा डोंब उसळला. मी भानावर आले. माझं बाळ नव्हतंच तिथे. मला भास झाला होता. आवाज आणि चाबकाचे फटके मात्र चालूच होते. शेवटी मी खाली पडले... पुढचं आठवत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;देवा!!! कसले रे हे लोक? हा काय प्रकार चालू आहे? त्यापेक्षा मरण का नाही देत मला? अजून किती छळ करणार आहेस माझा? माझं बाळ सुखरूप असेल ना? &lt;br /&gt;&lt;br /&gt;एका रात्री, तो प्रसंग, ज्याची भिती होती, तो आलाच. मी खूप ओरडले, रडले, नुकतीच बाळंत झाले आहे, परोपरीने विनवले... पण त्याने सोडले नाही. रात्रभर चालू होते. पहिल्या तिघांनंतर मी बेशुध्द झाले. नंतर काय झाले ते माहित नाही. परत शुध्दीवर आले तेव्हा मला दोन माणसांनी एका काठीला बांधून खांद्यावर घेऊन चालले होते. मला शुध्द आलेली बघून लगेच खाली उतरवले आणि पाणी पाजून चालायला लावले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसा चालायचे आणि रात्री मुक्काम... मुक्काम झाला की, आज कोणाची पाळी हाच विचार सगळ्याजणी करायच्या. दिवसा चालणे बरे, रात्र नको असे चालू होते. दिवस जात होते, रात्री जात होत्या. आम्ही पाय ओढत ओढत चाललो होतो. जरा कुठे पाऊल अडखळले की चाबूक पडलाच पाठीवर. मधे एक तळं होतं त्यात उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला काहीजणींनी, पण त्या माणासांनी त्यांना बाहेर काढलं आणि परत तेच.... जीवघेणी मारझोड. धड मेला जीवही जात नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस खूप मोठा आवाज यायला लागला. वाराही सुटला होता. थोड्या वेळाने एक मोठ्ठे पांढरे घर दिसले. एवढे मोठे घर!!! बाप रे!!! आणि जसजसे ते घर जवळ आले तसतश्या बायका किंचाळायला लागल्या. असले भयानक लोक याआधी कधीच बघितले नव्हते आम्ही कोणी. पांढरेफट्टक!!! विचित्र चेहरे!!! केस सोनेरी!!! तोंडावर पण केसच केस. शी: !!! भयानक. राक्षसांनी जबरदस्तीने आम्हाला सगळ्यांना त्या घरात नेले आणि एका मोठ्या खोलीत ढकलून दिले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खोलीत मिट्ट अंधार आणि.... अक्षरशः किळसवाणी दुर्गंधी. आमच्या आधीच अजून बर्‍याच बायका तिथे होत्या. खोलीत उभं रहायची पण जागा नव्हती. आणि खालची जमीन अगदी निसरडी आणि ओली झालेली होती. खोलीत पाऊल टाकल्या टाकल्या काहीजणीतर भडभडून ओकल्या. आधीच्या वासात अजून भर पडली. त्या वासाने श्वासदेखील बंद झाला. तशाच थकव्याने आलेल्या ग्लानीत सगळ्या दाटीवाटीने उभ्या होतो. बायका आळीपाळीने बसत होत्या. पण खाली बसायची पण इच्छा होत नव्हती इतकी खालची फरशी घाण होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळ झाली तसा खोलीत थोडा उजेड आला. डोळे खरेतर अंधारालाच सरावले होते. तो थोडासा उजेडही सहन होत नव्हता. उजेडामुळे त्या भयानक वासाचे कारणमात्र कळले. त्या बायका त्यांचे सगळे विधी तिथेच, बसल्याजागीच, करत होत्या बहुतेक. आणि काहीजणी तर... त्या घाणीतच ते सगळं मिसळलेलं. त्यानेच ती जमीन निसरडी झालेली. पण ज्या बायका तिथे आधी आल्या होत्या त्या आता त्या सगळ्याच्या पलिकडे पोचल्या होत्या. थोड्याच दिवसात मी पण निर्जीव होईन... तो पर्यंत धीर धरायचा... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;ब्रिगेडियर विल्हेल्म व्हान डाइक&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कमांडर्स लॉगबुक, &lt;br /&gt;ता. २७ मार्च १६६७&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक दिवस गेला. आज अजून माल आला. यावेळचा माल जरा बरा आहे. मागचे जहाज गेल्यापासून जवळ जवळ अडिचशे जिन्नस आले आहेत. यावेळी पुरूष कमी आहेत आणि मुलं व बायका जास्त आहेत. पुढचं जहाज येईपर्यंत पुरूष वाढवले पाहिजेत. नाहीतर जहाजाची फेरी तोट्यात जाईल आणि कंपनीच्या डायरेक्टर्सकडून तंबी मिळेल ती वेगळीच. काही तरी केलेच पाहिजे. दोन तीन दिवसांनी अशांतीला एखादी चक्कर मारावी आणि तिथल्या लोकांना जरा सरळ करावं हेच ठीक राहिल. पुरूष काय सगळे गायब झाले की काय एकदम? का हे हरामखोर अशांती त्या इंग्रजांना परस्पर विकत आहेत चांगला माल? आणि गाळ इथे आणत आहेत? लक्ष ठेवले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नशीब, आजपण बहुतेकांनी जेवण घेतले निमूटपणे. एवढं चांगलं मिळतं ते खायचं सोडून फेकून देतात. परवा दोन बायकांना असं काही फोडून काढलं आणि बेशुध्द होईपर्यंत उन्हात उभं केलं की, नंतर सगळेच निमूटपणे जे समोर येईल ते खात आहेत. पण हा परिणाम आठदहा दिवस टिकतो. मग परत तेच. ते काही नाही. मधनं मधनं दोघाचौघांना फोडून काढलं पाहिजे, म्हणजे मग नीट राहतात. इलाज नाही. हडकुळ्या जिन्नसांना भाव येत नाही नीट आणि एवढी सगळी मेहनत वाया जाते. जेवढा माल जमलाय तेवढ्याची तपासणी सुरू करून द्यावी उद्याच. नाही तर जहाज आले की खूप गडबड उडून जाते. आणि जहाज दिसलं की हे रानटी राक्षस बिथरतात, जहाजात चढायला घाबरतात,  अजिबात आवरत नाहीत कोणाला... आणि मग तपासणी उरकून घ्यावी लागते गडबडीत. डॉक्टर झूसना उद्याच हुकूम जारी करून टाकावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फादर व्हान डेर वाल नाराज आहेत. चर्चमधली उपस्थिती खूप कमी झालीय म्हणे. कमीत कमी रविवारी तरी उपस्थिती सक्तीची केली पाहिजे म्हणत होते. हरकत नाही. हुकूम जारी केला पाहिजे. म्हातारं खुश होईल तेवढ्यावर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजकाल घरची फार आठवण येते आहे. ख्रिस्टिनाचा वाढदिवस होता काल. सतरा पूर्ण केले. मागच्या पत्रात खूप हट्ट केला होता तिने... नाही जमले वाढदिवसाला जायला. सहा महिन्याची काय तीन महिन्याची पण सुट्टी नाही सध्या. सिझन चालू आहे... जंगलातून एकदा का पावसाळा चालू झाला की माल यायला उशिर होतो आणि माल कमीही येतो. याच दिवसात काय ती जास्तीची कमाई. जाऊ दे. जाईन तेव्हा तिच्यासाठी खूप छान छान वस्तू घेऊन जाईन. जमलंच तर खास तिच्यासाठी म्हणून दोन जिन्नस घेऊन जाईन. घे म्हणावं तुझ्या खाजगी मालकीच्या पोरी. खुश होऊन जाईल एकदम. असंच करावं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण यावेळी बायका जास्त आल्या हे एकापरीने चांगलेच. माल जाईपर्यंत मजा येणार एकंदरीत. बाकीचे लोक पण खुश आहेत. या ओसाड जागी बायकापोरं घेऊन रहायचं म्हणजे शक्यच नाही. आणि नुसतं रहायचं म्हणजे हे शिपाई एकमेकांचा जीव घेतील!!! जहाज येईपर्यंत मजा करा लेको. मग आहातच तुम्ही परत एकटे.... नविन माल येई पर्यंत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला, उशिर झाला. आजची पोरगी तयार झाली असेल एव्हाना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;क्रमशः&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-1097038644169147800?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/1097038644169147800/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=1097038644169147800' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/1097038644169147800'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/1097038644169147800'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/11/blog-post_11.html' title='परवशता पाश दैवे... २'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s72-c/DSC01279.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-5254434787819365088</id><published>2009-11-10T02:40:00.000+04:00</published><updated>2009-11-10T02:42:52.753+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवासवर्णन'/><title type='text'>परवशता पाश दैवे... १</title><content type='html'>&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s400/DSC01279.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #990066;"&gt;ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;- १&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडगार पहाटवार्‍याच्या झुळकीने आणि पक्ष्यांच्या आवाजाने मेन्साह हळूहळू जागा झाला. बराच वेळ तसाच बसून होता तो. आख्ख्या गावात ही त्याची सगळ्यात आवडती जागा होती. घरामागच्या अंगणातल्या भल्याथोरल्या झाडावरची ही जाडजूड फांदी. कधीही करमेनासे झाले की तो निवांत इथे बसायचा. कधी कधी तिथेच झाडाच्या बेचक्यातच झोपायचा तो. इथून सूर्य, चंद्र, तारे, गावाबाजूची नदी अगदी सगळं सगळं कसं स्वच्छ दिसायचं. खाली उतरलं की गावाच्या कुंपणामुळे नदी दिसायचीच नाही. आणि आजकाल सारखं सारखं नदीवर जाता पण यायचं नाही. आई सारखं लक्ष ठेवून असायची. आजकाल अचानक गावातली मुलं माणसं नाहीशी होत असतात म्हणे. कोणी म्हणतं की पूर्वजांचा कोप झालाय, कोणी म्हणतं की शेजारच्या गावातले लोक त्यांना पळवून नेतात. खरंच असावं ते... गायब झालेला एकही माणूस कधीही परत दिसला नाही. तेव्हापासून कधीही मनासारखं नदीत डुंबायची पण सोय नाही राहिली. मेन्साहला अगदी कंटाळा यायचा. नदीवर जायचं किंवा जंगलात हुंदडायला जायचं तर बरोबर भरपूर हत्यारबंद मोठे लोक असले तरच. पण त्यात काहीच मजा नाही ना!!! थोडं इकडे तिकडे गेलं की लगेच ओरडायला लागतात ते. आणि मोठ्या लोकांना कंटाळा पण फार लवकर येतो. चारपाच सूर मारले पाण्यात की लागलेच ओरडायला आटपा आटपा म्हणून. अगदी कंटाळवाणं झालं होतं त्याला. तरी बरं घरातल्या घरात खेळायला धाकटी बहिण अगोसी तरी होती. पण ती तरी काय आणि किती खेळणार. त्यात परत मुलगी. काही झालं की लगेच आईला हाक मारते. जाऊच दे. आज कसंही करून कुंपणाच्या बाहेर जायचं म्हणजे जायचंच. तेवढीच मजा. बेत पक्का. कोणी आलं बरोबर तर ठीकच. नाही तर एकटाच. तसा मेन्साह फारच स्वच्छंदी. एवढासा लहान पण उनाडक्या मात्र फार त्याला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बर्‍याच वेळाने मेन्साह खाली उतरला. आईची नजर चुकवून हळूच घराबाहेर सटकला. सावधपणे फिरत फिरत कुंपणाच्या दिशेने सरकायला लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं... त्याच्यामागे कोणीतरी आहे. गर्रकन वळून बघतो तो अगोसी त्याच्या मागेच उभी होती. हे एक लफडंच आता. हिला कसं टाळावं? आणि ही बरोब्बर जाऊन आईला सांगणार. त्यापेक्षा हिलाही सामिल करून घ्यावं हे बरं. नदीवर जायचंच आज. योग्य ती मांडवली झाली आणि बहिण भाऊ दोघे निघाले हळूच. कुंपणाच्या एका बाजूला एक अगदी लहानसा भाग थोडा मोकळा झाला होता. अगदी एखादं लहान मूल सरपटत जाऊ शकेल एवढं. दोघांनी मिळून ते भोक थोडं अजून मोठं केलं आणि सरपटत बाहेर गेले. समोरच नदी. मेन्साह आणि अगोसी धावतच गेले आणि नदीत उड्या मारल्या. मनसोक्त डुंबले दोघे. बर्‍याच वेळाने बाहेर आले आणि एका झाडाखाली अंग वाळवत बसले. तेवढ्यात मेन्साहला झाडामागे काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने मान वळवली, पण त्या आधीच एक जाडजूड राकट हात आधी त्याच्या तोंडावर आला आणि मग डोळ्यावर. &lt;br /&gt;&lt;br /&gt;डोळ्यापुढे अंधार व्हायच्या आधी त्याला अगोसी दिसली... एक भलामोठा माणूस तिचे तोंड दाबत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;- २&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाळाला पाजता पाजता ते झोपून गेलं. त्याला हळूच खाली ठेवून आकोसिवाने परत एकदा दाराकडे नजर फिरवली. दिवस पार डोक्यावर आला पण अजून कोमीचा पत्ता नाही. भल्या पहाटे उठून सावकाराकडे गेला होता. चारच दिवसापूर्वी सासरा वारला. त्याचं सगळं दिवसपाणी करायचं म्हणजे केवढा खर्च. नातेवाईक होतेच म्हणा मदतीला पण खर्चच खूप मोठा. सावकाराचं तोंड बघितल्याशिवाय उपायच नाही. पण सावकार म्हणजे मोठी असामी. पार राजापर्यंत पोच त्याची. त्याचं नुसतं दर्शन व्हायलाच नशिब लागतं. तो काय असा सुखासुखी भेटतो का... कोमीला उशिर होणार हे गृहितच होते. पण दिवस डोक्यावरून बाजूला गेला तरी अजून त्याचा पत्ता नाही. काळजीने आकोसिवा पार घाबरून गेली. आता कसं आणि कुठे शोधावं. परत हे बाळ लहान पदरात. आत्ताशी कुठे दोन अंधार्‍या रात्री होऊन गेल्या आहेत. अंगावरच पितंय ते अजून. सासरा होता आधाराला, तो ही गेला. अजून रांधायचं राहिलं होतं. दमून भागून कोमी येईल तर त्याला काहीतरी पुढ्यात सरकवायला पाहिजेच. त्याच विचारात ती उठली आणि चुलीपाशी जाऊन बसली. एकदम तिच्या लक्षात आलं... काटक्या संपल्याच आहेत की!!! हे मात्र फारच मोठं संकट आता. आता या वेळी कुठून आणू लाकडं? सकाळी पोराच्या रगाड्यात राहूनच गेलं. विसरूनच गेलं. आता मात्र काही तरी करणं आवश्यक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण पोराला टाकून कसं जायचं? शेजारच्या अयावाला पोराकडे थोडावेळ बघ म्हणून सांगून ती रानाकडे निघाली. आत्तापुरत्या काटक्या मिळाल्या तरी पुरे. बाकीचं नंतर बघू. सगळ्या बायका सोबतीने सकाळीच जाऊन आल्या होत्या. एकटं दुकटं रानात फिरणं आजकाल फारच धोकादायक झालं होतं. काय काय ऐकायला यायचं. लोक अचानक गायब होतात म्हणे रानात. कोणी नदीतच गायब. म्हातारा आदोबायो म्हणतो की रानातले आत्मे फार असंतुष्ट झालेत सध्या आणि त्यांना माणसं खायची चटक लागली आहे आजकाल. माणूस गेला की परत त्याचं नखही दृष्टीस पडत नसे. जसा काही तो हवेतल्या हवेत विरघळून जातो. नाही म्हणायला काही तरूण पोरं गेली माग काढायला रानामधे. पण ती सुध्दा गायबच झाली. त्यानंतर परत कोणाची माग काढायला जायची पण हिंमत नाही झाली. शक्य तेवढं घोळक्याघोळक्याने रानात जायचं आणि लवकरात लवकर परत यायचं, हाच काय तो उपाय. आज मात्र नाईलाज म्हणून अगदी जीवावर उदार होऊनच चालली होती आकोसिवा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रानात फार आत न जाता ती भराभर काटक्या गोळा करायला लागली. कुठे काही आवाज येतोय का यासाठी ती फार सावध होती. तेवढ्यात तिला काही तरी विचित्र जाणिव झाली. कोणीतरी तिच्या अगदी जवळ आले आहे हे स्पष्टपणे जाणवले. तिला आपण अगदी उलटे पालटे होत हवेत तरंगत आहोत असेही वाटले. मग तिला कळले की तिचा पाय एका दोरीत अडकलाय आणि ती झाडाला लटकते आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;डोक्यावर फटका बसण्यापूर्वी तिला एवढेच कळले, एक भलामोठा काळाकभिन्न धिप्पाड माणूस तिच्या बाजूला उभा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;- ३&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिपाई दारात उभे राहिले तेव्हा आतल्या बाजूला अनानी नुकताच जेवायला बसायच्या तयारीत होता. कालच्या शिकारीत भलं मोठ्ठं डुक्कर सापडलं होतं. दहाबारा लोकांना अगदी पुरून उरलं होतं ते. शेवटी अनानीच्या भाल्याच्या अचूक वारालाच बळी पडलं होतं ते. तरी सुध्दा पळत राहिलं ते. खूपच दमवलं बेट्याने. पण शेवटी सापडलंच. अनानीचा नेम अचूक. सकाळी सूर्य उगवणार नाही एखाद वेळेस, पण अनानीने भाला फेकला आणि तो लागला नाही असं होणारच नाही, असं आख्य्ख्या पंचक्रोशीतली माणसं छातीवर हात ठेवून म्हणायची. भलं मोठं डुकराचं धूड घेऊन सकाळीच परतले होते सगळे. एवढं मोठं डुक्कर बघून सगळेच खुष झाले होते. आपल्या वाट्याचं डुक्कर आईच्या तावडीत देऊन अनानी मस्त पसरला. त्याला जाग आली तीच मुळी डुकराच्या खमंग वासाने. तसाच तोंड धुवून तो जेवायला बसणार एवढ्यात दारात शिपाई हजर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजाने बोलावणं धाडलं होतं. काही दिवसांपासून गडबड चालूच होती. लवकरच त्यांच्या गावावर अशांति हल्ला करणार हे बहुतेक नक्की झाल्यातच जमा होतं. तसेही हे अशांति लोक जरा भांडखोरच. निमित्ताची वाटच बघत बसलेले. कुठे काही खुट्ट झाले की लगेच लढाया मारामार्‍या करायला धावतात. आणि त्यात परत आजकाल त्यांच्याकडे काहीतरी नवीनच हत्यारं आली आहेत म्हणे. नुसता आवाज होतो आणि समोरची दोनपाच माणसं जागीच पडतात, त्यांच्या अंगातून रक्त येतं, पण बाण नाही भाला नाही सुरा नाही... नुसताच आवाज येतो म्हणे. काही तरी चेटूक नक्कीच. पण अनानी असल्या चेटकाला वगैरे घाबरणार्‍यातला नव्हता. त्याच्या जन्माच्यावेळी गावच्या म्हातार्‍याने त्याच्यासाठी खास, रानातनं एक सिंहाचं नख आणलं होतं आणि त्याने त्याची नाळ कापली होती. अनानीला नेहमी तो सिंह आपल्या बाजूला आहे आणि आपले रक्षण करतो आहे असे वाटायचे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिपायांना पंगतीला घेऊन अनानीने जेवण पूर्ण केलं आणि निरोप घेऊन तो निघाला. नेहमीप्रमाणे आईच्या डोळ्याला पाणी आलं. पण माया तोडून, तिच्या नजरेला नजर न देता तो तिथून गडबडीने निघाला. नाहीतर त्याच्याही डोळ्यात पाणी आलं असतं. आणि सगळ्या गावभर त्याची छी:थू झाली असती. गावातले असेच अजून वीसपंचवीस लोकसुध्दा निघाले त्यांच्याबरोबर. दिवसभर चालल्यावर रात्री मुक्कामाला राजाच्या गावात पोचले ते. रात्री जेमतेम झोप लागते न लागते तोच, अशांतीचा हल्ला झाला. खूप गदारोळ झाला. अनानीने अगदी शिकस्त केली. चारपाचांना तर अगदी सहज लोळवले त्याने. पण शेवटी अशांतीच्या नवीन हत्याराने जादू केलीच आणि अनानी आणि त्याच्या साथीदारांना माघार घ्यावीच लागली. तेवढ्यात अंधारात कोणीतरी त्याला घट्ट पकडलं आणि दोरीने बांधलं. सकाळ होई होईपर्यंत सगळं शांत होऊनसुध्दा गेलं होतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनानीचा राजा मारला गेला होता. सगळं उध्द्वस्त झालं होतं. अशांतींनी गाव जाळलं आणि जे सापडतील ते लोक, पकडलेले सैनिक वगैरेंना बांधून ते चालू पडले. नदी ओलांडताना अनानीने मागे वळून बघितले, त्याला क्षणभर भास झाला, तो सिंह अजून त्या गावाच्या वेशीवरच थांबला आहे. म्हणजे!!! सिंहाने साथ सोडली की काय? नाही नाही... असे कसे... आत्ता पर्यंत बेफिकिर असलेला अनानी एकदम भानावर आला आणि त्याच्या हातापायातले त्राणच गेले एकदम. तो खाली कोसळला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पडता पडता त्याला एवढेच जाणवले... कोणीतरी त्याच्या अंगावर चाबकाचे फटके मारत आहे आणि त्याला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;- ४&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाडी शहराबाहेर पडली आणि गाडीचा वेग वाढला. वेग वाढला तसा गाडीतल्या एसीचा थंडावाही वाढला आणि हा सुखावला. मस्तपैकी पाय ताणून देत त्याने अंग मागे झोकून दिले. बाहेर पावसाळी हवा होती. मधेच थोडा पाऊसही लागला होता. हवा कुंद वगैरे म्हणतात तशी होती. पण हा मात्र बराच एक्सायटेड होता. बर्‍याच वर्षांपासून मनात होते ते आज पूर्ण होणार होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळूहळू, जीव सुखावल्यामुळे, डोळेही जडावले. एकीकडे, जिकडे चालला होता त्याबद्दल, विचार चालू होते मनात. डोळे मिटता मिटता याचं मन एकदम पंचवीस तीस वर्षं मागे, भूतकाळात गेलं. असाच पावसाळी मोसम. शाळा सुरू होऊन दोनेक महिनेच झाले होते. अशीच कुंद हवा. कंटाळवाणा गणिताचा तास अगदी संपण्यात होता. पुढचा तास इतिहासाचा. म्हणजे आवडीचा. त्या तासाची वाट बघण्यात गणिताचा उरलेला तास बराच सुसह्य झालेला. बेल झाली आणि क्षणार्धात गणिताचं पुस्तक आत दप्तरात गेलं, इतिहासाचं पुस्तक बाहेर आलं. सातपुतेबाई बाहेर उभ्याच होत्या. त्या नेहमीसारख्या भरभर चालत टेबलापाशी गेल्या. या बाईही आवडीच्याच. इतिहास शिकवता शिकवता बरंच काही सांगायच्या. आयुष्यात समाजाकडे बघायची दृष्टी असते त्याचं भान बाईंनीच नकळत दिलेलं. अगदी गप्पा गोष्टी करत सगळं चालायचं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दिवशी मात्र बाईंनी जो धडा शिकवायला घेतला त्याने मात्र हा अगदी गुदमरून गेला. असंही घडतं जगात? माणसं अगदी आपल्यासारख्या दुसर्‍या माणसांशी असं वागू शकतात? आणि एक नाही दोन नाही करोडो माणसांनी हे भोगलं? शेकडो वर्षं हे चाललं होतं? कोणालाच काही वाटत नव्हतं? त्या इतिहासाच्या पुस्तकातली, सभ्य घरातल्या सन्मार्गी मुलामुलींना रूचतील अशी चित्रं एकाएकी बदलून, त्यांच्यामागची खरी भयानक चित्रं समोर आली. बाईंनी नुसत्या शब्दांनी ती उभी केली याच्या डोळ्यांसमोर. तेव्हापासून आजतागायत याला या विषयाबद्दल भयानक कुतूहल वाटत आलेलं. मोठं होता होता जमेल तेव्हा जमेल तसे वाचन करताना या विषयावर बरीच माहिती गोळा केली याने. शाळेत का कॉलेजात असतानाच 'एक होता कार्व्हर' नजरेस पडलं होतं. त्यातनं या लोकांच्या यातनांचं झालेलं दर्शन याला बरेच दिवस अस्वस्थ करून गेलं. ती अस्वस्थता पूर्णपणे गेलीच नाही कधी. अजूनही कधी कधी तो न पाहिलेला छोटा जॉर्ज मनात दिसतो. आई बापांपासून तोडला गेलेला, दुबळा, अशक्त, मायेचे फार कमी क्षण वाट्याला आलेला. पण भयानक चिवट. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याला या लोकांच्या शारिरिक कष्टांबद्दल, छळाबद्दल भरपूर वाचायला मिळाले होते. पण याला खरे वाईट वाटायचे, ते या लोकांच्या 'तुटण्याबद्दल'... आपापल्या आयुष्यात रमलेले हे लोक असे अचानक एकाएकी बाजूला फेकले गेले... आई बाप बायको नवरा मुलं बाळं आप्त... संपलं, एका क्षणात संपलं अगदी. कोणतीही पूर्वसूचना न देता, मनाची तयारी न होऊ देता... नियतीने घाला घातला आणि चालत्या बोलत्या स्वतंत्र माणसांचे केवळ बाह्य स्वरूप माणसाचे असलेले जनावर करून टाकले... या जनावराला मन, भावना वगैरे बाळगण्याची मुभा नव्हती. पण मन असे थोडेच जाते. ते तर सतत आपल्या बरोबरच येते आणि शेवटपर्यंत साथ देते. या लोकांना किती मानसिक यातना झाल्या असतील? आपल्याबरोबर काय होते आहे? काय होणार आहे? त्यात परत शारिरीक यातना. आप्तांचे, गावाचे शेवटचे दर्शन... त्या क्षणी पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची काही कल्पना नाही... कसे झाले असेल त्यांना? जेव्हा कधी मरण आले असेल तेव्हा, आईच्या मऊमऊ हाताची आठवण आली नसेल? घरातून निघताना बिलगलेल्या बायकापोरांची याद आली नसेल? जे लगेच मेले नाहीत पण कित्येक वर्षं लांबलेलं दिर्घायुष्य ज्यांच्या नशिबी आलं त्यांचा जीव असा सुखासुखी गेला असेल? ज्यांच्यामुळे हे भोग वाट्याला आले त्यांना शाप दिले नसतील? आणि त्या लोकांना हे तळतळाट भोवले नसतील? त्यांच्या शेवटच्या क्षणी हे पाप त्यांच्या भोवती फेर धरून नाचलं नसेल? &lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळेच भयानक, अगदी मुळापासून हलवून टाकणारे. अंतर्मनात खोलवर हे अगदी रुतून बसलेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याला प्रत्यक्ष आफ्रिकेत जायचा योग आला, नोकरीनिमित्ताने. आफ्रिकेचे आकर्षण होतेच मनात. पण संचारही वाढला. त्यामुळे हा खुष होता. एके दिवशी कळलं की ज्या ठिकाणी या भयानक नाट्याचा एक फार मोठा अंक खेळला गेला ते ठिकाण हा नेहमी जिथे जायचा त्या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अंतर्मनातलं आकर्षण उसळून बाहेर आलं. कसंही करून तिथे जायचंच. विचार पक्का ठरला आणि एक दोन मित्रांना घेऊन हा निघाला....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;क्रमशः&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-5254434787819365088?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/5254434787819365088/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=5254434787819365088' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/5254434787819365088'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/5254434787819365088'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='परवशता पाश दैवे... १'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Su2U5_CFjEI/AAAAAAAABZY/_7yvBTZ4Mzk/s72-c/DSC01279.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-8344309872581528218</id><published>2009-09-11T18:47:00.000+04:00</published><updated>2009-09-11T18:49:02.088+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>भेट...</title><content type='html'>टर्रर्रर्रर्र...&lt;br /&gt;&lt;br /&gt;घड्याळानं भोकाड पसरलं आणि अगदी एका सेकंदात आबासाहेबाचा सरावलेला हात गाप्पकिनी त्या घड्याळाच्या डोक्यावर आपटला. घड्याळाचा आवाज बंद. आबासाहेबानं नुसती कूस बदलल्यासारखी केली आणि परत पहाटेच्या गुलाबी थंडीत विरून गेला. खरं तर आबासाहेबाला घड्याळाची गरजच नव्हती. शाळेत असल्यापासून पहाटे ५ वाजता उठायची सवय लागली होती. आणि आता गेल्या १०-१२ वर्षात तर ही सवय इतकी अंगवळणी पडली होती की एकवेळ घड्याळ बंद पडेल पण आबासाहेबाचा डोळा ५ वाजता उघडणार नाही असं होणारच नाही. शाळेत कॉलेजात अभ्यास तरी असायचा, आता तेही नाही, तरीही येतेच जाग. लोळता लोळता आबासाहेबाला परत छान डुलकी लागली. थोड्यावेळानं खिडकीतून ऊन आत, अगदी डोळ्यावर आलं तसं तो एकदम भानावर आल्यागत उठून बसला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;डोळे चोळत त्यानं आजूबाजूला बघितलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की इतकावेळ आपल्या बाजूला सुमी झोपली आहे असं वाटत होतं ते स्वप्नच होतं. एक क्षणभर तो अगदी कावल्यागत झाला. दबा धरून बसलेलं मांजर आता अगदी दूधाच्या पातेल्यावर झडप घालणार आणि तेवढ्यात त्याच्या पाठीत काठी बसावी अस्सं झालं अगदी त्याला. पण मग त्याला स्वतःचंच हसू आलं. आपल्याच हाताने डोक्यावर टपली मारत तो उठला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'आबासाहेब, हितं कुटली आली सुमी? तुमचे तुमीच हितं. उटा आनि आवरा. ऑफिसला जायला उशिर होतोय.' स्वतःला समजवल्यागत करत तो चटचट आवरायला लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरंतर आबासाहेबाला जिल्ह्याच्या गावात एकटं राहणं अगदी जीवावर यायचं. कॉलेजात जाईपर्यंत गावात उंडारत आयुष्य काढलेलं त्यानं. अभ्यासात बरा होता म्हणून बापानं हौसेनं शिकायला कॉलेजात धाडलं त्याला. शहराचं आकर्षण असल्यानं आबासाहेबही खुश झाला होता. पण नव्याची नवलाई ओसरल्यावर 'गड्या आपुला गाव बरा...' असंच वाटायला लागलं त्याला. पण इलाज नव्हता. शिक्षण आवश्यक होतंच. त्याचं घराणं खरं तर तालेवार. एके काळी आपली पाचसहाशे एकर शेती होती असं त्याचा बाप त्याला नेहमी सांगायचा. पण पुढे कूळकायद्यात बरीचशी जमीन गमावली, उरलेली भावकीत वाटण्यात गेली आणि अगदी किरकोळ २५-३० एकर तेवढी राहिली हातात. आबासाहेबाच्या आज्ज्यापर्यंत तर घरात सावकारीही होती आणि जमिनदारीही. आख्खं गाव पायापाशी उभं राहत होतं. दरारा एवढा की वाड्यासमोरून जाताना लोक जोडे हातात घेऊन जात होते. पण जमिनी गेल्या, सावकारी संपली आणि दरारा गेला. समानतेच्या लाटेत जमिनदाराचं घराणं भुईसमान झालं. पण आबासाहेबाच्या बापानं, रावसाहेबानं सगळ्यांशी दिलजमाईचं धोरण ठेवल्यानं आन् संबंध राखल्यानं गावात अजूनही थोडाफार मान होता. पंचवीस एकर जमीन तीन भावात वाटल्यावर काय शिल्लक उरणार आन् कोणाची पोटं भरणार या विचारानं आबासाहेब कॉलेज संपल्यावर तिथं जिल्ह्यालाच नोकरी धरून राहिला. बर्‍यापैकी चेहरामोहरा आणि चालणारं डोकं या बळावर लवकरच तो नोकरीतही व्यवस्थित स्थिरस्थावर झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाव तसं फार लांब नव्हतं. एस्टीनं चारेक तासच. पण दर एक दोन दिवसाआड कोणी ना कोणी तरी यायचंच तिथून काहीबाही कामासाठी. त्यांच्याबरोबर माय पाठवायची काहीतरी. कधी भाजी, कधी घरचं तूप, कधी नुसतंच पत्र असं चालायचं. त्यामुळे आबासाहेबाला जरा थंडावा मिळायचा. पंधरा दिवसातून एखादी चक्कर तो स्वतः मारायचा. पण सहा महिन्याखाली लगिन झालं, सुमी आयुष्यात आली आन् आबासाहेबाला करमंना झालं शहरात. बरं सुमीला हिकडं आनावं म्हनावं तर ते पण बरुबर दिसंना. त्यानं एकदा नुसतं हळूच विषय काढायचा प्रयत्न केला तर चुलती फिस्सकनी अंगावर आली त्याच्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मोठी सून हाये ती. येवडी वर्सं तुझ्या मायनं केलं समद्यांचं आन् तू घेऊन चालला लगी तिला. तितं राजा-रानी र्‍हावा मजेत आन् हितं म्हातारा म्हातारी करतेतच अजून दुसर्‍यांचं." &lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्या बायका फिदीफिदी हसल्या होत्या. आबासाहेबाला कुटं तोंड लपवावं असं झालं होतं. सुमी पण मान खाली घालून पदर तोंडात धरून हसत होती. त्यानं तर अजूनच चिडला होता आबासाहेब. पण नंतर सुमीनंच समजूत काढली होती त्याची. असं वागणं शोभून दिसणार नाही, आपल्याला चार लोकांत रहायचं आहे, थोडं दमानं घ्या. थोडे दिवस जाऊ द्या मग हळूच जमवून आणू आपण, असं समजवल्यावर आबासाहेबाला पण हुरूप आला. अशी समजूतदार बायकू मिळाल्याबद्दल त्यानं खंडोबाला मनोमन नमस्कार घातला. आणि नाईलाजाने का होईना पण नोकरीच्या गावी रुजू झाला. तेव्हापासून हे असं चालू होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्तासुध्दा तोंड धुताना, दाढी करताना आरशासमोर उभं राहिल्यावर त्याला सुमीच दिसत होती. पण आता पुढची चक्कर आलीच आहे चार पाच दिवसांवर या विचाराने त्याने मनाला लगाम घातला आणि निमूटपणे आवरून ऑफिसच्या रस्त्याला लागला. पण आज काय त्याचं चित्त थार्‍यावर येईना. सारखी सुमीची आठवन यायलागली. कसातरी ऑफिसात पोचला आणि मग मात्र जरा ते मागं पडलं. नेमका दुपारी गावाकडचा कैलास ऑफिसात हजर. आबासाहेबाला अगदी तापल्या रानावर हलकेच पाऊस पडून जावं तसं झालं. आज लई आटवन यायलागली होती आन् आला बाबा हा कैलास. कैलास तर त्याच्याच वयाचा, शाळूसोबती. चार घटका त्याच्या संगतीत घालवल्यावर आबासाहेब शांत झाला. कैलासनं रावसाहेबांची चिठ्ठी आणल्याली. त्यानं गडबडीनं पाकिट फोडलं. त्यातनं दोन कागद निघाले. नेहमी चार ओळी लिहिणार्‍या रावसाहेबांनी आज चक्क २ पानांचं पत्र लिहिलंय!!! त्यानं कागद समोर धरला. त्यात लिहिलेलं,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #0000FF;"&gt;चिरंजीव आबासाहेबांस,&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेक आशिर्वाद, उपरी विशेष. सध्या गावात थोडीफार थंडीतापाची साथ चालू आहे, बरेच लोक आजारी आहेत. चार पाच मयती झाल्या आहेत. तरी आम्ही सगळे रानात रहायला जात आहोत. खबरदारी म्हणून. घरात कोणासही त्रास नाही.  महादा राखणीला म्हणून राहिल वाड्यावर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी क्षेम. काळजी नसावी. यावेळचे येणे थोडे लांबवता आले तर उत्तम. काळजी घ्या, तब्येतीला जपा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रावसाहेब.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आबासाहेबाने घाईघाईने दुसरा कागद उलगडला. त्यात लिहिलं होतं,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #FF66CC;"&gt;आवो, या ना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुमी&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीच आज आबासाहेबाचं चित्त भरकटलं होतं, आता तर पार ढेपाळलाच गडी. कैलासनेच जरा समजूत घालून शांत केले त्याला. गावात तशी काही फार गंभीर परिस्थिती नाहीये. काळजी घेतली तर आटोक्यात येईल. आबासाहेबाला नीट समजवून कैलास निघून गेला. आबासाहेबाला मात्र काही गोड लागेना. त्याची पंचाईतच झाली होती. ऑफिसचं इनिस्पेक्शन दोन दिवसावर आल्यालं, रजा घेता येईना. आन् गावात फोन तरी कुटं करनार. आख्ख्या गावात फक्त दोन फोन. एक पंचायतीच्या कार्यालयात आन् दुसरा पतपेढीच्या कार्यालयात. जरी केला फोन तरी तिथं सुमी कशी येणार? मोठ्या मुश्किलीने त्याने कसेबसे दोन दिवस घालवले. घालमेल चालूच होती. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद व्ह्यायच्या वेळी नेमका फोन आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'हॅलो, कोण?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आवो...'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सुमे.... तू?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;आबासाहेब हातभर उडालाच. आत्ता या वेळेला सुमीचा फोन? आन् ती कशी काय फोन करतीये? कुठनं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आवो, ओरडू नका. मला लै आटवन यायलागली. म्हनून म्हादूकाकाला सांगाती घेऊन आले मी हितं पंचायतीच्या हापिसात. तुमी या ना.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'अगं पण आत्ता संध्याकाळ व्हायलीये... गाडी गेली आसंल. आता कसं निगू?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ते काय मला माहित नाय. तुमी या मंजी या. आन् ऐका, रानात कोनीच न्हाय. समदे आत्याबाईकडे गेले हायेत आज दुपारच्याला. मी उगाच कंबर धरल्याचं नाटक करून मागं र्‍हायले. रानात येकटी नको म्हनून आज वाड्यावरच हाय, महादूकाका हाय सोबतीला. बरं मी ठिवते फोन, लोकं बघायलेत.' सुमीनं धाडधाड गाडी सोडून फोन बंद केला सुध्दा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आबासाहेब खुळ्यागत बघतच राहिला. आता काय करावं? कसं जावं? आज मात्र त्याला स्वतःला आवरता येत नव्हते. आलंच नाही. इनिस्पेक्शनही झालंच होतं. त्याने साहेबाला २ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला आणि तडक दिलप्याच्या घरी थडकला. दिलप्या त्याचा कॉलेजपासूनचा दोस्त. मारवाड्याचा. घरी तीनचार मोटरसायकली वगैरे बाळगून असणारा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'दिलप्या लेका एक काम कर रे माजं...'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आरं बोल की... '&lt;br /&gt;&lt;br /&gt;'तुझी गाडी दे मला दोन तीन दिवसांकरता. आर्जंट गावी जाऊन यायचंय. सुमीचा फोन आला होता ल्येका... आता काय मला दम न्हाय बघ. गाडी दे नाहीतर चालत जातू बघ मी.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मायला आब्या, आसं इचारून गाडी घेऊन जायची वाईट चाल कधी पासून पडली रं आपल्यात? आँ? धर ही चावी आन् सूट. नेमका आजच टँक फुल्ल केलाय. नीट ग्येलास तर आकरा बारा पर्यंत पोचशील पण. ये निवांत, सगळं आटपून', डोळा घालत दिलप्या म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथेच चहा नाश्ता करून आबासाहेब थेट निघालाच. अंधार आणि हायवेची रहदारी. आबासाहेब अगदी जपूनच चालवत होता गाडी. गाव जवळ आलं, दिवे दिसायला लागले.  आबासाहेब गावात शिरला तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. गाव अगदी शांत होतं. उगाच कोण चुकार भेटला तर चौकशा नकोत म्हणून आबासाहेब, थोडा आडवाटेनंच गावात शिरला आणि थेट वाड्यासमोरच गाडी लावली. वाड्यात उजेड दिसत होता. त्याने गाडी बंद करायच्या आतच दार उघडलं गेलं. दारात स्वतः सुमीच होती. आबासाहेब आत शिरला तशी तिनं पटकन दरवाजा लोटून दिला. सोप्यात आल्यावर तिथल्या उजेडात त्याने सुमीला बघितलं आणि बघतच राहिला. लग्नातही सजली नव्हती तशी सजून सुमी त्याच्या स्वागतासाठी वाट बघत होती. आबासाहेबाला एवढा शीण करून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चारपाच तास मोटारसायकलवर रात्रीच्या अंधारात हायवेवरून यायचं म्हणजे काय चेष्टा नाही. त्याचं अंग अगदी मोडून गेलं होतं. पण सुमीला बघून त्याला अगदी राहवेना,&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सुमे, काय गं? आज काय पेश्शल बेत हाय का काय?' &lt;br /&gt;&lt;br /&gt;'तर, मी येवडं प्रेमानं बोलावलं आन् तुमी धावत आलेत मंग पेश्शल खातिरदारी नकू का?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सुमे, माझा तर इश्वासच बसंना गं!!! दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ. तुझा फोन येई पर्यंत वाटलं पन नव्हतं की रात्री मी हितं असेन. तुझ्याबरूबर.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आसंच आसतंय. कधी काय व्हईल काय सांगावं? आन् आसं अचानक भेटन्यातच गंमत जास्त आसती.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आगं पन एकटीच कशी तू? म्हादूकाका कुटं हाये? तू म्हनाली व्हतीस की त्यो पन हाये सोबतीला.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आवो हितंच होता की. गेला आसंल मागं गोठ्यात. मी बगते त्याला.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'बरं, आदी च्या कर गं फस्क्लास. जेवायचं बगू नंतर. तशीबी जेवनाची भूक न्हाईच मला फारशी.' आबासाहेब सुमीकडं रोखून बघत म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'चला...' लाजून हसत हसत सुमी आत मधे पळाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आबासाहेब पटकन हातपाय धून कापडं बदलून एकदम हुश्शार होऊन चुलीपाशी सुमी जवळ पाटावर येऊन बसला. सुमी पुढ्यात च्याचा कप घेऊन बसली होती. कसल्यातरी तंद्रीत होती जनू. तो येऊन बसल्याचंही तिला कळलं नाही. निवांत बसत तो भिंतीला टेकला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ए सुमे, काय झालं गं? कसला विचार करतेस एवढा? आन तो च्या इकडं.' कप हातात घेत तो म्हणाला. तिला हळूच हलवलं त्याने. सुमी भानावर आली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मी काय म्हंते, आता परत जाऊच नका. हितंच र्‍हावा. काय आसंल ते आपन गोड करून खाऊ. पन आता दूर नाही र्‍हानार मी.' &lt;br /&gt;&lt;br /&gt;'शाब्बास गं माज्जी रान्नी!!! आदी कोन बोलत होतं? तुमी जावा, मी र्‍हाते, हळूहळू येईन मी तिकडं. आन् आता काय झालं?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'व्हय हो... मीच म्हनलं होतं. पन आता येगळं हाय. आता न्हाय जमनार तसं. तुमी हितंच र्‍हावा.' त्याच्या कुशीत शिरून सुमी मुसमुसत म्हणाली. तिच्या डोळ्याला ज्या धारा लागल्या त्या थांबेचनात. बराच वेळ आबासाहेब तिला समजवत राहिला. पण रडणं काही कमी होईना. शेवटी आबासाहेब उगाच तिचं लक्ष हटवायला काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला,&lt;br /&gt;&lt;br /&gt;'आर्रर्र, च्यात साखर कमी झाली बघ. तो डबा घे जरा साखरंचा.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच तंद्रीत सुमीनं हात लांब करून फडताळाच्या अगदी वरच्या फळीवर असलेला साखरेचा डबा अल्लाद उचलला आन् आबासाहेबाच्या पुढ्यात ठेवला. क्षणभर आबासाहेबाला काहीतरी चुकतंय, काहीतरी विचित्र घडतंय असं वाटलं पण नीट कळेना. तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं. जमिनीवर बसलेल्या सुमीनं हात लांब लांब लांब करत नेऊन फडताळाच्या अगदी वर म्हणजे अगदी चार पाच फूट लांब असलेला साखरंचा डबा उचललाच कसा. त्याला काहीतरी जाणवलं. तो ताडकन् उठला आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला. मागनं सुमीचा आवाज आला, &lt;br /&gt;&lt;br /&gt;'आवो, कुटं जाताय? पळू नका. थांबा.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;आबासाहेब कुठला थांबायला. पळत पळत तो सोप्यापर्यंत आला. तेवढ्यात त्याला समोर सुमी उभी दिसली. तशीच सुंदर, नटलेली. चेहर्‍यावर गोड हसू. शांतपणे उभी. तो तिच्याकडे बघतच राहिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मला सोडून जाताय? नका ना. आता नाही राहणार मी तुमच्याशिवाय. तुम्ही आणि मी. आपण दोघंच. बाकी कुण्णी कुण्णी नाही. या ना...' ती दोन्ही हात पसरत म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारावल्यासारखा आबासाहेब हळूहळू पुढे सरकला. सुमीच्या सान्निध्यात त्याला आता शांत वाटत होतं. त्याने स्वतःला झोकून दिलं आणि तिच्या मिठीत विरघळून गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;****&lt;br /&gt;&lt;br /&gt;'हवालदार, बॉडीची पोझिशन नीट आखून घ्या. फोटोग्राफर आलाय ना? तेही उरकून घ्या. आणि नातेवाईक कुठे आहेत?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'साहेब, ते सगळे रानात होते, वाड्यात कोणीच नव्हतं. आत्ताच आलेत, तिथे चौकीत बसवून ठेवलं आहे त्यांना. हे अजून सांगितलेलं नाहीये साहेब त्यांना.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'का?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सकाळी वाड्याचं दार अर्धवट उघडं दिसलं आणि बाहेर ही गाडी दिसली म्हणून लोकं डोकावले तर बॉडी दिसली. लगोलग सांगावा धाडला. तर काल संध्याकाळीच या इसमाची बायको मयत झाली होती साहेब. काल सकाळपासूनच अचानक तापानं फणफणली होती. साथ चालूच आहे साहेब गावात. संध्याकाळी झोपली तर घरच्यांना वाटलं की शांत पडली आहे, सकाळी पत्ता लागला, बहुतेक संध्याकाळीच आटोपली असणार. काय भानगड आहे कळेना साहेब.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF0000;"&gt;समाप्त&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-8344309872581528218?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/8344309872581528218/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=8344309872581528218' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/8344309872581528218'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/8344309872581528218'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/09/blog-post_11.html' title='भेट...'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-5776460486892611127</id><published>2009-07-01T01:11:00.000+04:00</published><updated>2009-07-01T01:13:21.433+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपटओळख'/><title type='text'>चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स</title><content type='html'>लहानपणी शाळेत असताना संस्कृतात 'स्त्रियश्चरित्रम्, पुरुषस्य भाग्यम् | न जानामि दैवम्, कुतो मनुष्यः||' असे एक सुभाषित आम्हाला शिकवले गेले होते. त्याचा अर्थ अगदी सहज समजेल असा आहे. पण तेव्हा त्या वयात त्यावर फारसा विचार केला नव्हता. ५० मार्कापैकी सुभाषितं आणि त्यांची भाषांतरं फारतर ४-५ मार्कांपुरती असतील. तेवढाच उपयोग. पण हे सुभाषित कायम आठवायचं. अगदी कधीही. पुढे पुढे मोठं होत असताना मला नेहमी आजूबाजूला काय चाललंय, कोण कसं वागतंय, कसं बोलतंय अशा गोष्टी निरिक्षण करायची सवयच लागली. त्यावरून एक गोष्ट पटली... वरच्या सुभाषितात ते स्त्रीचे चरित्र, पुरुषाचं भाग्य वगैरे जाऊ दे, पण माणूस हा प्राणि मात्र नक्कीच 'न जानामि दैवम | कुतो मनुष्यः' असा आहे हे नक्की. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माणूस हा माझ्या मते जगातला सगळ्यात अनाकलनिय, गूढ असा प्रकार आहे. आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यातसुध्दा असे अनुभव येतातच. एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखत असतो. आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्ण माहित असतो (असं आपल्याला छातीठोकपणे वाटते) पण एखाद्या क्षणी ती व्यक्ती असं काही वागून बोलून जाते की आपला अंदाज साफ चुकतो. अजून अशीही उदाहरणं दिसतात की माणूस एका विशिष्ट प्रकारे घडलेला असतो. पण एखादी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घडते आणि खोलवर परिणाम करते की तो माणूस अगदी बदलूनच जातो. त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व १८० डिग्रीमधे फिरते आणि तो अगदी पूर्णपणे बदलतो. हेच कशाला, आपण स्वतःलाही ओळखत नाही नीट. कधी कधी आपण स्वतःच स्वतःला चकित करतो. म्हणूनच ते... 'न जानामि दैवम्, कुतो मनुष्यः'.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, नुकताच पाहिलेला चित्रपट 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1NC7_3eI/AAAAAAAAA64/iBRy5WGcgWg/s400/livesothers.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी &lt;a href="http://www.misalpav.com/node/8196" title="गुडबाय लेनिन" target="_blank"&gt;गुडबाय लेनिन &lt;/a&gt; या चित्रपटावर लिहिले होते. बर्‍याच लोकांनी तो चित्रपट पाहिलाही होता. बहुतेक सगळ्यांनाच आवडला होता तो. त्याच वेळी बर्‍याच समानव्यसनी लोकांनी अजूनही काही चित्रपटांची नावे सुचवली होती. त्यापैकी हा 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स' एक. हा चित्रपट सुचवल्याबद्दल मुक्तसुनितचे आभार नक्कीच मानावे लागतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हाही चित्रपट पूर्व जर्मनीशी संबंधित आहे. पुढची गोष्ट सुरू व्हायच्या आधी पूर्व जर्मनीतल्या काही गोष्टींबद्दल थोडेसे... पूर्व जर्मनी हा देश दुसर्या  महायुध्दानंतर सोविएत सैन्याच्या अधिपत्याखालील भूभागावर जन्माला आला. साहजिकच पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाची अगदी पोलादी पकड असलेली राज्यव्यवस्था. फारसे वैचारिक स्वातंत्र्य नाही. कोणत्याही एकाधिकारशाही असलेल्या देशात ज्या प्रकारे दडपशाही असते तसेच वातावरण. कोणत्याही प्रकारच्या विरोधाला किंवा बंडखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने एक प्रचंड मोठे गुप्तहेरखाते उभारले होते आणि अतिशय प्रेमाने पोसले होते. त्या संघटनेचे नाव 'श्टाझी' (&lt;span style="color: #CCCCCC;"&gt;झबल्यातला झ&lt;/span&gt;). अतिशय कडव्या आणि ध्येयप्रेरित लोकांनाच या संघटनेमधे प्रवेश मिळत असे. या संघटनेचे खास बलस्थान म्हणजे त्यांनी तयार केलेले खबर्या्चे जाळे. हा प्रकार इतका भयानक होता की अगदी नवरा - बायको वगैरे तर राहु द्या पण लहान मुलांनाही आपल्या आईवडिलांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल श्टाझी कडे चुगल्या करण्यासाठी पद्धतशीरपणे शिकवले जात असे. (&lt;span style="color: #CCCCCC;"&gt;पूर्व जर्मनी कोलमडल्यानंतर श्टाझीची कागदपत्रं खुली करण्यात आली. त्यात कोणालाही आपल्याबद्दल श्टाझी कडे काय माहिती होती हे बघता यायला लागले. त्यात आपल्यावर कोण कोण पाळत ठेवत होते हे पण कळणे क्रमप्राप्तच. ही कागदपत्रं खुली झाल्यावर कितीतरी नातेसंबंध पार मोडून पडले.&lt;/span&gt;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशा वातावरणात घडणारी एका अतिशय भावनाशुन्य, कोरड्या, कडक शिस्तीच्या अधिकार्‍याची आणि एका संवेदनशील अशा लेखकाची ही कहाणी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्टाझी कॅप्टन गेर्ड विस्लर हा खात्यातला एक अतिशय हुशार, अनुभवी, बुध्दिमान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूर्णपणे निष्ठावान असा कर्तबगार अधिकारी. त्याचा वरिष्ठ ले. कर्नल ग्रुबित्झ याचा पण त्याच्यावर पूर्ण विश्वास. चित्रपटाच्या सुरूवातीलाच संशयितांकडून कबुलीजबाब घेण्याचे विविध मार्ग (अर्थात मानवी आणि अमानवी दोन्ही) हा कॅप्टन विस्लर हाताळताना आणि ते नवीन भरती झालेल्या विद्यार्थी सहकार्‍यांना शिकवताना दाखवले आहे. तर असा हा विस्लर आणि त्याचा बॉस ग्रुबित्झ. ग्रुबित्झ हा एका वरिष्ठ मंत्र्याच्या, हेम्फच्या, अगदी जवळचा असतो. गेओर्ग ड्रेयमान हा पूर्व जर्मनीतला अतिशय प्रतिभावान असा लेखक, नाटककार. तो विचाराने कम्युनिस्ट असतो. त्याचे तत्कालिन पूर्व जर्मन राज्यकर्त्यांच्या एका गटाशी खूप जवळून संबंध असतात. मंत्र्याला या ड्रेयमानविषयी संशय असतो की त्याला पश्चिम जर्मनी बद्दल सहानुभूती आहे आणि त्यासाठी तो ग्रुबित्झला ड्रेयमानवर नजर ठेवायला सांगतो. ग्रुबित्झ हे काम त्याचा सगळ्यात विश्वासू सहकारी कॅप्टन विस्लरवर ही अतिशय नाजूक जबाबदारी टाकतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1aWAf56I/AAAAAAAAA68/TKf2thAUmFE/s400/MHE-OT%7E1.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;गेर्ड विस्लर&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1eRNRcHI/AAAAAAAAA7A/-jlHoipHTsk/s400/vlcsnap-00004.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;ख्रिस्टा-मारिया आणि गेओर्ग ड्रेयमान&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस विस्लर ड्रेयमानच्या घरी कोणीही नसताना काही टेक्निशियन्सना घेऊन घुसतो आणि त्याच्या पूर्ण घरभर गुप्त माइक्स आणि कॅमेरे लावतो. त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एक अडगळीची खोली असते त्या खोलीत कंट्रोल रूम थाटतो. अशी व्यवस्था होते की ड्रेयमानच्या घरात जे जे काही घडते ते सगळे व्यवस्थित ऐकू येते. त्या घरात ड्रेयमान आणि त्याची मैत्रिण ख्रिस्टा-मारिया राहत असतात. ही ख्रिस्टा मारिया अतिशय गुणवान आणि गाजलेली अभिनेत्री असते. इथून सुरू होतो विस्लर आणि त्याच्या एका साथीदाराकडून २४ तास पहारा. प्रत्येक घटनेची लेखी नोंद ठेवली जाते. ड्रेयमान जरी निष्ठावान असला तरी त्याला बर्‍याच गोष्टी पसंत नसतात. त्याचा एक प्रसिध्द दिग्दर्शक मित्र येर्स्का हा केवळ राज्यकर्त्यांच्या नाराजीमुळे अक्षरशः आयुष्यातून उठलेला असतो. अशा अनेक घटना तो मूकपणे बघत असतो. त्याचे काही कलाकार मित्र आवाज उठवतात पण याचे धोरण मात्र जमेल तेवढे जुळवून घेण्याचे असते. हा म्हणजे आपल्या विचारांबरोबर केलेला एक प्रकारचा व्याभिचारच असतो. इकडे ख्रिस्टा-मारियाचे पण एक प्रकरण असते. मिनिस्टर हेम्फ आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तिचा यथेच्छ भोग घेत असतो. या सगळ्या भानगडी हळूहळू विस्लरला कळत जातात आणि त्याच्या सारखा खरोखर कम्युनिझमवर निष्ठा असलेला कर्तव्यदक्ष अधिकारी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांचे हे उघडे नागडे रूप पाहून हादरून जातो. तो डळमळू लागतो. एक दिवस ख्रिस्टा-मारिया हेम्फला भेटून येत असते तेव्हा विस्लर असे काही जुळवून आणतो की ड्रेयमानला ही भानगड कळते. पुढच्या वेळी ती जेव्हा परत हेम्फला भेटायला जायला निघते तेव्हा तो तिला जाब विचारतो. तेव्हा ती त्याला रोखठोक जबाब देते... मी शरीराच्या बदल्यात तर तू विचारांचा बळी देऊन, पण आपण दोघेही केवळ आपल्या कलेकरिता का होईना व्याभिचारच करत आहोत. पण त्याचवेळी विस्लर तिला रस्त्यात गाठून तिचा एक चाहता म्हणून भेटतो. आणि तिला योग्य-अयोग्यची जाणिव करून देऊन हेम्फला भेटण्यापासून परावृत्त करतो. ती परत घरी ड्रेयमानकडे जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्यात विस्लरला हळूहळू ड्रेयमान समजत जातो आणि विस्लर पूर्णपणे बदलत जातो. तो रोज सगळ्या खोट्या नोंदी करत जातो की काहीही संशयास्पद नाही वगैरे. आणि हळूहळू ग्रुबित्झला पटवून त्याच्या कनिष्ठ सहकार्‍याला या केसवरून हटवतो आणि पूर्णपणे स्वत:कडे सूत्रं घेतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांनी येर्स्का एका भकास आयुष्याला कंटाळून आत्महत्या करतो आणि ड्रेयमान अंतर्बाह्य हादरून जातो. तो पूर्व जर्मनी मधे वैफल्यग्रस्त मनःस्थितीमुळे होणार्‍या आत्महत्यांवर एक लेख लिहितो आणि तो काही मित्रांच्या सहाय्याने पश्चिम जर्मनीमधे प्रसिद्ध करतो. सगळीकडे खळबळ माजते. हेम्फ ग्रुबित्झला जाब विचारतो. ग्रुबित्झ विस्लरला फैलावर घेतो. त्या लेखाची मूळ प्रत श्टाझीचे पश्चिम जर्मनीमधील हेर मिळवतात. पूर्व जर्मनीमधला प्रत्येक टाईपरायटर हा रजिस्टर्ड असतो. पण हा लेख एका अशा टाइपरायटर वर टाइप केलेला असतो जो गुप्तपणे पूर्व जर्मनी मधे आणलेला असतो. ग्रुबित्झ पिसाळतो. त्याला कोणत्याही प्रकारे या घटनेचा उलगडा करायचाच असतो. त्याला पूर्ण खात्री असते की हा लेख ड्रेयमाननेच लिहिलेला आहे पण त्याच्याकडे काहीच पुरावा नसल्याने तो काहीच करू शकत नाही. ड्रेयमानच्या घाराची पूर्ण झडती घेतली तरी काहीच मिळत नाही. तो टाइपरायटर फरशीच्या खाली लपवलेला असतो. तो काही सापडत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1mrBdvuI/AAAAAAAAA7E/75xhMbpSit8/s400/vlcsnap-00007.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच वेळी ख्रिस्टा-मारियाने झिडकारल्यामुळे सूडाने पेटलेला हेम्फ ग्रुबित्झला पुरावा देतो की ख्रिस्टा-मारिया ही काही प्रतिबंधित गोळ्यांचं सेवन करते. ग्रुबित्झ तिला अटक करतो. तो विस्लरला सांगतो की तुला जर का स्वतःची प्रतिमा स्वच्छ करायची असेल तर ख्रिस्टा-मारिया कडून तुला माहिती काढावीच लागेल. दडपणाखाली विस्लर तयार होतो आणि ग्रुबित्झच्या देखरेखीखाली ख्रिस्टा-मारियाची चौकशी करतो. त्यात ती टाइपरायटर बद्दल सांगते. चौकशी संपते. ग्रुबित्झ ख्रिस्टा-मारियाला खबरी व्हायला भाग पाडतो. हे सगळे चालू असताना, विस्लर हळूच सटकतो आणि ड्रेयमानच्या घरी जाऊन तो टाइपरायटर गायब करतो. ग्रुबित्झच्या लक्षात येईपर्यंत विस्लरने आपला कार्यभाग साधलेला असतो. ग्रुबित्झ श्टाझीची माणसं घेऊन ड्रेयमानच्या घरी येतो पण तो पर्यंत काहीच नसतं तिथे. ड्रेयमान बाहेर गेलेला असतो तो पण परत येतो. इकडे ख्रिस्टा-मारिया हे सगळे सहन न होऊन बाहेर रस्त्यावर जाऊन एका गाडीखाली जीव देते. ड्रेयमानला वाटते की टाइपरायटर तिनेच लपवला. ख्रिस्टा-मारिया मेल्यामुळे हेम्फचा इन्टरेस्ट संपतो आणि हे प्रकरण गुंडाळले जाते. पण ग्रुबित्झला विस्लरने केलेल्या विश्वासघाताची पूर्ण कल्पना आलेली असते. केवळ पुरावा नाही म्हणून त्याला शिक्षा होत नाही, केवळ पदावनती आणि एका अती फडतूस कामावर त्याला पाठवले जाते. इथे चित्रपटाचा एक मुख्य भाग संपतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1wluilCI/AAAAAAAAA7I/8i3PyAV8zhw/s400/vlcsnap-00010.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे साधारण साडेचार वर्षांनी पूर्व जर्मनीत उलथापालथ होते, कम्युनिस्ट राजवट कोसळते आणि श्टाझी नष्ट होते. ड्रेयमान हेम्फला त्याच्याच एका नाटकाच्या प्रयोगात भेटतो. त्यावेळी त्याला कळते खरे काय काय घडले आहे. तो पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्टाझीच्या कार्यालयात जाऊन स्वतःच्या बाबतीत असलेली सगळी कागदपत्रं बघतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या ऑफिसरचा कोड HGW XX/7 असा आहे तो आपल्यावर पाळत ठेवत होता पण त्याने जाणूनबुजून आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन आपल्याला वाचवले असते. तो HGW XX/7 हा कोड कोणाचा आहे असे विचारतो आणि त्याला गेर्ड विस्लरचे नाव कळते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp15pLmkXI/AAAAAAAAA7M/90Z701KF61I/s400/vlcsnap-00011.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो विस्लरचा शोध घेतो. त्याला कळते की आता विस्लर हँडबिलं वाटपाचे / कुरिअरचे काम करत असतो. तो विस्लरला भेटायचे टाळतो. काही दिवसांनी विस्लर रस्त्यावरून जात असताना त्याला एका पुस्तकाच्या दुकानात ड्रेयमानच्या नवीन पुस्तकाची जाहिरात दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp2HjCuDBI/AAAAAAAAA7U/wZHrVwpsuZU/s400/vlcsnap-00014.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो दुकानात शिरतो. एक प्रत उचलतो, उघडतो. ड्रेयमानने ते नवीन पुस्तक HGW XX/7 ला अर्पण केलेले असते. विस्लरला मनोमन कळते की ड्रेयमानला सगळे कळले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp2L-0ezpI/AAAAAAAAA7Y/1HPLqGopTWE/s400/vlcsnap-00016.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; तो पुस्तकाचे पैसे देत असताना काउटरवरचा माणूस विचारतो,&lt;br /&gt;&lt;br /&gt;'पुस्तकाला गिफ्टरॅप करू?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;विस्लर त्याच्याकडे मोठ्या अभिमानाने बघतो, त्याच्या डोळ्यात एक चमक असते, तो अगदी शांतपणे उत्तरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'नाही, हे पुस्तक माझ्यासाठी आहे.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपट संपतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp2Qo4XCnI/AAAAAAAAA7c/19w2IwaFQiQ/s400/vlcsnap-00017.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;'नो, धिस इज फॉर मी.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक अतिशय सुंदर चित्रपट बघितल्याचे समाधान देऊन जातो. विस्लरसारखा कडवा माणूस कसा हळूहळू बदलतो आणि अगदी विरुध्द बाजूपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो हे अतिशय हळूवारपणे चित्रण केले आहे. त्याचा हा प्रवास चालू असताना आपण त्याच्याबरोबर असतोच. पण आपण एवढे समरस झालेलो असतो की तो बदलतो आहे हे आपल्याला दिसत असते पण जाणवत नाही. शेवटी आपण एकदम भानावर येतो आणि विचार करतो, 'अरे!!! केवढा बदलला हा. कुठून कुठपर्यंत पोचला.' अप्रतिम. सगळेच कलाकार अप्रतिम काम करून गेले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटाची मला जाणवलेली दोन वैशिष्ट्ये म्हणजे कोणताही भडकपणा नाही. विस्लरचा प्रवास अगदी सहज आणि हळूवारपणे दाखवला आहे. एक प्रसंग असा आहे. तो घरी येतो, लिफ्टमधे शिरतो. एक अगदी लहान मुलगा पण त्याच्या मागोमाग शिरतो. विस्लरचा गणवेष पाहून तो लहान मुलगा विचारतो 'तू श्टाझी आहेस का?' विस्लर त्याला उलट विचारतो 'तुला रे काय माहित श्टाझी काय आहे ते?' तो मुलगा म्हणतो, 'मला माहित आहे. माझे बाबा म्हणतात की श्टाझी दुष्ट असतात.' इतक्या वर्षांच्या सवयीने, अगदी प्रतिक्षिप्तक्रिया असल्याप्रमाणे विस्लर त्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव विचारायला जातो पण प्रश्न पूर्ण न करता अर्धवट सोडून देऊन गप्प बसतो आणि विषय बदलतो. हा प्रसंग विस्लरमधला फरक खूपच यथार्थपणे जाणवून देतो. भाषणबाजी नाही, ड्रामा नाही. फक्त एक लहान मुलगा, लिफ्टमधली शांतता आणि विस्लरच्या चेहर्‍यावरचे मूक भाव. लाजवाब.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp46_b4PrI/AAAAAAAAA7g/ro_7t_2wfVI/s400/vlcsnap-00002.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;'श्टाझी दुष्ट असतात!!!'&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा शेवट. ख्रिस्टा-मारिया मरते तिथे हा चित्रपट संपतच नाही, पण जेव्हा ड्रेयमान नंतर विस्लरला शोधून काढतो तिथेही संपवला नाहीये. त्यावेळी ड्रेयमान विस्लरशी काही बोलतच नाही. बहुधा, तो असले हलके काम करताना त्याच्यासमोर जाणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तो पुस्तक प्रसिध्द करतो आणि HGW XX/7 ला अर्पण करतो. नंतर विस्लरला ते पुस्तक दिसते आणि अर्पणपत्रिकाही दिसते आणि तो जे काही समजायचे ते समजतो. क्लास. कुठेही शब्दबंबाळ संवाद नाहीत. किंबहुना संवादच नाहीत. तसेही, जेव्हा जेव्हा भावना खरोखर व्यक्त होतात तेव्हा क्वचितच शब्द उपयोगी पडतात. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ते पुरेपूर माहित आहे हे जाणवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असा हा... 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'. २००७ च्या ऑस्कर मानांकनात 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' पुरस्कार मिळालेला चित्रपट. अजूनही य पुरस्कार मिळालेले आहेत. पण सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे, मला आवडलाय. तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल, नक्की बघा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-5776460486892611127?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/5776460486892611127/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=5776460486892611127' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/5776460486892611127'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/5776460486892611127'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/Skp1NC7_3eI/AAAAAAAAA64/iBRy5WGcgWg/s72-c/livesothers.jpg' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-6294307841142104696</id><published>2009-06-28T17:31:00.001+04:00</published><updated>2009-06-28T17:35:13.706+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>माती - १</title><content type='html'>"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क... &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्‍याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे. अझान झाली तरी तो जुनाट खरखर करणारा लाऊडस्पीकर चांगली पाचएक मिनिटे चालूच ठेवतात ते. सहसा अझान संपली की परत पांघरूणात गुडुप्प होतात लोक. इतक्या थंडीचं सकाळी सकाळी फजरेच्या नमाजाला उठायचा बरेच लोक कंटाळा करायचे. फारतर घरातच नमाज अदा करायचे. पण लाऊडस्पीकरच्या खरखरीने त्यातल्या बहुतेकांची झोप पार मोडायची आणि आता उठलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून ते मशिदीत दाखल व्हायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतक्या वर्षांच्या सवयीने उस्मान बरोब्बर अझान व्हायच्या आधीच जागा झालेला असायचा. पहाटेच्या शांत वातावरणात अझान ऐकताना तो अगदी तल्लीन व्हायचा. काझीसाहेबांचा आवजही गोड आणि सुरेल अगदी. रात्री इशाची शेवटची नमाज झाली की घरी भाकरतुकडा खाऊन म्हातारा मारूतिच्या देवळात भजनपार्टीला साथ करायला हजर. अझान झाली की मग उस्मान सावकाश उठून वझू करून निवांत चालत गल्लीच्या टोकाला असलेल्या मशिदीत दाखल व्हायचा. पण आज अझान होऊन गेली आणि आता काझीसाहेब नमाज सुरू करतील हे समजत असून सुध्दा त्याच्याने अगदी उठवत नव्हतं. रात्री उशिरा पर्यंत खूप वर्षांनी गावात परत आलेल्या नईमबरोबर आणि जुन्या दोसदारांबरोबर गप्पांचा फड जमवून तो घरी आला होता, जमिनीला पाठ लावून कुठे दोन तीन घंटे होतात न होतात तर अझान झाली. उठायचं जीवावर आलं होतं पण काझीसाहेबांचा आवाज आला परत आणि तो सवयीने उठलाच एकदम. त्याच्या हालचालीने रशिदाही जागी झालीच होती जवळजवळ. रात्री त्याच्या पोटावर येऊन झोपलेल्या चांदसाहेबला त्याने हळूच बाजूला केले आणि गडबडीने वझू करून तो पळतच मशिदीत गेला. नमाज सुरू झालीच होती. काझीसाहेबांनी निवांतपणे आटोपलं. नमाज झाल्यावर अजून दोन-चार जणांशी दुवा सलाम करून उस्मान घरी परत आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळ जवळ उजाडलंच होतं. नदीवरल्या देवळातली घंटा वाजायला लागली होती. उस्मानने त्या दिशेने हात जोडले आणि तो घरात शिरला. अंगणातल्या मोरीवर त्याने परत हातपाय धुतले, पावडरने दात घासले आणि मागच्या अंगणात गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मै बोली आज नमाजकू जात नै जाते, क्या की. कित्ती देर तक सोये..." रशिदा अंगण झाडता झाडता म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हाव ना बेगम. नींद खुली मगर उठने का मनच नै करा."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"फिर!!! कैसे करेगा? रातकू कितना लेट आये तुम. चार दोस्ता मिले तो दुनिया भूलते तुम. चांदसाहेब भोत देर तक बैठा था खिडकीमे... अब्बू, अब्बी आते, कब्बी आते. उदरीच सोया बैठे बैठे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मान तिथेच पायरीवर टेकला. पहाटेचं मस्त वारं सुटलं होतं. ना धड अंधार ना धड उजेड. उस्मानला एकदम मस्त वाटायला लागलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेगम, आव ना. बैठो इदर." तो लाडात येत रशिदाला म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तर क्या. बस इतनाच बाकी है अब. पूरी रात दोस्तोके साथ उडाओ और दिनमे बेगम को गोद मे बिठाओ." रशिदा लटक्या रागाने म्हणाली. पण तिलाही उस्मानचा प्रसन्न चेहरा बघून बरं वाटलं. ती बसलीच येऊन त्याच्या जवळ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे बेगम, तो काल नईम आला ना, दुबईवरून. किती दिवसांनी आला तो. जवळजवळ चार वर्षांनी. मग बसलो गप्पा मारत. सांगत होता तिकडच्या गंमती."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दिसला होता मला तो काल गल्लीत. सलाम करून गेला. किती बदललाय तो. कपडे काय, सेंट काय, काळा चष्मा... एकदम सामने आके क्या भाभीजान बोला. मै तो पैचानीच नै उसकू. फिर बोला मै नईम."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे हे तर काहीच नाही. त्याच्या अब्बासाठी, अम्मीसाठी काय काय आणलंय त्याने. आणि काजू बदाम खजूर तर विचारूच नको. पूरी गल्लीमे बाटेगा करके बोल रहा था." &lt;br /&gt;&lt;br /&gt;बराच वेळ दोघं बोलत बसले होते. रशिदाला मात्र राहून राहून मियाचं लक्षण ठीक वाटत नव्हतं. ती उस्मानला चांगलं ओळखत होती. त्याच्या चेहर्‍यावर त्याचं मन तिला स्वच्छ वाचता येत असे. आजपण त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे तिला कळत होतं. पण शक्यतो तो स्वत:हून बोलेपर्यंत ती त्याला छेडत नसे. आजही तसंच काहीसं तिला जाणवत होतं. तेवढ्यात उस्मानचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तालमीला जायला उशीर झाला होता गप्पांच्या नादात. घाईघाईत तो परसदारी जाऊन आला आणि तालमीकडे निघाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मान मुकादम हे पंचक्रोशीतल्या पैलवान मंडळीत फार मोठं नाव होतं. वयाच्या दहाव्या वर्षी कल्लाप्पा वस्तादाचा गंडा बांधला होता त्याच्या बापाने त्याला. पंधराव्या वर्षी वस्तादाने त्याला धायगावच्या जत्रेत पहिल्यांदा मैदानात उतरवला होता. तेव्हा पासून खुब्याचं हाड निखळल्यामुळे कुस्ती सोडे पर्यंत आस्मान कसे दिसते हे उस्मानला माहित नव्हते. कायम तालमीत पडलेला असायचा. खरंतर जेमतेम पाच सहा हजार वस्तीचं गाव त्याचं. त्यात परत मुसलमानाची दहा वीसच घरं. एवढ्याश्या गावातून आलेला उस्मान पार जिल्ह्यापर्यंत मजल मारून आला. महाराष्ट्र केसरीची तयारी करताना त्याचा तोल जाऊन तो नेमका पडला आणि पडता पडता उजवा हात आधाराला म्हणून खांबाला धरला तर पूर्ण वजन येऊन खुबाच निखळला. तेव्हापासून कुस्ती बंद झाली. उस्मान खूप हळहळला. पण अल्लाची मर्जी म्हणून गप्प बसला. पण लायकी असूनही आपण शोहरत मिळवू शकलो नाही याचे दु:ख त्याच्या मनातून कधीच गेले नाही. बापाबरोबर धंद्याला लागला. बापाने हळूहळू दुकान त्याच्यावर टाकायला सुरूवात केली. एके दिवशी शेजारच्या गावातल्या रशिदाचा रिश्ता सांगून आला. बापाने रिश्ता पसंत केला म्हणून निमूटपणे लग्न केले. पण त्याच्या नशिबाने रशिदा खूपच चांगली निघाली. उस्मान तसा थोडा गरम डोक्याचा, पण रशिदा मात्र प्रत्येक गोष्ट नीट विचार करणारी. सासू सासर्‍याला खूष केलं तिने. वर्षाच्या आत पाळणा हलला आणि चांदसाहेब घरात आला. एक दिवस अचानक अम्मी हार्ट अ‍ॅटॅकने गेली आणि तिच्या दु:खात अब्बाही निघून गेले. आता उस्मान, रशिदाबेगम आणि चांदसाहेब एवढेच राहिले. धंदा असला तरी मिळकत फार नव्हती. दोन वेळचं खाऊन सुखी होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुस्ती संपली पण पैलवानकी संपली नाही. रोज नियमाने मेहनत केल्याशिवाय उस्मानला चैनच पडत नसे. आणि तालमीतल्या नवीन पोरांना मातीत घोळवायचा जिम्मा त्याच्याकडेच दिला होता वस्तादानं. उस्मान तालमीत शिरला. कापडं काढली, मारूतीच्या समोर जाऊन नमस्कार केला आणि जय बजरंग म्हणून आखाड्यात उतरला. पण आज काय त्याचं मनच लागंना. तेवढ्यात एक दोन पोरांनी त्याला विचारलं पण, "काय झालं वस्ताद? आज आंगात जोर नाही जनू." भानावर येत तो परत समोरच्या पोराला भिडला. पण जरा वेळानं त्याचं त्यालाच गोड वाटेना. तो हौद्यातून बाहेर आला आणि कापडं करून निघाला. नदीवर जाऊन आंघोळ आटपून घरी आला. येऊन निवांत बसला तो अंगणातल्या खुर्चीवर. रोजच्यासारखं रशिदा दूधाचा लोटा त्याच्यासमोर ठेवून घरात गेली. जरा वेळानं बाहेर येऊन बघते तर लोटा तसाच आणि उस्मान शून्यात नजर लावून बसलेला. मग मात्र तिला राहवलं नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्या सोचते जी? फजरसे देखी मै. क्या तो बी सोच रहे तुम."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही, काही नाही." उस्मान भानावर येत म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही कसं? मेरेसे नै छुपा सकते तुम जी. बोला ना... काय झालं?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मान घुटमळला. उगाच एक दोन वेळा त्यानं घसा खाकरल्यासारखं केलं, बोलू की नको, कसं बोलावं... रशिदाला कळेचना. असं काय आहे याच्या मनात? &lt;br /&gt;&lt;br /&gt;"रहेनदो, मेरेकू कामा है... आप सोचते बैठो." तिने अर्धवट उठल्यासारखे केले. तिची युक्ती बरोब्बर लागू पडली आणि एकदम पूर्ण धीर एकवटून उस्मान तटकन बोलला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी काय म्हणतोय बेगम... नईमशी बोलून कुठे दुबईत नोकरी मिळते आहे का बघू का?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हाय अल्ला!!! तर सकाळपासून हे चाललंय वाटतं हुजूरच्या डोक्यात. काही गरज नाही. खाऊन पिऊन सुखी आहोत आपण. आप कमा रहे ना? दो वखत का खाना नसीब हो रहा ना? मै पूछती क्या करना दुबई हमको?" रशिदा उसळून म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मानला अंदाज होताच, रशिदा काय बोलणार याचा. तिला कसे पटवावे याचा विचार खरंतर तो करत होता. नईमशी बोलायचे त्याने मनात पक्के केलेच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ऐसा देखो बेगम, तुम ठीक बोली." तो तिच्या कलाकलाने घेत म्हणाला. "दो वखत की रोटी तो हो रही नसीब, पण जरा पुढचा विचार कर. दुकान कसे चालले आहे ते तुला माहितच आहे. काही खास नाही. अल्लाने एवढा सोन्यासारखा पोरगा आपल्याला दिला आहे. त्याच्या परवरिशची काही सोय नको का? मी २-३ वर्षांसाठी जाऊन येतो. बक्कळ पैसा मिळेल. मग आहोतच आपण इथे. चांदसाहेब खूप हुशार आहे. परवाच मास्तर आले होते दुकानात ते सांगत होते. क्या पता? कल को अच्छा पढेगा डाक्टर बनेगा तो पैसा तो लगेगा ना? मग काय करणार आपण?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मानला माहित होते, चांदसाहेब हा रशिदाचा अगदी सगळ्यात नाजूक कोपरा मनातला. एरवी कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करणारी रशिदा याबाबतीत मात्र कमजोर पडते. त्याने बरोब्बर तिथेच नेम धरला. पण हा विषयच एवढा विचित्र होता की रशिदाच्या मनाची थोडी चलबिचल झाली तरी ती काही बधली नाही. तिचा हेका चालूच होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ बेगम, आपण काही पैसेवाले नाही. एका पोराची परवरिश करायची आहे आपल्याला. पण मी तिकडे गेलो तर पैसाही मिळेल आणि आयुष्यात एकदा तरी मक्का मदिना बघायची इच्छा आहे माझी ती पण मला पूर्ण करता येईल. पैगंबरसाहब जहाँ चले सो वो मिट्टी कितनी पाक होगी? मेरेकू एक बार जरूर होना. तुम सबकू भी एक बार घुमाउंगा. बेगम ऐसा मौका बारबार नही आता."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण लोक तिथे जातात, तिथे फसवतात, वाट्टेल ते घडतं. माझ्या मयक्याला एक बाई आहे, तिचा शोहर तर १० वर्षं झाली अजून एकदाही आला नाही. पत्र येतं, पैसे येतात पण ते काय खाक खुषी देतात? मला भिती वाटते. आणि मिट्टी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या मिट्टीच्या नादाला लागून आपली मिट्टी नको व्हायला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय बोलते तू बेगम? नईम माझा चांगला मित्र आहे. तो मला असं फसवणार नाही. मै अपनी जानकाभी भरोसा उसपे कर सकता हूं. मी एक काम करतो. आधी त्याच्याशी बोलून तर बघतो. आणि मग आपण ठरवू. आधीच कशाला नाही म्हणतेस." तो अगदी निकराने म्हणाला. रशिदालाही थोडी लालूच, थोडी उस्मानच्या हट्टीपणाची भिती वाटायला लागली होती. त्याने अगदी डोक्यात घट्ट धरलंच आहे हे जाणवलं तिला. त्याला जास्त विरोध केला तर तो अजून अडून बसेल हे तिला माहित होतं. परत चांदसाहेबच्या परवरिशची फिकीर होतीच तिलाही. अगदी काही घराला सोन्याची कौलं लागलेली नव्हती. तिचा विरोध लटका पडत गेला. उस्मानच्या चेहर्‍यावर तजेला आला. तो नाश्ता करायला बसला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अब्बा..." चांदसाहेबाची सकाळ झाली होती. स्वारी उठून धावत धावत उस्मानपाशी येऊन घट्ट बिलगली. "अब्बा, कुठे गेला होता? मी कित्ती कित्ती वाट बघितली रात्री?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मियाँ, मी काय पळून गेलो होतो का? इथेच तर होतो गल्लीमधे. तो नईमचाचा आलाय ना? त्याच्या बरोबर गप्पा मारत होतो. त्याच्या घरी." उस्मान चांदसाहेबला जवळ घेत म्हणाला. बापलेक बराच वेळ गप्पा मारत मस्ती करत बसले. रशिदा काम करता करता तृप्त होऊन त्यांच्या खेळाकडे बघत होती. मधेच तिचे डोळे भरून आले. तिने मनोमन दुवा मागितली, "या अल्लाह, या नबी, आमच्यावर लक्ष ठेव. नेकी असू दे, हरामाचा पैसा नको, बरकत दे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मान दुकानात जायला निघाला. जाताजाता तो नईमच्या घरी डोकावला. आज बोलून टाकायचंच. चांगल्या कामात देरी नको. बघू नशिब कसं आहे. नईम बाहेरच बसला होता. नुकताच उठलेला दिसत होता. आळसावून बसला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"सलाम आलेकुम, नईममियाँ"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आव आव, उस्मानसेठ. अम्मी दो कप चाय भेजना. उस्मानमियाँ आये है."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्या नईंम? सुब्बे सुब्बे मजाक नक्को करू भाई. कसला उस्मानसेठ आणि कसलं काय?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय झालं उस्मान? कुछ गडबड? कल तक तो सब ठीक था ना भाई!!! "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"गडबड नाही नईम. पण तुझ्याशी एक बोलायचं होतं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे बोल ना मग. इतना हिचक क्यूं रहा तू?" तेवढ्यात चहा आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नईम एक बात बोल, मला दुबईत काही काम मिळेल का?" चहाचा घोट घेत घेत उस्मानने कसेबसे विषयाला तोंड फोडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अब्बे साले... ये बात है क्या? तो उसमे इतना शरमा क्यू रहा है पूछनेमे? मला वाटलं तुला काही पैसा वगैरे पाहिजे. नोकरी पाहिजे काय? ठीक आहे. मी एकदम कसं सांगू? पण दुबईमधे मी ज्या शेखकडे काम करतो ना, तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे नोकर मोजायला एक माणूस ठेवावा लागेल. माझ्यासारखे ड्रायव्हरच दहाबारा आहेत त्याच्याकडे. काहीतरी करुच आपण. मी माझ्या मॅनेजरला विचारून बघतो. आणि तुला सांगतो." नईम अगदी सहजतेने म्हणाला. जणू काही मॅनेजरला विचारायचे ते केवळ उपचार म्हणून, बाकी सगळं पक्कंच झालंय. त्याची सहजता बघून उस्मानही सुखावला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय काम करावं लागेल रे मला? मला तर ड्रायव्हिंग येत नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नईम जोरात हसला... "सबर करो दोस्त, सबर करो. अरे आत्ताशी कुठे आपण बोलायला लागलोय. आणि तू नोकरी पक्कीच समजून उडायला लागला? वेळ लागतो रे. आणि काम मात्र काय पडेल ते करावं लागेल. हे नाही करणार ते नाही करणार नखरे नाही चालत तिथे. बघ, विचार कर." उस्मान आता सगळ्या विचारांच्या पलिकडे पोचला होता. त्याला आता डोळ्यापुढे दुबई, तिथले शेख, वाळवंट, मक्का, मदिना, उंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा दिसायला लागला होता. त्यासाठी तो काय वाट्टेल ते करायला तयार होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो नईमला म्हणाला, "हरकत नाही, नईम. बिल्कुल तक्रार नाही करणार. तू बोल तुझ्या साहेबाशी." नईमने परत एकदा त्याला आश्वासन दिले की तो पत्र लिहिल लवकरच. उस्मान हवेत तरंगतच दुकानात गेला. पुढचे काही दिवस तो केवळ शरीराने गावात होता. बाकी दुबईला तर तो कधीच पोचला. त्याला आता स्वप्नातही दुबई दिसत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पाच सहा दिवसांनी एका संध्याकाळी नईम उस्मानच्या घरी आला. "उस्मान, एक खबर है. मी ज्या एजंटकडून दुबईला गेलो होतो ना त्याच्याशी मी बोललो. त्याला मी सगळी कल्पना दिली. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे तो. त्याला म्हणलं की, उस्मान माझा दोस्त आहे आणि तो आपल्या पोराच्या भल्यासाठी दोन तीन वर्षं दुबईला जायचं म्हणतोय. काही असेल तर सांग. काल त्याने फोन केला होता. तो म्हणतोय की दुबईला एक ऑफर आहे. पण त्यात जरा प्रॉब्लेम आहे." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ तो शेख खूप मोठा माणूस आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. तो गरीब देशातल्या हुशार मुलांना घेऊन जातो आणि त्यांना खूप शिकवतो, पैसा देतो. एजंट म्हणतोय तुझ्याबरोबर चांदसाहेबाला घेऊन जायला तयार असशील तर आत्ता नोकरी देतो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय? नईम तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?", उस्मान अक्षरशः हादरला. हे काहीतरी भलतंच समोर येत होतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ उस्मान. मला कळतंय. आणि पटतंय पण. अरे असं बघ, तू पण त्याच शेखकडे नोकरी करणार, आणि चांदसाहेबपण तिथेच राहणार. मग काय हरकत आहे?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे पण, त्या ६ वर्षांच्या पोराला घेऊन इतक्या लांब कसा जाणार मी? आणि तो त्याच्या अम्मीशिवाय कसा राहिल? शक्य नाही ते."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बघ बाबा, चांगला चान्स सोडतो आहेस तू. अरे अशी बरीच मुलं आहेत तिथे म्हणे. चांदसाहेबसाठीच करतो आहेस ना तू हे सगळं? मग, अशी संधी स्वप्नात तरी मिळाली असती का तुला? माझं ऐक आणि हो म्हण."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नईम, बेगमको पूछेबिना मै कुछ बोल नही सकता."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ठीक है, उस्मान, बराबर है. लेकिन बेगमको मनाओ. बायका प्यार मोहब्बत मधे अडकतात. दुनिया काय चीज आहे हे त्यांना माहित नसते. तू बेगमला पटव कसेही करून. आपल्याकडे अजून दोन दिवस टाइम आहे. याद रख. चलता हूं. खुदा हाफिझ." &lt;br /&gt;&lt;br /&gt;नईम गेला. उस्मानच्या डोक्यात एक भुंगा सोडून गेला. दिवसभर तो भुंगा त्याचा मेंदू पोखरत राहिला, पण त्याची रशिदासमोर हा विषय काढायची हिंमतच नाही झाली. पण वेळ हातची जात होती. कसेही करून रशिदाला पटवायलाच पाहिजे. त्याने दुसर्‍या दिवशी हळूच तिला सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अल्ला रहम करे, मियाँ, आप होशमे तो है ना?" रशिदाचा अवतार केवळ बघण्यासारखा होता. "आपको बोल्तेभी खराब नै लगा? आज बोले सो बोले. परत बोललात तर माझ्यासारखी वाईट नाही कुणी, सांगून ठेवते." दिवसभर उस्मान तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे गेल्यावर चांदसाहेब कसा सुखात लोळेल, शिकेल, मोठा माणूस होईल. सग्गळं सग्गळं सांगून झालं. पण ती अज्जिबात बधली नाही. शेवटी नाईलाज होऊन त्याने नईमला नकार कळवला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"देख उस्मान, तू मेरा दोस्त है. मी बघतो काही मार्ग आहे का ते." उस्मानपुढे मान डोलावण्याशिवाय उपाय नव्हता. नईम एवढ्या आपुलकीने सगळं करत होता, त्या ओझ्याखाली तो अजून दबत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मधे एक दोन दिवस गेले आणि परत एकदा नईम उस्मानला भेटायला त्याच्या दुकानावर आला. "देख उस्मान, भाभी काय म्हणते की ती चांदसाहेबला एकटं सोडणार नाही ना? मग भाभीलापण नोकरी मिळाली तर? शेखच्या घरी नोकरी. त्याच्याकडे कुक किंवा मेड वगैरे म्हणून भाभीला नोकरी मिळवून दिली तर? आधी तुम्ही दोघं जा आणि तू सेट झालास, तुला तिथे पटलं तर मग पाच सहा महिन्यात भाभीपण येईल. मग तर झालं?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे नईम, म्हणजे आम्ही सगळेच तिथे? मला तर तू आजकाल काय बोलतो आहेस ते कळेनासंच झालंय. मी नुसती एक साधी नोकरी मागितली आणि इथे तू आणि तुझा तो एजंट आख्खं कुटुंबच्या कुटुंब पाठवायला निघाले!!!" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"उस्मान, प्रश्न नंतर सोडवत बस. आधी संधी साधून घे. तो शेख खूप मोठा आणि दयाळू आहे." बराच वेळ तो बोलत होता. उस्मान हळूहळू परत त्याच्या खुशहालीच्या स्वप्नात जायला लागला. शेवटी त्याच्याकडून हा नवीन प्रस्ताव रशिदाबरोबर चर्चा करेन या आश्वासनानंतरच नईम गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मानने अक्षरशः आपली सगळी बुद्धी पणाला लावून रशिदाला पटवले. नईमने जो आकडा सांगितला होता तो तर तीला मोजता पण येत नव्हता. एवढी संधी समोरून चालत येत आहे म्हणल्यावर तीपण हळूहळू डळमळली. पुढच्या गोष्टी पटापट घडल्या. तिघांचे पासपोर्ट एजंटनेच बनवून दिले. सगळे फॉर्म्स भरून घेतले. सह्या घेतल्या. एव्हाना नईम परत गेला होता. आता व्हिसाची वाट बघणे. रशिदाला तर हे सगळे शब्द कळतही नव्हते. ती सतत दुवा करत होती. सगळं काही नीट होऊ दे, देवा परमेश्वरा!!! चांदसाहेब तर पार बावरून गेला होता. त्याला फक्त एवढेच कळले होते की अब्बू आपल्याला घेऊन कुठे तरी लांब चालले आहेत. आणि अम्मी येणार पण नंतर. भिती वाटत होतीच त्याला. पण उस्मान त्याला रोज आपण विमानात बसणार, मग ते विमान कसे आकाशात जाणार वगैरे सांगून रमवायचा. त्यामुळे त्याला पण उत्सुकता लागत चालली होती. एकदाचा व्हिसा आला आणि आता लोकांना सांगायला हरकत नाही असा विचार करून तो सगळ्यात आधी काझीसाहेबांना सांगायला गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटा उस्मान, जो भी कर रहे हो सोच समझके करो. अल्लाह को याद करके करो. लक्षात ठेव, सुख पैशावर अवलंबून नसतं. त्याही पलिकडे असतं. सांभाळून रहा." काझीसाहेब म्हणत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो काझीसाहेब. मी लक्षात ठेवेन. मला तिथे गेल्यावर अरबस्तानातल्या पवित्र मातीत रहायला मिळेल. जिथे पैगंबरसाहेब राहिले ती माती पवित्र आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"उस्मान, मिट्टी मिट्टी होती है. उसमे पाक क्या नापाक क्या? माणूस पाक तर माती पण पाक. हा नजरेचा फरक आहे. मातीच्या मागे लागून माती करून घेऊ नकोस. कल्पनेतल्या सुखसमृध्दीसाठी तू वास्तवातल्या सुखाचा सौदा करतो आहेस. तू निर्णय घेतलाच आहेस. कृपाळू परमेश्वर तुझं रक्षण करो." &lt;br /&gt;&lt;br /&gt;तयारी होत होती. रशिदाचा जीव रोज थोडा थोडा तुटत होता. कितीतरी वेळा हे सगळं एक स्वप्नं ठरावं, आपल्याला एकदम जाग यावी असं तिला वाटायचं. पण स्वप्नं चालूच राहिलं. संपलंच नाही. उस्मानशी काही बोलायला जावं तर तो त्याच्या स्वप्नांमधे एवढा गुरफटला होता की त्याला आता त्यापुढे सगळं जग तुच्छ वाटत होतं. आपला साधा सरळ नवरा अचानक एवढा कसा बदलला याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. तिच्या सगळ्या गप्पा ऐकून घेणारा, तिला खुष ठेवायला धडपडणारा उस्मान गायबच झाला होता आणि त्याच्या जागी हा अगदी हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा पण आतून पूर्णपणे वेगळा असलेला उस्मान तिला दिसत होता. हे बरोबर नाहीये, तिचे मन सारखे तिला सांगत होते. पण आता प्रकरण एवढं पुढे गेलं होतं की ते थांबवणं आता शक्य नाही हे तिला कळत होतं. आणि एकदाचा तो दिवस आला. उस्मान आणि चांदसाहेब नवीन कपडे घालून तयार होऊन बसले होते. रशिदाची आई आणि भाऊ आले होते. त्यांना पण हे सगळे पटले नव्हते पण पोरीच्या संसारात कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. दारात गाडी आली. तालुक्याला रेल्वे स्टेशनपर्यंत गाडीतून जायचे होते. गल्लीतले लोक जमले. काझी साहेब आले. त्यांनी दुवा-ए-सफर म्हणला. रशिदा आणि उस्मान एवढ्या सगळ्या लोकांसमोर फक्त डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत होते. त्या क्षणी उस्मानही त्याच्या स्वप्नाच्या दुनियेतून खाली आला होता. दोघं गाडीत बसले, उस्मानने 'बिस्मिल्लाह अर्रहमान अर्रहीम' म्हणले, ड्रायव्हरने गाडी सुरू केली. काही झाले तरी आता मागे वळून बघायचे नाही, उस्मान स्वतःला बजावत होता. पोराच्या भल्याकरता देत असलेली किंमत त्याला चुकती करायचीच होती. त्याने डोळे पुसले आणि चांदासाहेबकडे बघितले. तो बिचारा भेदरून त्याला घट्ट बिलगून बसला होता. त्याला हे सगळं कळत नसलं तरी असह्य होतंय हे स्पष्ट जाणवत होतं त्याच्या चेहर्‍यावरून. उस्मानने त्याला गोष्ट सांगायला सुरूवात केली. थोड्यावेळाने चांदसाहेब झोपून गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जिल्ह्याच्या गावी क्वचितच जाणार्‍या उस्मानला मुंबई आल्यावर भयानक दडपून गेल्यासारखं झालं. तिथले रस्ते, दुकानं, गाड्या, इमारती. त्याने सिनेमात जरी हे सगळे बघितले असले तरी प्रत्यक्षात बघितल्यावर तर तो घाबरूनच गेला होता. एजंटचा माणूस त्याला स्टेशनवर घ्यायला आला होता. तिथून एक दिवसापुरतं त्यांना एका लॉजवर नेलं त्याने. दुबईला जायचे विमान संध्याकाळी होते. दुपारी तो एजंट दोन नवीनच माणसांना घेऊन आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"उस्मान, ये दोनो साब डॉक्टर है. चांदसाहेबला तपासणार आहेत. शेखसाहेबांना मुलं त्यांच्यासमोर एकदम नीट आणि धडधाकट दिसायला हवी असतात." त्यांनी चांदसाहेबला तपासले. सगळे काही ठीक होते. उस्मान त्या आत्ता पर्यंत न पाहिलेल्या दयाळू शेखसाहेबांना दुवा देत होता. तो अगदी भारावून गेला होता. कोण कुठला शेखसाहेब. केवळ गरिब मुलांना मदतच नव्हे तर त्या करता त्या मुलांच्या आईवडिलांना पण नोकरी देतो हा शेखसाहेब. वल्लाह... काय पाक आणि नेकदिल आहे माणूस. प्रत्येक नमाजानंतर तो त्या शेखसाहेबांसाठी मुद्दाम दुवा देत असे. बास्स... आता उद्या दुबई. त्या शेखसाहेबांना एकदा भेटायचे आणि आभार मानायचे. बरोबर असलेला एजंटचा माणूसपण सतत शेखसाहेबांबद्दल बोलत होता. शेखसाहेब कसे दानी आहेत, त्यांनी गरीब देशांत किती मशिदी बांधल्या आहेत, दर वर्षी रमझानमधे लाखो रूपये कसे दान देतात... सतत हेच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी विमानतळ. उस्मानला आता मात्र खरंच भिती वाटायला लागली होती. चांदसाहेब तर पार गारठूनच गेला होता. एकदाचं सगळं पार पडलं आणि विमान उडलं. चांदसाहेब उस्मानला जो चिकटून बसला होता तो काही केल्या सोडतच नव्हता. मधे एकदा एअर होस्टेस्स त्याच्यासाठी चॉकलेट्स आणि खेळणी घेऊन आली तेव्हा तो जरा खुष झाला होता. पण तेवढंच. अडिच तीन तासात विमान दुबईला पोचलं. उस्मानने जे काही दृष्य खिडकीतून बघितलं ते त्याला जन्नतपेक्षाही जास्त मोहवून गेलं. असंख्य दिव्यांनी जमिन अगदी लगडून गेली होती. अंधार नावालाही दिसत नव्हता. जसजसं विमान खाली आलं तसतसे रस्ते आणि त्यावरून वेगाने धावणार्‍या मोटारी दिसू लागल्या. विमानाचा एक जोराचा आवाज आला आणि हलकासा धक्का बसून विमानाने जमिनीला स्पर्श केला. विमान अल्लाद उतरले. बराच वेळ झाला तरी विमान चालतच होते. शेवटी एकदाचे थांबले. एजंटने उस्मानला सगळे व्यवस्थित समजवले होते. त्याप्रमाणे तो चांदसाहेबला घेऊन विमानाच्या बाहेर आल्यावर तिथे त्याला एक माणूस भेटणार होता. तो पुढचे सगळे सोपस्कार आटोपून त्यांना मुक्कामाला नेणार होता. चांदसाहेब झोपला होता. त्याला तसाच घेऊन उस्मान बाहेर आला. त्याला काही शोधायची गरजच पडली नाही. तिथे पायघोळ अरबी कपडे घातलेले दोघंजण उभे होते. त्यांच्या हातात फोटो होते. त्यांनी उस्मानला लगेच इशारा केला. त्या दोघांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांना पुढचे सोपस्कार पार पाडायला घेऊन गेले. उस्मान बिचारा ते जातील तिथे त्यांच्या मागेमागे फिरत होता. ते काहीच बोलत नव्हते. त्याचा खांदा अवघडला होता. एकदाचे सगळे झाले. सामान घेऊन त्यांना विमानतळाच्या बाहेर आणले. एका भल्या मोठ्या व्हॅनमधे बसवले. गाडी निघाली. जवळ जवळ तासभर गेल्यावर एक खूप मोठ्ठं गेट आलं. त्या गेटच्या आजूबाजूला खूप हिरवळ आणि झाडं होती. गाडी आत आली. बरोबरचे ते दोघं आधी खाली उतरले. उस्मान चांदसाहेबला घेऊन उतरला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात त्या दोघांतला एक जण त्याच्या जवळ आला आणि हिंदीत म्हणाला.... "बच्चा इधर दे दो. हमारे पास. और तुम ये दुसरा आदमी के साथ जाव."&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्मान बावचळल्यासारखा बघतच राहिला. त्याला कळेचना हा माणूस काय बोलतोय ते. तसा तो पहिला माणूस परत त्याच्यावर ओरडला. "एय, पागल. क्या देखता है? बच्चा दे दो. और तुम इसके साथ जाव." आणि त्याने जवळ्जवळ चांदसाहेबाला हिसकून घेतले आणि जायला लागला. उस्मान बधिर होऊन उभा होता... जे काही घडलं त्याची त्याला काहीच अपेक्षा नव्हती... आणि इतकं पटकन सगळं घडलं की त्याल अजूनही कळलं नाही काय चाललंय ते... या सगळ्याप्रकारामुळ चांदसाहेब जागा झाला होता पण तो एवढा भेदरला होता की तो रडतही नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो अस्पष्टसं पुटपुटला... "साब, मेरा बेटा... किधर लेके जा रहे हो... हम साथ मे रहने वाले है..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात तो दुसरा माणूस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमशः&lt;br /&gt;&lt;br /&gt;http://www.misalpav.com/node/8356&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-6294307841142104696?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/6294307841142104696/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=6294307841142104696' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/6294307841142104696'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/6294307841142104696'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/06/blog-post_4199.html' title='माती - १'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-2781030588974852613</id><published>2009-06-28T17:28:00.001+04:00</published><updated>2009-06-28T17:28:58.572+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माहिती'/><title type='text'>एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत</title><content type='html'>सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली. एनडी (त्यांना सगळे एनडीच म्हणतात) बद्दल मला फक्त एवढीच माहिती होती की ते एक राजकारणी आहेत आणि शे. का. पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मुलाखत बघताना हा माणूस किती मोठा आहे हे कळले. मुलाखत अर्ध्याच तासाची होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हणले गेले तसे, जरी त्यांनी शे.का. पक्षाचे नेतृत्व केले असले तरी आज ते खर्‍या अर्थाने सर्वपक्षिय झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख लोकचळवळींशी ते आजही जातीने निगडीत आहेत. त्यांना बघूनही ते ८० वर्षांचे असतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे सेझ विरोधात म्हणा किंवा तथाकथित आधुनिक विकासामुळे भूमिपुत्र भरडला जात आहे तिथे त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ते स्वतः तिथे जाऊन मार्गदर्शन करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही. आधुनिक चाणक्य शरद पवार हे त्यांचे मेव्हणे. पवार हे एनडींच्या बायकोचे भाऊ. पण पवारांच्या प्रभावाखाली नसलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते असे वागळे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजकारणी वाटलेले एनडी मुलाखतीच्या शेवटी मात्र त्यापेक्षा खूप मोठ्ठे समाजकारणी आहेत असेच वाटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा कार्यक्रम आपल्याला http://www.ibnlokmat.tv/gallery.php?id=1&amp;conid=57082 या लिंकवर बघता येईल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-2781030588974852613?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/2781030588974852613/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=2781030588974852613' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2781030588974852613'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2781030588974852613'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/06/blog-post_9163.html' title='एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-8518725685508668674</id><published>2009-06-28T17:24:00.000+04:00</published><updated>2009-06-28T17:25:33.672+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माहिती'/><title type='text'>तें ... पाकिस्तानात</title><content type='html'>आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;"Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. "&lt;/strong&gt;&lt;br /&gt;http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/entertainment/05-silence-the-court-is-in-session&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेंच्या "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा प्रयोग १६ मे ला उर्दूमधे कराचीत झाला, त्याची ही बातमी आणि छोटेखानी परिक्षण. बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. नाटक आणि त्याचे सादरीकरण या दोन्हीबद्दल स्तुति केली आहे. पाकिस्तानातले बहुतेक ग्रेट कलाकार इथेही तितकेच नावाजले गेले आहेत. पण आपल्या इथले सिनेकलाकार आणि उर्दू साहित्यिक सोडल्यास इतर भाषांमधून काही तिकडे गेले असेल असे वाटले नव्हते. आज अचानक हे सापडले. पाकिस्तानात नाटक वगैरे कला जिवंत आहेत आणि बर्‍यापैकी सुस्थितीत असाव्यात असेही वाटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटचा परिच्छेद मुद्दम उद्धृत करत आहे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;If nothing else, the play is worth the Rs 500 price tag for its powerful dialogues, especially that of Benare in the end which sums up the dark undertones of our society. Students can avail a 50 per cent discount on the ticket.&lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;५०० रू. तिकिट काढून लोक नाटक , ते पण एका भारतिय नाटककाराचे, बघायला येतात हे नक्किच कौतुकास्पद आहे. बेणारेबाई ही इथेच नव्हे तर तिथेही (किंबहुना कुठेही) तितकीच रेलेव्हंट (मराठी प्रतिशब्द?) वाटते!!! हेच ते तेंचे मोठेपण का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;खूप आनंद वाटतो आहे. हा धागा टाकायचे कारण की &lt;br /&gt;&lt;br /&gt;०१. हा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा असे वाटले. &lt;br /&gt;०२. या निमित्ताने तें कसे जगभर पोचले आहेत त्या बद्दल अजून ऐकायला / चर्चा करायला आवडेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-8518725685508668674?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/8518725685508668674/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=8518725685508668674' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/8518725685508668674'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/8518725685508668674'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/06/blog-post_1194.html' title='तें ... पाकिस्तानात'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-7810450301587767970</id><published>2009-06-28T17:20:00.000+04:00</published><updated>2009-06-28T17:23:14.600+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपटओळख'/><title type='text'>चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!</title><content type='html'>काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच. कशी काय माणसं वर्षानुवर्षे एखाद्या यंत्रासारखी वागू शकतात (इंग्रजीमधे रेजिमेंटेशन हा अगदी चपखल शब्द आहे), करोडो लोकांचं आयुष्य म्हणजे  प्रचंड शक्तिशाली पण एखाद्या लहानशा बटणाच्या मर्जीवर नाचणार्‍या वीजेसारखं कसं काय नियंत्रित होऊ शकतं हे प्रश्न माझ्या बालमनात तेव्हाही यायचे. ही प्रचंड जनशक्ती कशी हळूहळू दबत जाऊन तिचा एक मोठ्ठा सुरूंग झाला आणि एके दिवशी अगदी लहानशा घटनेमुळे त्याचा स्फोट झाला. पण त्याहूनही रंजक त्याआधीचा इतिहास आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आंतरजालामुळे, जवळजवळ सगळीच माहिती उपलब्ध आहे. मला जर्मनीबद्दल पहिल्यापासूनच विशेष आकर्षण आहे. त्यामुळे पूर्व जर्मनीबद्दल विशेष लक्ष देऊन वाचत होतो. कम्युनिझमच्या दडपणाखाली सुध्दा पूर्व जर्मनीने अचाट अशी प्रगती केली होती. पोलादी पडद्याआडचे ते सगळ्यात जास्त प्रगत राष्ट्र (सोविएत युनियनपेक्षाही जास्त प्रगत) होते. आर्थिक निकषांवर त्यांनी काही पश्चिम युरोपातल्या भांडवलशाही देशांनाही मागे टाकले होते. जर्मनांची उद्यमशीलता आणि राष्ट्रप्रेम कम्युनिझमचा वरवंटापण दडपू शकले नाही. तर एकंदरीतच खूप मनोरंजक माहिती कळत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचताना एका वेगळ्याच धाटणीच्या चित्रपटाबद्दल कळलं. चित्रपटाचं नाव, "गुडबाय लेनिन!". नावामुळेच कुतूहल चाळवले गेले. आधी वाटले की कसा लोकांनी उठाव केला, कम्युनिस्ट सत्ता उलथून टाकली वगैरे बद्दल एखादा माहितीपट असेल. पण नाही... काहीतरी वेगळंच होतं हे प्रकरण. मग ठरवलं की बघायचाच. जर्मनीमधे २००३ साली बनलेला हा चित्रपट पूर्णपणे जर्मन भाषेत आहे. त्यामुळे सबटायटल्स असतील तरच कळणार ना. म्हणून मग जालावर सबटायटल्ससकट कुठे उपलब्ध आहे का त्याचा शोध सुरू केला... आणि काल परवा मिळाला एकदाचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही आहे केर्नर कुटुंबाची गोष्ट, ऑक्टोबर १९८९ मधे सुरू होते जेव्हा पूर्व जर्मनीला शेवटचे आचके यायला नुकतीच सुरूवात झाली होती आणि साधारण ऑक्टोबर १९९० पर्यंत संपते, जेव्हा पूर्व जर्मनीचे पश्चिम जर्मनी मधे विलिनीकरण होऊन परत एकदा एक एकसंध जर्मनी दिमाखात जगाच्या नकाशावर अवतरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडर केर्नर हा १८ वर्षांचा मुलगा आपल्या आई (ख्रिस्तिआन) आणि बहिण (अरिआन) बरोबर राहत असतो. सुरूवातीच्या काही दृष्यातून आपल्याला अलेक्झांडरच्या लहानपणाबद्दल फ्लॅशबॅक्स मधून कळतं... त्याचे वडिल तो १० वर्षांचा असताना पश्चिम जर्मनीला पळून गेलेले असतात. त्यानंतर त्याची आई भ्रमिष्ट होते, पण काही उपचारांनंतर सुधारते. त्यानंतर ख्रिस्तिआन स्वतःला कम्युनिस्ट पार्टीच्या कामाला वाहून घेते. ती एक शिक्षिका असते आणि विद्यार्थ्यांमधे खूपच लोकप्रिय असते. ती लोकांच्या समस्या स्वतःच्या पार्टीकनेक्शन्सच्या जोरावर सोडवून देते, त्यामुळे तिला आजूबाजूच्या वर्तुळात एक मानाचे स्थान असते. असं सगळं सुरळित चालू असताना, एक दिवस येतो आणि सगळं उलटपालट करून जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;निमित्त असतं पूर्व जर्मनीच्या ४०व्या वर्धापनदिनाचं. कम्युनिस्ट जगात गोर्बाचोवनी आणलेल्या बदलाच्या वार्‍यामुळे पूर्व जर्मनीच्या तत्कालिन सत्तावर्तुळात अतिशय मूलभूत बदल होतात. आणि त्यामुळे भीड चेपलेल्या पूर्व जर्मनांची जोरदार निदर्शनं सुरू होतात. त्यांना इतर देशात (म्हणजे पश्चिम बर्लिन) जायचे मुक्त संचार स्वातंत्र्य हवे असते. आपले नुकतेच १८ वर्षाचे झालेले अलेक्झांडरभाऊ पण त्यात सामिल होतात. त्याला यथासांग अटक आणि मारहाण होते. आणि नेमकी त्याची आई (ख्रिस्तिआन) ते बघते आणि तिला हार्ट अ‍ॅटॅक येऊन ती तिथेच कोसळते. अलेक्झांडर तिला बघतो पण पोलिस त्याला मारहाण करून गाडीत घालून घेऊन जातात. तो काहीच करू शकत नाही. पण इकडे पोलिस ख्रिस्तिआनवर उपचार करतात, आणि तिच्या एकंदरीत प्रतिष्ठेमुळे अलेक्झांडरची पण सुटका होते. तो हॉस्पिटलमधे येतो आणि त्याला कळते की उपचारांत उशिर झाल्याने त्याची आई कोमात गेली आहे. पुढचे सगळेच अनिश्चित झालेले असते. तिला हॉस्पिटलमधे ठेवून फक्त शुश्रूषा करत राहणे एवढेच शक्य असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हळूहळू दिवस जात असतात. बाहेर अतिशय वेगाने घटना घडत असतात. कम्युनिस्ट राजवट जाते. पूर्व जर्मनीमधे पहिल्यांदाच मुक्त निवडणुका होतात. नवीन राज्यकर्ते येतात. जर्मनीच्या एकीकरणाची बोलणी चालू असतात. इकडे अलेक्झांडरचे त्याच्या आईची सेवा करणार्‍या लारा नावाच्या नर्सबरोबर सूत जुळते. आयुष्य अडखळते पण मग परत हळूहळू वेग घेऊ लागते. आणि एक दिवस अचानक आईसाहेब चक्क व्यवस्थित शुध्दीत येतात. सगळ्यांना आनंद होतो. पण डॉक्टर मात्र अगदी स्पष्टपणे सांगतात, तिचे हृदय अतिशय नाजुक झालेले आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा धक्का सहन होणार नाही. आता मात्र सगळेच घाबरतात. कारण हे की, ती कोमात असताना जी काही उलथापालथ झाली आहे, ज्या विचारसरणीवर एवढा विश्वास ठेवून आयुष्यभर काम केले ती विचारसरणी, तो देश अगदी पाचोळ्यासारखे उडून गेलेले बघितले तर तिचा मृत्यू नक्की. आता काय करणार? प्रत्यक्षातून पुसला गेलेला पूर्व जर्मनी हा देश परत कसा आणणार? आणि तो सुद्धा किती दिवस? सगळेच प्रश्न.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडर मात्र एकदम हिकमती पोरगा असतो. तो आईला घरी आणतो, घराला परत जुनं रूप देतो. जुन्या पध्दतिचे कपडे परत वापरायला काढतो. त्याची बहिण आरिआन पण सामिल होते. आता एकामागे एक अशी संकटं यायला लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे, आईला हवा असतो टिव्ही. आता टिव्ही लावला तरी त्यावर दाखवणार काय? मग अलेक्झांडर त्याच्या एका मित्राच्या सहाय्याने खोट्या बातम्या, खोटे व्हिडिओ वगैरे तयार करून ते सगळे व्हीसीआर टिव्हीला जोडून तिला दाखवत राहतो. मग एक दिवस नेमका त्यांच्या घराच्या समोरच्या उंच इमारतीवर कोकाकोलाची जाहिरात लावली जाते आणि नेमकी ख्रिस्तिआन ती बघते. आता हे कसे काय? साक्षात भांडवलशाहीचा देव कोकाकोला पूर्व जर्मनी मधे? ती हादरतेच. मग अलेक्झांडर आणि त्याच्या मित्राची पळापळ. ते एक अशी बातमी तयार करून दाखवतात की कोकाकोला कम्युनिझमला शरण आला आहे, कोकाकोलाचा फॉर्म्युला हा खरंतर कम्युनिस्टांनीच शोधून काढला होता पण तो अमेरिकनांनी पळवून नेला होता असं सिध्द झालंय वगैरे !!! असे बरेच किस्से घडतात. पण पठ्ठ्या अलेक्झांडर सगळ्याला पुरून उरतो. त्याची आपल्या आईला जगवण्याची धडपड आणि त्यातल्या गंमती एकीकडे हसायला लावतात पण मनाला चटका लावून जातात. सगळे त्याला सांगत असतात की बाबारे असं किती दिवस करणार तू? पण हा पोरगा आपला हट्ट सोडत नाही. इतक्यात त्याच्या वडिलांचा पत्ता लागतो. ते आता पश्चिम जर्मनी मधे एक सुखवस्तू डॉक्टर झालेले असतात. त्यातच त्याची आई त्याला वडिलांच्या जाण्यामागची खरी कारणं सांगते आणि फक्त एकदा आपल्या नवर्‍याला भेटायची इच्छा व्यक्त करते. अलेक्झांडर अगदी ती सुध्दा पूर्ण करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या दिवशी पूर्व जर्मनी विलिन होतो त्यानंतर बरोब्बर तीन दिवसांनी ख्रिस्तिआन शांतपणे मरते. एका खूप मोठ्या ताणातून सगळेच मुक्त होतात. अलेक्झांडरने शेवटपर्यंत केवळ आपल्या आईचं मन मोडू नये म्हणून एक अस्ताला गेलेला देशच्या देश अगदी यशस्वीपणे तिच्या त्या छोट्याशा खोलीमधे उभा केलेला असतो. चित्रपट संपतो तेव्हा आपण नकळतपणे अलेक्झांडरच्या बाजूला उभे राहून ख्रिस्तिआनला शेवटचा निरोप देत असतो. आणि एकीकडे वाईट वाटत असूनही, "चला!!! आता अलेक्झांडर सुटला बिचारा धावपळीतून" असं वाटून हायसं वाटतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथेच्या अनुषंगानेच पण त्या एक वर्षात घडलेल्या घटनांचा जो काही विदारक सामाजिक परिणाम झाला त्याचे पण चित्रण सुंदर केले आहे. बळजबरीने उभारलेली का होईना, पण एक आख्खीच्या आख्खी जीवनपध्दती जेव्हा इतक्या पटकन लयाला जाते, तेव्हा नुसत्याच भौगोलिक सीमारेषा नव्हे तर लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त करून जाते. ज्या व्यवस्थेच्या आधारावर लोकांनी आयुष्यं घालवली ती एका रात्रीत नष्ट होऊन लोकांना, विशेषतः म्हातार्‍या पेन्शनर लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणते, वैफल्यग्रस्त करते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणत्याही प्रकारची ड्रामेबाजी, रडारड वगैरे (वाव असूनसुद्धा) नाही, एकही प्रसंग / फ्रेम भडक नाही. अगदी वेगळीच कथा आणि अलेक्झांडर, ख्रिस्तिआन, अरिआन, लारा  या मुख्य पात्रांचा अतिशय सहजसुंदर अभिनय एक सुखद कलानुभव देऊन जातो. पूर्ण चित्रपट एका वेगात जातो, कुठेही रटाळ अथवा कंटाळवाणे होत नाही. सतत, "आता काय नवीन भानगड होईल? पुढे काय आता?" असं वाटत राहतं. चांगले चित्रपट बघायची इच्छा असणार्‍यांनी अगदी जरूर बघावा हा चित्रपट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा चित्रपट मला जालावर टॉरेंटच्या माध्यमातून मिळाला. कोणाला इच्छा असल्यास टॉरेंट फाईल पाठवेन.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-7810450301587767970?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/7810450301587767970/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=7810450301587767970' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7810450301587767970'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7810450301587767970'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/06/blog-post_28.html' title='चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-3229356300294906644</id><published>2009-06-28T17:16:00.000+04:00</published><updated>2009-06-28T17:18:31.800+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपटओळख'/><title type='text'>चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा</title><content type='html'>युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्‍या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते. तर, दुसर्‍या महायुद्धात झालेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि ज्यामुळे युध्दाला अतिशय महत्वाची कलाटणी मिळाली अशा युध्दांबद्दल वाचत असताना, एक थोडेसे चमत्कारिक नाव कानावर पडले. "इवो जिमा". नाव कायमचे लक्षात राहिले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"इवो जिमा" हे जपानी बेटसमूहापैकी एक बेट. जपानच्या मुख्यभूमी पासून खूपच दूर. युध्दात जेव्हा जपानची पीछेहाट सुरू झाली तेव्हा मुख्यभूमीच्या बचावासाठी जपानी सैन्याने इथे घट्ट पाय रोवून ठाण मांडले होते. या बेटाचे महत्व असे की, हे जर अमेरिकेच्या हाती पडले तर तिथे अमेरिकेला तळ बनवून सैन्य, आरमार आणि विमानं वगैरे ठेवता आले असते. आणि मग या तळाचा उपयोग मुख्यभूमीवर बाँबवर्षाव आणि हल्ले करण्यासाठी झाला असता. तेव्हा हे बेट वाचवणे हे अतिशय आवश्यक होते. पुढे अतिशय घनघोर लढाई झाली आणि शेवटी हे बेट अमेरिकेच्या हाती पडले. आजही अमेरिकेच्या मरिन कोअर साठी हे बेट एक तीर्थक्षेत्र आहे. नवीन भरती झालेले इथे श्रध्दांजली वाहण्यासाठी येतातच. तर जपानी सरकारनेही या बेटावर बराचसा भाग प्रतिबंधित केला आहे कारण जवळजवळ १० हजार जपानी सैनिकांची प्रेतं (अवशेष) तिथे विखुरलेली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशा या ऐतिहासिक घटनेवर आपल्या क्लिंट इस्टवुड आजोबांनी एक चित्रपट काढला आणि स्वतः दिग्दर्शित केला. खूप दिवसांपासून बघायची इच्छा होतीच. आज योग आला. अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट. चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे. या लढाईत ज्याने जपानी सैन्याचे नेतृत्व केले होते, त्याने वेळोवेळी आपल्या बायको आणि मुलांना लिहिलेल्या पत्रात लढाईच्या आधीच्या तयारीचे आणि प्रत्यक्ष लढाईचे वर्णन केले होते. त्यावर आधारित एक पुस्तक निघाले आणि त्यावर आधारित हा चित्रपट. चित्रपट पूर्णपणे जपानी भाषेत आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत. काही काही प्रसंगात सबटायटल्स नसले तरी भाषा आड आली नसती एवढे सुंदर काम केले आहे अभिनेत्यांनी. साधारण कथानक असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इवो जिमा वर जपानी सैन्य ठाण मांडून बसले आहे. त्या सैन्याचा प्रमुख म्हणून ले. जनरल तदामिची कुरिबायाशी याची नेमणुक झाली आहे आणि तो अधिकार सूत्र हातात घ्यायला येतो. त्याच्या स्वागताला काही अधिकारी उपस्थित असतात. तिथपासूनच त्याच्या आधुनिक आणि कल्पक विचारांची आणि त्या जुन्या अधिकार्‍यांच्या जुनाट / पारंपारिक विचारांची लढाई सुरू होते. बेटाची पाहणी करता करता त्याला असे आढळते की जरी अमेरिकेचे सैन्य बोटींमधून किनार्‍यावर उतरेल तरी तिथेच (म्हणजे किनार्‍यांवर) त्यांच्याशी लढणे कठिण जाईल. बेटाच्या एका भागात त्या बेटावरचा सगळ्यात उंच डोंगर असतो. बेत असा ठरतो की सगळे किनारे मोकळे सोडायचे आणि त्या डोंगरावर तळ बनवायचा. जपानी सैन्यात 'साइगो' नावाचा एक सामान्य शिपाई दाखवला आहे. तो पेशाने बेकर असतो पण जबरदस्तीने सैन्यात भरती केले असते त्याला. हा या चित्रपटाचा दुसरा नायक. (रूढार्थाने या चित्रपटाला नायक  नसला तरी कुरिबायाशी आणि साइगो ही मुख्या पात्रं आहेत. त्यांच्या नजरेतून, आठवणींमधून चित्रपट पुढे जातो.) तर हा साइगो युध्दाला कंटाळलेला असतो, त्याला युध्द वगैरे प्रकारातला फोलपणा कळून चुकलेला असतो. लढाई सुरू होते आणि नेहमीच्याच मार्गाने जात राहते. बरेचसे जपानी सैनिक मरतात. शेवटी अगदी मोजके सैनिक राहतात. कुरिबायाशी स्वत: जातीने त्यांना घेऊन हल्ला करायला निघतो. तुंबळ लढाई होते, आणि..... पुढचे बघायचे असेल तर चित्रपटच बघा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या संपूर्ण प्रवासात, जपानी संस्कृती मधले जे काही कट्टर प्रकार आहेत ते अगदी छान टिपले आहेत. शत्रूच्या हाती जिवंतपणे न पडणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी मग हाराकिरी आलीच. लढाईच्या सुरूवातीला एका भागात जपानी सैन्याचे अगदी पानपत होते. काही मोजके सैनिक आणि २-३ अधिकारी उरतात. कुरिबायाशी त्यांना कसंही करून तिथून जीव वाचवून पळून येऊन दुसर्‍या एका भागातल्या तुकडीला मदत करायला सांगतो, पण या तुकडीच्या मुख्य अधिकार्‍याला ते पटत नाही आणि तो स्वत: हाराकिरी तर करतोच पण बाकीच्या सैनिकांना पण भाग पाडतो. साइगो तिथेच असतो, पण तो जीव वाचवून अळतो तिथून. दुसरीकडे जाऊन मदत करण्याऐवजी, 'दिलेली जबाबदारी मला पार पाडता आली नाही म्हणून जीव देणे अधिक योग्य' अशा प्रकारच्या आत्मघातकी विचारांमुळे जपानी सैन्य अजून कमजोर आणि संख्येने घटत जाते. समोर मृत्यू अटळ दिसत असताना सैनिक सगळी सामानाची आवराआवरी करतात वगैरे दृश्ये छान घेतली आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक छान दृश्य / संवाद म्हणजे.... एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे". &lt;br /&gt;&lt;br /&gt;युध्दासारखा तीव्र भावनिक विषय असला तरी पूर्ण चित्रपट अतिशय संयतपणे पण त्यामुळेच परिणामकारी पद्धतीने मांडलेला आहे. (आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.) कुठेही आरडाओरडा नाही, डायलॉगबाजी नाही. उपदेश वगैरे नाही. सगळं कसं अगदी 'रिअल लाईफ'. बरंचसं चित्रण स्टुडिओ / सेट वर झालेल असले तरी कृत्रिमता कुठेही जाणवत नाही. छायाचित्रण पण आवडले. एकंदरीत एक छान चित्रपट बघायची इच्छा असल्यास जरूर बघा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाताजाता... या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे, बहुतेक लोकप्रिय चित्रपटांचे सिक्वेल्स / प्रिक्वेल्स निघतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे नाहीये. या चित्रपटाला आहे एक साथी चित्रपट. म्हणजे क्लिंट इस्टवुडनेच दिग्दर्शित केलेला 'फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स'. हा चित्रपटही इवो जिमाच्या लढाईवरच आहे पण त्यात अमेरिकेच्या दृष्टिकोनातून लढाई दाखवलेली आहे!!! दोन्हीही चित्रपट फक्त २ महिन्यांच्याच फरकाने प्रदर्शित झाले होते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-3229356300294906644?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/3229356300294906644/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=3229356300294906644' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3229356300294906644'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3229356300294906644'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-7415853830827034531</id><published>2009-03-15T14:58:00.000+04:00</published><updated>2009-03-15T14:59:22.972+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पुस्तकओळख'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माहिती'/><title type='text'>पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा</title><content type='html'>जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला. काही पुस्तकांची नावं सुचव असं कळवल्यावर मुक्तसुनीतनी महेश एलकुंचवारांच्या 'पश्चिमप्रभा' या पुस्तकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं. त्यामुळे पुस्तक घेतलेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पुस्तक, एलकुंचवारांनी 'लोकमत' मधे २००४-०५ साली साधारणपणे वर्षभर पाश्चिमात्य साहित्याची तोंडओळख मराठी सामान्य वाचकाला व्हावी अशा हेतूने चालवला होता. यामधे इंग्रजी बरोबरीनेच इतर युरोपिय भाषामधल्या काही उत्कृष्ट कलाकृतींचाही अतिशय धावती पण नेमकी अशी ओळख करून दिली आहे. वृत्तपत्रिय स्तंभलेखन या स्वरूपातले हे लेख अगदी छोटेखानी आहेत आणि ते त्या कलाकृतीची केवळ ओळख करून देणे एवढ्याच पुरते मर्यादित आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एलकुंचवारांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात,&lt;br /&gt;&lt;br /&gt;".... गेली पन्नास वर्षे मी पाश्चात्य वाङ्मय वाचत आहे. त्याबद्दल बोलावे, त्याच्याबद्दल ऐकावे असा योग सहसा येत नाही. त्यामुळे.... मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची... तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे छोटे लेख टिपणवजा आहेत. ते समीक्षा नव्हेत. ते फार विवेचकही नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;.... ही सर्वच पुस्तके इतकी मोठी व अभिजात आहेत की एकेका छोट्याशा टिपणात त्यांना गवसणी घालणे शक्य नाही. पण ज्यांनी ती वाचलेली नाहीत त्यांना ती वाचावीशी वाटावीत व ज्यांनी ती वाचलेली आहेत त्यांना पुनःप्रत्यय मिळावा एवढाच मर्यादित हेतू हा स्तंभ लिहिताना मी मनाशी वागवला होता."&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरं म्हणजे लिहिणारे एलकुंचवार, विषय त्यांना आवडलेल्या साहित्यकृती आणि त्याही अभिजात वगैरे, तेव्हा इतक्या छोट्या टिपणवजा लेखांतून त्या त्या कलाकृतींचे समग्र दर्शन घडवणे ही एक तारेवरचीच कसरत होती. पण त्यांनी ती यशस्वीपणे निभावून नेली आहे. पुस्तकात जागोजागी प्रत्येक कलाकृतीतलं नेमकेपण टिपण्याचा त्यांचा गुण जाणवतो.&lt;br /&gt;हेन्री मिलर, व्हॅन गॉफ, चेकोव, मॉम, टी. एस. एलियट, ग्रॅहॅम ग्रीन, पिरांदेलो, इब्सेन अशी बरेच वेळा कानावर पडलेली नावं तर त्यात आहेतच. पण रँबो, सोग्याल रिंपोचे, वॉल्ट व्हिटमन, लोर्का, ज्याँ जेने, सिल्विया प्लाथ अशी माझ्या सारख्याला कधीच माहित नसलेली नावं पण आहेतच. यातले काही लेखक तर रूढार्थाने साहित्यिकही नाहीत. उदाहरणार्थ तिबेटन लामा सोग्याल रिंपोचे हे धर्मगुरू. त्यांच्या 'तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डायिंग' बद्दल खूप छान ओळख आहे. तसेच दाग हामरस्कोल्ड, हे गृहस्थ तर युनोचे सरचिटणीस. राजनयिक. पण त्यांचे 'मार्किंग्ज' हे काय जबरदस्त ताकदीचे असावे हे त्यांच्यावरचा लेख वाचताना जाणवते. पॉल ब्रंटनचे 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' हे एकमेव पुस्तक असे की जे मी आधी वाचले होते, आणि पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकात जागोजागी एलकुंचवाराच्या चौफेर वाचनाची कल्पना येते. रिंपोचेंच्या पुस्तकाच्या ओळखीत ते लिहितात, "गुरू रिंपोचे सांगतात ते भारतीय माणसाला नवीन नाही. योगसूत्रातला समाधीपाद आणि साधनपाद वाचलेल्या माणसाला तर नाहीच नाही." !!! तर बरेच ठिकाणी पाश्चात्य कलाकृतीशी समांतर अशी भारतीय किंवा मराठी साहित्यातली उदाहरणं ते देतात. ललित, कादंबरी, कविता, नाटक असे सगळेच साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेवटी, "या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?" असे वाटायला लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हे साधारण तीसेक लेखांचे पुस्तक वाचल्यावर माझी मात्र गोची झाली आहे. 'एकदा तरी वाचायची आहेत' या यादीत एकदम इतक्या पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजे, एकंदरीत पुस्तकाचा मूळ उद्देश नक्कीच साध्य झाला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;पश्चिमप्रभा&lt;br /&gt;महेश एलकुंचवार&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिली आवृत्ती (२००६)&lt;br /&gt;चक्षू प्रकाशन, औरंगाबाद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूल्य : रू. १४०/-&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-7415853830827034531?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/7415853830827034531/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=7415853830827034531' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7415853830827034531'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7415853830827034531'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/03/blog-post_7816.html' title='पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-7159668094853510692</id><published>2009-03-13T23:02:00.001+04:00</published><updated>2009-03-13T23:17:29.983+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खोबार'/><title type='text'>माझं खोबार... भाग ८</title><content type='html'>&lt;a href="http://www.misalpav.com/node/3867" title="माझं खोबार... भाग १" target="_blank"&gt;माझं खोबार... भाग १ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/3898" title="... भाग २" target="_blank"&gt;... भाग २ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/3976" title="... भाग ३" target="_blank"&gt;... भाग ३ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/4334" title="... भाग ४" target="_blank"&gt;... भाग ४ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/4516" title="... भाग ५" target="_blank"&gt;... भाग ५ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/5283" title="... भाग ६" target="_blank"&gt;... भाग ६ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/6046" title="... भाग ७" target="_blank"&gt;... भाग ७ &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990066;"&gt;&lt;em&gt;असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण एकदा काय झालं.... &lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;मित्रहो, मागच्या भागात मी मला भेटलेल्या काही पाकिस्तानी मित्रांबद्दल लिहिले. अभारतिय मुसलमान व्यक्तींशी इतक्या जवळून आलेला हा पहिलाच संबंध. पण तो तसा संमिश्र असाच अनुभव म्हणावा लागेल. किंबहुना काही तुरळक अपवाद वगळता, बव्हंशी चांगलेच अनुभव आले. पण व्यक्तिशः असे असले तरी, सामाजिक जीवनावर, हिंडण्या फिरण्यावर एक हलकी का होईना पण वेगळी छाप पडलीच होती. मी पुढे काही अनुभव देणार आहे, जे अगदी पूर्णपणे नाही तरी बर्‍याच प्रमाणात प्रातिनिधिक आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौदी अरेबिया मधली एक प्रसिद्ध ज्युसचा ब्रँड बनवणारी कंपनी आमची कस्टमर होती. माझे तिथे नेहमी जाणे येणे असे. तिथले सगळेच लोक मला चांगले ओळखायला लागले होते. माझा संबंध तिथे विशेषकरून तिथल्या अकाउंट्स / फायनान्स डिपार्टमेंट मधे येत होता. त्या डिपार्टमेंटला तीन माणसं आणि तिघेही इजिप्शियन (स्थानिक भाषेत 'मसरी', अरबीत इजिप्तला 'एल मिस्र' असे म्हणतात.), त्यामुळे एकंदरीत सगळाच घोळ होता. पूर्ण अरब जगात इजिप्शियन्स हे चक्रम आणि सणकी म्हणून ओळखले जातात. मला या तिघांनी हे अगदी व्यवस्थित पटवून द्यायचे असाच जणू काही चंग बांधलेला होता. ;) कोणतीही गोष्ट धडपणे होऊ देत नव्हते. पण हळू हळू त्यांच्याशी नीट ओळख वाढवून वातावरण जरा सुसह्य केले. एखादी गोष्ट कशी समजावली तर त्यांना समजेल याचा अंदाज आला. त्यांचा मुख्य होता अश्रफ आणि अजून एक होता नासर. (या नासरची भली मोठी दाढी होती. नेहमी मला धार्मिक गप्पा मारायला उद्युक्त करायचा. एकदम कट्टर होता. एक दिवस हा पठ्ठ्या दाढी सफाचट करून आला. कारण विचारलं तर म्हणे स्किन वर रॅश आली. नंतर कळलं की त्याला अमेरिकन व्हिसा साठी अर्ज करायचा होता. दाढी वगैरे असल्याने त्याला वाटले की एखाद वेळेस व्हिसा मिळणार नाही, म्हणून मग धर्म गेला उडत आणि दाढी झाली गायब. ;) ) तिसर्‍याचं नाव विसरलो. हळू हळू चांगली मैत्री झाली त्यांच्याशी. पण धार्मिक बाबतीत जरा कडवटपणा जाणवायचाच. कंपनीचा मुख्य अधिकारी इशफाक नावाचा एक पॅलेस्टिनियन होता. हा म्हणजे धर्मात जे जे करू नका असे सांगितलेले ते सगळे करणारा. दर विकेंडला स्वारी बाहरीनमधे मुक्काम ठोकून असायची. हा साहेब आणि ती मसरी गँग एकदम ३६चा आकडा. मी मध्यममार्गी धोरणाने कोणत्याही भानगडीत न पडता आपले काम कसे उरकेल त्या प्रमाणे रहायचो. इथेच माझा एक भारतिय मुस्लिम सहकारी पण येत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा आम्ही दोघंही तिथे एकदम पोचलो. काही काम चालू होतं. तेवढ्यात दुपारच्या प्रार्थनेची वेळ झाली. अश्रफ एकदम सगळे काम सोडून उभा राहिला. निघाला प्रार्थनेला. माझ्या सहकार्‍याला म्हणाला "चल. आपण प्रार्थना उरकून घेऊ आणि मग पुढचे काम करू." (इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे स्वतःच्या प्रार्थनेचं पुण्य, सव्वाब, मिळतंच पण दुसर्‍यांना प्रार्थनेला उद्युक्त केलं तर त्यांच्या पुण्यातला काही हिस्सा पण मिळतो. त्यामुळेच लोक एक दुसर्‍याला ओढत असतात प्रार्थनेची वेळ झाली की.) माझा सहकारी म्हणाला की "तू हो पुढे, मी एवढी चर्चा संपवून आलोच." अश्रफ हातपाय धुवायला  गेला. (प्रार्थनेच्या आधी हातपाय धुणे आवश्यक असते. त्याला वदू (उर्दूत वझू) असे म्हणतात.) तो ते करून आला तरी माझा सहकारी माझ्या बरोबर चर्चा करतच होता. त्याला १-२ वेळा आठवण करून अश्रफ गेला. तेवढ्यात नासरने पण तसेच केले. मागे लागून लागून शेवटी तो पण गेला प्रार्थनेला. दोघेही प्रार्थना संपवून परत आले तरी आमची चर्चा चालूच. माझा सहकारी धार्मिक असला तरी एखादी चर्चा किंवा काम अर्धवट टाकून प्रार्थना करणे वगैरे त्याला चूक वाटायचे. जरा वेळाने हे दोघं परत आले आणि आमचे बोलणे चालूच आहे हे पाहून, अश्रफला वाटले की मीच त्याला प्रार्थनेला जाण्यापासून रोखतो आहे. माझ्या सहकार्‍याला तो मोठ्या दिमाखात म्हणाला, "हे बघ, हा देश &lt;strong&gt;&lt;em&gt;आपला&lt;/em&gt;&lt;/strong&gt; आहे. इथे तुला एखाद्या काफिराचे म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. आधी प्रार्थना करून ये." हे ऐकून मी आणि माझा सहकारी काही क्षण अक्षरशः सुन्नच झालो. माझ्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले होते. पण मी त्यातून सावरायच्या आधीच माझा सहकारी एकदम उसळून त्याच्या अंगावर ओरडला, "गप्प बस. काहीही बरळू नकोस. प्रार्थना कधी करायची, करायची की नाही ही, मी आणि अल्ला, आमच्या मधली खाजगी बाब आहे. त्यात तुला दखल द्यायची काहीही गरज नाही. आणि माझ्या मित्राला असं काही बोलशील परत तर याद राख. वाट लावून ठेवेन तुझी. तू अतिशय उद्धटपणे बोलून त्याचा अपमान केला आहेस, आधी क्षमा माग."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सगळा प्रकार अक्षरशः काही सेकंदात घडला. मी भानावर यायच्या आत माझ्या मित्राने अक्षरशः त्याच्या नावाने शंख करायला सुरूवात केली. ४-५ लोक गोळा झाले. प्रकरण वाढलं आणि इशफाकसाहेब त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यांना अंदाज आला आणि तिथल्या तिथे त्यांनी स्वत: कंपनीच्या वतीने माझी माफी मागून प्रकरण मिटवले. आता अपमान करणारे मुसलमान, माझ्या बाजूने भांडणारा मुसलमानच आणि माझी माफी मागणारा पण मुसलमानच (तो सुद्धा अभारतिय) आणि मी 'काफिर'. किती फरक वागण्यात!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच अजून एक प्रसंग मला आठवतोय. माझ्या बाबतीत नाही घडलेला, पण एका चांगल्या स्नेह्यांच्या बाबतीत घडला होता. हे एक मराठी गृहस्थ, खोबारच्या (धाहरान) विमानतळावर एअर इंडियाचे एअरपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. खोबारला बदलून आले होते. त्यांचा एक सहायक होता, अजय म्हणून. पोरगा दिल्लीकडचा. एकदा एअर इंडियाचं विमान आलं होतं ते सुटायला काही तरी तांत्रिक कारणाने उशिर होत होता. माझे स्नेही तेव्हा नेमके दुसरीकडे होते. त्यांच्या खालोखाल म्हणून अजय सगळी धावपळ करत होता. त्या गडबडीत तो सुरक्षापरवाना गळ्यात घालायला विसरला. तसाच तो टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर पडला टारमॅकच्या दिशेने जायला. मोजून ४ पावलं गेला नसेल तर त्याला तिथल्या रक्षकाने अडवले. परवाना गळ्यात नाही म्हणून. हा म्हणाला परवाना आहेच, मी परत माझ्या केबिनमधे जाऊन परवाना घेऊन येतो. पण त्या रक्षकाने त्याला सरळ अटकच केली. हा हातापाया पडत राहिला की अरे अटक करायची तर खुशाल करा, हे एवढं फ्लाईट जाऊ दे. पण काही उपयोग झाला नाही. बाकीच्या स्टाफने हे माझ्या स्नेह्यांना कळवले. ते तातडीने आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. अजयला पण सोडवले. पण त्यांनी त्या रक्षकाविरूद्ध त्याने काही असभ्य भाषा वापरली म्हणून तक्रार केली. एअरपोर्टच्या मोठ्या साहेबाकडे प्रकरण गेले. सुनावणीच्या वेळी त्याने त्या रक्षकाला विचारले की काय काय घडले. त्याने सोयिस्कर कथन केले. मग अजयने त्याचे म्हणणे मांडले. पण शेवटी, "एका काफिराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एका मुसलमानाला शिक्षा करता येणार नाही" असा निवाडा होऊन त्या रक्षकाला 'बाइज्जत बरी' करण्यात आले. माझे स्नेही अक्षरशः संतापाने लाल झाले होते मला हा प्रसंग सांगताना पण.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण असे प्रसंग आणि अनुभव घडणे नविन नसले तरी तितकेसे सर्रास पण नसे हेही नमूद केले पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सौदी अरेबियाची अजून एक खास पैदास म्हणजे 'मुतव्वा'. हे प्रकरण इस्लामी धर्मशास्त्राशी संबंधित असलं तरी आख्ख्या मुस्लिम जगात फक्त सौदी अरेबियातच बघायला मिळतं. आपण खोबार भाग २ मधे बघितलंच आहे की राजसत्ता (अब्द्'अल अझिझ) आणि धर्मसत्ता (शेख अब्द्-अल वहाब) अरबस्तानाच्या एकीकरणासाठी एकत्र आल्या होत्या. त्यातच सत्तेची वाटणी झाली होती. त्याचंच प्रत्यक्ष रूप म्हणजे मुतव्वा. या वाटणी प्रमाणे एक धर्ममार्तंडांची समिती स्थापन झाली. तिचे इंग्रजी नाव 'कमिटी फॉर द प्रपोगेशन ऑफ व्हर्च्यू अँड प्रिव्हेंशन ऑफ व्हाइस'. इतकं जबरदस्त नाव असलेल्या कमिटीचे धंदे पण एकदम जबरदस्तच. या समितीचे सदस्य हे काही विशिष्ट धार्मिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्यांना व्यवस्थित पगार मिळतो. त्यांना पोलिसांसारखे काही अधिकार असतात. कुठेही इस्लाम विरूद्ध वर्तन होताना आढळलं तर त्या व्यक्तींवर तात्काळ आणि कडक कारवाई करायची त्यांना मुभा असते. कायद्या प्रमाणे त्यांच्या बरोबर एक पोलिस असणं बंधनकारक असलं तरी बहुतकरून तसं दिसत नाही. त्यांना कोणालाही अडवून कागदपत्र वगैरे तपासायचे अधिकार बहुधा नसावेत पण हाही नियम धाब्यावर बसवला जातो. याचं कारण म्हणजे त्यांच्या बद्दल असलेली आपल्यासारख्या सामान्य बाहेरच्यांना वाटणारी भिती. एखादा मुतव्वा समोर आला कीच अर्धं अवसान गळतं. इतकी त्यांची दहशत. त्यामुळे आजूबाजूला असे कोणी दिसले की लोक निमूटपणे रस्ता बदलून जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे मुतव्वा लोक साध्याच कपड्यात असतात. पण त्यांना ओळखणं अगदी सोप्पं असतं. त्यांचा गाऊन बर्‍यापैकी आखूड असतो. डोक्यावर रिंग नसते. आणि ती परिचित खूण.... भली मोठ्ठी दाढी... इंग्रजीत अनट्रिम्ड म्हणतात तशी. सहसा त्यांच्या हातात छडी असते. साधारण पणे २-२ च्या जोडीत फिरतात. नजर भिरभिरती. अजून एक खूण म्हणजे भली मोठ्ठी काळ्या काचा असलेली 'जीएमसी' गाडी. हातातली छडी खूप बोलते. विशेषतः प्रार्थनेची वेळ झाली, अजान झाली की सगळ्यांना प्रार्थनेला जाणे भाग पाडायला ही छडी एकदम पटाईत आहे. अश्या वेळी तुम्ही मुसलमान नसाल आणि तुम्हाला एखादा मुतव्वा प्रार्थेनला जायची सक्ती करतो तेव्हा तर प्रसंग फारच गंभीर होतो. आपण सांगावं की मी मुसलमान नाही आणि तो अतिशय आश्चर्याने तुमच्याकडे एखादा विचित्र प्राणी बघावा तसं बघून अगदी स्वाभाविकपणे विचारतो, "का?" !!! आता का काय? काय सांगणार, कप्पाळ? पण नाही, मग तिथेच भर रस्त्यात ऊन्हातान्हात इस्लाम वरचे एक अगम्य प्रवचन ऐकायला मिळते. आपण आपला भार एकदा या पायावर एकदा त्या पायावर टाकत निमूटपणे ऐकत राहणे एवढेच करू शकतो. म्हणली तर गंभीर म्हणली तर विनोदी अवस्था. मग त्याचे समाधान झाले की तो सोडून देतो. आणि एखादा मुसलमान सापडला तर पायावर छडीचे फटके हाणून जबरदस्तीने जवळच्या मशिदीत बोळवण होते त्याची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मगाशी म्हणलं तसं त्यांच्या बद्दल वाटणारी जरबच आपल्याला गप्प बसवते. परत आपल्याला तिथली भाषा वगैरे काही कळत नाही त्यामुळे चेहरा जमेल तितका निरागस ठेवून निभावून न्यावं लागतं. मला स्वतःला कधी छडी खावी लागली नाही पण हा अनुभव घेतलेले बरेच होते माहितीतले. या मुतव्वांची अजून एक खासियत म्हणजे एखादी स्त्री काही चूक करताना आढळली तर ते तिच्याशी बहुतेक सरळ बोलणार नाहीत. तिच्या बरोबर जो कोणी पुरूष असेल त्याच्याशी बोलतात, म्हणजे त्यांची छडी बोलते आधी आणि मग ते बोलतात. :) आणि स्त्रिया एकट्या पडतच नाहीत बाहेर. कमीत कमी एखादा पुरूष असतोच बरोबर. नाहीतर घोळक्याने म्हणजे ७-८ जणी एकदम बाहेर पडायच्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा मी बायकोमुळे छडी खाता खाता वाचलो. माझ्या बायकोला मुतव्वा बघायची फार उत्सुकता लागली होती. मी तिला म्हणायचो पण, काय तुझी महत्वाकांक्षा... पण नाही. आणि खोबार हे तेलव्यापाराचे केंद्र, खूप गोरे लोक तिथे असल्यामुळे सौदी अरेबियामधले सगळ्यात लिबरल शहर होते, त्यामुळे मुतव्वांची पकड बरीच ढिली होती. त्यामुळे मुतव्वा बघायचा योग वर्षातून ५-६ वेळाच. पण एकदा आलाच तो योग तिच्या नशिबात. आणि असा आला की परत तीने नाव नाही काढले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;झालं असं की एकदा तिला बरं नव्हतं, म्हणून आम्ही हॉस्पिटलमधे गेलो. मी गाडी पार्क केली आणि आम्ही हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीकडे निघालो. तिथल्या रितीप्रमाणे तिने काळा गाऊन चढवलाच होता. डोक्यावर केस झाकले जातील असा स्कार्फही घेणं आवश्यक असतं. तेही केलं होतं. चालता चालता तो स्कार्फ खांद्यावर पडला. तेवढ्यात समोरून एक बिनारिंग, आखूड गाऊन घातलेली दाढी येताना बघितली मी. हळूच बायकोला म्हणलं, "तुला मुतव्वा बघायचा आहे ना? हळूच तिकडे बघ, तो जो आहे ना तो मुतव्वा." ती पण 'आजिं म्या परब्रह्म पाहिले'च्या आनंदात तल्लीन होऊन बघत होती. तेवढ्यात ते परब्रह्म आमच्याच दिशेने यायला लागलं. मला वाटले की आम्ही त्याच्याविषयी बोललो ते त्याला कळले वाटते. हलकासा घाम फुटला. तो अगदी माझ्या समोर येऊन उभा ठाकला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण काही बोलायच्या आधी सभ्यपणे हसला, मग म्हणाला, "शी युवर वाइफ?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी, "हो". (क.. क.. क.. क.. किरण स्टाईल मधे). &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो, "कॅन यू प्लीज आस्क हर टू कव्हर हरसेल्फ प्रॉपरली?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;हुश्श!!! माझ्या लक्षात आलं की काय बिघडलं होतं. लगेच सुधारणा झाली. मी त्याला हसून दाखवलं. तो पण हसला आणि गेला बिचारा आपल्या वाटेने. त्या दिवशी माझा डॉक्टरचा खर्च फुकटच गेला, औषध न घेताच बायको खडखडीत बरी झाली. ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असे हे मुतव्वे... खास सौदी प्रॉडक्ट. पण, परत तेच, मानवाला लागू पडणारं महान तत्व त्यांनाही लागू पडतं. म्हणजे... माणूस तो माणूसच... अरे ला कारे केलं की अर्धी अरेरावी संपते. हेच मुतव्व्यांच्या बाबतीत पण सत्य आहे. आपली चूक नसेल आणि अरबी मधे थोडा शाब्दिक लढा देता आला तर त्रास कमी होतो. माझ्या पाहण्यात आलेल्या उदाहरणावरून मला हे चांगलेच कळले. झालं काय की...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौदी मधे सगळ्या रेस्टॉरंट्स मधे 'फॅमिली' आणि 'इतर' अशी द्विवर्ण्य व्यवस्था असते. 'फॅमिली' म्हणजे स्त्रिया किंवा स्त्रिया बरोबर असलेली कुटुंबं. आणि सडे / एकटे पुरूष असतील तर 'इतर' ... सौदी भाषेत बॅचलर्स. फॅमिली भागात अश्या बॅचलर्सना सक्त मनाई. माझे बॅचलर मित्र आमच्या बरोबर फिरायला वगैरे यायला एकदम तय्यार असायचे. कारण माझी बायको बरोबर असल्याने, त्यांना फॅमिली सेक्शन मधे बसायला मिळायचं. ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर आमच्या एका कस्टमरकडचा एक सुदानी अकाऊंटंट एका मॉल मधल्या रेस्टॉरंट मधे गेला. सोबत त्याची बायको होतीच. हा गडी एकदम बिन्धास्त. सुदान म्हणजे पूर्णपणे अरबी झालेले आफ्रिकेतले राष्ट्र. मातृभाषा अरबीच त्याची. फॅमिली एरियात जागा नसल्याने हा बायकोबरोबर 'इतरां'साठी ठेवलेल्या भागात बसला. थोड्यावेळाने एक मुतव्वा येऊन त्याच्या अंगावर ओरडायला लागला. त्याला फॅमिली भागात जायची सक्ती करू लागला. हा खमक्या, तो उलट वाद घालू लागला. थोड्या वेळाने तो मुतव्वा कंटाळला. त्याने विचारलं, "अरे इथे सगळे पुरूष तुझ्या बायकोकडे बघतील ना , तुला चालेल?" आमचा मित्र बायकोकडे वळून म्हणाला "का गं? तुला चालेल?" ती पण अमेरिकेत वगैरे शिकलेली. तिला राग होताच असल्या प्रकाराचा. ती तडक म्हणाली, "मला काही फरक पडत नाही." हे ऐकून त्या मुतव्व्याला बहुतेक फेफरं आलं असेल. बाईला प्रॉब्लेम नाही, दादल्याला पण नाही, ती व्यवस्थित अंग झाकून होती, शांतपणे दोघं जेवत होते. त्यामुळे मुतव्व्याची पंचाईतच झाली. त्यांच्या नावाने शिव्याशाप घालत गेला बिचारा. आमचा मित्र ही गोष्ट सांगताना पण जाम हसत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एका परिस्थितीत या मुतव्व्यांचा एकदम शक्तीपात व्हायचा. ते म्हणजे पाश्चिमात्त्य. मुख्यत्वे अमेरिकन्स आणि इतर गोरी जमात. त्यांच्या समोर अगदीच शेपूट घालून असत. पण एक मात्र खरं की मी असतानाच हे मुतव्वे हळूहळू सौदी सरकारला डोईजड झाले होते. अफगाणिस्तानात गेलेले बहुसंख्य लोक याच पंथातले होते. त्यातले बरेच लोक सोविएत पाडावानंतर परत पण आले. पण मग त्यांना बर्‍याच गोष्टी अगदी मानवेनात. संघर्ष वाढले. पेरलं तसं उगवायला लागलं. असंतोष वाढू लागला आणि त्यातूनच एकदम मोठ्ठा स्फोट होऊन बाहेर पडला 'ओसामा बिन लादेन' नावाचा राक्षस. तो तर सौदी सरकारच्याच गळ्याला नख लावायला निघाला. त्यामुळे त्याला हद्दपार केलं आणि नंतर काय घडलं हा इतिहास जगासमोर आहेच. त्या वेळेपासून सरकार पण खूप सावध झालं. सगळ्यात मोठ्ठी धरपकड मुतव्व्यांचीच झाली. अशी बातमी होती की रियाध शहराबाहेर या मुतव्व्यांच्या 'पुनर्वसना'साठी खास 'केंद्रं' स्थापण्यात आली होती. नुकतंच असंही कळलं की सरकारने काही नविन कायदे लागू करून त्यांच्या कारावायांना अजून खूपच आळा घातला आहे. पण हा संघर्ष इतका सहजासहजी संपणारा नाही. या संघर्षाचा शेवट आपण अजून नक्कीच बघितलेला नाहीये. सर्वसामान्य सौदी माणसाला हिंसा नकोही असेल पण धर्माचा पगडा पण इतकाच आहे की धर्माच्या नावाने लढणारे तथाकथित 'धर्मयोद्धे' कुठे तरी जवळचे वाटतात. तेलावर असलेली राजघराण्यातल्या मूठभर लोकांची पकड आवडत नाही. गोर्‍या लोकांचे मुक्त वावरणे नकोसे वाटते. आणि करू तर काहीच शकत नाहीत. धुमसण्याशिवाय. लोकशाही नाहीच. सामाजिक उन्नतीच्या संधीही तश्या कमीच. पण नविन राजा बराच उदार आहे असे म्हणतात. बायकांना ड्रायव्हिंग करायला परवानगी मिळणे हे आता वास्तवाच्या कक्षेत, अगदी दूर क्षितिजावर का होईना, आले आहे. खोबार तर नक्कीच बदलतंय. माझ्या परवाच्या ट्रिपमधे मी एक दोन बायका बिना बुरख्याच्या पण बघितल्या. अगदी ५ वर्षांपूर्वी ही एक अगदी अशक्य अशी गोष्ट होती. विश्वास नाही बसत. कालाय तस्मै नमः हेच खरं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण असं सगळं असलं तरी तिथलं आमचं जीवन अगदीच रंगहीन किंवा कळाहीन असं मात्र अजिबात नव्हतं. बंधनं असली तरी आपण काहीतरी मार्ग काढतोच. आमचा बर्‍याच लोकांचा एक चांगला ग्रुप होता. आम्ही सणासुदीला एकत्र भेटायचो. धमाल करायचो. गाणी वगैरे व्हायची. एखाद्याचं घर मोठं असेल तर मस्त दांडिया वगैरे पण खेळायचो, नवरात्रीला. माझ्याच घरी चांगला १० दिवस दणकून गणपती पण बसवला होता. रोज गर्दी व्हायची आरतीला. आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नसतील असे लोक पण हौसेने येऊन उभे रहायचे आरतीला. बंधनात जगताना बंडखोरीचा आनंद मिळत असावा बहुतेक त्यांना. एरवी सुद्धा एकत्र भेटून धमाल चालयची. तासनतास गप्पा मारणे हा पण एक ठरलेला कार्यक्रम. विशेषतः विकेंडला. या गप्पातून वेगवेगळे मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे. सौदी माणसांबद्दलचे / देशाबद्दलचे विनोद तर खूपच आहेत. त्यातले काही देतो इथे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौदी माणसं एका बाबतीत विलक्षण प्रसिद्ध. अतिशय जिगरबाज ड्रायव्हिंग. कुणाच्या बापाला भीत नाहीत. १२-१२ वर्षांची पोरं पण बिन्धास्त गाड्या उडवतात. त्यातून तिथले स्थानिक टॅक्सीवाले तर विचारूच नका... एकदम उडन खटोला. त्याचा हा किस्सा. एक गोरा एकदा रियाध विमानतळावर उतरतो आणि टॅक्सीत बसतो. टॅक्सी निघते. थोड्या वेळाने रेड सिग्नल येतो. टॅक्सीवाला शिस्तीत सिग्नल क्रॉस करून जातो. गोरा घामाघूम. अजून एक रेड सिग्नल. परत तेच. गोरा टाईट. तिसर्‍यांदा परत तेच. रेड सिग्नल, गाडी सुसाट. गोरा जवळ जवळ बेशुद्ध. तेवढ्यात अजून एक रेड सिग्नल येतो आणि टॅक्सीवाला क्रॉस करनार एवढ्यात सिग्नल ग्रीन होतो. टॅक्सीवाला जीवाच्या आकांताने ब्रेक मारून थांबतो. गोरा आधी टॅक्सीच्या बाहेर उडी मारतो. आणि मग त्या टॅक्सीवाल्याला विचारतो. "बाबारे, हा काय प्रकार आहे. सगळे रेड सिग्नल तोडलेस. इथे मात्र ग्रीन असून सुद्धा कचकचून ब्रेक मारलास. का?" टॅक्सीवाला म्हणतो... "मग, उजवीकडून एखादा टॅक्सीवाला येत असेल तर." !!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक विनोद म्हणजे सौदी मधली व्हिसा सिस्टिम. तिथे व्हिसावर हा माणूस काय कामासाठी आला आहे हे लिहिलेले असते. त्याला प्रोफेशन म्हणतात. प्रत्येक कंपनीला व्हिसाचा कोटा प्रोफेशन प्रमाणे आणि राष्ट्रियत्वाप्रमाणे ठरवून दिलेले असतो. सगळी नोकरभरती त्यात बसवावी लागते. त्यामुळे असे होते की घ्यायचा आहे भारतिय मॅनेजर पण कंपनीकडे भारतिय मॅनेजरचा व्हिसा नाहीये मग दुसरा जो काही भरतिय व्हिसा उपलब्ध असेल तो घ्यायचा माणसाला आणायचं. त्या मुळे बरेच वेळा व्हिसा प्रोफेशन एक आणि माणूस काम भलतंच करतोय असं दिसायचं. माझ्या ओळखीचा एक जण एका कंपनीत जी.एम. होता पण व्हिसा होता कूकचा. त्यामुळे त्याला बायकोला तिकडे नेताना त्रास झाला. कारण तो जरी जी.एम असला तरी सरकारदरबारी तो 'लेबर कॅटेगरी' असल्याने बायकोला आनता येत नव्हते. तर असाच किस्सा....&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा रियाध झू मधे एक नविन वाघ आणला. पहिल्या दिवशी त्याला जेवायला केळी दिली गेली. वाघ बेक्कार वैतागला. पण बिचारा प्रवासातून दमून भागून आला होता म्हणून जे मिळालं ते खाल्लं. दुसर्‍या दिवशी परत तेच. समोर हाऽऽऽ केळ्यांचा ढीग. वैतागला बिचारा. पण असेल काही स्थानिक पद्धत म्हणून गप्प बसला. तिसर्‍या दिवशी मात्र असं झालं आणि हा चवताळला. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागला. तिथला कीपर धावत आला. "काय रे, काय झालं तुला ओरडायला?" वाघ म्हणाला, "अरे मी वाघ आहे वाघ. मला केळी कसली देतोस?" कीपर शांत पणे म्हणाला, "तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील." !!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि हा मला सगळ्यात जास्त आवडलेला.... एक जण दुसर्‍याला म्हणतो... "सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडळी, खोबारने मला खूप काही दिलं. आयुष्यात पहिल्यांदा दूर भिरकावून दिल्यासारखा झालो होतो, मला आधार दिला. आसरा दिला. आप्तस्वकियांच्या आधाराशिवाय जगायला शिकवलं. माझी बायको आणि मुलगी तिथे आले तेव्हा कुटंबाची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर असणे म्हणजे काय हे दाखवून दिलं. निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्‍हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मंडळी असं हे माझं खोबार. वेगवेगळ्या रंगांचं. मला जे दिसले त्यातले जमले तेवढे रंग तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला. जमलं की नाही हे तुम्हीच ठरवा. मी मात्र माझ्यासाठीच लिहित होतो. माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं. खरं तर खोबार हे एक रूपक आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक खोबार येतं. कोणाला ते आपल्या राहत्या घरीच सापडतं... कोणाला कॉलेजच्या हॉस्टेलवर, तर कोणाला घरापासून हजारो मैल दूर परक्या देशात परक्या मातीत. पण आपापलं खोबार सापडणं हे महत्वाचं. मला ते 'अल खोबार' नावाच्या गावात सापडलं. तुम्हाला? &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऐकायला आवडेल मला... &lt;br /&gt;&lt;br /&gt;सफळ संपूर्ण.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-7159668094853510692?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/7159668094853510692/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=7159668094853510692' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7159668094853510692'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/7159668094853510692'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='माझं खोबार... भाग ८'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-3604060404820403519</id><published>2009-02-28T22:37:00.000+04:00</published><updated>2009-02-28T22:38:41.098+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>फेड...</title><content type='html'>"राजू...."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं. मी तिथे पोचेपर्यंत राजू आणि नंदा पण तिथे पोचलेच. आक्काला सोबत म्हणून राहिलेल्या वसुधाताई पण होत्याच. राजू, नंदा, वसुधाताई सगळेच आक्काला आवरायचा प्रयत्न करत होते. आक्का बर्‍यापैकी बेभान झाली होती. शरीराने एवढीशी आमची आक्का पण त्या तिघांना आवरत नव्हती. राजू तिला समजवत होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"घाबरू नकोस गं आई, आम्ही आहोत ना... कोणी काही करत नाही तुला. कोण तुला घेऊन जातो बघतोच मी. शांत हो बरं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंदाने तिचं डोकं मांडीत घेतलं आणि आई मुलाला मायेने थोपटते तसं हळूवार तिला थोपटायला सुरूवात केली. राजू आणि वसुधाताईंनी तिला दाबून धरलं होतं. थोड्या वेळाने हळू हळू आक्का शांत झाली आणि बारीक आवाजात हुंदके देत रडू लागली. मी आपला नुसता एखादा चित्रपट बघितल्या सारखा दारात उभा राहून बघत होतो. काही कळतच नव्हतं. आक्काच्या चेहर्‍यावरची भिती एवढी स्पष्ट होती की मी पण थिजल्या सारखा झालो होतो. थोड्या वेळाने आक्काला झोप लागली. नंदाने तिचं डोकं हळूच बाजूला ठेवलं आणि ती बाहेर दिवाणखान्यात जाऊन बसली. वसुधाताई आक्काच्या बाजूला बसल्या आणि तिच्या छातीवर हात ठेवून शांतपणे हलक्या आवाजात रामरक्षा म्हणू लागल्या...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"श्रीगणेशाय नमः&lt;br /&gt;अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य,&lt;br /&gt;बुधकौशिक ऋषि:,&lt;br /&gt;श्रीसीतारामचंद्रो देवता..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीच्या अबोल शांततेत त्यांच्या मंद लयीतले खर्जात म्हणलेले रामरक्षेचे पुरातन मंत्र खरंच एक वेगळीच जाणिव करून देत होते. मनाला धीर देत होते. काही तरी अनामिक गूढ असं घडत होतं पण त्या मंत्रोच्चारामुळे मात्र ती जाणिव नक्कीच कमी झाली होती. राजू तिथेच बाजूला खुर्चीत डोळे मिटून बसला होता. त्याच्या चेहर्‍यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी पण हळूच बाहेर दिवाणखान्यात येऊन बसलो. नंदा सोफ्यावर बसली होती. माझ्या चाहुलीने डोळे उघडले तीने. क्षीणपणे हसली. मी काय बोलावं याचा विचार करत होतो, तेवढ्यात तीच म्हणाली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"घाबरलास?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही. पण अगदीच नाही असंही नाही. खरं तर मी घाबरलोय, हादरलोय की स्वप्नात आहे... मला काही कळतच नाहीये."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हं... स्वप्न असतं हे तर किती बरं झालं असतं रे... पण दुर्दैवाने हे स्वप्न नाहीये... वास्तव आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अगं पण हा काय प्रकार आहे? मला नीट सांगणार का? मी संध्याकाळ पासून बघतोय तुम्ही सगळे काही तरी विचित्र टेंशन मधे आहात. आणि मला असं तडकाफडकी का बोलावून घेतलं? तरी बरं एवढ्या शॉर्ट नोटिस मधे तिकिट मिळालं नाही तर आजकाल व्हेकेशन सीझन चालू आहे त्यामुळे सगळ्या फ्लाईट्स भरून जात आहेत. आणि या वसुधाताई कोण आहेत? इथेच राहतात का?" संध्याकाळपासून दाबून ठेवलेली आणि या प्रसंगामुळे शीगेला पोचलेली माझी उत्सुकता बदाबदा बाहेर पडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सांगते रे... सगळं सांगते. तू एवढा परदेशातून थकून भागून आलास म्हणून संध्याकाळी काही बोललो नाही आम्ही. सकाळी बोलू निवांत असं वाटलं. पण आता मात्र सांगते सगळं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या नंतर मात्र जे काही ऐकलं ते निव्वळ मतकरी, धारपांच्या कथा-कादंबर्‍यातच घडतं असं वाटायचं. प्रत्यक्षात, आपल्याच जीवनात कधी असं घडेल असं चुकूनही वाटलं नव्हतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंदा सांगत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला माहितच आहे आमचं रूटिन. सकाळी सात वाजता जुई कॉलेजला जाते, साडेसातला राजू जातो फॅक्टरीत. मी आठ सव्वाआठ पर्यंत निघते. मग त्यानंतर दिवसभर आक्का एकट्याच असतात. मी सगळा स्वैपाक करूनच जाते. त्यांचं आंघोळ, पूजा, पोथी वगैरे चालतं बराच वेळ. मग जेवतात. दुपारी पेपर वगैरे वाचतात, टिव्ही बघतात. जुई येतेच तीन पर्यंत. मग तिचे लाड करण्यात वेळ जातो त्यांचा. चांगलंच गूळपीठ आहे दोघींचं. संध्याकाळी येतोच आम्ही दोघं. मग कधी देवळात जातात तर कधी त्यांच्या एक-दोन मैत्रिणी आहेत आमच्या सोसायटीतल्या त्या येतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ता पर्यंत सगळं ठीक होतं रे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना थोडं विस्मरण व्हायला लागलंय. पटकन आठवत नाही. कधी तरी आंघोळ करून येतात आणि परत त्याच पावली बाथरूम मधे जाऊन आंघोळीला बसतात. एकदा जुई घरी आली दुपारी तर दार उघडलं त्यांनी पण 'कोण पाहिजे?' असं विचारलं. आणि एकदा मी शुक्रवारच्या हळदीकुंकवाला शेजारच्या देशपांडेकाकूंना बोलावलं तर मी त्यांना नमस्कार केल्यावर आक्कांनी मलाच नमस्कार केला. त्यांनी मला 'त्यांची आई' समजणं तर आता माझ्या अंगवळणीच पडलंय." मी ऐकत होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आक्का माझी आत्या, राजू माझा आत्तेभाऊ. हे नातं नुसतं नावापुरतं. मी आणि राजू सख्ख्या भावापेक्षा जास्त जवळ आहोत एकमेकांच्या. आम्ही एकत्र वाढलो, खेळलो. एकाच कॉलेजमधे गेलो. नशिबाने आमच्या बायका पण एकमेकींशी खूपच छान ऍडजस्ट झाल्या. त्या मुळे मी परदेशात गेलो तरी वर्षातून एकदा तरी एकत्र येतो, फिरायला जातो. खूप जवळ आहोत आम्ही सगळे एकमेकांच्या. आक्का मला आईसारखीच आहे. काका तसे लवकरच गेले. पण आक्काने नीट सांभाळून घेतलं. आमची मदत योग्य तेव्हा घेतली. जमेल तशी परतफेड पण केली. राजू पण धडाडीचा. शिकला व्यवस्थित. आज त्याचा स्वतःचा उत्तम धंदा आहे. फॅक्टरी आहे. ५०-६० माणसांना रोजगार देतोय तो. नंदा, सुनंदा खरं नाव तिचं, पण स्वत:ची इस्टेट एजन्सी चालवते. जुई इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. एकंदरीत सगळं कसं छान चालू आहे. आणि आता हे अचानक नविन प्रकरण...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात राजू पण बाहेर येऊन बसला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे काय सांगू तुला... आधी आमच्या लक्षातच नाही आलं की असं काही होतंय. पण जेव्हा आक्काने नंदाला आई समजून नमस्कार केला तेव्हा मात्र आम्ही घाबरलो. आपल्या काटदरे डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिला. त्यांचं म्हणणं पडलं की हे सगळं म्हातारपणामुळे होतंय. टेस्ट्स वगैरे केल्या, त्यात कळलं की बहुतेक हा अल्झायमर्सचा प्रकार असावा. मेंदू मधे काही तरी गडबड होते आणि स्मरणशक्ती जाते माणसाची. पण गंमत म्हणजे लहानपणचं सगळं आठवतं तिला. मोठेपणीचंच विसरते ती. कधी कधी तर ती स्वतःला शाळकरी मुलगीच समजते." राजू सांगत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे कधी कधी त्या 'आई' अशी हाक मारून माझ्या कुशीत शिरतात ना... खूप रडू येतं रे... ज्या बाईने इतकं केलं आयुष्यभर लोकांचं तिला असं का व्हावं... मग मी पण जवळ घेते त्यांना, कुरवाळते, की मग बरं वाटतं त्यांना. पण हे सगळं तात्पुरतं. थोड्या वेळाने आपोआप भानावर येतात त्या. तेव्हा पासून आम्ही पूर्ण दिवसभरासाठी एक मुलगी ठेवली घरात. आक्काला एकटं ठेवणं शक्य नाही." ... नंदा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण मागच्या दहा पंधरा दिवसांपासून मात्र एक फारच विचित्र प्रकार घडतो आहे. आक्का एक दिवस अचानक दुपारी बारा साडेबाराला जोरजोरात ओरडायला लागली. ती कुणालातरी घालवून द्यायचा प्रयत्न करत होती. त्या मुलीने तिला विचारलं तर रस्त्याकडे हात करून ती म्हणाली, 'तो बघ कसा तिथे उभा आहे. कधीचा आपल्याच घराकडे बघतो आहे. काय पाहिजे कुणास ठाऊक.' त्या मुलीने रस्त्याकडे बघितलं तर तिथे अरे चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आक्काचे हातवारे मात्र किती तरी वेळ चाललेच होते. ती पोरगी जाम घाबरली होती. जुई येईपर्यंत कशीबशी थांबली ती घरी, जशी जुई आली तशी पळूनच गेली ती, परत आलीच नाही ती... उरलेले पैसे घ्यायला पण. त्या दिवसापासून नंदा घरीच आहे. आक्काचे भास मात्र हळू हळू वाढतच चालले आहेत. आता तर ती त्या माणसाशी बोलते पण. त्याला काही तरी सांगत असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'आम्ही काही कुणाचं देणं लागत नाही. मी आज पर्यंत कुणाचं एक पैसाही देणं अंगावर ठेवलं नाही. तुझे एवढे पैसे कसे राहू देईन. मुकाट्याने जा इथून.' &lt;br /&gt;&lt;br /&gt;असंच काहीतरी बोलत असते."&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजूचं बोलणं ऐकून मी पण घाबरलो. खरं तर हे सगळं आक्काला होणारे भास म्हणून सोडून द्यावं, पण मग मगाशी जाणवलेलं ते गूढ अस्तित्व, ती अनाम भावना.... ते काय होतं? का तो मला झालेला भास होता? पण ती जाणीव एवढी स्पष्ट होती की केवळ भास म्हणून झटकून टाकूच शकत नव्हतो मी. त्या जाणीवेच्या केवळ आठवणीने माझ्या अंगावर काटा आला आणि अंगावर शिरशिरी आली. माझी अवस्था राजूच्या नजरेतून सुटली नाही. तो एकदम म्हणाला,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"म्हणजे तुला पण जाणवलेलं दिसतंय 'ते' !!!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय म्हणायचंय तुला, राजू? काय जाणवलंय?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"जेव्हा जेव्हा आक्काला असे भास होतात तेव्हा मला आणि नंदाला काही तरी गूढ वाटायचं, कोणी तरी जवळ उभं आहे असं जाणवायचं. फार विचित्र आहे रे हा सगळा प्रकार. ताबडतोब जुईला तिच्या मामाकडे पाठवलं आम्ही. मी पण घरूनच काम करतोय गेले दहा दिवस. नंदाला एकटं सोडू शकत नाही आक्का जवळ. आणि आता तर ती हिस्टेरीक होते. अनावर होते. तो माणूस तिला काही तरी सांगतो आणि ही त्याच्याशी भांडते. असह्य झालंय रे हे सगळं. कोणाशी बोलणार तरी आणि? काय सांगणार लोकांना, माझी आई वेडी झाली, तिला भास होतात, असं सांगू? आणि ती भयानक जाणिव... कोणाला पटेल तरी का? &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणून काल फोन केला आणि ताबडतोब बोलावलं तुला. तू येशील याची खात्री होती. संध्याकाळीच बोलायचं होतं खरं तर. पण नंदा म्हणाली तू दमून आला आहेस. सकाळी बोलू. पण आता तू सगळं बघितलंच आहेस, 'त्याचा' अनुभव घेतलाच आहेस."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजू अरे असं काही नसतं रे... उगाच काय बोलतोस तू? एवढा शिकलेला तू..." मी स्वतःच्या भितीला बाजूला ठेवून राजूला धीर द्यायचा एक क्षीण प्रयत्न केला. प्रयत्न क्षीण होताच कारण राजू थोडासा हसून म्हणाला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आधी स्वतःला पटव आणि मग मला पटवून द्यायचा प्रयत्न कर. ज्याला त्या अस्तित्वाची जाणिव झाली, तो विसरूच शकणार नाही." खरंच होतं त्याचं. पण बुद्धी मात्र हे मानायला तयार नव्हती. मन-बुद्धीचा झगडा चालूच होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ राजू, उद्या आपण परत जाऊ काटदरे डॉक्टरांकडे, अजून काही टेस्ट्स आहेत का ते बघू. मी पण माझ्या काही मित्रांना विचारतो. अरे आजकाल नविन नविन औषधं निघत आहेत दिवसागणिक. काही तरी उपाय नक्कीच असेल. आता मी आलोय ना... बघू काय करता येईल ते. अरे पण त्या वसुधाबाई कोण रे?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"त्या आक्काच्या ओळखीच्या आहेत. त्यांचा गावाबाहेर एक आश्रम आहे. त्या आणि त्यांच्या बरोबर अजून ४-५ लोक असे राहतात तिथे. एक छोटंसं रामाचं देऊळ आहे तिथे. प्रसन्न ठिकाण आहे. खूप जण त्यांच्या कडे जातात. दर गुरूवारी आक्का जायची तिथे. गेले २-३ गुरूवार गेली नाही ती, म्हणून काल त्या सहज चौकशी करायला आल्या. त्यांना बघताच आक्काने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला, सोडेचना. त्या पण जरा शांतच बसल्या होत्या. आक्का पण त्यांना जाऊ देईना, म्हणून मग आम्हीच त्यांना म्हणलं की शक्य असेल तर रहा इथेच आज. त्या पण अगदी मोकळेपणी राह्यल्या. म्हणूनच आज आम्ही आमच्या खोलीत झोपलो. वाटलं त्यांच्या मुळे आक्का जरा शांत झाली. आज झोप मिळेल जरा, तर हे सगळं रामायण परत घडलं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे जाऊ दे रे... सगळं होईल ठीक. आता झोप बरं. मी बसतो इथेच जरा वेळ." बळजबरीने मी दोघांना झोपायला पाठवलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काय असेल हा प्रकार? खरंच असं काही असेल? कोण माणूस असेल तो? काय पाहिजे असेल त्याला? त्याची अशी काय वस्तू राहिली आमच्या कडे की तो ती परत मागतो आहे? मी एकदम चपापून भानावर आलो. मी तर खरंच तो माणूस आहेच असं मानून विचार करायला लागलो होतो. निग्रहाने सगळे विचार बाजूला सारले. आक्काच्या खोलीकडे गेलो. हळूच डोकावून बघितले. आक्का शांतपणे झोपली होती. वसुधाताई तिच्या बाजूला शांतपणे डोळे बंद करून बसल्या होत्या. नाईटलॅंपच्या निळसर प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळाच भासत होता. चेहर्‍यावर एक प्रसन्नता होती. त्यांच्याकडे नुसतं बघून मला बरं वाटलं. ओझं जरा कमी झालं. मी अंथरूणावर येऊन पडलो. प्रवासाचा शीण, आक्काचा एपिसोड... सगळा ताण एका क्षणात माझ्यावर चालून आला आणि मी शरण गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी उशिराच जाग आली. नंदा-राजू उठलेच होते. माझीच वाट बघत होते. आक्का पण उठली होती. आता तर ती एकदम वेगळीच वाटत होती. रात्रीची आक्का जणू तिच्यासारखी दिसणारी पण दुसरीच बाई होती. सूर्यप्रकाशात काय जादू असते. तेच घर, त्याच वस्तू, तीच झाडं, त्याच व्यक्ति... रात्रीच्या काळोखात एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे भासतात कधीकधी. एकदा उजाडलं की मात्र सगळं अचानक मंगलमय होऊन जातं. हाही खरा आपला भासच. बदलत काही नसतं.... फक्त आपली नजर आणि आपलं मन बदलतं. पण अंधाराचा हा गुणधर्मच असावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजू शांतपणे बसला होता. मीच बोलायला सुरूवात केली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"चल तयार हो. डॉक्टरांकडे जाऊन येऊ."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"कशाला?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे असं काय करतोस? भेटून येऊ. विचारू त्यांना की अजून काय करता येईल." त्याची अवस्था बघून मला कसं तरीच झालं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचं बोलणं चालू असतानाच वसुधाताईपण बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसल्या आमच्या बरोबर. राजूने आमची ओळख करून दिली. नमस्कार वगैरे झाले. वसुधाताईंनी बोलायला सुरूवात केली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजू, कालची पूर्ण रात्र मी आक्कांच्या बाजूला बसले होते. मला काही तरी जाणवत होतं. काय ते नक्की अजून नाही कळलं, मी प्रयत्न करत होते, पण नीट पकडीत येत नव्हतं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी, नंदा, राजू.... फक्त खुर्चीतून खाली पडायचेच बाकी होतो. म्हणजे आम्ही एकटेच नव्हतो तर, 'त्या'ची जाणीव होणारे. आता मात्र डोकं कामातूनच गेलं. असह्य झालं अगदी. काही समजेचना. आजपर्यंतचं शिक्षण, विचार सांगत होते की असं काही नसतं. हे सगळे नुसते मनाचे खेळ असतात. पण मग ती जाणीव, राजू आणि नंदाला पण जाणवलं होतं ते आणि आता वसुधाताईंनी तर नुसतं त्याला अनुभवलं नव्हतं तर त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला असं म्हणत होत्या. मला हे द्वंद्व असह्य झालं, मी त्या तिरीमिरीतच त्यांना म्हणलं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माफ करा ताई, पण असं काही नसतं. हे सगळे मनाचे खेळ असतात. तुम्ही उगाच काही तरी यांच्या मनात भरवून देऊ नका. आधीच ते बिचारे घाबरून गेले आहेत. त्यांना धीर द्यायचा सोडून तुम्ही असलं काही तरी सांगून त्यांना अजून घाबरवताय? कधी जाताय तुमच्या आश्रमात परत तुम्ही? आता मी आलोय, मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही काल इथे थांबलात त्याबद्दल धन्यवाद. या आता!!!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसुधाताई शांतपणे हसल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. खरं तर हे सगळं गूढच आहे. मला पण अजून नीटसं कळलं नाहीये. साधना खूप लागते. मी तर अज्ञानीच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी आक्कांना नक्की यातून बाहेर काढू शकेन. कमीत कमी 'तो' कोण आहे? त्यांना का भेटतोय? काय राहिलंय त्याचं? हे सगळं तरी आपल्याला नक्कीच कळेल. बाकी जशी तुमची इच्छा." शेवटचं वाक्य त्यांनी राजू-नंदा कडे बघून म्हणलं. बाई अतिशय हुशार आणि कॉन्फिडंट वाटत होत्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"वसुधाताई, हा काय बोलला त्याबद्दल माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखतोय आज बरेच दिवसांपासून. तुम्ही जे म्हणताय त्यावर साहजिकच विश्वास बसणं कठिण आहे पण केवळ तुम्ही हे बोलत आहात म्हणून मी थोडा तरी विचार करते आहे. तुम्ही जर का खरंच मदत करू शकला तर खूप बरं होईल." नंदा म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आपण प्रयत्न करू, नंदा. यश मिळणं न मिळणं त्या रामरायाच्याच इच्छेवर आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय करावं लागेल आपल्याला?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काहीच नाही. मी काही मंत्र तंत्र जाणत नाही. की मला काही विद्या अवगत नाही. माझ्या कडे रामरायाचा अंगारा आहे. आपण तो आक्कांना लावू आणि त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू. आपल्याला आधी आक्का काय अनुभवातून जात आहेत ते जाणून घ्यायचंय. त्यातूनच आपल्याला मार्ग सापडेल हे निश्चित्त." &lt;br /&gt;&lt;br /&gt;ताई स्वतः आंघोळ करून आल्या. नंदाने आक्कांना आंघोळ घातली. आम्ही सगळेच आंघोळी करून देवघरात बसलो. ताईंनी फक्त एक ऊदबत्ती लावली. कसलाही बडेजाव नाही की विधी नाहीत. शांतपणे हात जोडून रामरक्षा, मारुतिस्तोत्र म्हणलं. शेवटी त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं. वातावरण भावमय झालं होतं. माझा सगळा आक्षेप एव्हाना गळून पडला होता. उरला होता फक्त एक असहाय्य पण शांत आश्वस्त जीव. आपल्याला काही धोका नाही, इथे मी सुरक्षित आहे ही भावना मनात दाटली होती. सगळ्यांची बहुतेक हीच अवस्था होती. आक्का तर अगदी लहान मुलासारखी दिसत होती. तिची क्षीण कुडी जमिनीवर मुटकुळं करून पडली होती. ताईंनी आक्काला अंगारा लावला आणि म्हणाल्या,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आक्का, कश्या आहात? बरं वाटतंय ना?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेले कित्येक दिवस भ्रमिष्टासारखी वागणारी आक्का शांतपणे म्हणाली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो, ताई. खूप बरं वाटतंय."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग आक्का आता आम्हाला सांगणार का? कोण येतो तुम्हाला भेटायला? काय पाहिजे त्याला? का त्रास देतोय तो तुम्हाला?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही सगळे उत्कंठा ताणून बसलो होतो. आक्का काय बोलतेय आता? काही तरी अगम्य असं सत्य ऐकायला मिळणार. इतकं शांत वाटत असून सुद्धा 'त्या'चा विषय निघताच आक्का एकदम अस्वस्थ झाली. तरी ती मोठ्या कष्टाने बोलली,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तो खंड्या रामोशी आहे. रोज येतो. कधीही येतो. म्हणतो 'माझे १० रूपये तुझ्याकडे उधार आहेत. मला परत कर. व्याजासकट पाहिजेत मला.' मी त्याला किती सांगते की अरे बाबा मी तुला ओळखत नाही की तुझ्याकडून कधी काही घेतल्याचं आठवत नाही. पण तो ऐकतच नाही. दुसरं काही बोलत नाही, फक्त पैशे परत मागतो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आक्का, अजून काही म्हणतो का तो? काही धमकी वगैरे देतो का?" बाईंनी विचारलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही हो... धमकी वगैरे देत नाही. उलट म्हणतो की, 'मी रामोशी आहे. तुमचं मीठ खाल्लं आहे, तुझं रक्षणच करीन. तू मला सूनेसारखी आहे. मला घाबरू नकोस. पण माझे पैसे तेवढे परत कर.'"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आक्का, तू त्याला कधी विचारलं नाहीस की तो कोण आहे? आपण कधी त्याच्याकडून पैसे घेतले होते? त्याने आपलं मीठ खाल्लं म्हणजे काय?" राजू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आक्का बराच वेळ शांत बसली होती. जणू काही आठवायचा प्रयत्न करत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"एकदा मला म्हणाला तो... तो आपल्याच गावचा आहे. गावाची गस्त त्याच्याकडे होती. एकदा तो असाच रात्री गस्त घालत असताना माझे सासरे अचानक काही काम निघालं म्हणून परगावी निघाले. घाईत त्यांचा बटवा राहिला घरीच आणि त्यांच्या लक्षात येई पर्यंत ते बरेच पुढे आले होते. तेवढ्यात त्यांना खंड्या भेटला म्हणून त्यांनी त्याच्याकडून थोडे पैसे उधार घेतले. त्या नंतर ते जेव्हा परत आले तेव्हा खंड्या आजारी पडला आणि त्याला तालुक्याला नेला होता वैद्याकडे. त्यातच तो गेला. आणि हे पैसे पण परत द्यायचे राहून गेले. आता त्याचा जीव अडकला आहे त्या पैश्यात. पैसे मिळाल्याशिवाय त्याचा जीव शांत होणार नाही म्हणतो. इतके दिवस तुझीच परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तुला पैसे परत मागितले नाहीत असं सगळं तो सांगतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मी कसा विश्वास ठेवू? उगाच कोणाचेही पैसे मी कधीच ठेवले नाहीत आणि माझे सासरे पण अतिशय सज्जन होते. त्यांनी ते पैसे नक्कीच परत केले असणार."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो. कोणाचा विश्वास बसेल? अतर्क्यच होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण आक्का, जरी समजा आपण त्याचे पैसे परत करायचे तरी कसे करणार? तो तर जिवंतच नाहीये ना. का त्याच्या नावाने काही दान करायचं? म्हणजे त्याला शांत वाटेल?" राजू म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघा, " वसुधाताई म्हणाल्या, "मला असं वाटतं... आपण क्षणभर असं धरून चालू की पैसे खरंच द्यायचे राहून गेले. आणि आता तो ते परत मागतो आहे. तर एक उपाय आहे. राजू, तू स्वत: गावी जा, त्या खंड्याचे कोणी वंशज असतील तर त्यांना शोधून काढ आणि ते पैसे त्यांना परत कर. त्यांना हे सगळं सांग आणि त्यांच्या कडून 'कर्ज फिटलं' असं वदवून घ्या."&lt;br /&gt;&lt;br /&gt;परिस्थितीच अशी होती की राजूने त्या क्षणी कोणाचंही काहीही ऐकलं असतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"ठीक आहे ताई. मी लगेच निघतो, पण किती पैसे परत करायचे? तो तर व्याजासकट मागतो आहे ना. काय करायचं?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजू, तू एखादी मोठी रक्कम दे त्यांना. पूर्वीच्या काळी अशी उधारी असून असून किती असणार. ५-१० रुपयांचीच असेल ना? त्या काळी एवढ्या पैश्यात महिनाभर घर चालायचं लोकांचं. हजार पाचशे परत कर म्हणजे खूप झालं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ठीक आहे. मी निघतो लगेच."&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा जरी पूर्ण विश्वास अजून बसत नव्हता तरी, मी आणि राजू लगेच गाडी करून निघालो. राजूचं मूळ गाव तसं जवळच होतं. २-३ तासाचा काय तो प्रवास. गाडी मीच चालवत होतो. पूर्ण प्रवासात आम्ही दोघंही गप्प होतो. माझ्या मनात आता त्या खंड्याला कसं शोधायचं हाच प्रश्न होता. आम्ही गावात पोचलो. दुपार टळत आली होती. गावात राजूचे कोणीच नव्हते आता. आम्ही चौकशी करत ग्रामपंचायतीचं ऑफिस शोधलं. सुदैवाने गावचे सरपंच तिथेच भेटले. राजूने ओळख सांगितली. आम्ही सगळी कहाणी त्यांच्या कानावर घातली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरपंच तसे वृद्धच होते. त्यांच्या आठवणीत तरी खंड्या रामोशी नव्हता. पण त्यांच्या माहितीचा एक रामोशी होता. गावाबाहेर रामोश्यांची वस्ती होती. त्यांनी लगोलग शिपायाला पिटाळला. थोड्या वेळात ३-४ जण आले त्याच्या बरोबर. सगळे त्याच वस्तीतले होते. सरपंचांनी त्यांच्या पैकी खंड्या रामोशी कुणाला माहीती आहे का विचारलं. कुणालाच काही आठवेना. बराच वेळ चर्चा झाल्यावर त्यांच्यातला एक जण म्हणाला,&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सरपंच, त्यो सुर्श्या हाय न्हवं का... त्याचा बा, त्याच्या बाचं नाव 'खंडेराव' लावतोय बघा."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे मग बघताय काय? बोलवा त्याला पटकन."&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिपाई तसाच पळाला त्यांच्यापैकी एकाला घेऊन. थोड्या वेळाने ते आले परत, एकाला पुढ्यात घालूनच आले ते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हा आमचा सुर्श्या. काय रे सुर्श्या, तुज्या बाच्या बाचं नाव खंडेराव होतं ह्ये खरं का?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"व्हय सरपंच. खंडेराव माझा आज्जा. माझा बा ल्हान आसतानाच मेला त्यो. रात्रीला गस्त घालताना जनावर चावलं आणि काही अवशिद कराय अदुगरच ग्येला तो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळं ऐकून आम्हाला पण हुरूप आला. राजू पुढे झाला. त्याने सगळी कहाणी परत त्या सगळ्यांना ऐकवली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुरेश, आता एक उपकार कर बाबा आमच्यावर. मी हे हजार रूपये तुला देतो. जे काय व्याज असेल ते सगळं यात आलं. सरपंच आणि हे बाकीचे तुझे मित्र साक्षीदार आहेत. तेवढं 'कर्ज फिटलं' असं म्हण बाबा आणि मोकळं कर आम्हाला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"साहेब, आम्ही गावाबाहेर असलो तरी सरपंच आम्हाला मान देऊन असतात. त्ये काय म्हन्तील त्ये खरं. आमाला काय कळतंय यातलं?" सगळा प्रकारच एवढा विलक्षण की ती माणसं पण चक्रावून गेली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुर्श्या, पैक्यावर कोणाची किती वासना आसंल त्ये सांगनं कठीन हाय गड्या. खंडेरावचा जीव आडकला आसंल त्या पैक्यापायी. आपन कसं सांगनार? तू एक काम कर. हे पावने म्हन्तात तसं घे तो पैका आनि मोकळं कर त्याना कर्जातून. पन तो पैका घरात न्हेऊ नको... देवळात नाही तर कोना गरजवंताला टाक आनि ह्ये समदं इसरून जा."&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजूने १००० रूपये सुर्श्याच्या हातावर ठेवले. सुर्श्या 'तुमचं कर्ज फिटलं' अस त्याला म्हणाला. सरपंच आणि इतर साक्षी होते. त्यांनी माना डोलावल्या आणि आम्ही उठलो. सरपंच म्हणाले, "आता कुठे जाता? तिन्ही सांजा झाल्यात, थोडा वेळ थांबा. वेळ टळून जाऊ दे, मंग जा. न्हायी तर हितंच मुक्काम करा रातचा आनि सकाळी जा."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हाला घरी पोचायची घाई झाली होती. मी तर कंटाळलो होतो. थोड्याश्या अनिच्छेनेच मी हे सगळे करत होतो. कसला बायकांचा खुळचटपणा असंच वातत होतं. हो नाही करता करता, थोडा वेळ थांबून निघू असं ठरलं. सरपंचांनी चहा नाश्ता मागवला. तेवढ्यात राजूचा मोबाईल वाजला... घरून होता फोन. मीच घेतला फोन, नंदा होती फोनवर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काम झालं ना आत्ताच?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो आत्ताच झालं. आपण ठरवलं तसंच सगळं केलं. पण तुला कसं कळलं?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे, आक्का झोपल्या होत्या, आम्ही दोघी बाहेर बसलो होतो. तेवढ्यात इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा आक्का स्वतःहून चालत बाहेर आल्या. थेट बाथरूम मधे गेल्या. डोक्यावर पाणी घेतलं आणि बाहेर येऊन म्हणाल्या, &lt;br /&gt;&lt;br /&gt;'नंदा, फिटलं गं बाई एकदाचं... खंड्या येऊन पाया पडून गेला... आता परत नाही येणार म्हणून निरोप घेऊन गेला.' &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे ऐकून लगेच तुला फोन केला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी सुन्नपणे ऐकत होतो, हातातून फोन गळून पडला होता, डोळ्यात पाणी होतं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-3604060404820403519?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/3604060404820403519/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=3604060404820403519' title='5 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3604060404820403519'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3604060404820403519'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/02/blog-post_28.html' title='फेड...'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-2688438152735138015</id><published>2009-02-13T09:03:00.000+04:00</published><updated>2009-02-13T09:05:39.991+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खोबार'/><title type='text'>माझं खोबार... भाग ७</title><content type='html'>&lt;a href="http://www.misalpav.com/node/3867" title="माझं खोबार... भाग १" target="_blank"&gt;माझं खोबार... भाग १ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/3898" title="... भाग २" target="_blank"&gt;... भाग २ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/3976" title="... भाग ३" target="_blank"&gt;... भाग ३ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/4334" title="... भाग ४" target="_blank"&gt;... भाग ४ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/4516" title="... भाग ५" target="_blank"&gt;... भाग ५ &lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/5283" title="... भाग ६" target="_blank"&gt;... भाग ६ &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990066;"&gt;&lt;em&gt;मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे... &lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*************&lt;br /&gt;&lt;br /&gt;जसं जसं माझं क्षितिज विस्तारत गेलं तसं तसं मला विविध देशातले लोक भेटत गेले. ज्या राष्ट्रांबद्दल आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं तिथले लोक भेटायला लागले, नुसतेच भेटले नाहीत तर काही माझे चांगले मित्र बनले. इजिप्त, पॅलेस्टाइन, लेबनॉन, जॉर्डन, सिरियन, बांग्लादेशी... अनेक. पण ज्या लोकांबद्दल सर्वसामान्य भारतिय माणसाला अपार द्वेष मिश्रित कुतूहल असतं ते.... आपले सख्खे शेजारी, पाकिस्तानी. हे तर बरेच भेटले. पहिल्या काही भागात जसं मी लिहिलं होतं, खोबार विमानतळावर जी काही माझी वाईट अवस्था झाली होती तेव्हा मला पाकिस्तानीच भेटले होते आणि मला त्यांचा काय आधार वाटला होता!!! आणि पुढे बरेच पाकिस्तानी भेटले, सगळ्याच प्रकारचे, त्यातून त्यांची मानसिकता कळत गेली. प्रत्येक समाजात सगळ्या प्रकारची माणसे असतात हे सत्य माझ्या मनावर ठासलं गेलं. असे बरेच भेटले तरी लक्षात राहिलेले काही प्रसंग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचा अजून एक क्लायंट होता. हा क्लायंट म्हणजे, सौदी अरेबियाच्या लष्कराचं एक भलं मोठ्ठं हॉस्पिटल होतं. त्याचं नाव "किंग फाहद मिलिटरी मेडिकल हॉस्पिटल". हे एक भलं मोठं संस्थानच होतं. खूप मोठा परिसर, जागोजागी दिसणारे लष्करी गणवेशातले लोक, गंभीर वातावरण यामुळे मनावर नेहमीच एक दडपण असायचं. पण ज्या विभागात माझं काम असायचं तिथे मला एक अगदी तरूण पाकिस्तानी पोरगा भेटला, अफझल. असेल फारतर २२-२३ वर्षांचा. दिसायला एकदम रुबाबदार आणि त्याला एकदम छानछोकीत रहायची आवड. त्याच्या बरोबर अजून दोघे... एक श्रीलंकन आणि दुसरा फिलिपिनो. त्या सगळ्यांचा बॉस एक ब्रिटिश नेव्ही मधला निवृत्त ज्युनियर कमिशंड ऑफिसर. (हा काय बोलायचा ते मला शेवट पर्यंत कळले नाही. अतिशय बेकार ऍक्सेंट आणि 'सालंकृत' इंग्रजी भाषा. कधी कळलंच नाही. तो श्रीलंकन मला नंतर नीट समजवून सांगायचा. आणि गंमत म्हणजे त्या श्रीलंकन पोराचं ड्राफ्टिंग त्या ब्रिटिश माणसापेक्षा खूपच चांगलं होतं. :) )&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाषिक आणि भौगोलिक जवळीकीमुळे अफझलची आणि माझी पटकन गट्टी जमली. तोही गप्पिष्ट, त्यामुळे हळूहळू विषय सापडत गेले आणि आमच्या मनमोकळ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे वडिल पण तिथेच काम करत आणि तो त्यांच्याच बरोबर एकाच क्वार्टर मधे राहायचा. त्याची आई आणि बहिण पाकिस्तान पंजाब मधे एक गुजरात म्हणून शहर आहे तिथे असायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अफझल कोणत्याही त्या वयातल्या साधारण भारतिय मुलांसारखाच होता. त्याला चित्रपटांचं भयंकर वेड. अर्थात भारतिय चित्रपट. (तो म्हणायचा की ज्याला पाकिस्तानी चित्रपट आवडतात तो माणूस पाकिस्तानीच नाही. ;) ) मी मुंबईचा आहे असे कळल्यावर त्याचा जो काही चेहरा झाला होता तो मी कधीच विसरणार नाही. अक्षरशः भारावून वगैरे बघत होता माझ्याकडे. त्याला खरंच असं वाटत होतं की मुंबईत फिल्मस्टार वगैरे असे गल्लोगल्ली हिंडत असतात. आपण सहज त्यांना भेटू शकतो. (अगदी असेच प्रश्न मला १९८४ साली इंदौर मधे पण विचारले गेले होते.) खरंतर त्याने पहिल्याच संभाषणात माझी विकेट घेतली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला म्हणाला "आपके मुंबई मे मुझे एक बार आना है." मी म्हणलं, "जरूर ये. तुला मुंबईची काय माहिती आहे?" पठ्ठ्याने मला जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया, फिल्मसिटी वगैरे नावं तिर्थक्षेत्राच्या नावासारखी म्हणून दाखवली. पुढे लगेच तर त्याने बाँब टाकला. मला म्हणतो, "यार, आप मुझे थोडी हेल्प कर सकते है? मुझे ना रानी मुखर्जी बडी अच्छी लगती है. मुझे एक बार उसके साथ डिनर पे जाना है. कुछ कर सकते है? मै कितना भी पैसा खर्च करने के लिए तैयार हूं." मी अक्षरशः ४ फूट उडालो. त्याला विदारक (नाही तर काय) सत्य परिस्थितीची कल्पना देता देता माझी हालत खराब झाली. :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग हळूहळू आमचे विषय वाढत गेले. मला इतक्या जवळून भेटलेला हा पहिलाच पाकिस्तानी. मला पहिल्यापासूनच पाकिस्तानी लोकांबद्दल कुतूहल आहे. कसे आहेत तरी कसे हे लोक? त्यांचे विचार कसे असतात? भारताबद्दल नक्की काय वाटतं त्यांना? द्वेष, मत्सर, असुया, भिती, साम्यत्वाची जाणिव? काय नक्की? अफझल बरोबर बोलताना, त्याच्याकडून पाकिस्तानातल्या त्याच्या पूर्वायुष्याबद्दल ऐकताना काही पदर उलगडत होते. मग एकदोनदा त्याच्या क्वार्टरवर त्याने जेवायला बोलावलं. मला काय प्रकारचं जेवण आवडतं असं त्याने विचारल्यावर, "शाकाहारी काहीही" हे माझं उत्तर ऐकून तो फारच चिंताक्रांत झाला. मी कोणत्याही प्रकारचं 'गोश्त' खात नाही हे त्याच्या दृष्टीने फारच अगम्य होतं. माणूस मांसाहाराशिवाय जगतो ही कन्सेप्टच त्याला पटत नव्हती. मोठ्या मुष्किलीने त्याला समजवलं. मग नंतर कित्येक दिवस तो मला शाकाहार वगैरे बद्दल निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. मग तो कधी कधी धर्माबद्दल वगैरे बोलायला लागला. हिंदू धर्माबद्दल वगैरे मी काही सांगावं असं तो सूचित करायचा पण मी या बाबतीत अगदी स्पष्ट होतो. सौदी अरेबिया सारख्या देशात धार्मिक किंवा राजकारण वगैरे बाबतीत तोंड उघडायचं नाही. मी काहीतरी बोलून विषय बदलून टाकायचो. तर असा हा अफझल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस तो जरा खूपच मूड मधे होता आणि त्याच्या कॉलेज मधील भानगडी वगैरे बद्दल बोलायला लागला. गडी बराच रंगेल होता. बरीच प्रकरणं करून चुकला होता. किंबहुना अभ्यास वगैरे सोडून उनाडक्या, मारामार्‍या, पोरी फिरवणं वगैरे हेच त्याचं मुख्य जिवितकार्य होतं असं म्हणलं तरी चालेल. अश्याच एका प्रकरणात, प्रकरण 'फारच पुढे' गेलं आणि त्या मुलीचे भाऊ याच्या मागे लागले. हा १०-१५ दिवस दुसर्‍या गावी लपून बसला. मग मात्र त्याच्या आईने त्याच्या बापाला सांगितलं की "बेऔलाद" मरायचं नसेल तर अफझलला तुमच्या कडे बोलवून घ्या. मगा बापाने खटपटी करून त्याला नोकरी लावली आणि खोबारला आणलं. या सगळ्या गोष्टी तो अतिशय अभिमानाने सांगत होता. मी पण सगळं शांतपणे ऐकत होतो. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तू मुसलमान आहेस ना?" तो हो म्हणाला. मग मी म्हणलं, "आत्ता ज्या ज्या गोष्टी तू करत होतास म्हणून सांगितलंस, त्या तुझ्या धर्माप्रमाणे योग्य होत्या का?" हे ऐकल्यावर तो एकदम तोंडात मारल्यासारखा गप्प बसला. मी त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघतच होतो. मी पण तो विषय जास्त न वाढवता सोडून दिला. तो दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी मी तिथे गेल्यावर थोड्या वेळाने तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला,&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो: "आपसे एक बात पूछनी है."&lt;br /&gt;मी: "हां, हां, पूछो."&lt;br /&gt;तो: "नही, जाने दिजिये. शायद आप बुरा मान जायेंगे."&lt;br /&gt;मी: "ठीक है. जाने दो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो गेला. थोड्या वेळाने परत आला आणि हाच संवाद रिपिट करून गेला. असं ३-४ वेळा झालं. मग मात्र मी त्याला नीट बसवलं आणि मनात काय आहे ते स्पष्ट बोल असं सांगितलं. मी मनावर घेणार नाही असंही आश्वासन दिलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो: "कल मैने आपको जो भी कुछ बताया, उसके बाद आपने मुझसे एकही सवाल पूछा और मै चूप हो गया."&lt;br /&gt;मी: "तो फिर?"&lt;br /&gt;तो: "बुरा ना मानियेगा... आप प्रॉमिस करें."&lt;br /&gt;मी: "यार, हम दोस्त है और तू फिक्र ना कर."&lt;br /&gt;तो: "आप हिंदू है ना?"&lt;br /&gt;मी: "हां, बिल्कुल."&lt;br /&gt;तो: "तो फिर आपके इतने अच्छे और नेक खयालात कैसे है?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मला हसावं की रडावं तेच कळेना. काय सांगू या बाबाला? बरं याला असं का वाटतंय की मी हिंदू असूनही चांगले विचार बाळगतो!!! मी त्याला थोडंफार समजवलं. तेव्हा तो पुढे म्हणाला की "हमे तो स्कूल मे बचपनसे जो भी सिखाया जाता है हिंदूओ और भारत के बारे मे, आप तो बहुतही अलग है." मग मी त्याच्या कडून थोडंफार त्यांना काय शिकवतात ते ऐकलं. फक्त वेडच लागायचं शिल्लक होतं मला. वाईटच. पाकिस्तानात भारतद्वेषाचं बाळकडू इतकं पद्धतशीर पणे दिलं जातं हे आपल्याला माहितच नसतं. पुढे मी पाकिस्तानी अभ्यासक्रमातली एक दोन इतिहासाची पुस्तकं मुद्दाम मिळवून चाळली. त्यांच्या आणि आपल्या इतिहासात बराच फरक होता. प्राचीन सिंधू संस्कृती नंतर एकदम बौद्ध धर्मच आणि मग एकदम अरब आले आणि लोकांना चांगलं जगायला शिकवलं. मधला सगळा काळ हा "जाहिलियत". म्हणजे अधर्म, अनाचार वगैरे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पण असाच. एकदम १८० डिग्री टर्न नसला तरी चांगला १२० डिग्री पर्यंत तर नक्कीच टर्न होता. सामान्य पाकिस्तानी माणूस हे शिकत मोठा होतो. पण मोठा होताना त्याला भारताबद्दल सारखं कळत असतं. हिंदी सिनेमे बघत असतात ते. त्यात दाखवलेलं काही शाळेत शिकवल्या बरोबर १००% जुळत नसतं. पण ते मान्य करायची तयारी तर नसते. आणि मग यातूनच भारताबद्दल असुया, द्वेष वाटते. समाजमन तसं असतंच आणि आजूबा़जूचं. बरं भारत हा कितीतरी मोठा देश, पाकिस्तान त्या मानाने लहान, ७१ मधे भारताच्या मदतीने झालेलं पाकिस्तानचं विभाजन या सगळ्याचा सल सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाच्या मनात ठसठसत असतो. प्रत्येक बाबतीत त्यांची स्पर्धा भारताशीच. पाकिस्तानी बर्‍याच अंशी भारतकेंद्रितच असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पाकिस्तानातले सिंधी, पंजाबी, पठाण, मुहाजिर वगैरे मधले अंतर्गत वाद कळले. पंजाबी माणूस सिंध्यांबद्दल कधीच चांगलं बोलणार नाही आणि पंजाबी दिसला की सिंधी माणसाने शिवी घातलीच समजा. मुहाजिर आणि सिंधी म्हणजे विळ्याभोपळ्याची मोट बांधलेली. फाळणी नंतर युपी बिहार मधून बहुसंख्य मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले. ते बहुतेक सगळे कराची मधे स्थायिक झाले. त्यामुळे कराचीत सिंधी एकदम अल्पसंख्य झाले. (बघा 'भय्या' प्रॉब्लेम तिथे पण आहेच. ;) ) मग त्यांच्यात मारामार्‍या झाल्या. पाकिस्तानच्या चळवळीत बहुतेक हे युपी बिहार वालेच म्होरके होते. पण पाकिस्तान झाल्यावर आधी बंगाली आणि मग पंजाबी बहुसंख्य झाले आणि हा मुहाजिर वर्ग एकदम पोरका झाला. एका मुहाजिराने (त्याचे आजोबा बुलंदशहरचे, अजूनही नातेवाईक चिक्कार आहे त्या भागात) माझ्यापाशी काढलेले उद्गार, "पाकिस्तानके लिये कुर्बानीया दी हमारे बापदादाओंने, और ये *** मक्खन खाके बैठ गये."&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण एवढं सगळं असलं तरी भारताचा विषय निघाला की बहुतेक पाकिस्तानी एकदम पाकिस्तानीच असतात. अजून एका बाबतीत एकजात सगळे पाकिस्तानी एकदम सेंटी असतात, काश्मिर. बलुची, पठाण वगैरे स्वतः पाकिस्तानला शिव्या घालतात पण काश्मिर मधे भारताने खूप अत्याचार केले आहेत आणि सर्वसामान्य काश्मिरी कसा बरबाद होतो आहे या बाबतीत मात्र एकदम पाकिस्तानी विचार. मी पण कधी कधी मुद्दाम वाद घालायचो. मजा यायची खेचायला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळून भेटलेलं अजून एक पाकिस्तानी कुटुंब म्हणजे आमच्या बिल्डिंग मधले अख्तरसाब, त्यांची बायको सीमाभाभी, मुलगा बिलाल आणि दोन मुली. अख्तरसाब म्हणजे अतिशय सज्जन माणूस. तितकाच उत्साही. खूऽऽप वर्षं सौदी अरेबियामधे राहिलेला माणूस. त्या वेळी एका खूप मोठ्या आर्थिक अडचणीतून जात होते ते. पण आमच्या बिल्डिंग मधलं सगळ्यात जास्त उत्साही जोडपं. (आमच्या बिल्डिंग मधे ४८ फ्लॅट्स पैकी जवळ जवळ ४०-४२ मधे भारतिय. पाकिस्तानी २ च. एक कोरियन सडाफटिंग. बाकीचे इजिप्शियन वगैरे. त्यामुळे सगळे आम्हाला दबून असायचे. आम्ही सुद्धा फार डोळ्यात येणार नाही या बेताने सगळा दंगा करायचो. दिवाळीत पूर्ण आठ मजल्यांवर जिन्यांमधून आणि दारांसमोर पणत्या लावल्या होत्या. होळी मधे बर्‍यापैकी रंग वगैरे पण खेळली होती पोरं.) आणि गंमत म्हणजे आमच्यात एकमेव पाकिस्तानी म्हणजे हे अख्तरसाब आणि कुटुंब. दिवाळी वगैरेंच्या तारखा यांना पाठ असायच्या. सगळ्या आयोजनात हे एकदम पुढे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाकिस्तान भारताबरोबर शेजारधर्म पाळत नसला तरी अख्तरसाबनी शेजारधर्म पुरेपूर पाळला. एकदा असं झालं की घरातला गॅस सिलिंडर संपला. मी संध्याकाळी घरी आल्यावर गाडी घेऊन जाऊन नविन सिलिंडर आणला. (तिथे सिलिंडर डेपो मधून आपल्यालाच आणावा लागतो.) बिल्डिंगच्या दारासमोर पार्किंग नव्हतं, सिलिंडर जड, म्हणून २ मिनिटं तशीच डबल पार्किंगमधे लावली गाडी. मी उतरून सिलिंडर काढे पर्यंत पोलिस साहेब आलेच तिथे. रंगेहाथ पकडल्यावर काय सोडतात ते मला. योग्य तो आदर सत्कार करून एक ट्रॅफिक व्हायोलेशन तिकिट (अरबी शब्द: मुखालिफा) ठेवला माझ्या हातात. काहीही न बोलता गेले ते. आता अरबी वाचता येत होतं तरी ते छापिल नसलेलं हस्ताक्षरातलं अरबी काही मला वाचता येइना. त्या मुळे खिश्याला किती मोठी चाट बसणार आहे ते कळेना. काय करावं हा विचार करत असताना, एकदम अख्तरसाबना वाचता येईल असं वाटलं. त्यांच्या घरी गेलो तर ते नेमके रात्री उशिरा येणार असं कळलं. म्हणून गप्प बसलो. रात्री १० वाजता बेल वाजली. बिलाल सांगत आला होता की "डॅडी आ गये है, आप को बुलाया है." सीमाभाभीनी इतक्या उशिरा ते आले तरी आवर्जून माझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं होतं त्यांना. मी लगेच गेलो तर हा माणूस कपडे वगैरे न बदलता माझीच वाट बघत होता. मला बघताच ते उठले आणि म्हणाले, "चलिये मेरे साथ." इतक्या उशिरा त्यांच्या ओळखीचा एक पंजाबी गॅरेजवाला होता त्याच्या घरी घेऊन गेले मला. (हे गॅरेजवाले पोलिसांच्या खाजगी गाड्यांची कामं फुकटात करून देतात त्यामुळे पोलिस पण यांची लहान मोठी कामं करून देतात बिनबोभाटपणे.) त्याला झोपेतून उठवून माझी "माझा शेजारी, भावासारखा आहे" अशी ओळख करून दिली. मला मुखालिफा मिळाला म्हणून सांगितलं. त्याने तो कागद घेतला माझ्याकडून आणि कोणत्या एरियात किती वाजता मुखालिफा मिळाला ते विचारलं. एक फोन केला आणि त्या वेळी त्या भागात कोण पेट्रोलिंगवाले ड्युटीवर होते ते विचारून घेतलं. नशिबाने तो पोलिस याच्या महितीतला निघाला त्यामुळे त्याने तो कागद ठेवून घेतला आणि मला "आप बेफिक्र रहे. कल सुबह आपका काम हो जायेगा. कंप्यूटरपे ये चढेगाही नही." असं सांगितलं. मी जायला उठलो तसं त्याने मला हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाला, "आप पहली बार आये है, हमारे अख्तरसाब के छोटे भाई है, ऐसे कैसे जा सकते है. बैठिये." तेवढ्यात आतून हाक आली. हा माणूस आत गेला आणि २ मोठ्या बश्यांमधून काहीतरी खायला आणलं. मला ते नक्की काय आहे ते कळेना. माझा चेहरा पाहून अख्तरसाब म्हणाले, "हलवा है. बेफिक्र खाइये." त्या बशीत शुद्ध तूपात थबथबलेला उत्कृष्ट असा बदामाचा शिरा होता. केशर वगैरे टाकलेला. वरतून अक्रोड वगैरे चुरून घातलेले. पण ते तूप इतकं की घशाखाली उतरेना. खानसाहेबांच्या भितीने कसंबसं घशाखाली उतरवलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात त्याचे भाऊ वगैरे येऊन बसले आणि गप्पा सुरू झाल्या. तेव्हा नुकताच काश्मिर मधे काहीतरी प्रकार घडला होता. आणि मी भारतिय म्हणल्यावर साहजिकपणे गाडी आलीच काश्मिरवर. मी आपलं नुसतं हसून वेळ मारून नेत होतो. तेवढ्यात त्यातला एक पंजाबी दुसर्‍याला म्हणाला, "ये कश्मिरी बडे *** है. सामने साप और कश्मिरी आये तो मै साप को छोड दूंगा. कश्मिरी को नही." आणि तेवढ्यात माझ्याकडे वळून म्हणाला, "फिरभी हम कश्मिर लेके रहेंगे जनाब. याद रखियेगा." तर असं हे त्यांचं काश्मिरवेड. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही हे यावरून लक्षात येईलच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक पाकिस्तानी माजी सैनिक माझ्या पहिल्या क्लायंटकडे ड्रायव्हर म्हणून होता. युसुफ त्याचं नाव. पंजाबी, गोरापान, उंची असेल सव्वासहा फूट. तो काही वर्षं सियाचीनला होता. अर्थात विरूद्ध बाजूने. त्याला दंडावर गोळीपण लागली होती. "दुश्मन की गोली खायी है. फिरभी डरा नही." असं अभिमानाने सांगायचा. पण कधीही मला उशीर झाला आणि टॅक्सी नाही मिळाली तर खूप लांब मला सोडायला यायचा. तिथेच चेल्लप्पन नावाचा मल्याळी माजी भारतिय सैनिक क्लेरिकल कामं करायचा. आणि हे दोघे जानी दोस्त. पण समोर आले की हातात काही तरी पेन किंवा फूटपट्टी घेऊन एकमेकांना गोळी मारायची ऍक्शन करायचे आणि मग मिठी मारून हसायचे. नियति तरी किती विचित्रच. कोण कधी कुठे कसा भेटेल काही भरवसा नाही. काही वर्षांपूर्वी सियाचीनला भेटले असते तर कदाचित खर्‍या गोळ्या घातल्या असत्या एकमेकांना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे नाना नमूने बघितले. पण हे सगळं झालं पाकिस्तानी लोकांबद्दल. आपले भारतातलेच मुस्लिम पण खूप जवळून बघितले. भारतात असताना मुस्लिम मित्र होते थोडे पण कधी खूप जवळून संबंध नव्हता आला. तो इथे आला. किती प्रकार. हैद्राबादी, मँगलोरी, तमिळ, मल्याळी (मलबारी), बंगाली, आपले कोकणी मुसलमान (मोहंमदखान देशमुख, नइम माजगावकर अशी टिपिकल नावं). त्यांचे आपापसातले हेवेदावे. ब्राह्मण विरुद्ध इतर, कोब्रा विरूद्ध देशस्थ हे जसे टोकाचे वाद आहेत तसेच हैद्राबादी विरूद्ध कोकणी, मलबारी विरूद्ध तमिळ अशी तेढ असते. (पुढे असे प्रकार किरिस्तांवात पण असतात हे कळले, गोवन, मँगलोरी, वसईचे, मल्याळी असे किती तरी प्रकार. इतकंच काय गोव्यात सारस्वत ख्रिश्चन पण आहेत. साहजिकच स्वतःला उच्चवर्णिय समजतात. :) ) या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण एकदा काय झालं....&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमशः&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-2688438152735138015?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/2688438152735138015/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=2688438152735138015' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2688438152735138015'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2688438152735138015'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/02/blog-post_13.html' title='माझं खोबार... भाग ७'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-3647067924426857613</id><published>2009-02-10T19:21:00.002+04:00</published><updated>2009-02-10T19:24:25.329+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खोबार'/><title type='text'>गाव...</title><content type='html'>&lt;strong&gt;कवितेबद्दल थोडंसं&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं. आज अचानक हे लिहावंसं वाटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक आहे गाव, &lt;br /&gt;त्याचं असंच काहीतरी नाव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसं आहे ते नकाशात, &lt;br /&gt;पण खरं तर ते आहे माझ्याच मनात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्यांदा जेव्हा गाव पाहिलं होतं, &lt;br /&gt;तेव्हा खूपच अनोळखी वाटलं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असं वाटलं, आपण कुठे आलो?&lt;br /&gt;मूळापासून तर नाही ना तुटलो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग रडलो, धडपडलो,&lt;br /&gt;स्वतःच स्वःला समजवत राहिलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी केलं खरं गावात घर,&lt;br /&gt;पण गावानेच केलं मनात घर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालचक्र फिरत होतं,&lt;br /&gt;भराभर पुढे जात होतं,&lt;br /&gt;जाताना सोनं देत होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच एक दिवस आला,&lt;br /&gt;गावातला शेर संपला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाइलाज होता, खूप जड गेलं,&lt;br /&gt;पण गाव सोडावंच लागलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालचक्र फिरतच होतं,&lt;br /&gt;भराभर पुढे जातच होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता... मी गावात नव्हतो,&lt;br /&gt;गाव मात्र तिथेच होतं....&lt;br /&gt;नकाशातलं नकाशात,&lt;br /&gt;मनातलं मनात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परत गावात जायचे बेत करायचो,&lt;br /&gt;आणि येणार्‍या आठवणी दाबून टाकायचो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आठवणी कसल्या लबाड,&lt;br /&gt;आणि खरं म्हणजे मन हे आठवणींचंच झाड.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;परवा मात्र गंमतच झाली,&lt;br /&gt;परत गावाला जायची संधी मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मानातल्या मनात मोहरलो,&lt;br /&gt;तडक गावात दाखल झालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळं कसं तस्संच होतं,&lt;br /&gt;गाव होतं तस्संच होतं,&lt;br /&gt;तरीही सारखं वाटत होतं&lt;br /&gt;काही तरी चुकत होतं&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच गल्ल्या तेच रस्ते, &lt;br /&gt;पाय माझे भटकत होते,&lt;br /&gt;मन मात्र अडखळत होते,&lt;br /&gt;काय चुकतंय शोधत होते,&lt;br /&gt;पण शोधूनही काही कळतच नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माग मात्र मी नाद सोडला,&lt;br /&gt;मनाचा घोडा मोकळा सोडला,&lt;br /&gt;आणि एकदम जादू झाली,&lt;br /&gt;सगळी ओळख पटू लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गावाने मला कुशीत घेतलं,&lt;br /&gt;मलाही छान उबदार वाटलं,&lt;br /&gt;काय चुकत होतं एकदम समजलं,&lt;br /&gt;मीच चुकीच्या ठिकाणी गाव शोधलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाव तर आहे तिथेच आहे.....&lt;br /&gt;नकाशातलं नकाशात,&lt;br /&gt;मनातलं मनात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;http://www.misalpav.com/node/5989&lt;br /&gt;&lt;br /&gt;*******************************************&lt;br /&gt;&lt;br /&gt;शनिवारी मला खोबारला जाऊन बरोब्बर १० वर्षं झाली. योगायोग असा की नेमका त्याच दिवशी अजिबात ध्यानी मनी नसताना अचानक मी परत खोबार मधे पोचलो... जवळ जवळ ६ वर्षांनी!!! खूप वेळ एकटाच पायी भटकलो. सगळ्या खुणा शोधल्या. एक दोन मित्रांना भेटलो, संध्याकाळी परतलो. नंतर दोन दिवस दुसर्‍याच ठिकाणी होतो. काल परत यायला विमानात बसलो आणि अचानक हे शब्द बाहेर यायला लागले. लिहायला काहीच नव्हतं. मग विमानात, विमान लागलं तर वापरायची एक कागदी पिशवी असते, ती घेतली आणि सगळं लिहून काढलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कवितेच्या तंत्राबद्दल यमक आणि जाणवणारी लय इतकं सोडलं तर बाकी काही कळत नाही मला. तेवढं मात्र जरा नीट केलं. बाकी सगळं जसं सुचलं तसंच आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-3647067924426857613?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/3647067924426857613/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=3647067924426857613' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3647067924426857613'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/3647067924426857613'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='गाव...'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-2496805567563281435</id><published>2009-01-31T03:15:00.000+04:00</published><updated>2009-01-31T03:17:40.051+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शाळा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भेटीगाठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवण'/><title type='text'>सेंडॉफ नंतरची शाळा...</title><content type='html'>&lt;em&gt;&lt;span style="color: #0000FF;"&gt;डिसक्लेमरः या लेखातली सगळी पात्रं खरीखुरी आहेत आणि सगळ्यांनी जरी चाळिशी ओलांडली असली तरी त्यांचा उल्लेख मुलं अथवा मुली असाच होईल. कोणाला आक्षेप असतिल तर ते आपल्या स्वतःकडेच ठेवावेत. आम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. :)&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारण ३-४ वर्षं झाली असतिल. रविवारचा दिवस होता. सकाळी साडेदहाचा सुमार असेल. दारावरची बेल वाजली. मीच दार उघडलं. एक वयस्क गृहस्थ दारात उभे होते. माझ्या वडिलांचे कागदोपत्री लावायचे नाव घेऊन ते घरात आहेत का अशी विचारणा झाली. मी साहजिकच त्यांना आत घेतले. तेवढ्यात बाबा पण बाहेर आले. पाहुणे म्हणाले, "काय रे? ओळखलंस का?". बाबांची बिकट अवस्था त्यांच्या चेहर्‍यावरूनच कळत होती. त्यांनी सपशेल शरणागती पत्करत, "नाही बुवा" अशी कबुली दिली. त्यावर ते म्हणाले, "अरे मी ***. आपण शाळेत एका वर्गात होतो." &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर मात्र १-२ तास आमच्याकडे जो आठवणींचा कार्यक्रम रंगलाय म्हणता, काही विचारू नका. ते आलेले काका आणि बाबा शाळेत मॅट्रिकपर्यंत एकाच वर्गात होते. मॅट्रिकनंतर तब्बल ५० पेक्षा जास्त वर्षांनी भेटत होते. दोघेही सत्तरीला टेकलेले. पण त्यांच्या बोलण्यातून ते त्यांची 'गोल्डन इयर्स' परत जगत होते हे स्पष्ट दिसत होते. त्यांच्या बॅचचा एक पुनर्मिलन सोहळा होणार होता आणि त्यासाठी हे काका खूप लांबून मुद्दाम पत्ता शोधत शोधत आमंत्रण करायला घरी आले होते. त्या नंतर तो सोहळा झाला पण. एकंदरित हा प्रकार बघूनच मला वाटायला लागलं होतं की आपल्याला पण शाळेतून बाहेर पडून बरीच वर्षं झाली आपण का नाही असं काही करत? पण हे सगळं तसंच मनात राहिलं. नेहमीच्या धावपळीत विसरूनही गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरीच वर्षं मुंबईबाहेर राहिल्याने शाळेतले मित्रही तसे दुरावलेच होते. एक दोघांशी मधून मधून बोलणं व्हायचं. अशातच जुलै २००८ मधे आपल्या स्वातीताईने &lt;a href="http://www.misalpav.com/node/2690" title="आमच्या १० वी ची पंचविशी.." target="_blank"&gt;आमच्या १० वी ची पंचविशी.. &lt;/a&gt; हा लेख लिहिला. तो वाचल्या नंतर मात्र अक्षरशः मनाची तडफड झाली. वाटलं की लोक इतकं एंजॉय करतात आपण पण करावं. त्याच सुमारास मिलिंद बोकिलची 'शाळा' कादंबरी वाचली. (मी ही कादंबरी, शेवटचे पान वाचून झाले की परत पहिले पान उघडायचे असं करत सलग ५ वेळा वाचली). 'शाळा' वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाला नाही असा माणूस बहुतेक शाळेतच गेला नसावा किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असावा. इतकी ती कादंबरी 'युनिव्हर्सल' आहे. (मला तर अजूनही वाटतंय की हा मिलिंद बोकिल माझ्याच वर्गातला एखादा असणार आणि आता फक्त नाव बदलून लिहितोय. नक्कीच, नाही तर आमच्या वर्गात घडलेल्या काही घटना त्याला तंतोतंत कश्या माहीत झाल्या?) याच सुमारास संगिता अचानक ऑर्कुटवर भेटली. तिच्याकडे तर आमचा ९वी मधे असताना काढलेला ग्रुप फोटोच होता. तिने तो स्कॅन करून पाठवला आणि १ आठवड्याच्या आत तो फोटो जवळ जवळ १०-१२ जणांकडे पोचला असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनाची अशीच घालमेल चालू असताना नितिन बरोबर एक दिवस जीटॉक वर गप्पा मारत होतो. मनातली आयडीया त्याला बोलून दाखवली. गंमत म्हणजे त्यालाही तसंच वाटत होतं. पण हे सगळं कसं जमणार, कसं करणार, कोणाला इंटरेस्ट असेल का? वगैरे शंकासुर पण आमच्या मनात कॉमनच होते. म्हणून मग परत ते सगळं तसंच राहिलं. उगाच मधून मधून आम्ही दोघं एकमेकांना आठवण करायचो आणि 'खो' दिल्या सारखा, जो आठवण द्यायचा तो आपण दुसर्‍याला आठवण करून दिली या सामाधानात स्वतः विसरून जायचा अर्थात् तो खो परत मिळे पर्यंत!!! हळू हळू आमच्या या खोखोच्या खेळात अजून एक दोघे सामिल झाले पण गाडं काही पुढे सरकेना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण म्हणतात ना, ज्या गोष्टीची वेळ आली आहे ती होतेच होते. अगदी असंच झालं. एकदा बोलता बोलता नितिन म्हणाला, "अरे मी वैभवला विचारून बघतो." म्हणलं ठीक आहे, विचार. तेव्हा वैभव नेमका परदेशात. पण त्याला जसं समजलं की असा काही विचार चालू आहे तेव्हा पासून तो अक्षरशः पिसाटलाच. त्याने लगेच स्वप्नाला फोन करून तिला यात खेचलं. वैभव आणि त्याची बायको स्वप्ना, दोघेही आमच्याच वर्गातले. त्यामुळे मुलं मुली असे दोघेही बरेच जण त्या दोघांच्या संपर्कात होतेच. पण त्या दिवसा नंतर प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत या दोघांनी जी काही मेहनत घेतली त्याला तोडच नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळू हळू या लोकांची एक 'ऑर्गनायझिंग टीम'च तयार झाली. वैभव, स्वप्ना, राधा, जयु, नितिन, तनुजा, मिलिंद, गिरिश... आपापले कामधंदे सांभाळून आठवड्यातून २-३ वेळा रात्री संध्याकाळी भेटायला लागले. कार्यक्रमाची रुपरेषा आकार घेऊ लागली. पहिली गोष्ट ही ठरली की जरी हा कार्यक्रम आपल्या बॅचच्या मुलामुलींना एकत्र आणायचा असला तरी आपल्या शिक्षकांशिवाय मात्र मजा नाही. जसे ते आमच्या शाळेच्या दिवसांचे अविभाज्य अंग होते तसेच ते या कार्यक्रमाचे पण असायालाच पाहिजेत. बरीच मुलं एकमेकांच्या संपर्कात होतीच. पण मुलींचं तसं नसतं. त्यांची लग्नानंतर नावं बदलतात. त्या दूर दूर सासरी वगैरे जातात. संपर्क हळू हळू कमी होत जातो. त्यांना कसं शोधायचं? सोयिस्कररित्या हे कारण पुढे करून सगळ्यांना ट्रेस करणं टाळता आलं असतं खरं तर. पण ऑर्गनायझर मंडळ लै भारी होतं आमचं. कार्यक्रम करायचा तर सगळ्यांनाच बरोबर घेऊन करायचा. कमीत कमी आमंत्रण तरी सगळ्यांना मिळालंच पाहिजे हा पक्का निर्णय होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेत जाऊन काही माहिती मिळते का ते बघायचं ठरलं. पण २५ वर्षांपूर्वीची माहिती मिळणं तर सोडा पण असेल तरी की नाही हीच मोठी शंका होती. पण शळेत गेल्यावर वाडेकर प्यूनच्या कानावर हे गेलं आणि त्याने कागदाचे मिळतिल ते गठ्ठे तपासून बरोब्बर २५ वर्षांपूर्वीचे आमच्या बॅचचे सगळे रेकॉर्डस शोधून काढले. त्यामुळे काम खूपच सोप्पं झालं. फोनाफोनी सुरू झाली. हळू हळू एक एक जण भेटत गेले. इतकी वर्षं हरवलेली मुलं मुली भेटत गेली. प्रत्येक जण हे सगळं ऐकल्यानंतर वेडा / वेडी झाले होते. ही कल्पनाच जबरदस्त होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SYJQzLv9DRI/AAAAAAAAAic/L04IYHdl6GA/s400/NITIN-2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग तारिख ठरली, रविवार, २५ जानेवारी २००९.  सोमवारी २६ जानेवारीची सुट्टी असल्याने मस्त 'लाँग विकेंड' मिळत होता त्यामुळे मुंबईबाहेरून येणार्‍यांची सोय झाली. एक छोटासा हॉल बुक केला. पूर्ण दिवसभराचा बेत ठरला. जेवण पण ठेवलं होतं. अनिता आणि तिचा नवरा दोघे कॅटरिंगचाच व्यवसाय करतात त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. घरचाच मामला झाला. शिक्षकांना बोलवायचे ठरलेच होते. पण एक कृतज्ञता म्हणून त्यांना काहीतरी द्यावे असं सगळ्यांनाच वाटत होतं. मग एक छोटीशी ट्रॉफी द्यावी असं ठरलं. एका अतिशय मोठ्या प्रोफेशनल ट्रॉफीमेकर कडे जाऊन सुंदर ट्रॉफी डिझाईन करून घेतली. कार्यक्रम करायचा तर नीट आणि सुंदरच करायचा हा एकच विचार प्रत्येकाच्या मनात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SYJQ8Zr5bMI/AAAAAAAAAi8/_McVze5eRGo/s400/Nandadeep.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळं होत असताना मला नितिन कडून नियमित अपडेट्स मिळतच होते. प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही ही सल मनात खूपच होती. पण माझ्या डोक्यात आलेली कल्पना सगळे जण मिळून इतकी मस्त प्रत्यक्षात आणत आहेत हे बघून मला बरंच वाटत होतं. नेहमी प्रमाणे माझी भ्रमंति चालूच होती. मनात धाकधूक होतीच की आयत्या वेळेला काही तरी अर्जंट काम उपटेल आणि आपल्याला जाता येणार नाही. बुकिंग मात्र करून ठेवलं होतं. आणि शेवटी शेवटी तर असंच ठरवलं की दुनिया इकडची तिकडे झाली तरी कार्यक्रम अटेंड करायचाच. नोकरी गेली... कुठे ते सगळ्यांना माहित आहेच. ;) मधेच २-३ वेळा सहज गंमत म्हणून नितिनला म्हणलं की "बघू रे, जमलं तर येतो" वगैरे. त्या वर त्याची प्रतिक्रिया बघून, शारिरीक दुखापतीचा १००% धोका आहे असे जाणवल्याने कार्यक्रम चुकवताच येणार नव्हता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझं २२ जानेवारीचं बुकिंग होतं. तो संपूर्ण दिवस ऑफिसमधे कसाबसा ढकलला. रात्री मुंबईला पोचलो. आधीचे महिनोन् महिने सहज निघतात पण शेवटचे २-४ क्षण मात्र जाता जात नाहीत, तसं झालं होतं. २३-२४ कसेतरी ढकलले. २४ला संध्याकाळी आम्ही ४-५ जण एकत्र भेटलो. रात्री घरी आलो, रात्रभर झोप नाही लागली. उद्या कसे सगळे भेटतिल, कसे दिसत असतिल... मनात चक्रं फिरत होती. एकदाची सकाळ झाली. एव्हाना माझ्या मोठ्या मुलीला पण कळलं होतं की बाबा त्याच्या शाळेतल्या मित्रांना (मैत्रिणी नाही, आमच्या शाळेत मुलं मुली जानी दुश्मन असायचे) भेटायला जाणार आहे. तिला बिचारीला हे पटतच नव्हतं की बाबा पण लहान होता, त्याचे पण मित्र होते, तो बेंचवर बसायचा ("अय्या, बाबा तुम्ही एवढ्याश्या बेंचवर कसे मावायचात?"), मस्ती करायचा. तिच्या प्रश्नांना उत्तरं देता देता माझी एक्साईटमेंट वाढत होती. धावत पळत, ठरलेल्या वेळेपेक्षा चांगला अर्धा तास आधी पोचलो. हळू हळू पब्लिक जमत होतं. बहुतेक जण ओळखू आले. काही जण मात्र अक्षरशः 'परकायाप्रवेश' केल्या सारखे वेगळंच शरीर धारण करून आले की काय असं वाटण्या इतके बदलले होते. पण तिथे पोचल्यावर मात्र सगळे परत लहान होऊन गेले आणि ओळखीचे वाटायला लागले. तशीच लहान असताना चालणारी चिडवा चिडवी चालू झाली. जुने सगळे 'संदर्भ' ;) परत आठवायला लागले. नुसते आठवतच नव्हते तर ते 'संदर्भ' साक्षात समोर दिसत असल्याने काही जण (आणि 'जणी' सुध्दा बरं का!!!) अंमळ हरवले होते.  आमच्या वेळच्या दहावीच्या सगळ्या वर्गांचे ग्रुप फोटो पैदा करून एका बोर्डावर लावले होते. आपले स्वतःचेच जुने चेहरे बघून दुसर्‍यांपेक्षा स्वतःचंच हसू येत होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग एक एक शिक्षक यायला सुरूवात झाली. इतक्या वर्षांनी त्यांना बघत होतो. बरेच जण निवृत्त झाले होते. वयं झाली होती. काही जण तर मुंबई सोडून गेले होते. पण केवळ आमच्या प्रेमापोटी दगदग सोसून जिद्दीने मुद्दाम हजर राहिले. २५ वर्षांत बरीच उलथापालथ झाली असली तरी शिक्षकांचा हात पाठीवर आहेच हे जाणवलं. त्यांना वाकून नमस्कार करताना उगाचच भरून येत होतं. गंमत म्हणजे आमच्या सगळ्यांच्यात कितीतरी फरक पडला होता तरी बहुतेकांना त्यांनी बरोबर ओळखलं. काही शिक्षक पुढच्या प्रवासाला निघून गेले आहेत, त्यांना श्रध्दांजली वाहून आमचा कार्यक्रम सुरू झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यात आधी घंटा वाजली, शाळा भरली. राधाने प्रास्ताविक केलं आणि माईक माझ्या हातात दिला. मी थोडक्यात हा सगळा कार्यक्रम कसा ठरला, नियोजन कसं झालं वगैरे सांगितलं. मला खरं तर एकच सांगायचं होतं, "आज आपण कोणीही असो, कसेही असो, कुठे असो... आपण आपल्या आयुष्यातली सर्वात अमूल्य चीज शेअर केली आहे... ती म्हणजे आपलं बालपण. गेली २५ वर्षं आपण दूर गेलो होतो पण आता मात्र कमीत कमी संपर्कात मात्र नक्कीच राहू. नियमितपणे जेवढे जमतिल तेवढे भेटत राहू." शाळेतल्या गंमतीदार आठवणी सांगितल्या. मी आणि नितिन कायम मागच्या बाकावर बसायचो. आमचे मुख्याध्यापक वैद्यसर त्यांच्या खोलीतून बाहेर पडले की आम्हाला बरोबर लांबूनच दिसायचे. वैद्यसर म्हणजे एकदम टेरर माणूस. कितीही उनाड, निर्ढावलेला पोरगा असो त्यांच्या समोर अतिशय गरिब बनून उभा रहायचा. त्यांची छडी खाल्ली नाही असा विद्यार्थिच नाही शाळेत. तर ते येताना दिसले की मी आणि नितिन सगळीकडे सावधगिरीचा इशारा द्यायचो. लगेच वर्गातले सगळे अवैध उद्योगधंदे थंड व्हायचे. एकदा कसं माहित नाही पण त्यांना आमचे हे महान कार्य लक्षात आले. (मला वाटतं बर्‍याच दिवसांत आमच्या वर्गात कोणाला छडी मारायला न मिळाल्या मुळे त्यांनी पाळत ठेवली असावी आमच्यावर.) झाऽऽलं. लगेच आम्हाला शिक्षा झाली. काय तर, सगळ्यात पुढे एक बेंच होता जो त्यांच्या केबिन मधून व्यवस्थित दिसायचा. आमची रवानगी त्या बेंचवर. आता यात शिक्षा कसली? तर भानगड अशी की हा बेंच मुलींच्या लायनीत होता. (मुलं मुली वेगळे बसायचे, दुश्मनी एकदम पक्की होती. दोन रांगा मुलांच्या आणि दोन रांगा मुलींच्या असा प्रकार होता.) आख्ख्या वर्गात आम्हाला हसत होते. शाळेतले शेवटचे सहा महिने असे काढले होते. पण आमचे वैद्यसर एकदम मस्तच होते. काही कारणाने येऊ नाही शकले. त्यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच जाणवली. त्यानंतर ओळख परेड झाली. प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून दिली. काय व्हरायटी होती... बाप रे. लेकुरवाळ्या गृहिणींपासून ते एका बहुराष्ट्रिय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत रेंज होती मुलींमधे. मुलांमधे कोणी यशस्वी बिझनेसमन तर कोणी राजकारणी, कोणी पत्रकार. खूपच जबरदस्त धक्के बसत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जेवणानंतर मात्र वेळ पूर्णपणे शिक्षकांसाठी होता. मी एक एक शिक्षकांबद्दल थोडं बोलून, त्यांच्या लकबी वगैरे सांगून आठवणी ताज्या केल्या. प्रत्येकाला समोर बोलवून थोडं बोलायची विनंति केली. बहुतेक जण खूपच छान बोलले. पण काही जण मात्र खूपच भावनाविवश झाले होते. जास्त बोलूच नाही शकले. आमची पण तीच अवस्था झाली होती. सातपुते बाईंचा इतिहासाचा तास, त्यांनी शिकवलेली फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य युध्द, सामंतबाईंनी (भर दुपारी शाळेच्या ग्राउंडवर) करून घेतलेली आंतरशालेय समूहगीतांची प्रॅक्टिस, त्यांचं आम्हा मुलांना धोपटणं, गोखले बाईंनी रोज पहिल्या तासाला म्हणून घेतलेला गीतेचा १५वा अध्याय, पोतदारसरांचं जीव तोडून चित्रकला शिकवणं आणि आम्ही मारूतिचा गणपती करण्याची किमया दाखवल्यानंतर हताश होणं, पीटीच्या गवळी सरांच्या शिट्टीची दोरी पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पायावर एकदा तरी सपकन् बसलीच आहे, खेडेकर सरांसारखं अक्षर आज पर्यंत बघितलं नाही, ८वी मधे असताना करमरकरबाईंनी नेहरू प्लॅनेटेरियम आणि सायन्स सेंटर मधे नेलेली शैक्षणिक सहल आणि त्यांचे एक नातेवाईक तिथे होते त्यांनी आमच्या साठी केलेला खास शो..... सगळेच काही ना काही आठवणी जागवत होते. प्रत्येक शिक्षकांनी आमच्या वर काही ना काही छाप सोडली आहे हे एकदम जाणवलं. सामंतबाई म्हणाल्या "तुम्ही २५ वर्षांनी मोठे झालात, मॅच्युअर झालात तसे आम्ही पण झालो. आज मला पश्चात्ताप होतोय की मी तुम्हाला खरंच खूप मारत होते. मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागते." हे ऐकून सगळेच एकदम सेंटी झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यात जास्त मजा तर सुशिताईने केली. ती म्हणाली, "शाळा सुरू झाल्यापासून मी शाळेत आहे. किती तरी बॅचेस माझ्या समोरून गेल्या. आणि शाळेतली सगळी 'गुपितं' मला माहित आहेत. मी बोलायला लागले तर बरेच जण पळून जातील." तिच्या या वाक्यावर पडलेल्या टाळ्याच, ती खरं बोलते आहे हे दाखवून गेल्या. भोगले बाईंनी तर खूपच छान भाषण लिहूनच आणलं होतं. गवळी सरांच्या मेमरीला तर सलाम!!! २४ तारखेला रात्री त्यांना शीतलने आठवण करायला फोन केला होता. ती त्यांना म्हणाली, "सर मी कोण ते ओळखा." सरांनी पटकन सांगितलं, "तू शीतल." जबरदस्त... २५ वर्षांनंतर नुसत्या आवाजावरून व्यक्ति ओळखणं म्हणजे केवळ ग्रेटच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळं होई पर्यंत संध्याकाळ होत आली होती. (जेव्हा कार्यक्रम ठरत होता तेव्हा असं वाटलं होतं की आपण दिवसभर काय करणार? म्हणून एक इव्हेंट मॅनेजर बोलावला होता. तो काही गेम वगैरे कंडक्ट करेल असा प्लॅन होता. तो बिचारा २-२.३० पासूनच येऊन बसला होता. पण आम्हीच आमची एवढी धमाल करत होतो की आम्हाला त्याची गरजच वाटेना. शेवटी ३ वाजता त्याला परतच पाठवला. :) ) एक एक जण निरोप घ्यायला लागला. होणार होणार म्हणता म्हणता कार्यक्रम झाला पण... आणि अतिशय मस्त झाला. जेव्हा पहिल्यांदा मी आणि नितिन बोललो होतो तेव्हा आम्ही खूपच साशंक होतो. कार्यक्रम होईल की नाही इथ पासून सुरूवात होती. पण प्रत्यक्षात जबरदस्तच झाला एकंदरित प्रकार. सगळ्यांच्या साठीच एक अविस्मरणिय दिवस होता तो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या पुरतं म्हणायचं तर, ज्या खेडेकर सरांनी पहिल्यांदा 'मराठी' भाषा म्हणून शिकवली त्यांनी आवर्जून 'खूप छान बोलतोस तू. भाषा छान आहे तुझी.' असं सांगितलं. त्यांनीच काय पण कोणत्याही शिक्षकांनी कौतुक करायचा प्रसंग शाळेत असताना कधी वाट्याला आला नाही. तो अनुभव शाळा सोडल्यानंतर २५ वर्षांनी मिळाला. म्हणलं, चला, २५ वर्षांत काही तरी तर शिकलो आपण. बरं वाटलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालच नितिनचा फोन आला होता. इतके दिवस कार्यक्रमाच्या धावपळीत गेले आणि आता एकदम रिकामपण आलंय म्हणत होता, वैभव आणि स्वप्नाची पण हीच अवस्था आहे. त्यावर उतारा म्हणून अजून एकदा कार्यक्रम करुया असं म्हणतोय तो. ;)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6731172828030606479-2496805567563281435?l=maazedonpaise.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://maazedonpaise.blogspot.com/feeds/2496805567563281435/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=6731172828030606479&amp;postID=2496805567563281435' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2496805567563281435'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6731172828030606479/posts/default/2496805567563281435'/><link rel='alternate' type='text/html' href='http://maazedonpaise.blogspot.com/2009/01/blog-post_31.html' title='सेंडॉफ नंतरची शाळा...'/><author><name>मी बिपिन.</name><uri>http://www.blogger.com/profile/03785442148185711516</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='09941271217302816922'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh4.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SYJQzLv9DRI/AAAAAAAAAic/L04IYHdl6GA/s72-c/NITIN-2.jpg' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6731172828030606479.post-4556937600228292347</id><published>2009-01-01T03:42:00.000+04:00</published><updated>2009-01-01T03:43:51.934+04:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समाज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विचार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माहिती'/><title type='text'>आफ्रिका!!! आफ्रिका!!!</title><content type='html'>माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो. पृथ्वीच्या गोलावर एखादं गावाचं नाव घ्यायचं आणि ते कुठे आहे ते दुसर्‍याने शोधून काढायचं. हाच खेळ त्या ऍटलस मधे बघून खेळायला जास्त मजा यायची. तिथे तर जामच कळायचं नाही. पण हे सगळं चालू असताना 'आफ्रिका' हा शब्द मात्र कुठे तरी घट्ट जाऊन बसला होता मनात. तो शब्दच काहीतरी वेगळा वाटायचा. काहीतरी अनामिक, गूढ असं वाटायचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा आफ्रिकेशी पहिला संबंध आला तो अगदी लहानपणी, ५-६ वर्षांचा असताना, आमच्या कडे नुकताच टीव्ही आला होता, तेव्हा. एका शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो. मला त्या झांझिबार शब्दाने अक्षरशः वेड लावले होते. पुढे कितीतरी दिवस तो शब्द माझ्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होता. साला, गावाचं नाव काय? तर झांझिबार!!! गंमतच आहे. कसं असेल ते झांझिबार? तिथल्या लोकांना आपल्या गावाचं नाव सांगताना थोडं विचित्र नाही वाटत? असले विचार यायचे माझ्या मनात. :) &lt;br /&gt;&lt;br /&gt;हळू हळू ते थोडं ओसरलं. तेवढ्यात आमच्या बिल्डिंगमधले एक जण नोकरी निमित्त 'नायजेरिया'ला गेले. तिथे लागोस मधे होते ते. त्यांची धाकटी मुलगी आमच्या बरोबरीचीच एकदम. रोजच्या खेळण्यातली. ती एकदम विमानात बसून कुठे गेली? तर आफ्रिकेला!!! कसली जळली होती आमची. पण चला आपण नाही तर कमीत कमी आपली मैत्रिण तर जातेय हाच आनंद होता. ती जेव्हा सुट्टीवर यायची तेव्हा तिच्या तोंडून तिथले उल्लेख, चमत्कारिक नावं, तिचं इंग्लिश (आम्ही मराठी माध्यमवाले, ती तिथे जाऊन एकदम इंग्लिश मिडियमवाली झालेली) वगैरे ऐकून आम्हाला फारच सुरस आणि चमत्कारिक असं वाटायचं. माझे आजोबा रेल्वेत मोठे अधिकारी होते. आणि मागे एकदा नायजेरियामधले काही अधिकारी तिथे रेल्वे सुरू करायच्या प्रयत्नात भारतात आले होते. त्यांचे काढलेले स्वागत समारंभाचे फोटो मला बाबांनी दाखवले. त्यात ते लोक एकदम धिप्पाड आणि काहीतरी वेगळेच झगे (गाऊन) आणि लांब टोप्या घातलेले पाहून गंमतच वाटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आफ्रिका डोळ्याना पहिल्यांदा दिसायचा योग आला तो अजून पुढे, साधारण ७५-७६ साली. मुंबईत, कुलाब्याला रीगलला 'हतारी' (http://en.wikipedia.org/wiki/Hatari!) हा सिनेमा आला होता. तो पूर्णपणे आफ्रिकेतच आहे. बाबांनी मला आणि ताईला मुद्दाम तो बघायला नेला होता. त्यातले एक एक प्राणी आणि ते निसर्ग सौंदर्य बघून केवळ वेडच लागायचं बाकी राहिलं होतं. सिनेमा संपल्यावर बाबांनी जवळ जवळ ओढतच बाहेर काढलं होतं. पुढे शाळेत भूगोलाच्या तासाला आफ्रिकेतले प्राणी, तिथले मौसमी वारे, हवामान, पिकं, तुआरेग जमातीच्या लोकांची घरं कशी असतात आणि त्याला काय म्हणतात वगैरे अतिशय नीरस गोष्टी पण माझ्या मनातली आफ्रिका अधिकाधिक संपन्न करत गेल्या. इतिहासाच्या तासाला बाई मध्ययुगातील गुलामांच्या व्यापाराबद्दल शिकवायच्या. ती वर्णनं ऐकून खूपच वाईट वाटायचं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असं होता होता, नववी दहावी मधे असताना, माझ्या हातात प्रसिध्द संशोधक, भटक्या (एक्स्प्लोरर) सर रिचर्ड बर्टनवर बाळ सामंतांनी लिहिलेलं पुस्तक पडलं. त्यात त्याने आफ्रिकेत अतिशय दुर्गम आणि भयानक टोळ्या वास्तव्य करत असलेल्या प्रदेशात केलेली भटकंती छान वर्णन केली आहे. आफ्रिकेतले विविध लोक, त्यांचे जीवन, नरभक्षक टोळ्या, त्याने नाईल नदीच्या उगमाचा लावलेला शोध आणि त्या प्रवासातले अनुभव जबरदस्तच आहेत. त्याच्या स्वतःच्या लिखाणातले उतारेच्या उतारे आहेत. ह्या माणसाचा माझ्यावर अजूनही विलक्षण प्रभाव आहे. कॉलेज मधे परत आफ्रिका भेटली, तेव्हा इदी अमिनवर एक सिनेमा आला होता. तो बघितला, त्यातल्या काही गोष्टी बघून धक्का बसला होता. त्याच वेळी द. आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा चालला होता. नेल्सन मंडेला हे नाव पूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध झालं होतं. इथियोपियातला दुष्काळपण खूपच गाजला होता. त्या साठी पैसे वगैरे पण गोळा केले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात आफ्रिका घुसत गेली आणि कधी जायला मिळेल असं वाटत नसल्यामुळे मी माझ्याच मनात एक चित्र उभं करत गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असं सगळं असताना, २००७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मधे एक दिवस माझा बॉस अचानक माझ्याकडे आला. म्हणाला, 'नैरोबीला एक अर्जंट काम आहे. तुला जावं लागेल'. खरं तर माझा तसा काहीच संबंध नव्हता पण माझ्या नावाची निवड झाली होती. मी अक्षरशः थरारलो. ध्यानी मनी नसताना एकदम आफ्रिकासफर घडणार!!! मी तसंही नाही म्हणू शकत नव्हतो, आणि मी नाही म्हणायचा प्रश्न ह्या जन्मात तरी उद्भवणार नव्हता. जनरितीपुरते थोडे आढेवेढे घेऊन मी जायचे मान्य केले. दुबई ते नैरोबी जवळ जवळ ५ तासाचा प्रवास आहे. फ्लाईट रात्रीची होती. पहाटे पोचणार होतो. मला तर अति एक्साईटमेंटमुळे झोप आलीच नाही. चेक इन साठी मुद्दाम पहिला नंबर लागेल इतक्या लवकर जाऊन, खास 'कॅन आय हॅव अ विंडो सीट, अवे फ्रॉम द विंग्ज, प्लीज?' अशी विनंति करून, छान सीट पटकावली. जसजसं नैरोबीजवळ यायला लागलं तसतसं मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं होतं. हीच ती आफ्रिका जी लहानपणा पासून डोक्यात आहे. हीच ती आफ्रिका जिथे आपला हीरो 'सर रिचर्ड बर्टन' वणवण करत भटकला. आधुनिक मानवाचा उगम इथलाच. डिस्कव्हरी / नॅशनल जिऑग्राफी मधून दिसणारी, आफ्रिका आज प्रत्यक्ष दिसणार. खिडकी बाहेर अंधार होता. नैरोबी आलं. तो पर्यंत बाहेर पहाटेचा लालसर पिवळा संधिप्रकाश बर्‍यापैकी फुटला होता. त्यामुळे तर अजूनच अद्भुत वगैरे वाटायला लागलं. वैमानिकाची 'पट्टे आवळा, विमान उतरतंय' अशी हाक आली. विमान हळूहळू खाली सरकलं. आणि एका क्षणी मला त्या धूसर, लाल प्रकाशात आफ्रिकेचं पहिलं दर्शन झालं. तो क्षण मी विसरणंच शक्य नाही. एकदम 'कोडॅक मोमेंट'च. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SVvuT4x7O9I/AAAAAAAAAgM/8polfXUvssg/s400/Africa%20Dawn%2006.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या जादूभरल्या प्रकाशात उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर खास आफ्रिकेत असतात तश्या एका 'फ्लॅट टॉप' झाडाचं दर्शन झालं. नैरोबीच्या बाहेर एका प्रचंड मोठ्या पठारावर एकुलतं एक झाड उभं होतं. वरच्या चित्रात आहे तसा एखादा जिराफ नाहीतर एखादा हत्तींचा कळप वगैरे दिसला असता तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. ते विमान त्याक्षणी उतरताना खाली धपकन् पडलं असतं तरी मला कळलं नसतं. माझा मित्र बाजूला बसला होता. मस्त घोरत होता. एक अतिशय सोनेरी क्षण घालवला त्याने. बिच्चारा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असं साक्षात गदिमाच म्हणून गेले आहेत. पण माझ्या बाबतीत नेमकं उलटं झालं. 'प्रतिमेहून प्रत्यक्ष भन्नाट' अशी माझी अवस्था झाली. पुढे नैरोबी मधे थोडासाच मुक्काम घडला. तिथलं जीवन अगदी थोडं का होईना पण जवळून बघता आलं. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या मनात एक स्टिरीओटाईप बाळगून असतो. जो पर्यंत आपण वास्तवाला डोळसपणे सामोरे जात नाही तो पर्यंत ते आपण घट्ट पकडून वर कुरवाळतही बसतो. पण डोळे, कान आणि मन उघडं ठेवून वावरलं की ह्या आभासातून सुटका होते. 'लॉ ऑफ फिफ्टी-फिफ्टी' प्रमाणे कधी सत्य धक्का देतं कधी सुखावतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला वाटतं की आफ्रिकन लोक म्हणजे एकजात सगळे धिप्पाड, काळे कुळकुळीत, कुरळ्या केसांचे वगैरे असतात. माझा पण असाच समज होता. पण तिथे तर मला चित्र थोडं वेगळंच दिसलं. माणसं काळीच पण त्या काळ्या रंगाच्या एवढ्या विविध छटा दिसल्या की बस्स. तेच केसांचं. कधी कुरळे, कधी सरळ आणि लांब (पण जास्तीत जास्त खांद्या पर्यंत, त्या खाली कधीच नाही), आणि कधी.... नाहीतच. :) असं सगळं. काही लोक एकदम धिप्पाड तर काही एकदम पाप्याचं पितर वगैरे. पुढे आफ्रिकेत अजून थोडं फिरलो तसं अजून वैविध्य दिसलं. माणसांचे तोंडावळे पण किती निरनिराळे!!! साधारण चेहर्‍यावरून, रंगावरून ते कुठले असावेत त्याचा अंदाज बांधता येतो. गोलसर चेहर्‍याचे धिप्पाड पश्चिम-आफ्रिकन, तसेच दिसणारे पूर्वेकडचे, टिपिकल 