<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss'><id>tag:blogger.com,1999:blog-14936767</id><updated>2009-12-21T20:41:13.618-08:00</updated><title type='text'>मराठी साहित्य (Marathi Literature)</title><subtitle type='html'>मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनुदिनीद्वारे मराठीतील लेखक वा कवींच्या साहित्यकृतींचा - मग त्यात पुस्तके, लेख, कविता, नाटके, भाषणे, समीक्षा, नाट्यछटा सारे आले; मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न राहील.

This is a blog dedicated to Marathi Literature, one of my favorite topics.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default?start-index=26&amp;max-results=25'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>57</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-7496165455067387866</id><published>2009-10-24T03:09:00.000-07:00</published><updated>2009-10-24T03:22:27.095-07:00</updated><title type='text'>कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना</title><content type='html'>भालचंद्र नेमाड्यांची १९६३मध्ये प्रकाशित झालेली 'कोसला' ही मराठीतली अतिशय गाजलेली कादंबरी. नेमाड्यांनी त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी, कथानायक ‘आज उदाहरणार्थ पंचविशीचा’ आहे असे सांगून लिहिलेली ही कादंबरी पंचेचाळीस वर्षे झाली तरी आपला प्रभाव टिकवून आहे. मूलपण आणि प्रौढ पुरुष यांच्यामधली गोंधळलेली अवस्था, जगाच्या भंपकपणाचा येणारा राग, स्वत:च्या डोक्यातला विचारांचा 'कल्लोळ कल्लोळ', पुढे नक्की काय करायचे आहे याचा काहीच निर्णय होत नसल्याने येणारी अस्वस्थता, आणि अशातच शरीराच्या गरजांचे वाढत्या उत्कटतेने जाणवू लागणारे अस्तित्व या सार्‍यांचा कोलाज कोसलाने मराठीत प्रथमच मांडला. ज्ञानेश्वरीतही वापरल्या गेलेल्या कोसला ह्या खानदेशी शब्दाचे मूळ म्हणजे ‘कोश’. वेगळेपणा, अलम दुनियेपासून तुटलेपण ह्या रुढ अर्थाबरोबरच एकमेकांत गुंतलेल्या वेगवेगळ्या धाग्यांनी तयार झालेले क्लिष्ट, काहीसे संरक्षक असे जाळे असाही ह्या रुपकाचा अर्थ नेमाड्यांना अभिप्रेत असावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;फडके-खांडेकरांच्या प्रभावांपासून नुकतेच मोकळे होऊ लागलेल्या, स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास स्वीकार करण्याच्या मनःस्थितीत येऊ लागलेल्या मराठी वाचकवर्गाने अशा या वेगळ्या वाटेवरच्या पुस्तकाला डोक्यावर घेतले नसते, तरच नवल. आजही आकाशवाणीने वाचकांकडून मागवलेली मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी असो, वा अंतर्नादची सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी - कोसलाचा त्यात समावेश असतोच. साठोत्तर साहित्यातील मराठीतील सर्वात महत्त्वाची म्हणता येईल अशी ही कादंबरी, इंग्रजीतल्या जे. डी. सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीवर बेतलेली आहे/ तिच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे, असा प्रवाद जेव्हा प्रथम ऐकला; तेव्हा काहीसे आश्चर्यच वाटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याची शहानिशा करावी या हेतूने या दोन्ही कादंबर्‍या एकापाठोपाठ एक वाचल्या. या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे, आणि फरकही जाणवले. ते लिहिण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, हा सारा उपद्व्याप ‘कोसला’सारखी लोकप्रिय कादंबरी कशी परप्रकाशित किंवा कमअस्सल आहे, हे सांगण्याच्या अभिनिवेशातून केलेला नाही. कोसलाने अनेकांना झपाटून टाकले आहे. तिची वेगळी शैली, ओळखीचे वाटणारे अनुभव आणि त्या वयातली अचूक टिपलेली मानसिकता - यामुळे ती केवळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी पंचविशीत असणार्‍या पिढीला जवळची न वाटता, आजच्या पिढीलाही ओळखीची वाटते. त्यामुळे मूर्तिभंजकाचा आव आणून, जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ, अशा सवंग अट्टाहासातून हे लेखन केलेले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरे म्हणजे, तसे पाहिले तर साहित्यात फार थोड्या गोष्टी, फार थोड्या थीम्ज ह्या ओरिजिनल, मूळच्या आहेत.‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ या न्यायाने कुठलाही विषय आत्तापर्यंत अस्पर्श राहिला असेल, असे वाटत नाही. तेव्हा या मूळ कल्पनांमध्ये लेखकाने स्वत:ची शैली कितपत जाणवून दिली आहे, स्वतःच्या प्रतिभेची कितपत गुंतवणूक केली आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे, कोसला आणि कॅचरचा नायक हा कॉलेज सोडलेला, सारख्याच पराभूत मानसिकतेत सापडलेला आहे; या साम्यापेक्षा त्यांच्या शैलीतील साम्य (आणि अर्थातच फरकही) मला अधिक महत्त्वाचा वाटतो. अर्थात, ‘कादंबरी उत्कृष्ट आहे ना? झालं तर! मग तिची प्रेरणा कुठूनही का असेना’, या विधानाला काही प्रतिवाद नाही; कारण कादंबरीच्या आस्वादात तिच्या प्रेरणास्रोताच्या स्थानामुळे काही बाधा येत नाही हे नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे दाखवायची झाली तर, दोहोंतला सुरुवातीचा परिच्छेदच पुरेसा बोलका आहे. ‘बट आय डोन्ट फील लाईक गोईंग इंटू इट…आय ऍम नॉट गोइंग टू टेल यू माय होल गॉडडॅम ऑटोबायोग्राफी’, या मंगलाचरणाने सुरुवात करणारा होल्डन आणि ‘खरं तर तुम्हांला वगैरे सांगण्यासारखं एवढंच...पण मी अगदी सगळंच सांगणार नाही’ म्हणणारा पांडुरंग सांगवीकर.‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ हे दोघांचेही ध्रुवपद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोघांचेही वडील कर्तबगार; पांडुरंगाच्या शब्दांत सांगायचे तर ‘रंगारूपाने प्रतिष्ठित’. एकाचे वडील सधन शेतकरी, तर दुसर्‍याचे चांगली कमाई असणारे वकील. त्यामुळेच की काय, पण पैशाच्या बाबत दोघेही अगदी उधळे नसले तरी काहीसे बेफिकीर. गॅदरिंगच्या बजेटबाहेर गेलेल्या खर्चाचे प्रकरण ‘कोसला’मध्ये येते; तर टाईपरायटर स्वस्तात विकून पैसे घेण्याची, अगदी लहान बहिणीने ख्रिसमससाठी साठवलेल्या पैशांतून उधार घेण्याची पाळी कॅचरमध्ये होल्डनवर येते. मेसच्या हिशोबात पांडुरंग फसवला जातो, तर होल्डनला वेश्या आणि तिचा दलाल ठकवतात. असे झाल्यावर ‘आपण कोणतंच काही नीट केलं नाही’ ही (पांडुरंगच्या शब्दांतील) भावना आणि असे फसवले गेल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटणे - हेही दोन्हीकडे सारखेच. पांडुरंग मेस, गॅदरिंग इ. मध्ये निष्काळजीपणे अडकतो; तर होल्डन कॉलेजच्या फेन्सिंग टीमचा मॅनेजर बनतो खरा - पण त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरून परत येतो. ह्या स्वभावदोषावर (किंवा वैशिष्ट्यावर) ‘कोसला’त थोडीफार टिप्पणी येते, पण होल्डन मात्र ‘सम गाईज स्पेन्ड डेज लूकिंग फॉर समथिंग दे लॉस्ट. आय नेव्हर सीम टू हॅव एनीथिंग; दॅट इफ आय लॉस्ट, आय वुड केअर टू मच’ असे परिणामकारक भाष्य करून जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन्ही नायकांच्या आयुष्यांत त्यांच्या धाकट्या भावंडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ऍलीचा आणि मनीचा, लहान वयात झालेला मृत्यू दोघांना उद्ध्वस्त करून जातो. मृत्यूच्या या अन्यायाने संतापून जाऊन होल्डन रात्रभर गॅरेजमध्येच झोपतो. आपल्या हाताने तिथल्या खिडक्या फोडतो, गाडीच्या काचाही फोडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंग ‘मी याचा सूड उगवीन’ अशा प्रतिज्ञा करून लहान मुलींची पिवळी साडी चिंध्या करून पेटवून देतो. त्या जाळात हात भाजल्यावर, शाईने तळवे थंड करून खोलीभर त्याचे शिक्के उमटवतो. इतर जगाला समजून घेताना त्रास होत असला, तरी मनीशी आणि फीबीशी त्यांचा संवाद जुळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दांभिकतेबद्दलचा दोघांचाही उपहास एकाच जातकुळीतला. होल्डनला त्यांच्या शाळेतल्या चर्चमध्ये येऊन भाषण देणार्‍या उद्योगपतीबद्दल वाटणारा आणि पांडुरंगाला वक्तृत्वमंडळात जाणवलेला. इतिहासाबद्दल दोघांच्या प्रतिक्रिया सारख्याच. ‘साल्यांना शिलालेख सापडले वगैरे, म्हणून अशोकाची माहिती कळली. मधले कुठले पुरावे नसले, की हे लोक वाटेल तसे ठोकताळे बांधतात’ म्हणत पांडुरंग इतिहास सोडून मराठी घेतो. अशाच धर्तीवर इजिप्शियन्सबद्दल लिहून ‘मला एवढंच माहीत आहे, मला नापास केलंत तरी चालेल’ अशी शरणचिठ्ठी उत्तरपत्रिकेतच लिहून होल्डन शाळा सोडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन्ही कादंबर्‍यांतील तपशीलांत याहूनही काही अधिक साम्ये आहेत. निरर्थकपणाचे तत्त्वज्ञान म्हणून की काय, पण कल्पित (मेक-बिलिव्ह) भंकस करणे (होल्डनचे टोपी घालून आंधळ्याप्रमाणे वावरणे, गोळी लागल्याचा अभिनय करणे तर पांडुरंगाचे सुर्शाबरोबर नऊ हजाराव्या शतकातले इतिहासकार असल्याचे समजून विसाव्या शतकाबद्दल बोलणे किंवा इचलकरंजीकर बरोबर मधुमिलिंद हे आडनाव घेऊन टाईमपास करणे इ.); वर्गातल्या मुलींचे पुढे कुणाशी लग्न होईल याबद्दलचे ‘करूण’ (ज्यांना होल्डन डिप्रेसिंग) म्हणतो असे विचार मनात येणे; क्लासिक पुस्तकांबद्दल चर्चा करणे (पांडुरंगचे मेहताशी डी.एच. लॉरेन्सबद्दल, होल्डनचे डीबीशी मॉमच्या ऑफ ह्यूमन बॉन्डेजबद्दल) वगैरे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे दोन्ही निवेदनांतून जाणवत राहणारे शैलीतील साम्य. वर म्हटल्याप्रमाणे, तपशीलांतील साम्यापेक्षाही शैलीतील साम्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. ‘कोसला’च्या लोकप्रियतेमागे कथानकापेक्षा शैलीचा वाटा काकणभर अधिकच असावा. दोघांचीही निवेदनाची शैली पराभवाचा स्वीकार केलेली, थोडी तुटक अशी आहे, आणि हे अधोरेखित करायला म्हणून की काय; सॅलिंजर कथनात ‘ऑर एनिथिंग, सॉर्ट ऑफ, अँड एव्हरीथिंग, दॅट किल्ड मी.’ अशा शब्दसमूहांची वरचेवर पेरणी करतो. ह्याचेच प्रतिबिंब नेमाड्यांच्या गाजलेल्या ‘वगैरे, उदाहरणार्थ आणि थोर’ मध्ये पडलेले आहे, हे कोसलाच्या वाचकांना सहज कळून येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;‘कॅचर इन द राय’ जिथे संपते, तिथे कोसलाचा उरलेला अर्धा प्रवास सुरू होतो; असे म्हणायला हरकत नसावी. कॅचरची मध्यवर्ती कल्पना जरी तीच असली, तरी तिचा पट कोसलाच्या तुलनेत लहान आहे. होल्डन मनोरुग्णालयातून (अथवा सॅनिटोरियममधून) गेल्या ख्रिसमसच्या काही दिवसांबद्दल सांगतो आहे, एवढाच. कोसलामध्ये याउलट पंचविशीतला सांगवीकर त्याच्या आयुष्यातील काही वर्षांविषयी सांगतो आहे. ह्या मोठ्या पटाचे फायदे आहेत, तसेच अर्थात तोटेही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोठा पट असल्यामुळे कोसलात काही ठिकाणी थोडा पसरटपणा येणे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर पांडुरंगची मनःस्थिती दर्शवणारी रोजनिशी नेमाड्यांना वेगवेगळे भाषिक प्रयोग करायलाही वाव देते. ‘पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी’ सारखी वाक्यं याच भागातली. मनीच्या मृत्यूचे प्रकरण नेमाड्यांनी &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2008/10/blog-post.html"&gt;अतिशय जीवघेणे&lt;/a&gt; लिहिले आहे. ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिने एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’, यासारख्या ओळी पहिल्याच प्रयत्नात ‘कट निअरर द एकिंग नर्व्ह’चा परिणाम साधून जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण या गोष्टींबरोबरच दुसर्‍या भागात, पांडुरंगाचा संपूर्ण पराभवाकडे होणारा प्रवास दाखवताना कोसला काही ठिकाणी विस्कळीतही होते. कॅचर मात्र एखाद्या परिणामकारक शॉर्ट फिल्मसारखा नेमका परिणाम साधून उत्कर्षबिंदूवर थांबते. नायकाच्या संपूर्ण पराभवाचा, त्याच्या हतबल मानसिकतेचा संपूर्ण प्रवास दाखवण्याच्या भानगडीत ती पडत नाही. हा एक मुख्य फरक वगळला तर; अंतर्नादच्या श्रेष्ठ पुस्तके विशेषांकात संजय जोशींनी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोसला निर्णायकपणे पराभूतवादी तर कॅचर ढोबळमानाने आशावादी, होल्डनच्या भवितव्याबद्दलच्या सार्‍या शक्यता मोकळ्या ठेवून संपली असल्याचे म्हटले आहे, ते तितकेसे पटत नाही. होल्डन सॅनिटोरियममध्ये असल्याचे कादंबरीच्या सुरुवातीला आणि शेवटी पुरेसे स्पष्ट केले आहेच. उलटपक्षी अखेरीस पांडुरंग 'उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राह्यलेलं बरं' ह्या तडजोडवादी वृत्तीचा स्वीकार करताना दाखवला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी गेलेल्या वर्षांबद्दल बोलताना 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच...तेव्हा गमावली ही भाषा उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही' अशीही टिप्पणी करतो. कादंबरीच्या विस्तारानंतर प्रवाहाच्या विरूद्ध पोहायची धडपड सोडून देऊन तथाकथित व्यवहारी शहाणपण अंगीकारलेला पांडुरंग सांगवीकर हा या दोन कादंबर्‍यांतला मुख्य फरक. सारांश म्हणजे, पुनरुक्तीचा आरोप पत्करून, ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच दु:खाची नस शोधणार्‍या दोन वेगळ्या मातींतल्या ह्या दोन असामान्य कादंबर्‍या. कोसला लिहिताना नेमाड्यांनी 'कॅचर'वरून प्रेरणा घेतली आहे, हे अमान्य करता येणार नाही. तपशीलांतील आणि त्याहूनही महत्त्वाचा म्हणजे, शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल. मूळ कल्पनेत नेमाड्यांनी स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक करून तिचा थोडा विस्तार केला आहे, हे नक्की. समीक्षकी भाषेत, त्यामुळे कॅचर अधिक 'टोकदार' ठरते आणि कोसला थोडी 'पसरट' होते असे म्हणायचे की, कोसला हे कॅचरच्या वाटेवरचे पुढचे पाऊल आहे असे ठरवायचे; हा भाग अलाहिदा (आणि व्यक्तिसापेक्षही).&lt;br /&gt;&lt;br /&gt;[अन्यत्र पूर्वप्रकाशित]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-7496165455067387866?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/7496165455067387866/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=7496165455067387866' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7496165455067387866'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7496165455067387866'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-514881941218415778</id><published>2008-10-26T22:46:00.000-07:00</published><updated>2008-10-26T23:23:44.016-07:00</updated><title type='text'>जे जे उत्तम...४ [कोसला]</title><content type='html'>ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग ती हात सोडा म्हणाली.&lt;br /&gt;तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?&lt;br /&gt;तेव्हा मनी बोललीच नाही.&lt;br /&gt;आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.&lt;br /&gt;पण ती आईशी बोललीच नाही.&lt;br /&gt;आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?&lt;br /&gt;तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.&lt;br /&gt;लाल साडी.&lt;br /&gt;हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो? &lt;br /&gt;तिला मी आठवलो असेन. लाल साडी.&lt;br /&gt;हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.&lt;br /&gt;मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?&lt;br /&gt;हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.&lt;br /&gt;आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?&lt;br /&gt;मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.&lt;br /&gt;मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.&lt;br /&gt;आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ&lt;br /&gt;आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.&lt;br /&gt;मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.&lt;br /&gt;तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.&lt;br /&gt;डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.&lt;br /&gt;आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.&lt;br /&gt;आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?&lt;br /&gt;मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.&lt;br /&gt;मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.&lt;br /&gt;मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.&lt;br /&gt;मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.&lt;br /&gt;मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन. &lt;br /&gt;मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास. तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कादंबरी - कोसला&lt;br /&gt;लेखक - भालचंद्र नेमाडे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-514881941218415778?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/514881941218415778/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=514881941218415778' title='21 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/514881941218415778'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/514881941218415778'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='जे जे उत्तम...४ [कोसला]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>21</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-2645370349096281538</id><published>2008-09-26T08:41:00.000-07:00</published><updated>2008-09-26T08:44:50.983-07:00</updated><title type='text'>बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]</title><content type='html'>[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2008/09/blog-post.html"&gt;येथे&lt;/a&gt; वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्‍या, खुरटणार्‍या, बहरणार्‍या आणि उन्मळून पडणार्‍या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्‍या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्‍या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2005/11/blog-post.html"&gt;मरून पडलेला हिरवा पांडुरंग&lt;/a&gt; लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्‍या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्‍या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे - &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;...तर हिरव्या पाना&lt;br /&gt;अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं&lt;br /&gt;सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं&lt;br /&gt;शैशव उलगडत जाताना मी&lt;br /&gt;किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे&lt;br /&gt;तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...&lt;br /&gt;सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात&lt;br /&gt;अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा&lt;br /&gt;क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...&lt;br /&gt;आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा&lt;br /&gt;तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी&lt;br /&gt;बराचसा कृतार्थ तुझा&lt;br /&gt;आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही&lt;br /&gt;पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -&lt;br /&gt;तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता&lt;br /&gt;कधीही सुरुवात होईल म्हणून...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला दिसते आहे, प्राणपणाने&lt;br /&gt;जपावे असे काही तुझ्यात - तू&lt;br /&gt;एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;&lt;br /&gt;या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र&lt;br /&gt;माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते&lt;br /&gt;त्यांचेच...&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्‍या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;दोन प्रहर. निवांत सारें.&lt;br /&gt;श्रमभराने बाजेवरतीं&lt;br /&gt;पांगुळलेली तू.&lt;br /&gt;खिडकीबाहेर ढाळितो चवरी&lt;br /&gt;आसुरलेला शेवगा दारचा.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच - &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;रात्री सुचलेली गाणी झाडांना&lt;br /&gt;सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून&lt;br /&gt;पाखरांनी एकच धरलंय :&lt;br /&gt;झाडांना जाग येण्यापूर्वीच&lt;br /&gt;आकाशवाटांनी निघून जायचं आणि&lt;br /&gt;दिवस मिटल्यानंतरही झाडांत&lt;br /&gt;लवकर परतायचं नाही...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुकी झाडे अनाग्रहीपणे&lt;br /&gt;पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज&lt;br /&gt;त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे&lt;br /&gt;वाट पाहावयास तयार आहेत...&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्‍यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी &lt;br /&gt;कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी &lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी &lt;br /&gt;कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी &lt;br /&gt;&lt;br /&gt;पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ &lt;br /&gt;पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ &lt;br /&gt;&lt;br /&gt;भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे &lt;br /&gt;लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे &lt;br /&gt;&lt;br /&gt;व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ &lt;br /&gt;कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्‍या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -&lt;br /&gt;&lt;br /&gt;कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात&lt;br /&gt;शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;तुझ्या इच्छेप्रमाणेच&lt;br /&gt;वणवण केल्यानंतर&lt;br /&gt;जरा मागे वळून पाहिले तर&lt;br /&gt;या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना&lt;br /&gt;यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून&lt;br /&gt;बरेच काही उगवून आलेले...&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;[समाप्त]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-2645370349096281538?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/2645370349096281538/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=2645370349096281538' title='21 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2645370349096281538'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2645370349096281538'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/09/blog-post_26.html' title='बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>21</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-2333663988421731492</id><published>2008-09-21T18:57:00.000-07:00</published><updated>2008-09-21T21:01:17.161-07:00</updated><title type='text'>बरेच काही उगवून आलेले...[भाग १]</title><content type='html'>झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...' &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय &lt;a href="http://farm4.static.flickr.com/3117/2821246066_35a27f86d6_o.jpg"&gt;जुना फोटो &lt;/a&gt;पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर &lt;a href="http://farm4.static.flickr.com/3165/2575132926_36cb1e9877_b.jpg"&gt;हिरवी सावली धरणारे माड &lt;/a&gt;मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/nandan27/2575134412/" title="Reddy  by Nandan Hodavdekar, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm4.static.flickr.com/3257/2575134412_c0f4301808.jpg" width="500" height="375" alt="Reddy " /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/37074326@N00/2821246206/" title="Sears tower Snow-fall 050 by nandanp27, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm4.static.flickr.com/3147/2821246206_1fc1b6cc12.jpg" width="500" height="375" alt="Sears tower Snow-fall 050" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;&lt;br /&gt;साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;&lt;br /&gt;आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,&lt;br /&gt;नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;&lt;br /&gt;पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध '&lt;a href="http://farm4.static.flickr.com/3015/2821322052_faf55cef79_b.jpg"&gt;द लोन सायप्रस&lt;/a&gt;' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये '&lt;a href="http://farm4.static.flickr.com/3085/2820406655_8a755ee94c_o.jpg"&gt;खडकावरील अंकुरा&lt;/a&gt;'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी &lt;a href="http://farm4.static.flickr.com/3097/2873268565_83b0952ef1_o.jpg"&gt;भरून गेलेले डोंगर&lt;/a&gt;. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क &lt;a href="http://farm4.static.flickr.com/3038/2821246924_9e49285bb5_b.jpg"&gt;दगड बनलेली&lt;/a&gt; झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/37074326@N00/2824309904/" title="Day 6 Arches 1 054 by nandanp27, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm4.static.flickr.com/3142/2824309904_5260640d9c.jpg" width="500" height="375" alt="Day 6 Arches 1 054" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड&lt;br /&gt;गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते&lt;br /&gt;ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे&lt;br /&gt;वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी&lt;br /&gt;घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे&lt;br /&gt;रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते&lt;br /&gt;गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(अखेरचा भाग या गुरूवारी)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-2333663988421731492?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/2333663988421731492/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=2333663988421731492' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2333663988421731492'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2333663988421731492'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='बरेच काही उगवून आलेले...[भाग १]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-8606124932525483163</id><published>2008-03-08T06:01:00.000-08:00</published><updated>2008-03-10T16:32:36.074-07:00</updated><title type='text'>उचलेगिरी / हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे...</title><content type='html'>बरेच दिवस एकंदरीत कविता, स्फुट लेख इत्यादींच्या उचलेगिरीवर लिहायचं म्हणत होतो. आज मराठी अनुदिनींवर चाललेल्या उचलेगिरीवर &lt;a href="http://tulipsintwilight.blogspot.com/2008/03/blog-post.html" target="_blank"&gt;ट्युलिप&lt;/a&gt; आणि &lt;a href="http://kasakaay.blogspot.com/2008/03/blog-post_07.html" target="_blank"&gt;संगीता&lt;/a&gt; यांनी लिहिलेलं वाचून त्याला मुहूर्त लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मलाही आधी असे एक-दोन अनुभव आलेत.  '&lt;a href="http://nileshmpande.blogspot.com/2007/05/blog-post_30.html" target="_blank"&gt;मी सखाराम गटणे&lt;/a&gt;' सारखा पटकन लक्षात येणारा नवीन लेख असो किंवा '&lt;a href="http://ek-kavita.blogspot.com/2007/04/blog-post_3234.html" target="_blank"&gt;दोन याचक&lt;/a&gt;' सारखी लगेच न कळणारी छोटीशी , अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2005/09/blog-post.html"  target="_blank"&gt;माझ्या पोस्टवरून&lt;/a&gt; केलेली उचलेगिरी असो -- दोन्हींच्या मागे, डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराला आपली चोरी कोणी पाहत नाही असं वाटत असतं, तशीच मनोवृत्ती असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुर्दैवाने हे फक्त अनुदिनींवरच होत नाही, तर क्वचित मनोगतासारख्या व्यासपीठावरही होतं. उदाहरणार्थ &lt;a href="http://ugaach-uwaach.blogspot.com/2006/06/blog-post.html" target="_blank"&gt;अजितचं हे पोस्ट&lt;/a&gt; पहा आणि मनोगतावरचा &lt;a href="http://www.manogat.com/node/8147" target="_blank"&gt;हा लेख&lt;/a&gt; वाचा. कळस म्हणजे, हे निदर्शनाला आणून दिले असतानाही, तोंडदेखली माफी मागणे किंवा खोटंच का होईना - लेखकाचे नाव प्रसिद्ध करायचे राहून गेले अशी सारवासारव करणेही त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. तीच कथा गटणेचीही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ओर्कुटबद्दल तर बोलायलाच नको. कित्येकांचे लेख, कविता मंडळी आपल्या नावाने प्रसिद्ध करत असतातच. पण अजून एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'मराठी साहित्य' या नावाच्या कम्युनिटीचे &lt;a href="http://www.orkut.com/Community.aspx?cmm=19288471" target="_blank"&gt;वर्णन वाचा&lt;/a&gt;. त्यात आणि मी माझ्या अनुदिनीबद्दल वर लिहिलेल्या दोन-तीन वाक्यांत जर काही साधर्म्य आढळले, तर तो योगायोग समजावा :). खरं सांगायचं तर, कॉपी करावं असं त्या वाक्यांत काही विशेष आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बरंच आधी लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग मी निवडला. पण ज्या विषयाची तुम्हांला (तथाकथित) आवड आहे, त्याबद्दलच्या दोन ओळीही तुम्हांला उचलेगिरी करून लिहाव्याशा का वाटतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या गोष्टीला ट्युलिपने वाचा फोडलीच आहे, तर असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल त्याचाही विचार व्हायला हवा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-8606124932525483163?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/8606124932525483163/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=8606124932525483163' title='15 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/8606124932525483163'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/8606124932525483163'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/03/blog-post.html' title='उचलेगिरी / हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे...'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-7310600349767286746</id><published>2008-02-11T23:08:00.000-08:00</published><updated>2008-02-11T23:27:36.995-08:00</updated><title type='text'>संत</title><content type='html'>काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी नाशकात बाबा आमटेंचा सत्कार घडवून आणला होता. तेव्हा भाषणाऐवजी त्यांनी "संत" ही कविता सादर केली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा”&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा&lt;br /&gt;उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर &lt;br /&gt;सहस्त्रावधी वारकरी नेत्र &lt;br /&gt;तुला पाहण्यासाठी.&lt;br /&gt;माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत&lt;br /&gt;निळ्या पाखरांचे थवे&lt;br /&gt;तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशाचं मन कळत नाही &lt;br /&gt;वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय&lt;br /&gt;प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही &lt;br /&gt;दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय&lt;br /&gt;म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण -&lt;br /&gt;उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी &lt;br /&gt;तुझ्याच मेघशील जीवनातून,&lt;br /&gt;तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण बांधण्यासाठी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी &lt;br /&gt;झेप घेते आकाशात हरवलेपणानं&lt;br /&gt;काळाच्या परमाणूत का होईना &lt;br /&gt;पण बारीकसा सूर्य होण्यासाठी,&lt;br /&gt;क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी, &lt;br /&gt;नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी.&lt;br /&gt;तसंच आहे माझ्या शब्दांचं ह्या क्षणाला माखलेलं हे मोठेपण. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तसं पाहिलं, तर कोण तू आणि कोण मी?&lt;br /&gt;कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी.&lt;br /&gt;आणि तरीही &lt;br /&gt;माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला&lt;br /&gt;जातात केव्हा तरी तडे&lt;br /&gt;आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन&lt;br /&gt;स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे&lt;br /&gt;तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशाच शंभर आभासांत पहाट, रात्रीच्या नि:शब्दातून&lt;br /&gt;मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही.&lt;br /&gt;सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात, &lt;br /&gt;पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्‍या विराट वृक्षावर&lt;br /&gt;अपराजित कुर्‍हाड मारणारा तू.&lt;br /&gt;सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून&lt;br /&gt;माझ्या देहात महारोगाची लस घाला &lt;br /&gt;म्हणून आव्हान फेकणारा तू.&lt;br /&gt;श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा&lt;br /&gt;सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा&lt;br /&gt;वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा&lt;br /&gt;दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा&lt;br /&gt;दुबळ्या दयेच्या चिखलातून &lt;br /&gt;माणुसकीला बाहेर काढणारा तू.&lt;br /&gt;पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे, आम्ही आहोत असे करंटे &lt;br /&gt;की आमच्या पेठेत लागतात पताका&lt;br /&gt;फक्त मंत्री आले तर. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा झुलू लागतात रस्त्यावर&lt;br /&gt;तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर.&lt;br /&gt;आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात &lt;br /&gt;निषादाच्या तीव्र पट्टीवर&lt;br /&gt;त्याचा जयजयकार करण्याकरता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि तुझ्यासारखे संत &lt;br /&gt;ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार&lt;br /&gt;निघून जातात गस्त घालीत अंधारात.&lt;br /&gt;उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून &lt;br /&gt;आसवांच्या दलदलीतून&lt;br /&gt;दु:खानं उसवलेल्या दुनियेवर &lt;br /&gt;अमृताचं सिंचन करीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि &lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर&lt;br /&gt;तुमच्या पायखुणा,&lt;br /&gt;आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी &lt;br /&gt;तुमच्या मखमली पालख्यांचे&lt;br /&gt;तुमच्या मेलेल्या मतांचे.&lt;br /&gt;आम्ही होतो मतवाले शूर शिपाई &lt;br /&gt;संरक्षण करण्यासाठी&lt;br /&gt;मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे महामानवा, &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार&lt;br /&gt;एखादा गुच्छ एखादा हार&lt;br /&gt;तीस पायांवर सरपटणार्‍या कॅलेंडरातील &lt;br /&gt;एखादा शनिवार, रिकामा रविवार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण तरीही, &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं,&lt;br /&gt;आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी&lt;br /&gt;जुने पडते आहे, नवे घडते आहे&lt;br /&gt;काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ&lt;br /&gt;जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार&lt;br /&gt;पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे&lt;br /&gt;तांबडेलाल,&lt;br /&gt;काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे&lt;br /&gt;ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून &lt;br /&gt;काळाच्या किनार्‍यावरुन धावणारं&lt;br /&gt;संग्रामशील माणूसपण. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्ही जाता तुमच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा." &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे यात्रिका, &lt;br /&gt;&lt;br /&gt;विस्कटलेल्या शरीरांचा, चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन&lt;br /&gt;तू तुझ्या मार्गानं जा &lt;br /&gt;मागे वळून पाहू नकोस.&lt;br /&gt;जो हिशेब कधी केला नव्हतास,&lt;br /&gt;तो यापुढेही कधी करू नकोस.&lt;br /&gt;तुला साथसोबत आम्ही करणार नाही.&lt;br /&gt;आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश &lt;br /&gt;तुझ्या रात्रीवर पडणार नाही.&lt;br /&gt;तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही.&lt;br /&gt;आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा&lt;br /&gt;दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला&lt;br /&gt;ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर&lt;br /&gt;असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला&lt;br /&gt;ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर &lt;br /&gt;&lt;br /&gt;हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... &lt;br /&gt;&lt;br /&gt;"जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती&lt;br /&gt;चालवील हाती - धरोनिया"&lt;br /&gt;&lt;br /&gt;[कविता &lt;a href="http://www.misalpav.com/node/800"&gt;येथून&lt;/a&gt; साभार. धन्यवाद, मिलिंद :)]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-7310600349767286746?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/7310600349767286746/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=7310600349767286746' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7310600349767286746'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7310600349767286746'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/02/blog-post_11.html' title='संत'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-608683893892661047</id><published>2008-02-05T07:08:00.000-08:00</published><updated>2008-02-05T12:19:55.827-08:00</updated><title type='text'>तिचे अभंग, तिची गाथा</title><content type='html'>सकाळी उठावे | सुसाट सुटावे |&lt;br /&gt;ऑफिस गाठावे | कैसेतरी ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |&lt;br /&gt;वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;चढावे बशीत | गर्दीत घुशीत |&lt;br /&gt;रोज या मुशीत | कुटताना ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |&lt;br /&gt;गाठण्या मुक्काम | सोस बये! ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;उशीर अटल | चुकता लोकल |&lt;br /&gt;जीवही विकल | संभ्रमित ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;लागते टोचणी | भिजते पापणी | &lt;br /&gt;जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |&lt;br /&gt;आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;रोजची टुकार | कामे ती भिकार |&lt;br /&gt;बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |&lt;br /&gt;समय निवांत | मिळेचिना ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हाही आराम | असतो हराम |&lt;br /&gt;कामे ती तमाम | उरकावी ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;लावून झापड | शिवावे कापड |&lt;br /&gt;तळावे पापड | निगुतीने ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;कामसू सचिव | सखीही रेखीव |&lt;br /&gt;गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;काया रे शिणते | मनही कण्हते |&lt;br /&gt;कुणी का गणते | श्रम माझे? ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;नित्याची कहाणी | मनात विराणी |&lt;br /&gt;जनांत गार्‍हाणीं | सांगो नये ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |&lt;br /&gt;जीव हा कुढतो | वारंवार ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |&lt;br /&gt;जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |&lt;br /&gt;एखादा आगळा | ध्यास घेई || &lt;br /&gt;&lt;br /&gt;तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |&lt;br /&gt;काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंगाला टेकत | लेकरु भेकत |&lt;br /&gt;आणते खेचत | भुईवर ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;उशीर जाहला | जीव हा गुंतला |&lt;br /&gt;प्रपंची वेढला | चहूबाजूं ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;कल्पना सारुन | मनाला मारून |&lt;br /&gt;वास्तव दारुण | स्वीकारते ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |&lt;br /&gt;वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;विसर विचार | रोजचे आचार |&lt;br /&gt;होऊनि लाचार | उरकावे ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही न मागणे | केवळ भोगणे |&lt;br /&gt;रोजचे जगणे | विनाशल्य ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा जन्म बिकट | गेलासे फुकट |&lt;br /&gt;हाकण्या शकट | संसाराचा ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरीही अखंड | आशा ही अभंग |&lt;br /&gt;मनी अनिर्बंध | तेवतसे ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |&lt;br /&gt;विसर जगाचा | पाडी झणीं ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;जातील दिवस | निराश निरस |&lt;br /&gt;झडेल विरस | आयुष्याचा ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरी की आभासी | आशा ही जिवासी |&lt;br /&gt;बळ अविनाशी | देई खरे ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुनश्च हासून | पदर खोचून |&lt;br /&gt;देई ती झोकून | हुरुपाने ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;[टीप -- ज्या वीकांत (वीक-एंड) या शब्दावरून ही कविता सुचली, तो &lt;a href="http://sanvaad.blogspot.com/2008/01/blog-post_09.html"&gt;या पोस्टमध्ये&lt;/a&gt; वाचला होता. यशोधरा, अनेक आभार :)]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-608683893892661047?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/608683893892661047/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=608683893892661047' title='23 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/608683893892661047'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/608683893892661047'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/02/blog-post.html' title='तिचे अभंग, तिची गाथा'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>23</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-9180159232539308638</id><published>2008-01-06T00:10:00.000-08:00</published><updated>2008-01-06T00:22:16.621-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निवडक उतारे'/><title type='text'>जे जे उत्तम...३ [भूमी]</title><content type='html'>रोहिणीचं पत्र होतं. मैथिलीला आश्चर्यच वाटलं. इतक्या वर्षांत काही पत्रव्यवहार नाही, जाणं-येणं नाही, फोन नाही, तरी काही माणसं आत रुतून बसलेली असतात. एक छोटंसं पत्र आणि चेक - तिनं कधीकाळी दिलेल्या पैशांचा. रोहिणीनं ते परत केलं होतं. तिचा नवरा आता नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'...तू एका वेळी, फार महत्त्वाच्या वेळी दिलेले हे पैसे. स्वतः अडचण सोसून दिलेले! त्या वेळी ते ज्यांनी ज्यांनी दिले त्यांतला एकेक रुपयासुद्धा मला मोलाचा होता. त्यामुळं सतीश पंधरा वर्षं जगला. चांगलं जगू शकला. ती मिळालेली सगळी वर्षंही महत्त्वाची होती. मुलांची शिक्षणं झाली. ती मार्गाला लागली. घराचे हप्ते फिटले. आता या वयात त्याची सोबत हवी होती. काही करायचं असं अटीतटीचं उरलेलं नाही, अशा वेळी असणारी सोबत - एकमेकांची एकमेकांकरता. सगळे दिवस धावपळ करण्यात गेले. जगलो कुठे! आता जरा निवान्तपणा येईल म्हणत असताना तो गेला अचानक. खूप शांत असा त्याचा मृत्यू! मी ऑफिसमधून आले. तोही नुकताच आला होता. मुलंही आता आमच्याजवळ नसतात. म्हणाला, "रात्री बाहेरच कुठं जेवू. पुष्कळ दिवसांत गेलो नाही. उद्या रविवारच आहे. घाई नाही." मग मिळून चहा घेतला. मी कप सिंकमध्ये ठेवायला गेले आणि परत आले तो सतीश नव्हता. पुष्कळ दिवस वाटत राहिलं, की अजून थोडी वर्षं मिळायला हवी होती. पण मग वाटलं, की असं वाटून घेताना जी वर्षं मिळाली ती शून्य होतात. मग विवेक केला, स्वतःला समजाव्ता आलं. सगळ्यांचे पैसे दिले परत. तुझेच कसे कोण जाणे राहून गेले, ते आता करते. ते परत करताना या वेळी ते आपण परत करू शकतो याचा सुद्धा अभिमान, आनंद नाही. तुलाही या पैशांची गरज नाही आता. तरी ते परत केले नाहीत तर त्या सगळ्या गोष्टींची किंमत कमी होईल असं वाटतं. म्हणून...'&lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्र एकदोनदा वाचलं. डॉ. भारद्वाजांनी शाकुंतल शिकवलं त्या वेळी अभिज्ञानशाकुंतलमधल्या 'अभिज्ञान'चा अर्थ शेवटी छान सांगितला. म्हणाले, "कुठल्याही श्रेष्ठ कलाकृतीचं शीर्षक हे काही त्या कलाकृतीचं नुसतं नाव म्हणून दिलेलं नसतं. तो अर्थ त्या कलाकृतीच्या श्वासामधून वाहत जात शेवटी प्रतीतच होतो. आपल्या पुढ्यात येऊनच उभा राहतो. अभिज्ञान म्हणजे हे असं प्रतीतीनं भिनत गेलेलं ज्ञान, वेगळी जाणीव. कशाची? आयुष्यातल्या पूर्वार्धातला प्रणयाचा बहर निघून गेलेला, विरहाचे, कसोटीचे, चुकांचे, संघर्षाचे, तपस्येचे दिवसही सरत आलेले. त्या वेळी शेवटी दोघे एकत्र येतात - दोघांतले खळाळते, उसळते आवेगाचे लोट शांत होत आलेले. आयुष्याची कडवट चव आता ओठांवर रेंगाळत नाही. पुत्राला पित्याच्या हाती सुपूर्त करून द्यायचं. भारताचा उद्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून आजवर संस्कार केले, त्यात स्वतःचं आईपणही कुठं होतं! उद्याच्या सम्राटाची माता नुसती आई थोडीच असते! प्रेयसी, पत्नी, माता या सगळ्या मुशीतून शिल्लक राहिलेली ती तपस्विनी - अधिक सतेज! तिच्याकडे बघताना, आयुष्याचा मध्य सरून गेल्यावर तिच्याजवळ पोचताना दुष्यंताला आणि शकुंतलेला एकमेकांमधल्या या वेगळ्या सखोल नात्याची जाणीव होते...हीच ती ओळखीची खूण...परस्परांमधली आणि आपली स्वतःचीही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुठं शाकुंतल..डॉ. भारद्वाजांनी दाखवून दिलेला त्यातला अर्थ! कुठं रोहिणीचं पत्र! ती नुसती बसून राहिली. घरी कुणी नव्हतं. संध्याकाळ होत होती. मावळतीचा सूर्य समुद्रात कुणी आतूनच मंद दिवे लावावे असा -- तसे हे सगळे अर्थही -- एकएकटे...एकत्रही...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कादंबरी - भूमी&lt;br /&gt;लेखिका - आशा बगे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच पोस्टमध्ये 'जे जे उत्तम...' मधले इतर अनुदिनींवरील लेख संकलित करून एकाच ठिकाणी द्यायचा विचार होता. तो तूर्तास पुढच्या पोस्टपर्यंत ढकलतो :)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-9180159232539308638?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/9180159232539308638/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=9180159232539308638' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/9180159232539308638'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/9180159232539308638'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2008/01/blog-post.html' title='जे जे उत्तम...३ [भूमी]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-4086343253020612621</id><published>2007-10-19T02:35:00.000-07:00</published><updated>2007-10-19T02:52:18.025-07:00</updated><title type='text'>लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ</title><content type='html'>काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी  त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.  कोसला काय किंवा द फाऊंटनहेड काय -- केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा '&lt;em&gt;तुम्हांला&lt;/em&gt;' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये (उदा. शतकात सर्वश्रेष्ठ गणली गेलेली युलिसीस) किंवा जे बहुसंख्यांना आवडतं त्याला केवळ त्याच कारणाने हट्टाने नावं ठेवण्याचा अट्टाहासही करु नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कविता आणि त्यांचा अर्थ, त्या आवडणं म्हणजे अजून एक पुढची पायरी. ग्रेसच्या सगळ्याच कविता कुठे कळतात? त्यांच्या ओळी हा एक वैयक्तिक अनुभव असतो. प्रत्येकाच्या मनात ती कविता वाचून तयार होणाऱ्या स्पष्ट - अस्पष्ट प्रतिमा वेगवेगळ्या, ज्याच्या-त्याच्या पिंडावर आणि आजवर घेतलेल्या अनुभवांवर बेतलेल्या. दहा हजार कवींना वेगवेगळ्या दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे निरनिराळ्या असल्या तरी शेवटी प्रत्येकाचा '&lt;a href="http://www.haikupoetshut.com/poets91.html"&gt;जस्ट वन&lt;/a&gt;' असलेला चंद्र असतो, तशा खासगी. अगदीच ढोबळ उदाहरण म्हणून, मर्ढेकरांची 'या गंगेमधि गगन वितळले' वाचून मला हटकून &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2007/04/blog-post.html"&gt;बाणगंगेचा तलाव&lt;/a&gt; आठवतो. कुणाला थेट गंगा नदी आठवेल, कुणाला कविताच आवडणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून स्पष्टीकरण हवं असेल, तर सलील वाघच्या कवितेवरील अभिजितची &lt;a href="http://abhijitbathe.blogspot.com/2007/09/blog-post_24.html#c6850275321172967424"&gt;ही प्रतिक्रिया&lt;/a&gt; वाचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;शिवाय कुणाला कशाचं दु:ख होईल हे कसं सांगावं?&lt;br /&gt;दु:खही होईल कि नाही हे ही?&lt;br /&gt;कवितेचं तसंच काहीतरी.&lt;br /&gt;अगदीच पान उघडलं, दिसली, वाचली, लिहिली - एवढं सोपं फक्त नव्हतं ते.&lt;br /&gt;यातल्या प्रत्येक क्रियेत वेगवेगळे संदर्भ येत गेले.&lt;br /&gt;त्याचे वेगवेगळे अर्थ लागत गेले.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर चार परिच्छेद खर्ची घालून जे लिहिलंय, तेच त्याने चार ओळींत मांडलंय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाय ही अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण असं असलं, तरी याचंही एक उलट टोक आहे. अनुभव जसे वैयक्तिक असतात, तसेच वैश्विकही असतात. वाचनातून आपण लेखक/कवीचे अनुभव व्हिकॅरियसली जगायचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी आपल्या पूर्वसंचितातल्या अनुभवाशी सांगड घालायचाही कुठेतरी नकळत प्रयत्न करत असतो. आपण कधीच न घेतलेले अनुभव (उदा. रारंगढांग) जसे आपल्याला आवडू शकतात, तसेच त्याच्या उलट जिथे जिथे आपली 'येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे' सारखी स्थिती होऊन ज्या अनुभवांशी आपण आयडेंटिफाय करु शकतो तेही बेहद्द आवडतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लंपनची पुस्तके असू देत किंवा थोड्या मोठ्या वयातलं '&lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2006/01/blog-post.html"&gt;शाळा&lt;/a&gt;' किंवा पंचविशीतल्या क्वार्टर-लाईफ क्रायसिस मधला 'पांडुरंग सांगवीकर'; 'टू किल अ मॉकिंगबर्ड' मधली जीन लुईस असो वा अजितने लिहिल्याप्रमाणे जे. एम. कॉटझींच्या '&lt;a href="http://ajitoke.blogspot.com/2007/10/boyhood.html"&gt;बॉयहूड&lt;/a&gt;' मधला मुलगा -- कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;फास्टर फेणे, गोट्या, हॅरी पॉटर इ. मध्ये आणि यासारख्या पुस्तकांत थोडा फरक आहे. पहिल्या गटातली पुस्तकं वाचताना मोठेपणीही हरवून जायला झालं, तरी 'पंखा' वाचताना बऱ्याचदा जी अंतरीची खूण पटते आणि क्वचित 'ते हि नो दिवसा: गता:' व्हायला होतं तसं वाटत नाही. जत्रेतल्या पाळण्यात बसून लहान मुलासारखा आनंद घेणं आणि खालीच थांबून पाळण्यातल्या हरखून गेलेल्या मुलांकडे पाहून त्यांच्या आनंदाशी, फार दिवसांनी भेटणाऱ्या जुन्या मित्रासारखी ओळख पटणं यात जो फरक किंवा साम्य आहे, तसंच काहीसं या दोन प्रकारच्या पुस्तकांत असावं असं मला वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे नुकतंच श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं 'डोह' वाचनात आलं. वाचताना लंपनची ओळोओळी आठवण यावी असं. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेल्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणीवेचीही अधूनमधून जोड दिलेलं. त्यातल्याच 'आम्ही वानरांच्या फौजा' या कथेतला हा काही आवडलेला भाग --&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊस पडत असायचा. पाऊसच पाऊस... नेहमीचे कोवळे निळेशारपण मावळून आभाळ ढगाळले कधी, कळायचेही नाही. पावसाचे तिरपे पारदर्शक पाते एकसारखे फिरत राहायचे. पात्यामागे पाते -- आणि त्या पातळ तलम पात्यांच्या पदरापदरांचे पुन्हा एक पारदर्शक पाते...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत... पाऊस कुठे कुठे पडत असेल, घाट कसा धुवून काळा लख्ख झाला असेल, वडाखालची तांबडमाती कशी सुवासत असेल, हे सारे मनात आणीत -- अंगणातून वाहत जाणाऱ्या पाण्यातून सोडलेल्या कागदी होड्या कुठल्या देशात वाहत जातील या तर्काच्या शिडाबरोबर हरवत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊसधारांचा गारवा शरीरात भरीत आम्ही चहाचे गरम गरम घुटके पडवीत उभ्याउभ्या घेत असू. कौलारओळींच्या शेवटाला घासून थोड्या वरून देशपांड्यांच्या भिंतीची रेषा खालती उतरत येत असे. त्या रेषेच्या उतारावरून एक अंगभर भिजलेली लेकुरवाळी वानरी, पोटाला घट्ट चिकटून राहिलेल्या पोरासह आमच्याकडे पाहत गहूगहू खालती सरकत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती बाई चिंब भिजलेली असे. छत्रीसारख्या डोक्यावरून पुढे आलेल्या तिच्या केसांची नोकदार झिपरी उसकटून गेलेली असे. तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे. ती खालती सरकायची आणि मग आई म्हणायची, "ये ग बाई, ये. भिजून गेली आहेस..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखादी भिजून आलेली बाई आत यावी तशी ती खुशाल आमच्या जवळ येऊन थांबे. सारे अंग हलवी; आणि भिजलेल्या पोराच्या केसातून पाणी निपटून काढी. मी तिचे अंग अंग जवळून पाही. तिचे काळे तोंड. नकटे नाक. तिच्या अंगावरली केसाळ लव. तिचे हात. तिच्या हातावरल्या रेषा... नि वाटे की, आजोबा आपला हात पाहतात, हिचाही त्यांना एकदा पाहायला सांगावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी लहानपणापासून वानरासंबंधी मला काहीतरी निराळे वाटत असे. आईबरोबर जाताना कुठून तरी पुढे धप् दिशी उडी मारून तोंड विचकून गेलेले वानर मला आठवते. त्याच्या डोक्यावरल्या झिपरीमुळे ते छपराखाली राहिले आहे व त्या छपराला पाय फुटले आहेत असा माझा चमत्कारिक समज तेव्हा झाला होता. त्याचे लुकलुकते डोळे, त्याच्या शेपटाचा डौल माझ्या चांगल्या स्मरणात आहे. मला तो काहीतरी, अगदी गरीब, कपडे नसलेल्या माणसातलाच एक वेगळा प्रकार वाटे. ती गावातून कशासाठी तरी सतत धावत असतात. कुठेतरी काहीतरी त्यांचे मोठे काम निघालेसे भासे. थंडीच्या दिवसांत आजीबरोबर वडाखाली ऊन्ह खायला यावे तेव्हाही कितीतरी वानरे, पाराजवळ ओळीने उन्हाला पाठ देऊन बसलेली असत. आणि मनात येई, कुणाकुणाच्या मागे राहून गेलेल्या नुसत्या सावल्यांतच जीव भरला आहे नि त्यांची वानरे झाली आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पतझडीच्या दिवसातल्या एका निष्पर्ण झाडाच्या सांगाड्यावर एकदा इतकी निश्चल वानरे मी पाहिली होती की, ते एखाद्या विचित्र झाडाचे फळपीकच वाटावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्बेत पाही. नि मग ती सारी छिद्रे मला आढळायला आलेल्या असंख्य वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे अतिशय वाटे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचे विलक्षण कडे तेव्हा वाढता वाढता माझ्याभवती पडलेले होते...संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार...अंधारावर अंधार...अंधार ही जशी दिवसाची कपऱ्याकपऱ्यातली झोप असे...दूरभर कुठे तरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक घास तोंडात भरवी. पानातच हळुवारपणे हात धुवी. आपल्याजवळच्या दुलईत गुरगटून घेई. अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी. प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही:&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बरं का, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते आहे...तो गोकुळात कृष्ण म्हणून आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो...तो रामराजा होता त्या वेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजांत होतो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी&lt;br /&gt;तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा...&lt;/em&gt;"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-4086343253020612621?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/4086343253020612621/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=4086343253020612621' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4086343253020612621'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4086343253020612621'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/10/blog-post_19.html' title='लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-1229686333332400253</id><published>2007-10-03T02:26:00.000-07:00</published><updated>2009-06-27T03:22:32.311-07:00</updated><title type='text'>पद्म</title><content type='html'>यापूर्वी दि. बा. मोकाशींच्या '&lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html"&gt;आता आमोद सुनासि आले&lt;/a&gt;' या कथेसंबंधी लिहिले होते. गुणवत्ता असूनही प्रसिद्धीचे, लोकप्रियतेचे जेवढे पडायला हवे तेवढे माप, दुर्दैवाने पदरात न पडलेले मोकाशींप्रमाणेच श्री. दा. पानवलकर हेही एक समर्थ कथालेखक. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या अर्धसत्य या चित्रपटाची पटकथा ज्या 'सूर्य' या कथेवर बेतली आहे; तिचेच नाव पानवलकरांच्या एका कथासंग्रहाला दिले आहे. त्यातील 'पद्म' ही कथा नुकतीच वाचनात आली. वर उल्लेख केलेल्या मोकाशींच्या कथेच्याच तोलामोलाची. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेमतेम पाच पानांची ही कथा. पहिल्यांदा वाचली तेव्हा जी.एं.च्या विलक्षण उपमांची आठवण करुन देणाऱ्या लेखनात आणि चित्रदर्शी वर्णनातच एवढं गुंतायला झालं, की शेवटच्या कलाटणीचे संदर्भ लक्षात यायला जरा वेळ लागला. पुन्हा एकदा कथा वाचली आणि मग त्यातली नुकतीच व्यालेल्या केळेची उपमा; मित्राच्या सायकलीने केलेला कानाडोळा; गावाची आठवण 'बुडवून' टाकण्याचा प्रयत्न करणारे डोंगर; (वयस्क) शेवाळाला पैलतीरी पोचवून कमळांच्या नाळी धुंडाळायला येणारा तो 'उलटा' झोका; परमेश्वराला साद घालत त्याच्यासारखाच 'तट'-स्थ बसलेला बूढ्ढा आणि तसाच निवांत निरीक्षण करणारा डोंगरावरचा नंदीबैल; पाठीवर शंख घेऊन लाळ खुरडत फिरणारी गोगलगाय; 'खोल पाणी दिसलं की खडा टाकावासा वाटतो' हे अगदी सहज येणारे वाक्य; धोक्याच्या जागी असलेली पण दाम मोजून सहज खुडता येणारी कमळं; फसवं 'फैला हुआ' झील, त्यातली चुकार कळी आणि निरुपायाने मधाचा कण सोडून परतावं लागणारा  निळा किडा यांचं रुपक; सुरुवातीच्या प्रसन्न (चिंचेचा मोहर खावा तशी उन्हे खात) उपमांनंतर कथेच्या अखेरीस, कलाटणीच्या अगदी आधी येणाऱ्या अभद्रसूचक उपमा (सापासारख्या लोंबणाऱ्या नाळी, वासनेच्या ठिणगीसारखा किडा) -- या साऱ्या गोष्टींचा मग संदर्भ लागला. वाचून अंगावर काटा यावा पण कौशल्याला दाद द्यावी असे सारे एकत्र गुंफलेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तम कथा लिहायला प्रतिभा सर्वात महत्त्वाची असली, तरी लेखनाच्या तंत्राकडेही लक्ष पुरवावे लागते. या दोन्ही गोष्टींचा इतका उत्तम मेळ, इतका सुरेख परिणाम आणि तोही कमी शब्दांत क्वचितच इतर कुठल्या कथेत साधला गेला असेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-1229686333332400253?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/1229686333332400253/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=1229686333332400253' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/1229686333332400253'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/1229686333332400253'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/10/blog-post_03.html' title='पद्म'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-4209361478768534085</id><published>2007-10-01T11:56:00.000-07:00</published><updated>2007-10-01T13:59:30.973-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निवडक उतारे'/><title type='text'>जे जे उत्तम...२ [सिंहासन/टॅगिंग]</title><content type='html'>&lt;em&gt;(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.) &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंत्र्यांच्या खोलीत तर राबता असतो. खोलीतल्या खुर्च्या नेहमीच भरलेल्या असतात आणि तरीही लोक येत-जात असतातच. एकेकाच गाऱ्हाणं ऐकता ऐकता मंत्र्यांची पुरेवाट होते. थोडी सहानुभूती दाखवली, तर येणारा अधिकच भडभडून बोलू लागतो आणि गळ्यात पडतो. थंडपणा दाखविला, तरी कोडगेपणाने बोलत बसतो आणि सरळ कटविलं, तरी जागचा हलायला मागत नाही! येणाऱ्यांमध्ये काही मंत्रिमहोदयांचे कार्यकर्ते असतात. ते तिष्ठत खुर्च्यांमध्ये बसून राहतात. मंत्रिमहोदय त्यांच्याशी चार शब्द बोलतात, मध्येच येणाऱ्याला कटवतात, कुठल्या कागदावर सही करतात, पुन्हा यांच्याशी चार शब्द बोलतात आणि पुन्हा तिसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला मान वळवतात. त्यात अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज, कॅबिनेट सबकमिटीच्या बैठकी, खुद्द मंत्रिमंडळाच्या बैठकी असा चक्रावून टाकणारा सगळा कार्यक्रम असतो. मंत्र्याचं खातं जेवढं महत्त्वाचं किंवा त्याची लोकप्रियता जेवढी जास्त, त्या प्रमाणात त्याच्या चेंबरपुढची गर्दी मोठी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज मात्र सकाळपासून मंत्रालयात गडबड उडाली होती. साऱ्या मंत्रालयात, विशेषतः सहाव्या मजल्यावर, वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. मंत्रीलोक अजून यायचे होते. पण सहाव्या मजल्यावर आधीपासून जवळच्याच आमदारनिवासातून आमदारांची रीघ सुरू झाली होती. मंत्र्यांचे वैयक्तिक चिटणीस आणि शिपाई गटागटानं कुजबुजत चर्चा करताना दिसत होते. कालच्या सी. एम्. च्या घोषणेमुळं सर्वत्र विद्युन्मय वातावरण पसरलं होतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मंत्रिमंडळात बदल म्हटला, की त्याचा पहिला दृश्य परिणाम मंत्र्यांच्या स्टाफवर होतो. आणि आताचा होणारा बदल काही साधा बदल असणार नव्हता. सी. एम्. आणि विश्वासराव दाभाडे यांच्या या लढतीत कोण जिंकतं, यांच्यावर अनेक मंत्र्यांच भवितव्य ठरणार होतं. अनेक डोकी गडगडणार होती आणि अनेक नवीन येणार होती. आणि मंत्री गेला, की त्यानं निवडलेला स्वत:चा वैयक्तिक स्टाफही आपापल्या जुन्या डिपार्टमेंटमध्ये जातो. त्याचं सगळं महत्त्व संपतं. आतापर्यंत मंत्र्याचा पी. ए. म्हणून रुबाबात वावरणाऱ्याला पुन्हा साधा क्लार्क म्हणून एखाद्या सामान्य सुपरवायझरला सलाम करावा लागतो. मंत्र्याच्या दारचा शिपाई म्हणून हजार लोकांना अडवून धरणारा किंवा उदार मनानं आत सोडणाऱ्याला पुन्हा आपल्या डिपार्टमेंटमध्ये साधा पट्टेवाला म्हणून हाक मारेल त्या फालतू टायपिस्टला ओ द्यावी लागते. हे फारच जड होतं. फारसं सुखाचं नसतं. म्हणून साहेब जाणार, असा सुगावा जरी लागला, तरी मंत्र्याचा सारा स्टाफ दुसऱ्या एखाद्या मंत्र्याच्या दारी आपल्याला आसरा मिळू शकेल काय, याचा वास घेऊ लागतो. किंवा नवे येणारे मंत्री कोण असू शकतील, हे आधीच हेरून त्यांच्या घरी खेटे घालू लागतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्येही काही महत्त्वाकांक्षी लोक असतातच, ज्यांची नेहमीच मंत्र्यांच्या स्टाफवर जायची धडपड चालू असते. त्यांचाही राबता आमदारनिवासात आणि वर सहाव्या मजल्यावर सतत असतोच. राजकारणावर त्यांची बारीक नजर असते. कोण आमदार कसा आहे, त्याचा मतदारसंघ कसा आहे, त्याचं पक्षात वजन किती आहे, वरच्या वर्तुळात त्याचा वावर कितपत आहे, विधानमंडळातला त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, यावर त्यांची बारीक नजर असते. आणि अमुक एखादा आमदार आज ना उद्या मंत्री होण्याची शक्यता आहे, असं दिसलं, की ते लगेच त्याच्या गळ्यात पडतात. अर्थातच कोणाच्या गळ्यात पडावं, यालाही मर्यादा आहेतच. कारण एखादा मंत्री जेव्हा आपला स्टाफ निवडतो, तेव्हा तो अतिशय सावधतेनं निवड करतो. मुख्य पी. ए. हा अत्यंत विश्वासू असावयास हवा. म्हणजे जर नात्यातला एखादा माणूस मिळाला, तर फारच बरं; नाहीतर निदान गावचा तरी हवा. किमानपक्षी जिल्ह्यातला तरी. जात-गोतही याबाबतीत महत्त्वाची. हीच बाब इतर पी. ए. आणि शिपायासंबंधी. शिवाय हे सारे लोक माहीतगार हवेत, अनुभवी हवेत, हुशार हवेत, बारा गावचे पाणी प्यालेले हवेत. तेव्हा नवे मंत्री सहसा जुन्या मंत्र्यांच्या स्टाफमधली अनुभवी माणसं ठेवून घेणं पसंत करतात. अर्थात यातही आवडीनिवडी येतातच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिवांच्या वर्तुळानं सुस्कारे सोडले. मुख्य सचिव आपल्या मोजक्या कडक भाषेत बोलत होते. आणि सचिवांनी आपल्या नोट्स बाहेर काढल्या होत्या. कठीण वर्ष म्हणजे काय, याची त्यांच्यापैकी प्रत्येकाला कल्पना होती. कठीण वर्ष, म्हणजे जिवापाड घोड्यासारखी मेहनत, परिस्थितीचा रोज अंदाज घेणं, त्यावर नवनवे तोडगे सुचविणं, ते अमलात आणण्याच्या नियमात बसणाऱ्या आणि व्यावहारिक अशा योजना सुचविणं, त्या राबवून घेणं, राबवून घेताना ज्या हेतूनं त्या योजिल्या होत्या, तो हेतू सफल होतो की नाही, यावर सतत बारीक लक्ष ठेवणं, सतत बैठकी आणि चर्चा, मिनिस्टरांशी बैठकी, कमिट्यांच्या बैठकी, दौरे, इन्स्पेक्शन्स् आणि पुन्हा रोज नवनवे निर्णय, जबाबदाऱ्या. हे एक आव्हान होतं. आणि बऱ्याच जणांना हे आव्हान झेलण्यातही मौज होती. आनंद होता. ही परिस्थिती म्हणजे खरोखरीच लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी आहे, असं त्यांना वाटत होतं. अखेर ते सारे सचिव म्हणजे भावना असलेली माणसंच होती. त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, स्वतःच्या सुप्त आकांक्षा होत्या. ते सारेच जात्या बुद्धिमान होते. आणि ज्या वेळी ते सरकारी नोकरीत शिरले, त्या वेळी तर केवळ बुद्धिमान तरूणांमधली गाळीव रत्नंच सिव्हिल सर्व्हिससाठी निवडली जात होती. त्यामुळे ते सरकारी नोकर असले, तरी त्यांना महत्त्वाकांक्षा नव्हत्याच, असं नाही. आणि कोणत्या महत्त्वाकांक्षी माणसाला कठीण आव्हानं आली, की आनंद वाटत नाही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळं एका सुप्त ईर्षेनं ते वर्तुळ आता चर्चेसाठी बसलं होतं. खरं म्हणजे ते वर्तुळ म्हणजे सबंध राज्याची कर्तुमकर्तुम् शक्ती होती. या वर्तुळातल्या सचिवांच्या नावानेच सरकारी निर्णय रोजच्या शेकडो राजपत्रांमधून घोषित होत होते. परंतु या शक्तीची जाणीव असूनही सर्व सचिवांचे चेहरे निर्विकार दिसत होते, कारण त्यांना आपल्या ताकदीची सवय होऊन गेली होती. इतकी, की आपल्य ताकदीच्या मर्यादा नवनवीन राजकीय संदर्भात सतत बदलत जातात, याचाही त्यांना हळूहळू विसर पडू लागला होता. आपण कागदावर केलेली योजना प्रत्यक्ष खालपर्यंत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त आणखी काही माध्यमे हवीत या त्यांना असणाऱ्या जाणिवेची दखल घेण्याची त्यांना अजून जरूरी वाटत नव्हती. म्हणूनच ते सहाव्या मजल्यावरील घडामोडींची यत्किंचितही दखल न घेता योजना आखू शकत होते. सी. एम्. जागेवर राहोत अथवा जावोत, दाभाडे त्यांच्या जागी येवोत किंवा आणखी कोणी येवो, त्यांना त्यांचं तेच काम त्याच पद्धतीनं करावं लागणार होतं, यात शंका नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;...&lt;br /&gt;&lt;br /&gt;कादंबरी: सिंहासन&lt;br /&gt;लेखक: अरुण साधू&lt;br /&gt;&lt;br /&gt;...&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या 'जे जे उत्तम...' मध्ये हाच उपक्रम टॅगच्या स्वरुपात पुढे चालवावा अशी सुचवणी झाली होती. त्याप्रमाणे मग आता खालील पाच जणांना 'खो' देतोय. तुम्ही करायचं एवढंच, की तुम्हांला आवडणारा एखादा मराठी उतारा उद्धृत करायचा आणि पुढे इतर पाच जणांना 'खो' द्यायचा. फक्त खो देताना, शक्यतो इतर कोणी त्यांना खो दिलेला नाही हे पडताळून पहा - जेणेकरून अधिकाधिक लोक यात सहभागी होऊ शकतील. तसेच ज्यांना खो दिला त्यांच्या अनुदिनीचा आणि ज्यांच्याकडून तुम्हांला खो मिळालाय, त्यांच्या 'जे जे उत्तम...' पोस्टचा दुवा तुमच्या लेखात दिलात तर एकाच पृष्ठावरुन असे अनेक उतारे वाचायला मिळतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या 'जे जे...'च्या लेखावरील पहिल्या पाच प्रतिसादींना मी खो देतोय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://kshiprasuniverse.blogspot.com/"&gt;क्षिप्रा&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.punekar.net/"&gt;योगेश&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://majhyaathavani.blogspot.com/"&gt;मिनौती&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://meghanabhuskute.blogspot.com/"&gt;मेघना&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://vidyabhutkar.blogspot.com/"&gt;विद्या&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पाच अनुदिनीकारांकडून तुमच्यापर्यंत ही साखळी पोचेलच. परंतु, त्याआधी जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही याच धर्तीवर पोस्ट लिहून 'जे जे उत्तम...'ची सुरुवात करू शकता. शुभेच्छा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;[गेल्या वर्षीही '&lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html"&gt;पुस्तकनिष्ठांची मांदियाळी&lt;/a&gt;' च्या टॅगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आधीच्या वाक्यात दिलेल्या पृष्ठाच्या दुव्यावर, या जोडसाखळीतील लेख वाचता येतील.]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-4209361478768534085?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/4209361478768534085/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=4209361478768534085' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4209361478768534085'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4209361478768534085'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/10/blog-post.html' title='जे जे उत्तम...२ [सिंहासन/टॅगिंग]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-6011909957816878237</id><published>2007-09-28T02:46:00.000-07:00</published><updated>2007-10-21T20:34:43.503-07:00</updated><title type='text'>मराठी साहित्यातील स्त्रीवाद</title><content type='html'>(उपक्रम या संकेतस्थळावर सुरु असलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या &lt;a href="http://mr.upakram.org/node/750"&gt;चर्चेला&lt;/a&gt; दिलेला हा प्रतिसाद. बराच लांबला आणि मूळ विषयाव्यतिरिक्त अवांतर लिहिणेही झाले म्हणून इथे वेगळा प्रकाशित करीत आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा लेखिका मराठी साहित्यात लिहित्या झाल्या तरी स्त्रीवादाची खरी मुहुर्तमेढ रोवली ती मालतीबाई बेडेकरांनी. १९३३ मध्ये विभावरी शिरुरकर या टोपणनावाने त्यांनी 'कळ्यांचे नि:श्वास' हा कथासंग्रह लिहून मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. मुळात स्त्री-वादाचा पाया हा स्त्रीला वेगळे अस्तित्व आहे, वेगळे व्यक्तिमत्व आहे ही मान्यता मिळवण्यात आहे. केवळ स्त्री असल्याने वेगळी वागणूक मिळावी असा नाही. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?' या कथेत एक मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई म्हणून इतरांनी आपल्याकडे पाहू नये, तर एक स्वतंत्र विचारी व्यक्ती म्हणून पहावे हा त्याकाळी धाडसी वाटणारा विचार कथानायिका मांडते. त्यातील एक उतारा &lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2006/03/blog-post.html"&gt;येथे&lt;/a&gt; वाचता येईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एका अर्थी मालतीबाई बेडेकर काळाच्या पुढे होत्या. विश्राम बेडेकरांच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रात त्याची चुणूक दिसते. साधारण पुढच्या एक-दोन दशकात, दुसऱ्या महायुद्धानंतर एक गरज म्हणून स्त्रियांची पहिली पिढी नोकरीसाठी प्रथमच घराबाहेर पडली. बटाट्याच्या चाळीचं शेवटचं स्वगत आठवतंय? एरवी एक पुस्तक म्हणून ते कितीही आवडत असले, तरी त्या स्वगतातला मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या म्हणून हळहळणारा भाग मला कायम खटकत आला आहे. अर्थात एका दृष्टीने ते तेव्हाच्या समाजमनाचे प्रतिबिंब म्हणता येईल. नाइलाज म्हणून स्त्रियांना नोकरी करण्याची परवानगी देणारा, आणि पुढे मग मुलीच्या पगारावर घर चालते तेव्हा तिचं लग्न होऊन कसं चालेल अशा कोंडीत सापडलेला. बटाट्याच्या चाळीच्याच संगीतिकेतला अंतू जोशी पत्रे टंकताना आवडणाऱ्या शांतेपेक्षा किंचित काळ्या सरलेला 'शांता शांता इनोसंट मन - सरला पित्रे पर्मनंट पण. हुडकून काढीन म्हणतो पत्ता, पगार अन महागाई भत्ता' म्हणून अधिक पसंती देतो, तेव्हा तो निरुपायाने बदलणाऱ्या पुरुषप्रधान समाजाचेच प्रतिनिधित्व करतो. (अर्थात, इतर प्रांतांच्या मानाने महाराष्ट्रात हे बदल लवकर झाले. उत्तर भारत याबाबत अधिक मागासलेला होता. केवळ सायकल चालवणाऱ्या मुली/स्त्रिया हे 'अजाब' पाहण्यासाठी १९२० च्या दशकात पंजाबातून काही पुरुष सहलीसाठी पुण्यात आले होते, असे एका लेखात वाचल्याचे आठवते.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;साठोत्तरी साहित्य हे स्त्रीवादापेक्षा दलित साहित्य आणि नेमाडे, चित्रे, ढसाळ, कोलटकर यांच्यासारख्या नव्या स्वरुपाचे लेखन करणाऱ्यांनीच अधिक गाजवले असावे. [चू. भू. द्या. घ्या.] अर्थात, इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधे केलेले उपहासात्मक भाष्य (महर्षी कर्व्यांची सून, अमक्यांची कन्या, अमक्यांची पत्नी अशी लेखिकेची ओळख एका समारंभात करुन देण्यात येते. तरीही काहीतरी राहिलंय असं तिला वाटत राहतं. शेवटी आपल्या शाळकरी मुलाच्या मित्रांनी, 'अरे ती बघ आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई' असे उद्गार काढल्यावर त्यांना आपली ओळख पूर्ण झाल्याचे, परिपूर्ती झाल्याचे समाधान मिळते.) याच काळातलं.[त्यांच्या मृत्युनंतर एका पत्रकारवर्यांच्या लेखात इरावतीबाईंच्या मानववंशशास्त्रातील संशोधन आणि लेखनकामापेक्षा - त्या तेव्हाच्या पुण्यात बुलेट चालवायच्या, नवऱ्याला दिनू म्हणून हाक मारायच्या असे कौतुक वाचल्यानंतर फार काही बदलले नाही याची खात्री पटली :)]&lt;br /&gt;&lt;br /&gt;पद्मा गोळे, संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांता शेळके या कवयित्रींनी आक्रमक स्त्रीवाद जरी कवितेतून मांडला नसला; तरी स्वतंत्र स्त्रीत्वाची जाणीव त्यांच्या कवितांतून डोकावत राहते. 'डोळा वाटुली संपेना' मध्ये कविताभर ताटकळणारी, आणि मग&lt;br /&gt;शेवटच्या कडव्यात 'संपावया हवी वाट, लावायला हवा दिवा; पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा' म्हणणारी इंदिरा संतांनी रेखाटलेली आई, किंवा -&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता सोंगं पुरे झाली&lt;br /&gt;सारी ओझी जड झाली, &lt;br /&gt;उतरून ठेवून आता तरी&lt;br /&gt;माझी मला शोधू दे &lt;br /&gt;तुकडे तुकडे जमवू दे&lt;br /&gt;विशाल काही पुजू दे&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी आस लागलेली, पद्मा गोळेंच्या 'मी घरात आले' मधली कविता-नायिका (कथानायिका असते तशी) याच गोष्टीची साक्ष देतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदरीतच स्त्रीवादी लेखक-लेखिका म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी हिरीरीने भांडणारे किंवा तळागाळातील स्त्रियांवर होणारे अन्याय रेखाटणारे अशी व्याख्या करणे संकुचितपणाचे होईल. (अशा यादीत मग फक्त 'मुलगी झाली हो' हे नाटक आणि इतर कार्यकर्ते-लेखकांची नोंद होईल). व्यापक अर्थाने, गौरी देशपांड्यांचं लेखन स्त्रीवादी म्हणता येईल. "मी एक टक्का स्त्रियांच्या जीवनाविषयी लिहिते असा आरोप असला तरी मला स्त्रियांत अशा अभेद्य भिंती जाणवत नाहीत. भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की.", या शब्दांतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. निपाणीतील विडी आणि जर्दा कारखान्यात काम करणाऱ्या गरीब स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या अनिल अवचटांचं लेखन आणि मध्यमवर्गीय/सुखवस्तू घरातील नमू आणि कालिंदीच्या मन:स्थितीचा वेध घेणाऱ्या 'दुस्तर हा घाट' आणि 'थांग'सारख्या कादंबऱ्या -- वरकरणी दोन टोकं वाटली तरी त्यांना जोडणारा धागा स्त्रीवादी लेखनाचाच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुनीता देशपांडेंचं 'आहे मनोहर तरी', कमल पाध्येंचं 'बंध-अनुबंध' आणि माधवी देसाईंचं 'नाच गं घुमा' या तीन पुस्तकांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख अपूर्ण राहील. तिघीही साहित्यिकांच्या पत्नी. लेखक त्याच्या लेखनात ज्या मूल्यांचा सतत पुरस्कार करतो, तसे त्याचे व्यक्तिमत्व असते या प्रचलित समजाला तिघींचं लेखन कमी-अधिक प्रमाणात छेद देतं. 'आमच्या घरी तांदूळ आणि प्रूफं दोन्ही सुनीतालाच निवडावी लागतात', असं म्हणणाऱ्या पुलंमध्येही कधीतरी सुनीताबाईंना 'शिकिवनारा बाबा' ही पुरुषी अहंगंडाची किंवा 'लोकापवादो बलवान मतो मे' म्हणून समाजापुढे मान तुकवण्याची जी वृत्ती आढळली; ती वृत्ती - तो पुरुषी अहंगंड कमी अधिक प्रमाणात इतर दोघींनाही जाचत राहतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्याच्या लेखिकांमध्ये मेघना पेठे आणि कविता महाजनांचे नाव आवर्जून घ्यावं लागेल. शरीरसंबंधांविषयी लिहिताना मराठी लेखक फार सोवळेपणाने लिहितात. एकंदरीतच मध्यमवर्गीय पांढरपेशेपणा याबद्दल मोकळेपणाने लिहायच्या आड येते, असा या चर्चेत मुद्दा उपस्थित झाला होता.(अर्थात केवळ शरीरसंबंधाविषयी मोकळेपणाने लिहिणे म्हणजे आधुनिक/स्त्रीवादी लेखन असा दावा यातून करायचा नाही. परंतु, चित्रपटात वाट्टेल ते पाहण्याची तयारी असलेले आपण पुस्तकांबाबत अजून बरेचसे परंपरावादी आहोत, हेही खरं.) या दोघींच्या लेखनात अशी वर्णने जेव्हा कथानकाच्या ओघात येतात तेव्हा त्यांचा तोल कुठे ढळत नाही. कविता महाजनांच्या 'ब्र' या पुस्तकातील हा एक उतारा उदाहरणार्थ पहा. [&lt;strong&gt;टीप&lt;/strong&gt; - या उताऱ्यात काही असभ्य, अश्लील आहे, असं मला वाटत नाही. केवळ सावधगिरी म्हणून ही टीप लिहिणे भाग आहे, की जर आपल्याला यात काही आक्षेपार्ह वाटणारं असेल, असं न वाचताच वाटत असेल तर कृपया पुढील दोन परिच्छेद गाळून पुढचा लेख वाचावा.]&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबून; तिथल्या स्पर्धेला, कटकटींना सामोरं जाऊन, लोकलमध्ये लोंबकळून घरी परतायचं. परतताना मुलींना पाळणाघरातून घ्यायचं. भाजी, दूध घ्यायचं. पुन्हा मुलींचं काहीतरी असायचंच... उद्या शाळेत अमुक वही, तमुक रंग सांगितलेत आणायला, किंवा क्राफ्टपेपर, किंवा घरी कुंडीत एक झाड लावून त्याची वाढ पाहायला सांगितलंय; असं काहीतरी. दगड, धोंडे न् माती. मग रात्रीचा स्वयंपाक. मुलींचा गृहपाठ. उद्या सकाळची तयारी. या सगळ्यात शरीर दगा नाही देणार, तर काय दिवसभर एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारखं झुलत बसणार? पण हे सगळं सहज बोलू शकतो दिनेश. रेवतीलाही ऐकवायचाच की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेवती एकदा म्हणाली होती, "कधीकधी इतकी चीड येते ऐकताना. वाटतं, आपणही सुनवावं. कधी आपली इच्छा झाली आणि याचं उठलंच नाही तर? बायका म्हणजे यांना हवं तेव्हा अंगाखाली यायला हव्यात. बळजोरी करता येते. नाहीच करता आली तर असं बोलून दाखवता येतं. पण मी जर असं म्हटलं कधी, तर किती घाण वाटेल ना? बघ, तुझा चेहरासुद्धा कसा झालाय हे इतकं साध्या सरळ भाषेत बोललेलं ऐकताना. त्यांच्यासारख्या खालच्या पातळीवर येऊन तशा गलिच्छ भाषेत बोलूच शकणार नाही कधी आपण. इतक्या पारंपारिक कल्पना ठाम असतात आपल्या डोक्यात. बाकी सारं आपण मोकळं बोलू. पाळीचं किंवा गरोदरपणीचं. पण असं निगेटिव्ह असलं, तर नाही बोलणार कधीच. आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाचा कसा अपमान करणार आपण मैत्रिणीजवळसुद्धा? परवा दिनेश म्हणाला की 'तुम्हां बायकांची अशी नेहमीच कटकट असते काही ना काही. कधी रेड डिस्चार्ज कधी व्हाइट डिस्चार्ज. निमित्तं मिळतात नाही म्हणायला.' इतकी किळस दाटून आली मनात. सणसणीत काही बोलावं असं वाटलं. पण नाही बोलले. आधीच या लोकांचे इगो नाजूक. ते दुखवायचे आणि तेही सेक्ससारख्या बाबतीत म्हणजे आपलं मरणच. आणि खरंतर मला इंटरेस्ट नसतो असंही नाही. पण नवेपणीसारखी निव्वळ शरीराची ओढ आता कशी राहील?"&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या विषयावर जे काही आठवलं ते लिहिलं. भविष्यात ह्या स्त्रीवादाचे स्वरूप कसे असेल?&lt;br /&gt;  &lt;br /&gt;नातिचरामित 'अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.' असं एक निरीक्षण आहे. (संसारी स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने उत्कर्ष साधू शकत नाहीत, असे लेखिकेला म्हणायचे आहे असा उफराटा निष्कर्ष यातून काढू नये; कारण हे निरीक्षण कथेच्या संदर्भात येते.) त्यावरुन परवाच एका अनुदिनीवर झालेली न्यूयॉर्क टाइम्सच्या &lt;a href="http://www.nytimes.com/2007/09/26/business/26leonhardt.html"&gt;एका पाहणीवरील&lt;/a&gt; चर्चा आठवली. घर आणि नोकरी, ह्या दोन्ही आघाड्या सांभाळताना स्त्रियांची दमछाक होते आहे आणि परिणामी त्यांचे असमाधान वाढते आहे हा या पाहणीचा निष्कर्ष. भारतातही नोकरी करणाऱ्या जोडप्यांत घटस्फोटाचे प्रमाण &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20071021/lokkal.htm"&gt;वाढते आहे&lt;/a&gt;. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याचाच अर्थ, स्त्रियांच्या समस्या दूर न होता उलट त्यांचे स्वरूप बदलते आहे आणि अधिक गुंतागुंतीचे होते आहे. आधुनिक स्त्रीची ही कुचंबणा जसजशा अधिकाधिक स्त्रिया लिहित्या होतील; तसतशी अधिक प्रभावीपणे मराठी साहित्यात व्यक्त होत राहील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-6011909957816878237?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/6011909957816878237/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=6011909957816878237' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/6011909957816878237'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/6011909957816878237'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/09/blog-post.html' title='मराठी साहित्यातील स्त्रीवाद'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-2867957578475434010</id><published>2007-08-13T02:41:00.000-07:00</published><updated>2007-10-01T14:00:06.802-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निवडक उतारे'/><title type='text'>जे जे उत्तम...१ [झुंबर]</title><content type='html'>&lt;em&gt;(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा एक उपक्रम या पोस्टपासून सुरु करतो आहे. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.) &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या गावाचे रस्ते म्हणजे एकदम मॅडसारखी एक जाळीच आहे असं म्हटलं तर अगदी बरोबर. तंतोतंतच. आधी एकमेकांच्या हातांत हात घालून जाणाऱ्या मित्रांसारखे मुख्य रस्ते. मग झाडांना फुटणाऱ्या फांद्यांप्रमाणं त्यांच्यापासून फुटणारे, काटकोनात जाणारे दुसरे रस्ते. सगळं असं आडवं आणि उभं. रस्त्यांवर प्रत्येक घराची फाटकं. फाटकं नसतील तर पुढं सरकून बसलेल्या घरांचीच दारं. त्या रस्त्यांना समांतर जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्यांचही तसंच. दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर आपापली फाटकं उघडून बसलेली आमची घरं मॅडसारखी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसल्यासारखी! पण पाठीला पाठ हे काही तेवढंसं खरं नाही. त्या घरांच्या पाठी जराशा बाजूला सारून आणखी काही रस्ते त्या आडव्या रस्त्यांना समांतर जाणारेच. पण हे रस्ते एकदम लहान. एखादीच मोटार किंवा बैलगाडी जाईल असले. त्या रस्त्यांना घरांतले मोठे लोक 'घरामागचे बोळ' किंवा नुसते 'मागचे बोळ' असंच म्हणणार. मोठी माणसं त्या रस्त्यानं बहुधा जाणार नाहीत. एखादा जाणारा सापडलाच तर समजावं की, त्याला कुठंतरी महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि आधीच पाऊणतास उशीर झालेला आहे. तसला माणूस धोतराचा काचा मारत मारत किंवा पँटचा पट्टा घट्ट करत करत किंवा कोटाच्या दुसऱ्या हातातून आपलाही दुसरा हात घालत घालत वाकडातिकडा चालताना दिसणार. सायकलवरनं जात असेल तर पळत पळत सायकलवर उडी मारून शीटवर बसताना किंवा हँडलवर वाकून सायकल मारताना दिसणार. बायका तर हातात झारा, लाटणं, भांडं, पिशवी, केरसुणी काय वाटेल ते घेऊन दोन पावलं पळत, दोन पावलं चालत जाताना दिसणार. त्यांच्या काखोटीला बसलेल्या आणि रडायचं नुकतंच थांबवलेल्या पोरांचे पाय फटाफट खालीवर होत असणार. आईच्या मांडीवर एका तालात आपटत असणार. सगळ्यांनाच त्या रस्त्यावरनं जाताना घाई. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या बोळांतून शाळेतल्या पोरांची ये-जा कायम सुरू. त्याचं एकुलतं एक महत्त्वाचं कारण? त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उलटीकडं तोंड करून बसलेल्या घरांची स्वैपाकघरं आणि त्यांच्या खिडक्या आहेत. दोन्हीकडच्या घरांत आमचे कोण कोण मॅड मित्र राहतात. त्या रस्त्यांवर कुठंही उभं राहून जास्त न ओरडता आणि दंगा न करता आमच्या मित्रांना हाका मारून बोलावता येतं. मित्राचे हात आधी खिडक्यांच्या गजावर दिसणार. मग त्याचं ते डोकं खिडकीत आलं की त्याच्याशी बोलायला येतं. एखाद्या लहान बोळकंडीतून जाताना दोन्हीकडच्या भिंतींना हात लावून चालत जाता येतं, तसं त्या रस्त्यानं जाताना दोन्हीकडं राहणाऱ्या आमच्या मित्रांशी बोलत जाता येतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आरामात, निवांतपणे. शिवाय मागच्या खिडक्यांतून आमच्या मित्रांना त्यांच्या अस्सल नावानं हाका मारता येतात. "जंब्या, चंब्या, सुक्या, परळ्या," अशा. पण त्याच मित्रांच्या घरांच्या पुढच्या दारात गेलं की पंचाईत व्हायची. आधी दारात कोण नसणारच. मग कडी वाजवायची. ती कधी कुणाला ऐकू आली तर येणार, नाही तर नाहीच. मग चोरासारखं उभं राहायचं. कुणीच आलं नाही तर मग कुचमुचत हाक मारायची, "जनार्दन्! चंद्रकांत्! सुकुमार्! परुळेकर्!" त्या नावांनी चंब्या वगैरेंना हाका मारताना आम्हांलाही लाज वाटणार आणि ऐकणाऱ्या आमच्या मित्रांनाही. कारण त्यांची ती नावं नव्हतीच. सोडऱ्याच्या दरवाजात उभं राहून त्याला "सोंडऱ्या!" अशी हाक मारणं विसराच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नुसतं "सोंडूर!" अशी हाक मारली, तर त्याचे आजोबा बाहेर येऊन म्हणणार. "तुला कोणता सोंडूर पाहिजे? माझ्यासकट या घरात सात सोंडूर राहतात. कोणता? आँ? सांग लवकर." मग ते भुवया वर उडवणार. पुढं काय बोलायच्या आतच ते पुन्हा भुवया उडवणार. असलं ते सगळं कठीणच. सोंडऱ्याचं नावही 'गुरुवेंद्राचार्य'. त्याला तीनचार हाका मारायच्या म्हणजे जिभेला खरचटायची पाळीच! या असल्या सगळ्यांपेक्षा भंगीबोळ बेष्ट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथा: कंठा&lt;br /&gt;संग्रह: झुंबर&lt;br /&gt;लेखक: प्रकाश नारायण संत&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-2867957578475434010?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/2867957578475434010/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=2867957578475434010' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2867957578475434010'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/2867957578475434010'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='जे जे उत्तम...१ [झुंबर]'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-8823849525948268178</id><published>2007-07-15T16:59:00.000-07:00</published><updated>2007-07-16T16:44:08.107-07:00</updated><title type='text'>दॉस्तायेवस्की, लेखकाचे आयुष्य आणि काही प्रश्न</title><content type='html'>"अर्थात, तुरुंगातलं आयुष्य कसं असतं याबद्दल दुमत होऊ शकतं," प्रिन्स म्हणाला. "तुरुंगात बारा वर्षं काढलेल्या एका माणसाची मी एकदा गोष्ट ऐकली होती. त्याच्याकडूनच. मी ज्या प्राध्यापकांकडून उपचार करून घेत होतो, तिथेच तोही होता. त्याला नैराश्याचे झटके येत, फीटस येत. अशावेळी मग तो आसवे गाळत बसे. एकदा तर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्याचं तुरुंगातलं आयुष्यही भकास होतं. खिडकीच्या जाळीबाहेर वाढणारं एक झाड आणि कोळी हेच त्याचे तिकडे सोबती होते. पण ते असो. त्यापेक्षा मी तुम्हांला दुसऱ्या एका माणसाबद्दल सांगतो. गेल्यावर्षी भेटलेला. त्याची केसतर निराळीच होती. विचित्र. विचित्र कारण, असं कधी घडल्याचं ऐकलेलं नाही. इतर अनेक कैद्यांबरोबर त्याला कुठल्यातरी राजकीय गुन्ह्याकरता गोळी घालून मारायला आणलं होतं. पण वीसच मिनिटांनी त्याला सोडून दिलं. देहदंडाऐवजी कुठली तरी दुसरीच शिक्षा ठोठावून. पण त्या पंधरा-वीस मिनिटांच्या काळात, आपण मरणार आहोत अशी त्याची ठाम समजूत होती. त्या जीवघेण्या वेळात त्याला काय वाटलं हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती. त्याबद्दल मी त्याला अनेकदा विचारलंही. त्याला सगळं काही लख्खपणे आठवत होतं, आणि त्यातलं काहीही आपण विसरणार नाही असा त्याचा दावा होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या कैद्यांना शिक्षेसाठी जिकडे आणलं होतं, तिकडून जवळपास वीस पावलांवर जमिनीत रोवलेले तीन खांब उभे होते. त्यांना बांधून गोळ्या घालण्यासाठी! पांढरा पायघोळ पोशाखातल्या पहिल्या तीन कैद्यांना तिथे आणलं गेलं. आपल्यावर रोखलेल्या बंदुका दिसू नयेत, म्हणून त्यांचे चेहरेही पांढऱ्या कपड्यांनी झाकले होते. मग सैनिकांची तुकडी प्रत्येक खांबासमोर उभी राहिली. माझा मित्र त्या यादीत आठवा होता. म्हणजे त्या वधस्तंभांकडे जाणाऱ्या तिसऱ्या गटात. हाती क्रूस घेऊन एक धर्मगुरु त्यांच्याकडे आला. माझ्या मित्राच्या आयुष्यात आता जेमतेम पाच मिनिटं उरली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो म्हणाला, की ती पाच मिनिटं म्हणजे त्याला प्रचंड खजिन्यासारखी वाटली. कधीच न संपणारा काळाचा खजिना. त्या पाच मिनिटांत इतकी आयुष्यं जगता येतील, की त्या शेवटच्या घटकेचा विचारही करायची काही गरज नाही. व्यवस्थितपणे त्या वेळाचे त्याने भाग पाडले. पहिला हिस्सा आपल्या साथीदारांचा निरोप घेण्यासाठी. त्याच्यासाठी दोन मिनिटं. अजून दोन मिनिटं आपल्या पार पडलेल्या आयुष्याविषयी आणि स्वतःविषयी विचार करायला. आणि बाकी मिनिट, जाताना या जगावर शेवटची नजर फिरवून जाण्यासाठी. अशी वाटणी केल्याचं त्याला चांगलंच आठवतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच्या सोबत्यांचा निरोप घेताना, त्यांच्यापैकी एकाला त्याने काहीतरी नेहमीचा, जुजबी औपचारिक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न आणि त्याच्या उत्तरात आपल्याला असणारा रस, हे त्याला पक्कं आठवतंय. निरोप घेतल्यावर, त्याने स्वतःकरता राखून ठेवलेल्या दोन मिनिटांच्या वेळात आपण काय विचार करणार आहोत, हे त्याला आधीच माहीत होतं. जितका लवकर शक्य होईल तितक्या वेळात, अगदी स्पष्टपणे त्याला आपल्या मनावर एकच विचार ठसवायचा होता -- की, आता चालू असणारा आपला श्वास, आपले हे शरीर आणि विचार करणारं मन; आपलं एकंदरीत अस्तित्वच तीन मिनिटांनी नाहीसं होणार आहे. जरी ते कुठल्याप्रकारे टिकून राहिलंच, तरी कुठे आणि कसं? त्याला वाटलं, या शेवटच्या तीन मिनिटांत या प्रश्नाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा. जवळच एक चर्च होतं. मुलामा दिलेला त्याचा मनोरा, सूर्याच्या प्रकाशात झळाळून उठला होता. त्या मनोऱ्याकडे, त्या झळाळत्या किरणांकडे निग्रहाने, काहीशा हट्टीपणानं तो पाहत राहिला. डोळे खिळवून. तीन मिनिटांनी आपण त्या किरणांपैकीच एक होऊ, त्यांचाच एक भाग होऊ असं त्याला वाटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हा विचार आणि लवकरच जे अपरिहार्यपणे घडणार आहे यातला विरोधाभास; ही अनिश्चिततेची भावना भयानक होती. पण या सर्वांपेक्षाही भयाण कल्पना ही - की जर माझी आता सुटका झाली, तर काय? मृत्युच्या छायेतून परत जीवनाकडे परतल्यावर जे कधीही न संपणारे, फक्त माझेच असणारे हे अमर्याद दिवस मला मिळतील; त्यांचं करू तरी काय? एकही क्षण वाया जाऊ नये म्हणून मग जी मिनिटामिनिटाला तगमग होईल, त्याचं काय? तो म्हणाला, की या विचारांचं, या कल्पनेचं त्याला इतकं असह्य दडपण आलं, की यापेक्षा त्या सैनिकांनी लगेच गोळ्या झाडून जीव घ्यावा आणि हे सारं एकदाचं संपवावं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रिन्स बोलायचा थांबला. तो पुन्हा बोलणं सुरु करेल आणि ही गोष्ट पूर्ण करेल, या अपेक्षेने इतरही थांबून राहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"एवढंच?" ऍग्लायाने विचारलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो. एवढंच," तंद्रीतून बाहेर येत प्रिन्स म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आणि, हे तुम्ही आम्हांला का सांगितलंत?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"असंच. बोलता बोलता आठवलं म्हणून."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्हांला असं म्हणायचं असावं, प्रिन्स," अलेक्झांड्रा म्हणाली,"की असे क्षण पैशांत मोजता येत नाहीत. पाच मिनिटंही कधी कधी अनमोल असतात. अगदी मान्य. पण तुमच्या त्या मित्राबद्दल एक विचारु का? त्याला सोडलं, असं तुम्ही म्हणालात. मग त्याने त्या 'कधीही न संपणाऱ्या, अमर्याद दिवसांचं' काय केलं? प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवला?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"छे, अजिबात नाही. मी विचारलं ना स्वत:च त्याला. तो म्हणाला, की जसं ठरवलं होतं तसं अजिबात झालं नाही. कित्येक मिनिटं त्याने वाया घालवली."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अच्छा. म्हणजे एक प्रयोग म्हणून जर आपण पाहिलं, तर निष्कर्ष हा निघतो की 'जगायचंय प्रत्येक सेकंद' असं कितीही ठरवलं; तरी ते शक्य होणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, ते अशक्यच आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"खरंय," प्रिन्स म्हणाला. "मीही असाच विचार केला. पण तरी, असं का जगता येऊ नये?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://viprashna.blogspot.com/2007/02/writers-and-first-hand-experience.html"&gt;हा उतारा&lt;/a&gt; फ्योदोर दॉस्तायेवस्कीच्या '&lt;a href="http://www.online-literature.com/dostoevsky/idiot/"&gt;द इडियट&lt;/a&gt;' या कादंबरीतला आहे. वर वर्णन केलेला प्रसंग, म्हणजे केवळ लेखकाचा कल्पनाविलास नाही तर त्याच्या आयुष्यात वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी गुदरलेला प्रसंग आहे. हेगल आणि इतर तत्त्वज्ञांच्या विचारांबद्दल चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या '&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Petrashevsky_Circle"&gt;पेट्राशेव्हस्की सर्कल&lt;/a&gt;'ला राजद्रोही ठरवून रशियाच्या पहिल्या निकोलसने, दॉस्तायेवस्की आणि इतर साहित्यिक/विचारवंतांना १८४९ साली देहदंडाची शिक्षा ठोठावली. अटकेनंतर सात महिन्यांनी, रशियन हिवाळ्यात कुडकुडत सैनिकांच्या गोळ्यांची वाट पाहत असताना, दॉस्तायेव्हस्कीची देहदंडाची शिक्षा रद्द होऊन, त्याऐवजी त्याला सैबेरियात चार वर्षांच्या अज्ञातवासात पाठवले गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात, या घटनेचा दॉस्तायेव्हस्कीच्या आयुष्यावर आणि पर्यायाने लेखनावर खोल परिणाम झाला. "जगणं आपल्या हाती आहे, इतरांच्या नाही. माणसांमध्ये फक्त एक माणूस बनून राहणं; आणि कितीही संकटं, दुर्दैवी प्रसंग आले तरी निराश वा विचलीत न होणं हेच जीवनाचं ध्येय आहे; हेच जीवन आहे." -- त्या अग्निदिव्यातून पार पडल्यावर काही दिवसांतच आपल्याला भावाला लिहिलेल्या पत्रातील &lt;a href="http://www.fyodordostoevsky.com/biography.php"&gt;या वाक्यातून&lt;/a&gt; त्याच्या विचारांच्या दिशेची कल्पना येते. शिक्षा भोगून परत आल्यावर, त्याने लिहिलेल्या 'क्राईम अँड पनिशमेंट', 'द इडियट' आणि 'द ब्रदर्स कॅरामाझोव्ह' या कादंबऱ्यांची गणना आत्तापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांत होते. ज्या &lt;a href="http://mr.upakram.org/node/236"&gt;अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची&lt;/a&gt; (Existentialism) पायाभरणी दॉस्तायेव्हस्कीने केली, त्या तत्त्वज्ञानाचा या कादंबऱ्यांवर मोठा प्रभाव आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण या तिन्हींपैकी, 'द इडियट' कादंबरीत दॉस्तायेव्हस्कीच्या वैयक्तिक आयुष्यातील भाग अधिक आहे. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असणारा; ख्रिस्ताच्या जीवनाने, त्यागाने प्रभावित झालेला; युरोपातील उपचार संपल्यावर पीटर्सबर्गच्या उच्चभ्रू वर्तुळात आलेला 'इडियट' प्रिन्स मिश्किन आणि सैबेरियातून सुटून आलेला, प्रिन्ससारखेच विचार असणारा, लहानपणापासून येणाऱ्या फीट्सच्या आजाराने बेजार दॉस्तायेव्हस्की यांच्यात कमालीचे साम्य आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात, वर लिहिलेला खोट्या देहदंडाच्या शिक्षेचा प्रसंगाने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली यात संशय नाही. पण मला यावरून एक प्रश्न पडतो, की जर दॉस्तायेव्हस्की पूर्वीचे आपले सुखासीन आयुष्य जगत राहिला असता तर त्याच्या हातून हे लेखन झालं असतं का? दुसऱ्या शब्दांत, असलं असामान्य लेखन करायला प्रतिभेच्या वरदानाबरोबरच त्या लेखकाचं जीवनही तसंच चाकोरीबाहेरचं हवं का? की फक्त प्रतिभेची झेपच इतकी विलक्षण असते, की ती दैनंदिन जीवनाच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;नागपुरातील एका डॉक्टरांनी मेघदूत वाचून हाती घेतलेल्या एका उपक्रमाबद्दल काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचल्याचं आठवतं. मेघदुतातील त्या ढगाचा रामगिरी ते हिमालय हा प्रवास त्यांनी विमानातून केला. वाटेत लागणाऱ्या नद्यांचे, सरोवरांचे आकार किंवा दरी-डोंगरांमुळे निर्माण होणारे आकृतिबंध -- अशा गोष्टी ज्या केवळ इतक्या उंचीवरुन पाहिल्यावरच लक्षात येऊ शकतात आणि त्यांची मेघदुतातील वर्णने, तंतोतंत जुळत होती. कालिदासाची प्रतिभा अचूक निसर्गवर्णनापुरतीच मर्यादित होती, हे सांगायचा अर्थातच यामागचा उद्देश नाही; तर फक्त वरील परिच्छेदातील शेवटच्या वाक्यातील मुद्दा स्पष्ट करणे एवढाच आहे. (शिवाय ही माहिती केवळ स्मरणातून देत आहे, त्याबद्दलचा दुवा माझ्याकडे नाही. तेव्हा चू. भू. दे. घे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हे असं कालिदासासारखं वा ज्ञानेश्वरांसारखं अलौकिक प्रतिभेचं देणं, शतकाशतकांतून केवळ एखाद्यालाच मिळतं. इतरांच्या बाबत मात्र 'मज अंगीच्या अनुभवे, मज वाईट बरवे ठावें' हेच खरं असावं आणि त्यामुळे मग मोजके अपवाद सोडले, तर 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?' अशी स्थिती.&lt;br /&gt;&lt;br /&gt; प्रत्यक्ष लेखकांना याबाबत काय वाटतं? 'रथचक्र'च्या प्रस्तावनेत श्री. ना. पेंडसे म्हणतात, "पाश्चात्यांच्या तुलनेने मराठी कादंबरी, लघुकथा आजही खुज्या वाटतील. पण अशा तऱ्हेची तुलना मराठी कादंबरीकार, कथाकार, टीकाकार यांना एका दृष्टीने अन्याय करणारी आहे. आपल्या एकंदर जीवनाची लांबीरुंदीच इतकी छाटछूट आहे - त्यापैकी ललित साहित्याला खड्यासारखं उचलून त्यावर ही तुलनेची तरवार चालवायची तर त्यातून विपरीत निष्कर्षापलीकडे हाती काही लागणार नाही."..."कोणतीही कलाकृती मूलतः आत्मचरित्रात्मकच असते. आपल्या अनुभवविश्वाच्या कक्षा कलावंताला ओलांडता येत नाहीत. ज्या क्षणी हे इमान तो सोडतो त्या क्षणी कलेतील सच्चेपणा संपतो. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठीला नोबेल कधी मिळणार किंवा मराठी साहित्यात शेक्सपिअर-टॉलस्टॉय-टागोर कसे निर्माण होतील, याविषयावर अनेक हेमंत-वसंत-शिशिर व्याख्यानमाला रंगतात; परिसंवाद झडतात. त्यासंदर्भात पेंडशांचे विचार महत्त्वाचे आहेत. संपूर्ण समाज ढवळून काढणाऱ्या, जुन्या जीवनपद्धतीला मोडीत काढणाऱ्या कितीशा घटना महाराष्ट्रात घडल्या? रशियन राज्यक्रांती, दोन्ही महायुद्धे किंवा फाळणी यासारख्या घटनांचा थेट परिणाम असा आपल्या जीवनावर झालाच नाही. [हे सारं, 'अ = ब' इतकं सोपं नाहीच. उद्या महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली तर त्यामुळे लगेच उत्कृष्ट साहित्य निर्माण होईल, असे नाही.] हे एक कारण, आणि बहुजन वर्गाला अजून मराठीत लेखन करता येत नाही आणि अभिजनांना इंग्रजी अधिक जवळची वाटते, त्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायांतले लोक आणि त्यांचे अनुभव मराठीत अजूनही म्हणावे तितके येत नाहीत, हे दुसरे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात, हे चित्र आता थोडेफार बदलू लागले आहे. 'इडली, ऑर्किड आणि मी', 'ब्र', 'चकवाचांदण' अशी वेगळ्या वाटेवरची पुस्तके मराठीत येत आहेत. जागतिक साहित्यातही, युरोपीय भाषांव्यतिरिक्त इतर साहित्याची, लेखकांची दखल अधिक प्रमाणात घेतली जाऊ लागली आहे. जागतिकीकरणामुळे नवीन अनुभवांची मक्तेदारी केवळ पहिल्या दोन जगांकडेच राहिलेली नाही. जागतिकीकरणाचा रेटा, त्याचे फायदे-तोटे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे साऱ्याच समाजांना स्पर्शणारे विषय आहेत. त्यांचे पडसाद तिसऱ्या जगातील लेखकांच्या लेखनातून उमटायला सुरुवात झाली आहे. किरण देसाईंचे बुकर पारितोषिक मिळवणारे 'द इन्हेरिटन्स ऑफ लॉस' असो किंवा ओरहान पामुकांचे 'इस्तंबूल', त्यामागची मूळ प्रेरणा हीच आहे. तेव्हा मराठीतही काही काळाने याच तोलामोलाचे साहित्य निर्माण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-8823849525948268178?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/8823849525948268178/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=8823849525948268178' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/8823849525948268178'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/8823849525948268178'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/07/blog-post.html' title='दॉस्तायेवस्की, लेखकाचे आयुष्य आणि काही प्रश्न'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-3559503329399402109</id><published>2007-06-24T04:50:00.000-07:00</published><updated>2007-06-24T05:02:05.841-07:00</updated><title type='text'>पाऊस -- बनगरवाडीतला आणि कांदेवाडीतला</title><content type='html'>नुकताच पाऊस वाजतगाजत डेरेदाखल झालाय. तेव्हा ग्रेसच्या भाषेत सांगायचं तर 'पाऊसनांदीची पिंजण' म्हणून मला आवडणारी पावसाची दोन वर्णनं येथे देत आहे. दोन्ही वर्णनं गाजलेल्या पुस्तकांतली. दोन्ही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली. पण त्यांच्यातल्या साम्याचा भाग एवढाच. एक ग्रामीण जीवनावरची अलिप्त कादंबरी, तर दुसऱ्या कथासंग्रहात भरलेला आहे तो मुंबईतला मध्यमवर्गीय लिप्ताळा. बनगरवाडीतला एकूणच तटस्थ, 'जसं-आहे-तसं' कथन करणाऱ्या निवेदनाचा सूर पावसाळ्याच्या या वर्णनातही जाणवतो; तर गंगाधर गाडगीळांच्या 'पावसाळी हवा' [कथासंग्रह - कडू आणि गोड] या कथेत पाऊस एका संसारी पुरुषाच्या दृष्टीतून येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बनगरवाडीतलं वर्णन, उगाचच 'साऱ्या सृष्टीने हिरवा शालू पांघरला' अशा वाक्यांत गुंतून पडत नाही; तर रोखठोकपणे ती धनगरांची वस्ती पावसाळ्याला कसं तोंड देते, हे सांगतं. झगझगीत पोपटी रंगाच्या गवताबरोबरच मग गळक्या छपरांचं, घोंघावणाऱ्या माशा-चिलटांचं, चिखलाचं आणि कुऱ्हाडींवर चढणाऱ्या गंजाचंही वर्णन येतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मे महिना संपला आणि जून आला. उन्हाळा संपला. पावसाळा आला. इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला. आभाळ झाकोळून आले. स्वच्छ ऊन नाहीसे झाले. वारा सुटला. झाडेझुडे गदगदू लागली. धूळमाती चौफेर उडू लागली. आभाळाकडे बघून लोक म्हणू लागले, 'वारा पाऊस घालवील.' पण तसे झाले नाही. सडासडा धारा आल्या. मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहिला. भटकी कुत्री भिंतीच्या आडोशाला उभी राहिली. लवकर उघडीप होण्याचे दिसेना. धनगरांची धावाधाव झाली. डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोपड्यात आणली. घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली. भिजल्या लोकरीच्या वासाने धनगरांची घरे दरवळली. सरीवर सरी आल्या. तापलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या. धूळ उडाली. चिखल झाला आणि मग तोही वाहून गेला. खडे उघडे पडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काडाने शाकारलेली घरे गळू लागली. सुरेख सारवलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखणू लागली, तेव्हा धनगरणी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहानमोठी भांडी ठेवून दिली. मेंढऱांच्या धडपडीतूनही भरलेल्या भांड्यांत ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला. धाब्याच्या घरातून गळू लागले. तेव्हा डोक्यावर रिकामी पोती घेऊन धनगर माळवदावर चढले. जिथे पाणी साचले होते, माळवदाला भोक पाडून आत शिरत होते, ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हवेमध्ये गारवा आला. धनगरांच्या कुऱ्हाडींवर गंज धरू लागला आणि धनगरणींनी साठवून ठेवलेले मीठ पाझरू लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकी वर काढली. अंगणात, माळवदावर, छपरांवर - जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले. सर्वत्र झगझगीत पोपटी रंग दिसू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंगठ्याच्या नखावर बसू शकतील एवढ्या बारक्या बेडक्या एकाएकी दिसू लागल्या. वाटेने चालताना टणाटण उडू लागल्या. त्यांच्यावर कावळे झडपा घालू लागले. छोटीशी पंखे असलेले किडे हजारो-लाखोंनी उडू लागले आणि साळुंक्या-चिमण्यांनी त्यांचा फडशा पाडला. त्यातून वाचले ते दिवे लागताच त्यांवर झडप घालून मेले. दोन दिवसांनी त्यांची पातळ पंखे ठिकठिकाणी गळून पडलेली दिसली आणि पंख टाकलेले ते लहान अळीसारखे पिवळ्या रंगाचे किडे नाहीसे झाले. विटकरी रंगाचे लांबट वाणी एकमेकांच्या पाठुंगळी बसून अनेक पायांवर चालू लागले. बोटाएवढे काळे वाणी आळशीपणाने इकडेतिकडे करू लागले. माणसा-जनावरांचा स्पर्श होताच वेटोळे घालून पडू लागले. धनगरांची पोरे मुद्दाम हात लावून ते गोल पैसे तळहातातून नाचवू लागली. माशा फार झाल्या. झोपड्यांतून घोंगावू लागल्या. मेंढरांच्या नाकांवर बसू लागल्या. चिलटे फार झाली आणि धनगरांच्या डोळ्यांसमोर उडू लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नांगरून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली. जमिनींनी पाणी पिऊन घेतले. ठिकठिकाणी लहानमोठी डबकी साचली आणि निळ्याकाळ्या आकाशाचे प्रतिबिंब त्यांत दिसू लागले. रानातून जाताना लोकांच्या, मेंढरांच्या, गुरांच्या पायांना चिखलाचे लपके चिकटू लागले. माळरान भिजले आणि हिरव्यागार माळावर काळीभोर मेंढरे हिंडू लागली. आणि त्यांच्या पाठींवर बसून काळे कोतवालपक्षी घोगरा आवाज काढू लागले. कुणाच्याही दृष्टीला न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओरडू लागले."&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बनगरवाडीच्या तुलनेत 'पावसाळी हवे'तलं वर्णन थोडं अलंकारिक असलं तरी, तेव्हाच्या गिरगावातील मध्यमवर्गीय माणसाच्या तोंडी ते कृत्रिम वाटत नाही. खरं तर, 'दक्षिणेकरता पोट सावरत धावणाऱ्या भटजीसारखे ढग','दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा' यासारख्या उपमा आणि चेतनागुणोक्ती अलंकाराचा केलेला सुरेख उपयोग यातून वर्णन खुलतं. बनगरवाडीतल्या त्रयस्थ निरीक्षणाच्या अगदी विरुद्ध, या कथेत बाहेरच्या निसर्गवर्णनाबरोबरच कथानायकाची मन:स्थिती रेखाटण्यावर भर दिला आहे. दोन लेखकांचे, एकाच ऋतूच्या वर्णनाचे दोन वेगळे मार्ग! दोन्हीही तितकेच प्रभावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"रात्रभर उकाड्यानं नुसतं गुदमरून जायला झालं होतं. कधी न धुतलेलं गरम जाकीट घातलेल्या दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा झाली होती. शरीर नुसतं चिवचिवलं होतं. आणि मन निपचित पडलं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण पहाटेच्या सुमाराला धावत्या सरींचे सपकाऱ्यावर सपकारे मारून पावसानं सारं वातावरण थंडगार करून सोडलं. पाणी पिऊन वाऱ्यानं एक भला मोठा थंड सुस्कारा सोडला आणि मग तास-दोन तास ढगांच्या पखाली तुडुंब भरून आणून रित्या करण्याचा त्यानं सपाटा चालवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पायगतीचं पांघरूण अंगावर घेऊन मी त्यात गुरगुटलो. जागेपणीच झोपेची सुस्ती मी अनुभवली. एक प्रकारची सौम्य प्रसन्नता येऊन मला बिलगली. आणि जलबिंदूंनी डवरलेल्या अर्धोन्मीलित मोगऱ्याच्या कळीप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली. हातातला खाऊ थोडा-थोडा खाऊन, तो खूप वेळ पुरविणाऱ्या लहान मुलाप्रमाणे मी कंजूषपणे तो आनंद थोडा-थोडा उपभोगीत होतो. मनाच्या गळक्या भांड्यात सुखदु:खं साठवून ठेवता येत नाहीत हे मला माहीत नव्हतं थोडंच! पण सुखाला आचवलेल्या ह्या दरिद्री जगात माणसाच्या मनाचा असाच संकोच होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळानं संधिप्रकाश कुठून तो झिरपू लागला. आणि पाय आखडून गाढ झोपी गेलेल्या कांदेवाडीतल्या कंगाल इमारतींच्या अंगावरचं अंधाराचं मळकं ठिगळं लावलेलं वस्त्र त्यानं दूर केलं. फाटक्यातुटक्या लक्तरांप्रमाणे दिसणाऱ्या त्या इमारतींच्या कळकट कौलांच्या झिंज्यातून पाणी ठिपकत होतं. आणि खिडक्यांचे डोळे किलकिले करून त्या बावळटपणे पावसाकडे पाहत होत्या. इतक्यात कुठचंसं दार कुरकुरलं, 'ऊं ऽ ऽ ऽ. मी नाही जा!'&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटलं की, कोणाच्यातरी कुशीत डोकं खुपसून आपणदेखील तसंच कुरकुरावं. मी पांघरूणात अधिकच गुरगुटलो, आणि त्या नुसत्या कल्पनेनंच मनातलं समाधान इतकं ओसंडलं की ते कुठं साठवावं ते मला दरिद्र्याला कळेना!&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरम चुलीमागे बसून डोळे मिटून गुरगुरणाऱ्या मांजराप्रमाणे मी कितीतरी वेळ बिछान्यात पडून होतो. पण हळूहळू ती सौम्य प्रसन्नता झिरपून गेली. आणि मनाचं भांडं रिकामं झालं. घड्याळाची टिकटिकदेखील ऐकायला येऊ लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात घरातल्या दिव्याचं बटन वाजलं. उजेडाचा एक लांबट चौकोन जमिनीवर उमटला. माझी आणि त्याची फार जुनी मैत्री! एके काळी माझ्या आईनं बटन दाबलं की, तो माझ्या अंथरुणाशेजारी येऊन बसत असे. आता बायकोच्या संसारदक्षतेच्या तो हकीगती सांगतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळानं स्टोव्हचं गाणं सुरू झालं. मध्यमवर्गीय संसाराच्या सुखदु:खाचं ते गाणं मी अनेकदा ऐकलं असेल. पण त्या वेळी त्या गाण्यातलं सारं कारुण्य माझ्या हृदयाला जाऊन भिडलं. आणि एका स्निग्ध खिन्नतेचा एकएक थेंब अगदी सावकाशपणे माझ्या मनात ठिपकू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाधान आणि खिन्नता ह्यांचं इतकं जवळचं नातं आहे की, माझ्या मनातल्या समाधानाची खिन्नता आणि खिन्नतेचं समाधान केव्हा होतं ते माझं मलाच कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या आळसट, नाजूक अनुभूतीचा डाव कुजेल अशी भीती वाटायला लागली, तेव्हा चटकन उठून गॅलरीत आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वात्रट वारा अधूनमधून आपले ओले हात झाडून पावसाचे शिंतोडे उडवीत होता. वाळत घातलेले कपडे जागच्या जागी खिदळत होते. टेलिफोनच्या तारांवरून भराभर सरकत जाऊन खाली उड्या घ्यायचा खेळ काही थेंबांनी चालवला होता. रस्त्यात मोकळ्या सुटलेल्या एका वासरानं एकदम कान टवकारले, नाक फेंदारलं, आणि आपल्या शेपटीचा गोंडा हवेत झुलवत ते तिरप्या उड्या मारीत उधळलं. आणि एक कुत्रा मारे उसन्या वीरश्रीनं त्याचा पाठलाग करीत मोठमोठ्यानं भुंकू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशात ढगांचं गढूळ पाणी साठून राहिलं होतं. आणि शेणानं सारवलेल्या टोपलीखाली कोंबडीची पिलं झाकून ठेवलेली असावी, त्याप्रमाणे मुंबईवर ढगांचं झाकण पडलं होतं."&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-3559503329399402109?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/06/blog-post_24.html' title='पाऊस -- बनगरवाडीतला आणि कांदेवाडीतला'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/3559503329399402109/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=3559503329399402109' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/3559503329399402109'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/3559503329399402109'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/06/blog-post_24.html' title='पाऊस -- बनगरवाडीतला आणि कांदेवाडीतला'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-4792562480807416963</id><published>2007-06-11T17:36:00.000-07:00</published><updated>2007-06-11T17:49:22.741-07:00</updated><title type='text'>पुलंच्या साहित्यावरील प्रश्नमंजुषा</title><content type='html'>पुलंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ही छोटीशी प्रश्नमंजुषा. केवळ &lt;u&gt;विरंगुळा&lt;/u&gt; हाच यामागचा उद्देश आहे. कृपया उत्तरे लेखाला प्रतिसाद म्हणूनच द्यावीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बऱ्याच वाचकांचे/अनुदिनी लिहिणाऱ्यांचे वाचन -- त्यातूनही पुलंच्या पुस्तकांचे; दांडगे असल्याने प्रश्नांत थोडा अवघडपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. [उदा. पहिल्या प्रश्नातील गाळलेल्या जागेचे उत्तर ध्वनिमुद्रिकेत सापडणार नाही, फक्त मूळ लेखातच सापडेल :)]&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रश्नांव्यतिरिक्त कुणाच्या स्मरणात पुलंची अशीच थोडी आव्हानात्मक वाक्यं असतील, तर प्रतिसादाच्या विषयात 'अधिक प्रश्न - १/२...' असे लिहून ही साखळी पुढे वाढवता येईल. लवकरच मी या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादात देईन. धन्यवाद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. अस्सल मुंबईकराचा जीव ताजमहाल हॉटेलात हल्ली __ (२) सुद्धा मिळते हे ऐकून तडफडतो. [खिल्ली]&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. पण राजहंस जमून गेला. असल्या हंसाची हिंसा करू पाहणाऱ्या नळाला अजिबात _______ (६) नसावा. [पाळीव प्राणी]&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. ___ (३)म्हणजे वानर! इंग्रजीत ह्याला मंकी डान्स असेच म्हणतात. पण ही वानरे साधीसुधी नव्हेत. अशोकवनातल्या सीतेच्या सुटकेसाठी धडपडणारी, श्रीरामप्रभूंच्या वानरसेनेतली ही वानरे. [पूर्वरंग]&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान ___ (३) प्रतिशत तरी मिळावेत. [व्यक्ती आणि वल्ली]&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. "बापूशेठ, पाव्हणे लेखक आहेत हो. आमच्या __ __ (२,२) सारखी नाटकं लिहिलं आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फर्मास फार्सं." [व्यक्ती आणि वल्ली]&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. मी निमूटपणाने सगळ्यांना घेऊन बाहेर गेलो. त्यांची तहान भागवली. शंकऱ्याला ____(४)ची तहान लागली होती. शरीला ऑरेंजची. [असा मी असामी]&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. 'स्त्री' म्हणजे मधल्या सुट्टीत सागरगोटे खेळणारी आणि अधूनमधून 'ए, माला दे ना चिंच' म्हणून आमच्यासमोर तोंडे वेंगाडणारी वस्तू येथपासून तो छबू लोखंडेला 'मिस लोखंडे' म्हणण्यापर्यंतचा आमचा मानसिक विकासही सोबतीसोबतीनेच झाला होता. तोच अंतू आठ दिवसांपूर्वी मला '__ ___ (२,३) आहे' हे सौंदर्यवाचक विधान आहे म्हणून सांगू लागला. [गोळाबेरीज]&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. कृष्ण चालले वैकुंठाला। राधा विनवी पकडुनि बाही। इथे ___ (३) खाऊनि घे रे। तिथे कन्हैय्या ___ (३) नाही॥ [पानवाला]&lt;br /&gt;&lt;br /&gt;९. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ' म्हणणारी माणसं भेटली - शिवाजीनगरला ___ (३) म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनाला 'शीव' म्हणणारा माणूस दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. [पुरचुंडी]&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०. कॉलेजच्या पोर्चमध्ये नायकाची वाट पाहत उभी असणारी नायिका ही फक्त फडक्यांच्याच कादंबरीत असते हे आमच्या सगळ्या गँगने ओळखले होते. शेवटी सगळे ___(३)-तुकारामच! [दाद]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-4792562480807416963?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='पुलंच्या साहित्यावरील प्रश्नमंजुषा'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/4792562480807416963/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=4792562480807416963' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4792562480807416963'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/4792562480807416963'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='पुलंच्या साहित्यावरील प्रश्नमंजुषा'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-7475597068800480476</id><published>2007-05-03T21:59:00.000-07:00</published><updated>2007-05-03T22:04:19.164-07:00</updated><title type='text'>मी सखाराम गटणे</title><content type='html'>"मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणाऱ्या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही. त्या एवढाल्या वाड्यात, आजारी आजी आणि घनघोर बाप सोडला तर फक्त मी आणि आईची मागे राहिलेली पुस्तकं. आसपास कोणी माझ्या वयाची मुलंही नव्हती. त्यामुळे पुस्तकं वाचणं आणि न आठवणाऱ्या आईच्या आठवणींत बुडून जाणं एवढाच दिनक्रम उरला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आप्पा दिवसभर त्यांच्या दुकानांवर. घरी यायचे ते पण रात्र उलटून गेल्यावर. मला कधी मारलं नाही हे खरं, पण त्यांचा दराराच एवढा होता, की माझ्या हातून कुठलीच चूक होणं शक्य नव्हतं. आईवेगळ्या मुलाला वाढवताना फक्त शिस्तच पुरेशी नाही हे त्यांना बहुधा कळत असावं, पण मायेनं बोलणं त्यांना जमायचं नाही. दिवसभराच्या दगदगीतून घरी आल्यावर मी काही खोड्या करत नाही, एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. तेव्हा मी असून नसल्यासारखाच. कधीतरी मध्येच कितवीत आहेस, प्रगतिपुस्तक बघू वगैरे रुंद गडगडाटी आवाजात चौकशा होत. मनातल्या मनात मी त्यांना 'आप्पा बळवंत' नाव ठेवून दिलं होतं. खरं तर त्या चौकात आप्पांचं दुकान आहे, म्हणूनच त्याला तसं नाव पडलं अशी माझी बरेच दिवस पक्की समजूत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा वेळी कधी सठीसामाशी येणारे पाहुणे, आप्पांचे मित्र वगैरे घरी आले; की जरी मला बुजायला झालं तरी फार बरं वाटायचं. माझ्या सद्गुणी स्वभावाचं, वाचनाच्या वेडाचं खूप कौतुक व्हायचं. मग एरव्ही एका गोड शब्दाला पारखा असलेला जीव फुलून यायचा. लोक आपल्याला चांगला म्हणताहेत, तेव्हा आपण जसे वागतोय तसंच वागत राहिलं पाहिजे असं काहीसं तेव्हा माझ्या मनानं घेतलं असावं. शाळेतल्या इतर मुलांपासून मग अधिकच वेगळा पडू लागलो. कुणी शिव्या दिल्या, मस्ती केली तर त्यांना मनातल्या मनात नाक मुरडू लागलो. माझ्या तेव्हाच्या पुस्तकी भाषेत बोलायचं झालं तर, साने गुरुजींची माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात अशी प्राणप्रतिष्ठा झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटतं, त्या वयात कोणी तरी एक हिरो लागतोच. आजच्यासारखा त्या काळात सिनेमा, क्रिकेट, नाटकं यांच्यात हिरो शोधायचा पर्याय तेव्हा नव्हता. आपसूकच साहित्यिकांना 'फॉलो' करू लागलो. व्याख्यानांना जाऊ लागलो. उगाच प्रगल्भता, अल्पाक्षररमणीयता, विचक्षण, नेणीव, आल्हाददायक, विश्रब्ध, हृदयंगम असले शब्द कानावर पडले की पोपटासारखा त्यांचा अर्थ न समजता त्यांचा वापर करू लागलो. 'पण'च्या ऐवजी परंतु, खरं तर'च्या ऐवजी 'वस्तुतः' असं कृत्रिम लिहून, निरर्थक मोठमोठे शब्द वापरून 'गटणेचं मराठी चांगलं आहे' असं कौतुक शाळेत पदरात पाडून घ्यायची सवय लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हाचे बहुतेक लेखक म्हणजे आदर्शवादाने भारलेले. त्यांना शिष्य मिळाला तोदेखील माझ्यासारखा. मग काय? जिथे तिथे जीवनविषयक सूत्रे शोधायची खोड लागली. 'योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत नाहीत' ऐकल्यापासून फक्त बोधप्रद पुस्तकेच वाचायची ठरवलं. बोजड पुस्तकं, काही कळत नसताना 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' असं मनाशी घोकत घोकत वाचली. सेल्फ-पिटी म्हणतात तसं, स्वत:लाच 'परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे' असं समजावू लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असंच एक दिवस एका नवीन लेखकाचं व्याख्यान होतं. त्यांची तोवर छापून आलेली प्रत्येक ओळ जरी मी वाचली असली तरी 'या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही' ही ओळ माझ्या विशेष आवडीची होती. आप्पांच्या अंगवस्त्रांची गावभर होणारी चर्चा माझ्या तेव्हा कानी असेल म्हणून किंवा त्या अडनिड्या वयातील एक मूड स्विंग म्हणून असेल, पण ते वाक्य वाचल्यानंतर त्यांना भेटायचंच हे ठरवलं होतं. त्यांच्या व्याख्यानाला गेलो, त्यांची स्वाक्षरी घेतली आणि मार्गदर्शन घ्यावं म्हणून त्यांच्या घरीही गेलो. असो, पुढची गोष्ट मी पुन्हा सांगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हा सगळ्यांना ती चांगलीच ठाऊक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी रातोरात नसलं, तरी माझं नाव, माझी बोलायची पद्धत, डबक्यावर शेवाळ साठावं तशा शब्दांत पुस्तकांचा केलेला पंचनामा इथपासून ते साने गुरुजींचा फोटो, माझं लग्न, मुलाचा जन्म इथपर्यंत सारं काही जगजाहीर झालंय. माझं नाव घेऊन मग अलंकारिक शैलीचा सोस असणाऱ्या, पुस्तकांच्या जगात नुकतंच पाऊल पडलेलं असलं तरी सारं काही वाचून झालेलं आहे अशा भ्रमात वावरणाऱ्या तरुण कुमार मंडळींना मग 'गटणे' म्हणून चिडवण्याची फॅशनच पडून गेली आहे. अजूनसुद्धा पाचवीतला नातू शाळेत मला 'गटणे' म्हणून चिडवतात अशी तक्रार घेऊन कधीकधी घरी येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझं खासगी आयुष्य असं जाहीर झाल्याबाबत, किंवा माझं नाव ही एक चिडवण्याची गोष्ट बनल्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आयुष्य ('जीवन' म्हणायचे तेव्हाच सोडले) ही काही फार सीरियसली घ्यायची गोष्ट नाही, हे जरा उशीरानेच का होईना पण समजलं खरं. तेव्हापासून उगाच कुढत राहून शिष्ट मोठेपणा मिरवण्यापेक्षा वागण्यात बराच मोकळेपणा आला. जमेल तितकं जग पाहिलं, कधी आदिवासी वस्त्यांत राहिलो तर कधी परदेशात. शक्य तेवढे वेगवेगळे अनुभव घ्यायचा प्रयत्न केला. पूर्वीच्या भिडस्त मध्यमवर्गीय चाकोरीबाहेर पडायचा प्रयत्न केला. उगाचच 'जीवन त्यांना कळले हो' वगैरेचा आव आणत नाही, पण पूर्वी आपण अगदीच 'हे' होतो, हे मात्र जाणवलं आणि मग जरा सुधारायचा प्रयत्न केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या मुलगा पेढीवर बसतो. हो, सोनगावकर सराफांच्याच. देशाबाहेरही धंदा वाढवण्याचे प्लॅन्स आहेत. मी आणि ही, आमच्या माथेरानच्या बंगल्यात निवांत राहतो. साने गुरुजी, पु. लं. यांची पारायणं केव्हाच झालीत. पण बाबा कदम, भाऊ पाध्ये, नेमाडे करत करत सध्या कमलेश वालावलकर, मकरंद साठे वाचतोय. (अगदीच जर दम्यासारखी जुनी सवय उबाळून आली तर वपु वाचतो.) वेगळं लिहितात फार. बाकी, नातवंडं मजेत आहेत. मुलगा-सून कर्तबगार आहेत. सारं काही 'एथास्थित' सुरू असल्याचा टिपीकल मध्यमवर्गीय स्मगनेस अलीकडे फारच जाणवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, काही वर्षांपूर्वी भाई गेले. ते असेपर्यंत दर दसऱ्याला त्यांच्या घरी जाऊन सोने द्यायचो. 'कधीच सीमोल्लंघन केले नसले तरी न चुकता सोने देणारा माणूस' या जुन्या विशेषणाने सुरुवात व्हायची आणि मग 'केतकी पिवळी पडली' पासून 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' पर्यंतच्या त्या आठवणींना उजाळा मिळायचा. आता अगदीच आठवण आली तर त्यांची 'सखाराम गटणे'ची कॅसेट लावून बसतो. आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिऱ्हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. "&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-7475597068800480476?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='मी सखाराम गटणे'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/7475597068800480476/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=7475597068800480476' title='30 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7475597068800480476'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/7475597068800480476'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='मी सखाराम गटणे'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>30</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-3121046058907994389</id><published>2007-04-24T11:47:00.000-07:00</published><updated>2008-11-13T07:16:01.683-08:00</updated><title type='text'>ह्या गंगेमधि गगन वितळले</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_hNNq0MZh_QY/Ri5SgUDtRmI/AAAAAAAAAA8/LCqIWFBANP4/s1600-h/Banganga.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5057070146677196386" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_hNNq0MZh_QY/Ri5SgUDtRmI/AAAAAAAAAA8/LCqIWFBANP4/s400/Banganga.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;em&gt; (All Image copyrights to &lt;a href="http://www.flickr.com/photos/rkmenon/"&gt;Ravi Menon&lt;/a&gt;)&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा&lt;br /&gt;अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा&lt;br /&gt;&lt;br /&gt;विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप&lt;br /&gt;अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी&lt;br /&gt;आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती&lt;br /&gt;उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता&lt;br /&gt;उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा&lt;br /&gt;असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मर्ढेकरांची ही कविता वाचताना, का ते माहीत नाही, पण हटकून माझ्या डोळ्यासमोर मुंबईतल्या बाणगंगा मंदिराचा तलाव येतो. तसं पाहिलं तर, कुठलेही पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर ज्या प्रतिमा उभ्या राहतात, त्या आपल्या अनुभवविश्वाच्या संचितातूनच परत वर येत असतात. एखाद्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील पुस्तकातली वर्णने वाचताना, आपल्या नकळत आपला गाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोच की. त्यामुळे मुंबईतीलच एखादी प्रतिमा या कवितेमुळे माझ्या मनात उभी राहणे हे साहजिकच आहे. अर्थात, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग झाला. दुसरं कारण असं असावं की, मर्ढेकर हे मराठीतील पहिलेच 'महानगरीय' कवी असावेत. निसर्ग, प्रेम, चांदणे, हृदयभंग यांच्याबाहेर पडून शहरातील - आणि विशेषतः मुंबईतील अनुभवांचे चित्रण करणारे. त्यामुळे ही कविता मर्ढेकरांना या (बाण)गंगेच्या पायऱ्यांवर बसून समोरच्या तलावातील आकाशाचे वितळलेले प्रतिबिंब पाहत पाहत, 'देव आहे की नाही? असलाच तर त्याचे काम काय?' असा विचार करत असताना सुचली असावी, असं मला सतत वाटत राहतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा तो वापरण्यामागचे प्रयोजन मला पूर्णपणे कळले आहे असे नाही, पण तिचा एकंदर आशय किंवा मूड थोडाफार पकडता येतो. 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी' असे म्हटले तरी प्रत्येक गोष्ट, भावना बुद्धीच्या निकषांवर घासून तिचे स्पष्टीकरण देता येतेच असे नाही. विमनस्क परिस्थितीत, अतर्क्य अवस्थेत मग हे दैववादाचे 'विटाळलेले झापडदार' किलकिले होऊ लागते. एकदा का, 'तूच कर्ता आणि करविता' मान्य केले की ज्या प्रश्नांची उत्तरे आपली तर्कशक्ती देऊ शकत नाही असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांच्यातले दोन ध्रुवांतले अंतर शिवले जाते. खूप वेळ भेडसावणाऱ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळणे किती सुखद आहे! आजवर अंतर्मनात, नेणीवेत दडपून ठेवलेले, स्वतःलाच कायम विचारलेले हे प्रश्न मग जाणीवेत येऊन हा सुखद उतारा, हा गगनगंध भरून घेतात. एकदा या दृष्टीने मग जगाकडे पाहिले, तर मग सगळ्या चराचरावर त्याचेच राज्य, त्याच्याच मायेची कमान दिसू लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथवर जरी कवितेचा अर्थ नीट लागत असला, तरी शेवटची परमेश्वराला 'असशील जेथे तिथे रहा तू' बजावणारी ओळ म्हणजे केवळ - 'देव शोधण्यासाठी देवळात जायची गरज नाही, या इथल्या फवाऱ्यात, सभोवतीच्या सृष्टीतच तो लपलेला आहे' अशा काहीशा बाळबोध अर्थाची असेल असा निष्कर्ष काढणे सयुक्तिक वाटत नाही. पण मग, आपल्या ढासळलेल्या 'अहम्'ची कबुली देणाऱ्या कडव्यानंतर अचानक हे आत्मभानाचा प्रत्यय येणारे कडवे का यावे? तात्पुरती चलबिचल झाली, तरी पुन्हा 'व्हेन रीझन रिटर्न्स टू इटस थ्रोन' झाले की जसा नव्याने आत्मविश्वास येतो ते दर्शविण्यासाठी? किंवा यापेक्षा तिसरेच काहीतरी अपेक्षित आहे किंवा काहीच नाही? मला वाटतं, याचं उत्तर प्रत्येकाने आपल्यापुरतं ठरवावं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही हवीहवीशी वाटणारी 'किंचित' दुर्बोधता/अनिश्चितता वाचकाला -- शांताबाई शेळकांच्या शब्दांत सांगायचे झाले तर '&lt;a href="http://www.manogat.com/node/10025#comment-97291"&gt;जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही&lt;/a&gt;' सारखी अनुभूती देणारी -- मर्ढेकरांच्या कवितांच्या इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल.&lt;br /&gt;(छायाचित्र &lt;a href="http://www.flickr.com/photos/rkmenon/305583177/"&gt;येथून&lt;/a&gt; साभार)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-3121046058907994389?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='ह्या गंगेमधि गगन वितळले'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/3121046058907994389/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=3121046058907994389' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/3121046058907994389'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/3121046058907994389'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='ह्या गंगेमधि गगन वितळले'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_hNNq0MZh_QY/Ri5SgUDtRmI/AAAAAAAAAA8/LCqIWFBANP4/s72-c/Banganga.jpg' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-5898999143141428315</id><published>2007-01-09T03:02:00.000-08:00</published><updated>2007-10-04T13:00:29.811-07:00</updated><title type='text'>ब्र</title><content type='html'>कविता महाजनांनी लिहिलेले 'ब्र' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. एका सामान्य गृहिणीने नकोशा झालेल्या संसाराचे जोखड दूर करून पूर्णवेळ समाजसेवा करणारी कार्यकर्ती व्हायचे ठरवल्यावर तिला आलेले वेगवेगळे अनुभव, त्या अनुषंगाने तिची स्वत्व शोधायची धडपड, येणाऱ्या कडू-गोड अनुभवांवरून आपण जो काही नवीन मार्ग निवडला आहे तो कितपत योग्य आहे आहे असा पडणारा संभ्रम आणि या साऱ्याला समाजसेवी संस्थांच्या आदिवासी भागात चालणाऱ्या कामाची पार्श्वभूमी असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तोकड्या अनुभवविश्वामुळे मराठीत कसदार साहित्य निर्माण होत नाही, ह्या आरोपाला/समजाला काही प्रमाणात का होईना, हे पुस्तक छेद देते. विभक्त झाल्यावर लेखिकेने स्वतः ठाणे येथील आदिवासी श्रमजीवी संघटनेत आणि टाटा समाजविज्ञान संस्थेच्या प्रकल्पात काही वर्षे काम केले. आदिवासी वस्त्यांत पायपीट करून, तेथे राहून आलेले अनुभव नोंदवले. त्यामुळे लेखनातला सच्चेपणा सहज जाणवतो. आपल्या शहरी खोलीत टेबलापाशी बसून या विषयावर लिहिलेली बरीच पुस्तके 'साच्याबाहेरील आयुष्याची साचेबंद कहाणी' या सदरात मोडतात. सुदैवाने तसे 'ब्र' बाबत होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाची सुरुवात आश्वासक आहे. कथानायिका प्रफुल्ला लेखिकेप्रमाणेच फाईन आर्ट्सचे रीतसर शिक्षण घेतलेली, परंतु लग्नानंतर कॅनवासमधे रंग भरायला विसरून गेलेली आहे. पण निसर्गाची रुपे टिपताना नेहमीच्या घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांपेक्षा एक निराळीच शब्दकळा वर्णनात दिसून येते. वेगळा रस्ता निवडल्यावर, पूर्वी सभोवती असणारे पण न जाणवलेले रंग/पर्याय खुणावू लागतात, त्याचेच हे प्रतीकात्मक वर्णन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;सकाळी दार उघडलं आणि खिळून राहिले.&lt;br /&gt;उजळलेलं आकाश आणि डोंगरांची रांग.&lt;br /&gt;रात्री आले, तो वळणं घेत येणारा डांबरी रस्ता स्वच्छ दिसत होता. त्याच्या दोन्ही&lt;br /&gt;बाजूंनी डोंगरापर्यंत पोचलेली हिरवी झाडं. काही गुच्छागुच्छांनी उभी तर काही&lt;br /&gt;एकएकटी. मध्ये सगळीकडे पसरलेलं पिवळं गवत... गुडघाभर उंचीचं असणार. झुडपंही वाळून&lt;br /&gt;गेलेली. पण हिवाळ्याच्या गेल्या दोन महिन्यांत गवतात जो लालसरपणा दिसत होता, तो&lt;br /&gt;उन्हाळ्याच्या चाहुलीनं वितळला होता. मध्यंतरी एकदा असंच फिरतीवर असताना सलग काही&lt;br /&gt;दिवस हा व्हॅन गॉगच्या चित्रांमधला लालसर पिवळा रंग पाहून पाहून डोकं भणाणून गेलं&lt;br /&gt;होतं. डोळे दुखायचे. वाटायचं, महिनाभर या गवतासोबत राहण्याची वेळ आली, तर मी नक्की&lt;br /&gt;वेडी होणार. आता बदल होताहेत हे पाहून डोळे निवळले.&lt;br /&gt;मधल्या पठारांवर लहान लहान&lt;br /&gt;वाड्या दिसत होत्या. मधून नदी वाहत असावी असा अंदाज येत होता, पण पाणी दिसत नव्हतं.&lt;br /&gt;बारीक धार असावी. कातकऱ्यांची काही सुटी सुटी घरं दिसत होती. दारू गाळण्यासाठी&lt;br /&gt;नदीकाठ सोयीचा. आणि महादेव कोळ्यांप्रमाणे येथील कातकऱ्यांकडे स्वतःचा काही&lt;br /&gt;जमीनजुमला नाही, असं महावीर सांगत होता रात्री. एका घरातून पहिला धुराचा लोट उठला.&lt;br /&gt;चूल पेटली असणार.&lt;br /&gt;हळूहळू मला समोर कागद असल्याचा भास होऊ लागला.&lt;br /&gt;बोटांमध्ये&lt;br /&gt;शिरशिरी उठली.&lt;br /&gt;जलरंगांच्या छटा शुभ्र बशीमध्ये तयार होऊ लागल्या. रंगाचा एकेक पातळ हलका थर&lt;br /&gt;कागदावर उमटू लागला.&lt;br /&gt;ही आकाशाच्या फिकट निळेपणापासून उजळ सुरुवात.&lt;br /&gt;ढगांच्या&lt;br /&gt;पांढुरक्या तुकड्यांच्या जागी ब्रश अलगद उचलून कागद तसाच पांढरा सोडून द्यायला&lt;br /&gt;हवा.&lt;br /&gt;मग डोंगरावरच्या मातकट लाटा.&lt;br /&gt;यलो ऑकर, इंडियन रेड, सॅप ग्रीन, सेपिया...&lt;br /&gt;रंगांची नावंही आठवू लागली. किती वर्षांनी.&lt;br /&gt;रस्ता ओलांडून रंग अलीकडे येतायेता&lt;br /&gt;मध्येच एका उंच पर्णहीन झाडावर तीन भलेमोठे तुरे होते... एखाद्या उत्सवाच्या&lt;br /&gt;सजवलेल्या काठ्या असाव्यात तसे फुलांनी माखलेले. फिकट जांभळी फुलं. पांढऱ्यासोबत&lt;br /&gt;थोडा जांभळा, थोडा लाल, मधूनच जाणवेल न जाणवेल अशी निळी छटा.&lt;br /&gt;रंगांचे थर वळत वळत&lt;br /&gt;कागदाच्या खालच्या उजव्या टोकाकडे आले. थांबले.&lt;br /&gt;समोर पायरीजवळच्या कुंडीत एक मोठं लालस पान दोन नव्या पानांना वाढू देण्यासाठी&lt;br /&gt;अंग मुडपून घेऊन बसलं होतं. नव्या कोवळ्या पानांचा पारदर्शकपणा अजून गेला नव्हता,&lt;br /&gt;त्यांतून प्रकाश पाझरत होता.&lt;br /&gt;चहूबाजूंना पाहिलं. किती चित्रं! कधीच संपणार नाहीत&lt;br /&gt;कितीही जणांनी रंगवली तरी.म्हटलं, आता दुसरा कागद घ्यावा...&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;यापुढे मग कथानायिकेला आदिवासी पाड्यांवर आलेले वेगवेगळे अनुभव, तथाकथित समाजसेवी संस्थांची प्रत्यक्ष कामाऐवजी अहवाल आणि सादरीकरणावर भर देऊन अधिकाधिक मदत पदरात पाडून घ्यायला चाललेली धडपड, वाडवडिलांची संस्कृती आणि नवीन यंत्रयुग यात नवीन आदिवासी पिढीची होणारी कुचंबणा असे वेगवेगळे टप्पे घेत पुस्तक पुढे सरकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसं पाहिलं तर आदिवासी स्त्रियांची आणि शहरी स्त्रियांची दु:खं वेगळी, तणाव वेगळे. पण कुठेतरी दोघींचा सांधा जुळलेला आहे. शिकून-सवरून, कमावत्या होऊनही स्त्रियांच्या वाट्याला येणारे शोषण काय किंवा इतर समाज ज्यांना पायदळी तुडवतो त्या आदिवासी समाजाच्या स्त्रियांना घटनादुरुस्तीनंतर राजकीय अधिकार मिळूनही वाट्याला येणारी अवहेलना काय; दोन्ही गोष्टी म्हणजे प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाचेच वेगवेगळे स्वरूप. अंगावर येणाऱ्या अलिप्ततेने लेखिका आपल्या जिवलग मैत्रिणीचा बळी घेणाऱ्या मुंबईतील त्या अपघाताचे वर्णन करते. [बहुधा कॉनरॅड रिक्टरच्या 'द ट्रीज' या कादंबरीचा येथे संदर्भ आहे. जी. एं. नी तिचा मराठीत 'रान' म्हणून अनुवाद केला आहे. कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.]&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;"त्या जंगलात चोविसोतास रात्रीसारखा अंधार असतो. प्रचंड उंचीची झाडं प्रकाशाला&lt;br /&gt;प्रवेशबंदी करीत असतात. जेव्हा पानगळ असते, तेव्हाच सूर्यकिरण पाचोळ्यावरून पावलं&lt;br /&gt;टाकू शकतात. असंख्य प्रकारचे पशूपक्षी तिथं अर्थातच मुक्तपणे वावरत असतात. अशा या&lt;br /&gt;प्रचंड जंगलाला अचानक वणवा लागतो. आगीची धग लागताच प्राणी सैरभैर&lt;br /&gt;होतात.&lt;br /&gt;शेकडो-हजारो खारींच्या झुंडी जीव वाचवण्यासाठी वणव्याच्या विरुद्ध दिशेनं&lt;br /&gt;धावू लागतात. इकडंतिकडं मागंपुढं न पाहता तोंडातून चित्कारही बाहेर पडू शकणार नाही&lt;br /&gt;अशा अफाट वेगानं त्या धावत सुटतात. एका झुंडीमागोमाग दुसरी झुंड... भयाच्या स्थितीत&lt;br /&gt;वेगाच्या नादात जंगल मागे पडून ओढा लागल्याचं त्यांच्या ध्यानातही येत नाही.&lt;br /&gt;झुंडीमागोमाग झुंडी त्या खळाळत वाहणाऱ्या पाण्यात कोसळतात.&lt;br /&gt;काही वेळानंतर चपळ&lt;br /&gt;हालचालींच्या, लुकलुकत्या डोळ्यांच्या, झुबकेदार मोठ्या शेपट्यांच्या खारींची&lt;br /&gt;असंख्य इवली इवली प्रेतं त्या पाण्यावर तरंगत असतात."&lt;br /&gt;पाच-सात वर्षांपूर्वी&lt;br /&gt;वाचलेल्या कॉनरॅड रिक्टरच्या एका कादंबरीतील हा प्रसंग पुन:पुन्हा मनावर आघात करीत&lt;br /&gt;आठवत राहिला.&lt;br /&gt;पुन्हा तसंच डोळ्यांत पाणी उभं राहिलं.&lt;br /&gt;प्रसंग तोच होता. तशीच पुनरावृत्ती&lt;br /&gt;होती. फरक एवढाच की, झाडांच्या जंगलाऐवजी इमारतींचं जंगल होतं. वाहनांचा गजबजाट&lt;br /&gt;होता. पाचोळ्यासारखी माणसं होती. त्यांना उद्दामपणे तुडवणारे असंख्य यांत्रिक&lt;br /&gt;राक्षसी पाय होते.&lt;br /&gt;एक लेडीज स्पेशल लोकल होती. आगीची आशंका होती. धुराची खूण&lt;br /&gt;होती. मृत्यूची भीती होती. जीव वाचवण्याची नैसर्गिक ओढ होती. पाऊस होता. अंधार&lt;br /&gt;होता. मृत्यूचं आमंत्रण घेऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या लोकलचं भान नव्हतं. नंतर&lt;br /&gt;कोलाहल होता. भयाण विचित्र शांतता होती. प्रेतांचीही रांग होती. अस्फुट हुंदके&lt;br /&gt;होते. हंबरून रडणं होतं.&lt;br /&gt;सगळं तेच तसंच पुनरावृत्त झालेलं होतं संदर्भ बदलून.&lt;br /&gt;खारीसारखी चपळाई देहात मुरवलेल्या या तमाम नोकरदार बायका, जिवंत डोळ्यांच्या,&lt;br /&gt;झुबकेदार कर्तृत्वाच्या... भयानं त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं...&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;पुढे मात्र स्त्रियांच्या नागरी-ग्रामीण समस्यांचे हे समांतर चित्रण मागे पडून स्थानिक स्वराज्य संस्थांत स्त्रियांसाठी राखीव ३३% जागांमुळे प्रस्थापित राजकारण्यांची झालेली तगमग; स्त्री सरपंच हे आपल्या हातातले कळसूत्री बाहुले म्हणून रहावे म्हणून त्यांनी अवलंबलेले मार्ग आणि या साऱ्यांना ज्या स्त्रिया पुरून उरल्या त्यांचे वेगवेगळे अनुभव हा वर्णनाचा मुख्य भाग बनतो. नवऱ्याला किंवा सासूला फूस लावून घरातूनच स्त्री सरपंचाचे खच्चीकरण करणे, नियमांची व हक्कांची अपुरी माहिती देणे, स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करायला अटकाव करणे इत्यादी अनेक गोष्टी मग वेगवेगळ्या स्त्रियांच्या अनुभवकथनातून पुढे येतात. त्यातच मग समाजसेवी संस्थांत झालेली कार्यकर्ता आणि व्यवस्थापक अशी दुफळी, आदिवासी - शहरी/स्थानिक - बाहेरचे असा कार्यकर्त्यांतच होणारा संघर्ष, पती-पत्नी संबंधांना आलेले व्यावसायिक स्वरूप असे निरनिराळे भाग या अनुभवांच्या कोलाजाचा एक भाग बनतात.&lt;br /&gt;अशीच एक वेगळी हकीकत --&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;हिराबाईला पहिलाच मुलगा झाला आणि त्याच्या अंगावर पांढरे डाग असल्याचं लक्षात&lt;br /&gt;आलं. पाड्यापाड्यावर चर्चा सुरू झाली. शेवटी भगताला बोलावलं. भगतानं सुपात तांदूळ&lt;br /&gt;पाहून सांगितलं की पोरगा बरंभ्याचा (भुताचा) आहे.&lt;br /&gt;हिराबाईनं मुकाट्यानं&lt;br /&gt;प्रायश्चित्त घ्यायचं मान्य केलं. पंचांना दारू न् कोंबडीचं जेवण यासाठी सांगितलेले&lt;br /&gt;पैसे दिले. गावाबाहेर सात भोंगे -- म्हणजे वाळलेल्या गवताच्या लहान झोपड्या एका&lt;br /&gt;रांगेत तयार करण्यात आल्या. त्या एकदम पेटवल्या आणि त्या पेटलेल्या साती&lt;br /&gt;झोपड्यांतून आरपार धावत हिराबाई पलीकडे गेली. अंग भाजलं, पण जातीबाहेर काढलं&lt;br /&gt;जाण्याची नामुष्की टळली.&lt;br /&gt;हा अनुभव हिराबाई कधीच विसरू शकणार नव्हती. पण वाईट&lt;br /&gt;घटनाही चांगले धडे शिकवून जातात अनेकदा, तसं तिच्याबाबतीत झालं.&lt;br /&gt;निवडणुकीच्या&lt;br /&gt;वेळी तिनं थेट भगतालाच हाताशी धरलं.त्याच्या अंगात देव संचारले... आणि देवानं&lt;br /&gt;सांगितलं, गावात फार व्याटव्याट कामं होत आहेत. कणसरी कोपणार आहे. यंदा पिकं बरी&lt;br /&gt;नाही यायची. सगल्यांच्या कणग्या रिकाम्या दिसतील.&lt;br /&gt;लोक घाबरले. शरण गेले. मग&lt;br /&gt;देवानं सांगितलं की, आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घेतलेल्या एका बाईला खुर्चीवं&lt;br /&gt;बसवा.&lt;br /&gt;आणि गावात अशी एकच बाई होती -- हिराबाई!&lt;br /&gt;बाकीच्या लोकांनी मानलं नाही, तरी एकूणएका वारल्याची मतं डोळे झाकून&lt;br /&gt;हिराबाईलाच पडली.&lt;br /&gt;त्यानंतर पहिली घरकुल योजना आली, त्यातलं पहिलं घर भगताला&lt;br /&gt;मिळालं.&lt;br /&gt;"गावात कोनाला म्हाईत नाही आजूक. पण मनात आणलं ना, तं भुताचेच क्याला,&lt;br /&gt;आपलेपण हात लांब होऊ शकतात... आणि सगल्या बाया एकदुसरीचं हात धरून राहिल्या तं कामं&lt;br /&gt;चांगली होणारच." हिराबाई गालातल्या गालात हसत म्हणाली.&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;येथे एक प्रकर्षाने जाणवणारा दोष म्हणजे, पुस्तकाला आलेले एखाद्या अहवालाचे (&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Reportage"&gt;रिपोर्ताजचे&lt;/a&gt;) स्वरूप आणि काही ठिकाणी जाणवणारी पुनरुक्ती. अर्थात, गोदावरी परुळेकरांच्या 'जेव्हा माणूस जागा होतो' नंतर स्वानुभवावर आधारित मराठीतले हे (बहुधा) पहिलेच पुस्तक असल्याने, असे होणे काहीसे क्षम्य मानता येईल. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेगळी वाट सुद्धा मग काही वेळाने रुळलेली वाट बनत जाते. बंडखोरांचे सुद्धा त्यांच्या नकळत प्रस्थापितांत रुपांतर होत असतेच. पुस्तकाच्या शेवटी, अशा या 'द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय' रस्त्यावरदेखील जुन्याच खाचखळग्यांची प्रचीती येऊ लागल्यावर, प्रफुल्ला येथेही आपला वेगळा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काहीसा त्रोटक आणि अपेक्षित शेवट असला, तरी ही वेगळ्या वाटेवरची कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;[अवांतर - ब्र हा शब्द मराठीत कसा आला, त्याचे स्पष्टीकरण : ब्रु (२उ.प) बोलणे हा संस्कृत धातु आहे. तो ब्रवीमि ब्रूवः ब्रूमः | असा ( परस्मैपदी) चालतो. त्यातील "ब्रवीमि "(वर्त.प्र.पु.ए.व.) चा अर्थ "मी बोलतो/बोलते " असा होतो. एखाद्या विषयावर चर्चा चालू असता जर कोणला काही मतप्रदर्शन करायचे असेल तर हात वर करून त्याने "ब्रवीमि" असे म्हणायचे.' ब्रूहि'(तू बोल) अशी संमती मिळाल्यावर बोलायचे. पुनःपुन्हा बोलून चर्चेत प्रत्यवाय आणणार्‍याला " "ब्र (ब्रवीमि चे पहिले अक्षर) अपि मा ब्रूहि " असे सांगितले जात असावे. त्याचे मराठीकरण "ब्र सुद्धा उच्चारू नकोस "असे झाले. (&lt;a href="http://mr.upakram.org/node/543#comment-8017"&gt;येथून&lt;/a&gt; साभार)]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-5898999143141428315?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/01/blog-post.html' title='ब्र'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/5898999143141428315/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=5898999143141428315' title='15 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/5898999143141428315'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/5898999143141428315'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2007/01/blog-post.html' title='ब्र'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-116081623766471074</id><published>2006-10-14T01:53:00.000-07:00</published><updated>2006-10-14T02:00:53.596-07:00</updated><title type='text'>माझा खटला - ओरहान पामुक</title><content type='html'>यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार तुर्कस्थानचे लेखक ओरहान पामुक यांना जाहीर झाला. त्यांच्या एका लेखाचे &lt;strong&gt;[१]&lt;/strong&gt; इंग्रजी भाषांतर 'द न्यूयॉर्कर' या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. त्याच लेखाच्या मराठी अनुवादाचा हा प्रयत्न -&lt;br /&gt;&lt;br /&gt;इस्तंबूलच्या सिसली भागात, जिकडे माझा उभा जन्म गेला आणि माझी आजी ज्या तीनमजली घरात चाळीस वर्षे एकटी राहिली; बरोबर त्या घरासमोरच्या न्यायालयात या शुक्रवारी मी न्यायदेवतेसमोर गुन्हेगार म्हणून उभा राहीन. 'सार्वजनिक स्तरावर तुर्की अस्मितेला काळिमा फासणे' हा माझ्यावर ठेवण्यात आलेला आरोप आहे. फिर्यादी पक्षाचे वकील, मला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व्हावी अशी मागणी करतील. याच कोर्टात याच गुन्ह्याखाली ह्रँट डिंक नावाच्या एका तुर्की-अमेरिकन पत्रकाराला कलम ३०१ अन्वये शिक्षा ठोठावण्यात आली होती; या वस्तुस्थितीची जाणीव मला वास्तविक भेडसावायला हवी. पण तसे होत नाही. मला अजून थोडी आशा आहे. कारण माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला हा ठिसूळ पायावर उभा आहे, अशी माझ्या वकिलाप्रमाणेच माझीही खात्री आहे. त्यामुळे मी तुरुंगात जाईन असे काही मला वाटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे माझ्यावरील खटल्याला एवढी प्रसिद्धी मिळालेली पाहून, मला खरं तर थोडंसं संकोचल्यासारखंच होतंय. कारण या शहरातील माझ्या ज्या ज्या मित्रांचा मी सल्ला घेतला, त्यांना कधी ना कधी याहून अधिक कठीण उलटतपासणीच्या दिव्यातून पार पडावे लागले आहे आणि केवळ एका पुस्तकामुळे किंवा काही लिखाणामुळे, अनेक वर्षे चौकश्या आणि खटल्यांचा पाठीमागे लागलेला ससेमिरा आणि तुरुंगवास यात खर्ची घालावी लागली आहेत. अर्थात या देशात; जिथे सैनिक, राजे आणि पोलीसगड्यांचा पदोपदी उदोउदो केला जातो आणि लेखकांना मात्र अनेक वर्षे कोर्टकचेऱ्या आणि तुरुंग यांच्या अग्निदिव्यातून पार पाडल्याशिवाय राजमान्यता मिळत नाही; तिथे माझ्यावर खटला भरण्यात आला यात आश्चर्य ते काय? माझे मित्र जेव्हा हसून "तू आता खराखुरा तुर्की लेखक झालास" असे म्हणतात, तेव्हा त्यांना काय म्हणायचेय हे मला अचूक कळते. परंतु, जेव्हा मी ते मला संकटात टाकणारे विधान केले तेव्हा मला असा 'सन्मान' अपेक्षित नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या फेब्रुवारीत, एका स्विस वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मी "तुर्कस्थानात आतापर्यंत दहा लाख अर्मेनियन्स आणि तीस हजार कुर्दीश लोक मारले गेलेले आहेत", असं विधान केलं होतं. शिवाय, या गोष्टीवर चर्चा करणेदेखील माझ्या देशात निषिद्ध मानलं जातं असं मी पुढे म्हणालो होतो. पहिल्या महायुद्धात, ऑटोमन साम्राज्याविरुद्ध भूमिका घेतल्याचा कांगावा करून कित्येक अर्मेनियन लोकांना देशाबाहेर हाकलण्यात आले होते आणि त्यांच्यापैकी अनेकांना वाटेतच कंठस्नान घालण्यात आले, यावर इतिहासतज्ञांचे दुमत नाही. तुर्कस्थानाचे सरकारी प्रवक्ते मात्र - मरण पावलेल्यांचा आकडा बराच कमी आहे, हे हत्याकांड योजनाबद्ध नसल्याने त्याला वंशनिर्मूलनाचा प्रयत्न (जेनोसाईड) म्हणणे चुकीचे आहे, मारल्या गेलेल्या अर्मेनियनांमध्ये अनेक मुस्लिमदेखील होते या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये मात्र, सरकारी दडपण झुगारून देऊन इस्तंबूलमधील तीन प्रतिष्ठित विद्यापीठांनी एकत्र येऊन एक शैक्षणिक परिषद भरवली. सरकारला अमान्य असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या इतिहासतज्ञांना या परिषदेत मज्जाव नव्हता. तेव्हापासून, गेल्या नव्वद वर्षांत या विषयावर जी सार्वजनिक चर्चा झाली नव्हती तिला तोंड फुटले - कलम ३०१ च्या समंधाला भीक न घालता!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑटोमन राज्यात अर्मेनियन लोकांवर काय अत्याचार झाले, हे सामान्य तुर्की जनतेला कळू नये म्हणून सरकार जर इतकी दक्षता घेत असेल; तर हा विषयच त्यांच्या दृष्टीने निषिद्ध आहे असे म्हटले तर त्यात वावगे काय? आणि माझ्या उद्गारांनी उठलेला गदारोळ, हा एखाद्या निषिद्ध विषयाला तोंड फोडल्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेलाच साजेसा होता. अनेक वृत्तपत्रांनी माझ्याविरुद्ध आघाडी उघडली. काही उजव्या गटाच्या स्तंभलेखकांनी (यातले सगळेच मुस्लिम मूलतत्त्ववादी नाहीत) तर माझे तोंड 'कायमचे' बंद करण्यात यावे, इथपर्यंत विधाने करण्याइतपत मजल मारली. जहाल राष्ट्रवादी संघटनांनी माझ्या या देशद्रोही कृत्याचा निषेध करण्यासाठी बैठका घेतल्या आणि माझ्याविरुद्ध आंदोलने केली. सार्वजनिकरीत्या माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. माझ्याच 'स्नो' या कादंबरीच्या 'का' या कथानायकाप्रमाणे, राजकीय मतांपोटी आपल्या आवडत्या शहराला पारखे होण्याचा अनुभव मी घेतला. मला हा वाद वाढवायचा नसल्याने किंवा त्यासंबंधी अधिक काही ऐकायची इच्छा नसल्याने, मी पुढे काहीच बोललो नाही. जणू एका विचित्र प्रकारच्या शरमेने माझा ताबा घेतला होता, आणि मी सामान्य जनतेपासूनच नव्हे तर माझ्या स्वत:च्या शब्दांपासून तोंड चुकवण्याचा प्रयत्न करत होतो. मग एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पुस्तकांना जाळण्याचा आदेश दिला, सिसलीमध्ये सरकारी वकिलांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची चर्चा होऊ लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे विरोधक फक्त वैयक्तिक द्वेष म्हणून माझ्याविरुद्ध नव्हते. माझ्यावरील खटला हा तुर्कस्थानात आणि बाहेरच्या जगातही चर्चिला जाणार हे मला माहीत होतं. याचं एक कारण म्हणजे, मी असं मानतो की एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात जी कृष्णकृत्ये घडली आहेत, त्यांची चर्चा केल्यामुळे त्या राष्ट्राच्या अस्मितेला, अभिमानाला उणेपणा येत नाही. असा उणेपणा जर संभवत असेल, तर अशा विषयांवर चर्चाच न होऊ देण्यामुळे. दुसरं म्हणजे, आजच्या घडीला तुर्कस्थानात ऑटोमन साम्राज्यातील अर्मेनियन्सवरील अत्याचारांविषयी चर्चा करण्यास जी मनाई आहे, ती विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. परिणामी या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येणार नाहीत. मला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारा पाठिंबा जरी दिलासादायक असला तरी, यामुळे मी आणि माझ्या देशात अंतर पडत चाललंय ही भावना मात्र कधी कधी मला त्रास देत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;युरोपियन समुदायात सामील होण्यास जो देश सरकारी धोरणानुसार कटिबद्ध  आहे, त्याच देशात युरोपात ज्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत अशा लेखकाला तुरुंगात का टाकण्यात येते आणि हे सारे नाटक (कॉनरॅड म्हणाला असता तसे) 'अंडर वेस्टर्न आईज' &lt;strong&gt;[२]&lt;/strong&gt; का करण्यात आले, हे सांगणे कठीण आहे. निव्वळ असहिष्णू वृत्ती, अज्ञान किंवा मत्सर यांपोटी हा विरोधाभास जन्मलेला नाही. खरं तर, असे अनेक विरोधाभास (सध्याच्या तुर्कस्थानात) आहेत. माझे जहाल राष्ट्रवादी विरोधक मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असताना तुर्कस्थानातील लोक सहृदय आहेत, इतर युरोपियनांप्रमाणे ते वंशनिर्मूलनाचा प्रयत्न करणे शक्यच नाही असा समज उरी कवटाळून बसलेल्या या देशाबद्दल मी काय मत बनवावे? एकामागून एका लेखकाला तुरुंगात टाकायचे आणि वर मात्र हितशत्रू तुर्कस्थानाची प्रतिमा जगभरात खोट्या बातम्यांनी कलंकित करीत आहेत, असे म्हणायचे यामागचे तर्कशास्त्र कोणते? तुर्कस्थानातील अल्पसंख्याकांविषयी तयार करण्यात आलेला अहवाल सरकारधार्जिणा नाही, म्हणून एका प्राध्यापकाला ठोठावण्यात आलेली शिक्षा आणि पाच इतर लेखक व पत्रकारांवर कलम ३०१ अन्वये दाखल करण्यात आलेले खटले, याबद्दल मी जेव्हा वाचतो; तेव्हा मला वाटतं की फ्लॉबर्ट आणि नेर्वाल हे पौर्वात्यशास्त्राचे दोन पितामह या घटनांना नक्कीच विचित्र [bizarreries]&lt;strong&gt;[३]&lt;/strong&gt; ठरवून मोकळे झाले असते.   &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात, हे विचित्र नाट्य केवळ तुर्कस्थानापुरतेच सीमित नाही; तर ही जागतिक स्तरावरची नवीन वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. तिची तोंडओळख आपल्याला नुकतीच होतेय खरी, पण यावर उपाय काय याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत, भारत आणि चीनने लक्षणीय आर्थिक प्रगती साधली आहे. या दोन्ही देशांत मध्यमवर्गाचा झपाट्याने विस्तार होतो आहे. या नवमध्यमवर्गाच्या खाजगी जीवनाचे प्रतिबिंब नवीन कादंबऱ्यांतून पडल्याशिवाय, त्याचे खरे स्वरूप कसे आहे हे कळणे अवघड आहे. पण, माझ्या देशातील दिवसेंदिवस अधिकाधिक पाश्चात्य होत चाललेल्या प्रतिष्ठित आणि मध्यमवर्गाप्रमाणे, या वर्गालाही दोन वरवर अगदी भिन्न भासणाऱ्या कृतींनी त्यांच्या नव्यानेच प्राप्त झालेल्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे समर्थन करावे लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना यासाठी पाश्चात्य आचार-विचार, लकबी अंगिकाराव्या लागतील. अभिजन वर्ग पाश्चात्य संस्कृतीकडे झुकताना पाहून इतर देशवासीयही त्याच मार्गाकडे वळू लागतील (महाजनो येन गता: स पंथ:); आणि त्यांचे या कामी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या वर्गाला मग आपल्याकडे घ्यावी लागेल. पण जेव्हा इतर लोक त्यांच्यावर आपल्या परंपरेला त्याज्य मानण्याचा आरोप करतील, तेव्हा त्यांना अतिजहाल आणि जाज्वल्य स्वरूपाचा राष्ट्रवाद, एखाद्या हत्यारासारखा परजून प्रत्युत्तर द्यावे लागेल. फ्लॉबर्टसारख्या बाहेरून आलेल्या निरीक्षकाला हे सारे केवळ 'विचित्र' वाटेल, पण हा सारे विवाद म्हणजे राजकीय आणि आर्थिक सुधारणा आणि त्यापोटी जन्म घेणाऱ्या सांस्कृतिक आकांक्षांतील संघर्ष आहेत. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेत सामील व्हायची धडपड आहे, तर दुसरीकडे लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य यांना केवळ पाश्चात्यांनी लावलेले जावईशोध ठरवणारा आक्रमक राष्ट्रवाद आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पौर्वात्य जगात नव्याने उदयाला आलेल्या या निष्ठुर सत्ताधाऱ्यांच्या खासगी जीवनाचे चित्रण सर्वप्रथम करणाऱ्यांमध्ये व्ही. एस. नायपॉल यांचे नाव घ्यावे लागेल. गेल्या वर्षी मे महिन्यात मी थोर जपानी लेखक केन्झाबुरो वी यांना भेटलो होतो. जपानी सैन्याने (दुसऱ्या महायुद्धावेळी) चीन आणि कोरियात जी नृशंस कृत्ये केली त्यांची खुलेआम चर्चा व्हावी, असे विधान केल्यामुळे त्यांच्यावरही जपानी जहालमतवाद्यांनी हल्लाबोल केला होता. चेचेन आणि इतर अल्पसंख्याकांविरुद्ध रशियन शासनाने स्वीकारलेले असहिष्णू धोरण, भारतात हिंदू राष्ट्रवाद्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर केलेले हल्ले आणि चीनने फारसा कानोसा लागू न देता, चालवलेला युघुर&lt;strong&gt;[४]&lt;/strong&gt; लोकांचा पद्धतशीर वंशसंहार; या साऱ्यांना याच विरोधाभासांतून खतपाणी मिळते आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उद्याचे लेखक या नव्या सत्ताधारी वर्गाच्या खासगी जीवनाचे चित्रण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशावेळी त्यांच्या देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर असणाऱ्या निर्बंधांविरुद्ध त्यांना पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळेल अशी त्यांची नक्कीच अपेक्षा असेल. पण सध्या इराक युद्धाबद्दल उजेडात येणारी असत्ये आणि सी.आय.ए. चे छुपे तुरुंग यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रतिमा तुर्कस्थानात आणि इतरत्र इतकी मलिन झाले आहे, की माझ्यासारख्यांना पाश्चात्य लोकशाहीचे समर्थन करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ/दुवे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;[१] &lt;a href="http://www.newyorker.com/talk/content/articles/051219ta_talk_pamuk" target="_blank"&gt;मूळ इंग्रजी लेख&lt;/a&gt;&lt;br /&gt;[२] &lt;a href="http://www.litencyc.com/php/sworks.php?rec=true&amp;UID=8552" target="_blank"&gt;'अंडर वेस्टर्न आईज' या कादंबरीविषयी अधिक माहिती&lt;/a&gt;&lt;br /&gt;[३] &lt;a href="http://www.extra.rdg.ac.uk/2001group/Articles-StudyDay/Flaubert%20final%20(Lou%20Curtis).pdf" target="_blank"&gt;फ्लॉबर्ट व bizarreries&lt;/a&gt;&lt;br /&gt;[४] &lt;a href="http://www.uhrp.org/pages/About?articlelive=93e12ddbdf59152a15752372ef9ffe8c" target="_blank"&gt;युघुर मानवी हक्क संघटना&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;* याच लेखकाचा 'द पामुक अपार्टमेंट्स' म्हणून लेख &lt;a href="http://www.newyorker.com/fact/content/articles/050307fa_fact4" target="_blank"&gt;या दुव्यावर &lt;/a&gt;वाचता येईल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-116081623766471074?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/10/blog-post_14.html' title='माझा खटला - ओरहान पामुक'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/116081623766471074/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=116081623766471074' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/116081623766471074'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/116081623766471074'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/10/blog-post_14.html' title='माझा खटला - ओरहान पामुक'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-116046778414174798</id><published>2006-10-10T01:07:00.000-07:00</published><updated>2006-11-15T03:43:46.636-08:00</updated><title type='text'>तू नसशील तर कसे व्हायाचें सुसह्य हे जीवन?</title><content type='html'>पु.लं.च्या विविधांगी प्रतिभेचा जवळजवळ पूर्णाविष्कार म्हणता येईल, असा बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेतील हा काही भाग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object width="424" height="337"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/vn1c-CygmNg"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/vn1c-CygmNg" type="application/x-shockwave-flash" width="424" height="337"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-116046778414174798?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/10/blog-post_10.html' title='तू नसशील तर कसे व्हायाचें सुसह्य हे जीवन?'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/116046778414174798/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=116046778414174798' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/116046778414174798'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/116046778414174798'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/10/blog-post_10.html' title='तू नसशील तर कसे व्हायाचें सुसह्य हे जीवन?'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-115365199913379675</id><published>2006-07-23T03:34:00.000-07:00</published><updated>2006-07-23T04:03:28.080-07:00</updated><title type='text'>अनिलांच्या 'दशपदी' कविता</title><content type='html'>&lt;strong&gt;तळ्याकाठी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/1600/kkk.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/400/kkk.jpg" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,&lt;br /&gt;जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही&lt;br /&gt;गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत&lt;br /&gt;उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत&lt;br /&gt;&lt;br /&gt;पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो&lt;br /&gt;दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो&lt;br /&gt;&lt;br /&gt;हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते&lt;br /&gt;अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;-- अनिल&lt;br /&gt;&lt;br /&gt;कवी अनिल तथा 'आत्माराम रावजी देशपांडे' हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे. त्यांच्याच 'तळ्याकाठी' आणि 'जुई' या दोन दशपदी कविता येथे देत आहे. ['जुई' पाठवल्याबद्दल &lt;a href="http://bolaacheekadhee.blogspot.com/" target="_blank"&gt;गायत्रीचे&lt;/a&gt; विशेष आभार. :)]&lt;br /&gt;&lt;br /&gt;या दोन्ही कविता इतक्या साध्या, अकृत्रिम शैलीत आपल्या डोळ्यासमोर ते चित्र, तो प्रसंग उभा करतात की त्यांना अधिक भाष्याची काहीच गरज नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जुई&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती&lt;br /&gt;इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती&lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला&lt;br /&gt;ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला&lt;br /&gt;&lt;br /&gt;तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे&lt;br /&gt;जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे&lt;br /&gt;&lt;br /&gt;कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत&lt;br /&gt;शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत&lt;br /&gt;&lt;br /&gt;मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते &lt;br /&gt;सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-115365199913379675?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/07/blog-post.html' title='अनिलांच्या &apos;दशपदी&apos; कविता'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/115365199913379675/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=115365199913379675' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115365199913379675'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115365199913379675'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/07/blog-post.html' title='अनिलांच्या &apos;दशपदी&apos; कविता'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-115148451350051893</id><published>2006-06-28T01:40:00.000-07:00</published><updated>2006-06-28T02:03:28.466-07:00</updated><title type='text'>आता आमोद सुनासि आले</title><content type='html'>मराठी नवकथा म्हटले की गंगाधर गाडगीळांचे नाव जरी सर्वप्रथम समोर येत असले, तरी पु. भा. भावे, अरविंद गोखले, सदानंद रेगे, व्यंकटेश माडगूळकर अशा अनेक कथालेखकांची नावेही या संदर्भात वगळून चालणार नाहीत. दि. बा. मोकाशी हेही १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. त्यांच्या बहुतांश कथा जरी काहीशा मध्यमवर्गीय परीघातील अनुभव टिपणार्‍या असल्या तरी काही त्यापलीकडे जाऊन 'कोऽहम्?' या सनातन प्रश्नाचा वेध घेताना दिसतात. 'आता आमोद सुनासि आले' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कथा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथेची सुरुवात मोजक्या शब्दांत केलेल्या चित्रदर्शी वर्णनाने होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"थडथडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांत वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाच थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी घडतात? माणसं अशी निपचित का पडतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज सहा दिवस झाले. केंबळं खेडं पावसाचा मारा खात दबकून बसलं होतं. सहा दिवसांत आकाशाचा काळपट रंग बदलला नव्हता. खग्रास ग्रहणासारखी भयाण काळोखी डोंगरापासून पायथ्याच्या खेड्यांपर्यंत पसरली होती. पाण्याचे तांबडे लोंढे खळखळा वाहत होते. पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटावी तसा आवाज वातावरण भरून टाकीत होता. घरे ठिबकत होती. माणसं विड्या ओढीत होती नि साखरेचा किंवा गुळाचा, दुधाचा किंवा बिनदुधाचा, मिळेल तो चहा पीत होती. ती आपापसात असं काही बोलत होती की पृथ्वीची ही वास्तू त्यांना कधीच आवडली नव्हती असं वाटावं."&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्याच्यात आपण स्वतःलाच पहायचो असा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याच्या दुःखाने बधीर झालेला रामजी लोहार. गावाला वेढून टाकणार्‍या आणि तडाखे देणार्‍या पावसासारखेच हे त्याचे दुःख. खेड्यातल्या नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचे वाचन करणार्‍या चार माळकर्‍यांपैकी एक. त्याचे दुःख कसे हलके करावे, हे इतरांना उमगत नाही. त्यांना ते जाणवते, परंतु त्या दुःखाशी ते तादात्म्य पावू शकत नाहीत. अद्वैत साधणे ही तशी अवघडच बाब.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"पण आज रामजीचं दुःख कशानं हलकं होत नव्हतं. जे काही आजपर्यंत लोकांना त्यानं सांगितलं होतं ते फक्त वरवरचं समाधान होतं. जीव नि मृत्यू यांतलं त्यालाही कळलं नव्हतं. नि संतांनाही कळलं नव्हतं. त्यामुळेच आज कधी केलं नव्हतं ते तो करीत होता. परमेश्वराला प्रश्न टाकीत होता. आपली तीस वर्षांची पंढरीची वारी विठ्ठलापुढे त्यानं टाकली. कुठं पुण्य गेलं या वारीचं? प्राक्तनाने मुलगा गेला? कसलं प्राक्तन? म्हातारपणी मी रडावं हे प्राक्तन?&lt;br /&gt;&lt;br /&gt;जी भाषा इतरांच्या वेळी समाधान करण्यास त्यानं वापरली होती, त्यातला अर्थ आज सुना झाला होता. विठ्ठलावर तो चिडला नव्हता. तेवढा आवेशही राहिला नव्हता. घड्याळ बंद पडावं आणि मग वेळ खोटी वाटावी तसं त्याला वाटू लागलं होतं. इतकी वर्षे विठ्ठलाच्या भक्तीमुळे आपण जगत आहोत असं त्याला वाटलं होतं. पण मुलगा जाताच मुलासाठी आपण जगत होतो हे त्याच्या एकदम लक्षात आलं. मुलगा होता तोपर्यंत आपला जीव निराळा, आपला जगण्याचा आशय निराळा नि मुलाचा निराळा, असं त्याला वाटलं होतं. पण मुलगा गेला नि स्वतःचं शरीरही त्याला निरर्थक वाटू लागलं. त्याचा देह जणू पिशवी होती. त्यातील पदार्थ सांडताच पिशवीचं काय करायचं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणीही वारकर्‍यानं सांगितलं असतं की रामजीचं दुःख हा अहंकाराचाच एक प्रकार होता. पण बाहेर जसं केंबळं खेडं पावसातून सुटू शकत नव्हतं तसाच रामजीही या अहंकारातून सुटू शकत नव्हता.&lt;br /&gt;....&lt;br /&gt;त्यानं पुन्हा रामजीकडं पाहिलं. त्याच्या मनात आलं - दुःखानं माणूस असा बधिर होतो. रामजी इतक्या जवळचा, पण त्याचं दुःख मला लागत नाही हे आश्चर्य आहे! आपण कळवळलो, पण आतलं सुखी नि निश्चिंत मन हललं नाही. आपलं सगळं ठीक आहे ही भावना नि तिची ऊब कधी तुटली नाही."&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा अस्वस्थ मनःस्थितीत रामजी आणि इतर तिघे माळकरी नेहमीच्या शिरस्त्यानुसार अमृतानुभवाचे वाचन सुरु करतात. त्या ओळींचा अर्थ, वर्षानुवर्षे पारायण करूनही त्यांना कळत नसतो. विरोधाभास म्हणजे नेमक्या "आता अज्ञानाचेनि मारे। ज्ञान अभेदें वावरे। नीद साधोनी जागरे। नांदिजे जेवी॥" याच ओवीने त्यांच्या पठणाची सुरुवात होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच वेळी शिवा नेमाणेची गाय गर्भारपणात अडलेली असते. शिवा आणि त्याची बायको असहायपणे तिच्या वेदना पाहत असतात. अडलेल्या जनावरांची सुटका करू शकणारा गावातील एकच माणूस म्हणजे रामजी लोहार, जो स्वतःच नियतीने केलेल्या आघाताने कोलमडून गेलेला असतो. चार दिवस खाणे-पिणे, बोलणे-चालणे काहीही न करता सार्‍या संवेदना गोठलेल्या अवस्थेत असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"संतू वाण्यानं सहावी ओळ वाचली होती. तो तिचा अर्थ सांगत असता हे निर्जीव चाललेलं प्रवचन कसं नि कुठं संपवायचं याचा तो विचार करत होता. इतक्यात शिवा नेमाणेच्या बायकोचा रडका, किंकाळा आवाज आला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"रामजीदा, धाव! माजी गाय अडली रे! धाव रामजीदा!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामजीच्या बधिर मनात काहीतरी हलू लागलं. 'धाव...धाव!' ही आरोळी आपण कुठं ऐकली? रामजीला वाटलं, पुराच्या खळबळत्या पाण्यातून - सोसाट्याच्या वार्‍यातून ती आली होती. आपण घरी होतो. नाही - ती हाक आपल्याला ऐकू आलीच नाही. आपण कानशीनं विळे घाशीत होतो. ही आरोळी ती नव्हे. ही नेमाण्याची बायको हाकारते आहे. तिची गाय अडली आहे. तिची गाय अडली आहे की माझा मुलगा ओरडतो आहे! - धाव!"&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यापुढचा कथाभाग मुळातूनच वाचला पाहिजे. अद्वैताची अनेक समर्पक उदाहरणे देणारा, मोजक्या शब्दांत सारे चित्र डोळ्यासमोर उभा करणारा आणि त्याचबरोबर जन्म-मृत्युच्या अव्याहत फेर्‍याचे वर्णन करणारा.  ज्ञानेश्वरांची एक तरी ओवी 'अनुभवावी' असे म्हणतात. या अनुभवलेल्या ओवीचेच चित्रण म्हणजे ही कथा आहे, असे मला वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"आता बाहेरच्या पावसाचा गारवा त्याला भासत नाहीसा झाला होता. त्याचं अंग आतून गरम होऊ लागलं होतं. त्याला कुठलं भान नव्हतं. सगळं जग गायीत, वासरात दिसत होतं. एक जीव इथं अडकला होता. त्याला बाहेरच्या जगात यायचं होतं. बागडायचं होतं आणि त्याला कुणीतरी अडवून ठेवलं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वासराचं डोकं आत सारून तो ते चिमुकलं शरीर वळवू लागला. आत गेलेली त्याची बोटं जणू अज्ञेयाचा वेध घेत होती. माणसाच्या पलीकडील घटनेचं ज्ञान घेत होती. आणि त्या घटना आपल्याप्रमाणं वळवू पाहत होती. त्याची सगळी शक्ती, कौशल्य, बोटांत येऊन राहिलं होतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलं असतं, आता बोटं डोळे झाले आहेत, बोटं जिवाशी झगडत आहेत. ढोपरात अर्धवट वाकून, मांड्या भरल्या की कमरेत ओणवं होऊन, कंबर थकली की गुडघ्यावर बसून तो वासराचे पुढचे खूर हाताशी येण्याची वाट पाहत होता.&lt;br /&gt;....&lt;br /&gt;गायीलाही धाप लागली होती. येणाऱ्या नव्या नव्या कळांची ती तयारी करीत होती. तिच्या महाकळा जणू आपल्याच अंग़ात शिरत आहेत, असा रामजी थरथरू लागला. त्याचं सगळं शरीर तल्लख झालं. गायीला त्याने एकदोनदा थोपाटलं. गोंजारलं. हात पाण्यात बुडवले. तेल घेतलं नि पुन्हा वासराचं शरीर वळवू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता त्याला चेव आला होता. जणू अज्ञेयाशी तो प्रत्यक्ष झटापट करीत होता. कसला तरी सूड उगवणार होता - काहीतरी सिद्ध करणार होता, गमावलेलं काही मिळवणार होता. गायीच्या पोटातल्या हालचालीशी त्याचं पुरं तादात्म्य झालं होतं. कळा भराभर येऊ लागल्या होत्या. वासरू बाहेर टाकण्यासाठी गाय तडफड करीत होती. तिच्या प्रयत्नांची लकब त्याच्या बोटांतून त्याला कळू लागली होती. नि त्याची बोटं तिला आपोआप साथ देऊ लागली. वासरू फिरत चाललं. डोकं आत गेलंच - आता पोट बोटांना लागलं. ते आणखी फिरलं. नि झटकन त्याचे पुढचे दोन खूर रामजीच्या बोटांना लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो हळूहळू ओढू लागला. वासरू बाहेर येऊ लागलं. रामजी डोक्यापासून मानेपर्यंत घामानं निथळला. गायीच्या सर्वांगावर घामाचे थेंब दिसू लागले. रामजी धापा टाकू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि एकदम न कळल्यासारखं वासरू त्याचा आवाक्यात पडलं. बाहेर येताच त्या वासराची लगबग सुरू झाली. जगात येण्याची इतकी घाई त्याला दिसली. रामजीनं वरचं आवरण काढताच त्यानं टुणदिशी उडी घेतली. त्याची उडी रामजीनं आईकडे वळवली. गायीची लगबग सुरूच होती. मागचे पाय इकडे तिकडे हलवीत, शेपटी वेळावीत, माना फिरवीत तिची जीभ वासराची वाट पाहत होती. त्या जिभेला वासरू लागताच तिचं चाटणं सुरू झालं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामजीनं धोतराचा सोगा सोडून तोंड, मान, हात पुसले नि तो भराभर सूचना देऊ लागला. गायीला खायला काय घालायचं? वार कशी कापायची? वासराला केव्हा पाजायचं? गायीला गरम पाणी पाजायचं नि स्वच्छ कसं ठेवायचं? तिच्या खाण्यात गव्हाचा भुस्सा किंवा सुंठमिरी किती टाकायची?...&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोलता बोलता गव्हाणीवर ठेवलेलं आपलं कुडतं त्यानं अंगात चढवलं. मग पेटी उचलून तो बाहेर पडला.&lt;br /&gt; &lt;br /&gt;बाहेर पाऊस लागताच त्याला सर्व भान पुन्हा आलं. नि गमावलेल्या पोराची आठवण आली. तो तसाच चालत राहिला. पावलं पुन्हा बधिर होऊ लागली. चेहरा कठोर बनला. संतू वाण्याच्या दुकानासमोर येताच तो तिकडे वळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओसरीवर तिघे माळकरी त्याचीच वाट पाहत बसेल होते. तो येताच ते उठले. जोशी म्हणाला, "पोथी पुरी करू या."&lt;br /&gt;&lt;br /&gt;चौघे माळ्यावर गेले नि आपापल्या जाग्यावर बसले. अमृतानुभव पुढे घेऊन संतूनं झटदिशी उघडला नि तो वाचू लागला :&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आमोद सुनासि आले। श्रुतिशी श्रवण निघाले।&lt;br /&gt;आरसे उठले। लोचनेशी॥&lt;br /&gt;आपलेनी समीरपणे।वेल्हावती विंजणे।&lt;br /&gt;किं माथेंचि चाफेपणें। बहकताती॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;आताही कुणाला त्यातला अर्थ कळला नाही, पण वाचण्याचा सूर नि शब्दांचा नाद यांत चौघेही रंगू लागले. आता त्या सुरांत नि नादात अर्थ प्रतीत होऊ लागला. रामजीचा चेहरा भावनांनी भरू लागला. तिसर्‍या ओवीला सुरुवात झाली न झाली तोच तो रडू लागला. पोथी चालूच होती -&lt;br /&gt;&lt;br /&gt;जिव्हा लोधली रसे। कमळ सूर्यपणे विकासे।&lt;br /&gt;चकोरचि जैसे। चंद्रमा झाले॥&lt;br /&gt;फुलेचिं झालीं भ्रमर।तरूणीच झाली नर..."&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;[संदर्भ - "मराठी कथा : विसावे शतक. संपादक - के. ज. पुरोहित, सुधा जोशी ]&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-115148451350051893?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html' title='आता आमोद सुनासि आले'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/115148451350051893/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=115148451350051893' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115148451350051893'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115148451350051893'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html' title='आता आमोद सुनासि आले'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-115016603326792127</id><published>2006-06-12T18:55:00.000-07:00</published><updated>2006-06-12T19:35:19.466-07:00</updated><title type='text'>पुलकित स्मृती</title><content type='html'>&lt;a href="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/1600/s166.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/400/s166.jpg" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज १२ जून २००६. पु. लं. चा सहावा स्मृतिदिन. पु. लं. विषयी लिहायचे ठरवले, तर एखादा लेखच नव्हे तर एक स्वतंत्र अनुदिनी सुरु करावी लागेल. 'आनंदयात्री' हे विशेषण जर कोणाला अगदी चपखलपणे लागू होत असेल, तर ते पु. लं. ना. हाच आनंद त्यांनी लेखनातून, संगीतातून, भाषणांतून अगदी भरभरून वाटला. अतिशयोक्ती न करता मी असे म्हणेन की मला मराठी भाषा येते याचा आनंद पु. लं. चे लिखाण वाचताना, त्यांच्या एकपात्री प्रयोगाची कॅसेट पाहताना जितका होतो तितका फार कमी वेळा होत असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;****&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सुजनहो' या त्यांच्या भाषणांच्या संग्रहातून घेतलेला हा एक उतारा --&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय संस्कृती म्हणा किंवा माणसाची संस्कृती म्हणा, दोन गोष्टींवर अधिष्ठित आहे, असं मला वाटतं. एक म्हणजे आठवड्याचा बाजार आणि एक वर्षाचा उत्सव. आठवड्याचा बाजार हा तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो; आणि वर्षाचा उत्सव तुमच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो. एक फार सुंदर चिनी म्हण आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की, 'तुम्हांला दोन पैसे मिळाले, तर एका पैशाचे धान्य आणा, आणि एक पैशाचं फूल आणा. एक पैशाचं धान्य तुम्हांला जगवेल आणि फूल तुम्हांला कशासाठी जगायचं हे कारण सांगेल.' संगीत तुम्हांला, का जगायचं याचं कारण सांगतं. तुम्हांला जगायचं आहे कशासाठी? मला मोगूबाई ऐकायच्या आहेत, मला भीमसेन ऐकायचे आहेत, मला किशोरीबाई ऐकायच्या आहेत, मला दीनानाथांचं गाणं ऐकायचं आहे. याच्यासाठी जगायचंय. सगळ्या कलांचा आनंद घ्यायचाय. मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, तो शब्दसुद्धा तसाच हवा. आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला 'उपजीविका' म्हणतात. ती 'जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे आणि ती जीविका कलावंत माणसं देत असतात, म्हणून त्यांचे हे उपकार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;****&lt;br /&gt;&lt;br /&gt;पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20030706/hs12.htm"&gt;एक सुरेख लेख&lt;/a&gt; दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख  --&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पु. लं. - अखेरचा अध्याय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/1600/smrutidin2.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://photos1.blogger.com/blogger/7404/575/320/smrutidin2.jpg" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?&lt;br /&gt;&lt;br /&gt;नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....&lt;br /&gt;&lt;br /&gt;****&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुनीताबाईंनी सांगितलेली &lt;a href="http://loksatta.com/daily/20060611/lokkal.htm"&gt;त्यांच्या लग्नाची कथा&lt;/a&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;****&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-115016603326792127?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post.html' title='पुलकित स्मृती'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/115016603326792127/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=115016603326792127' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115016603326792127'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/115016603326792127'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post.html' title='पुलकित स्मृती'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-14936767.post-114673087117154477</id><published>2006-05-04T00:50:00.000-07:00</published><updated>2006-05-04T01:22:08.393-07:00</updated><title type='text'>पुस्तकनिष्ठांची मांदियाळी</title><content type='html'>टॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या &lt;a href="http://marathiblogs.net/"&gt;२०० च्या पुढे &lt;/a&gt;गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो -&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -&lt;br /&gt;    'नातिचरामि' - मेघना पेठे&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -&lt;br /&gt;   'हंस अकेला' आणि 'आंधळ्याच्या गायी' असे वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रह लिहिणाऱ्या मेघना पेठे यांची ही पहिलीच   कादंबरी. विवाहसंस्थेवरील माझ्या मतांचा उद्गार म्हणजे ही कादंबरी असे लेखिकेचेच म्हणणे आहे. अद्याप वाचन सुरू असल्याने मत नोंदवणे योग्य होणार नाही, पण तिचे परीक्षण &lt;a href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1152347.cms"&gt;येथे&lt;/a&gt; वाचता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -&lt;br /&gt;&lt;br /&gt;विशाखा - कुसुमाग्रज&lt;br /&gt;व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे&lt;br /&gt;हंस अकेला - मेघना पेठे&lt;br /&gt;वनवास - प्रकाश नारायण संत&lt;br /&gt;बलुतं - दया पवार&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर&lt;br /&gt;स्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक&lt;br /&gt;डांगोरा एका नगरीचा - त्र्यं. वि. सरदेशमुख&lt;br /&gt;तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे&lt;br /&gt;बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;'पूर्वरंग' हे पु. लं. चे प्रवासवर्णन हे माझे अतिशय आवडते पुस्तक. पु. लं. चे हे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणता येणार नसले, तरी याच पुस्तकाचे बोट धरून मी मोठ्यांच्या पुस्तकविश्वात प्रवेश केला. पाचवीच्या मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो असताना हे पुस्तक सापडले आणि आपण काहीतरी वेगळे वाचतोय याची जाणीव झाली. अर्थात त्यावेळी वाचलेले सगळेच कळले असे नाही, पण पु. लं. ही काय असामी आहे याची एक झलक या पुस्तकातून नक्कीच मिळाली. त्याकाळी महाराष्ट्राबाहेर न गेलेल्या मला त्यांनी लीलया पूर्व आशियाची सफर घडवली. एखाद्या जुन्या मित्राबरोबर कधीही आणि कुठल्याही विषयावर बोलता येते, त्याप्रमाणे आजही या पुस्तकाचे कुठलेही पान उघडले की अनेक ओळखीच्या खुणा सापडतात आणि क्वचित एखाद्या विनोदातली न कळलेली खुबी जाणवते, आणि कसे 'पुलकित' वाटू लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी या खेळासाठी निवडलेले (Tagged) ब्लॉगर्स असे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://e-shal.blogspot.com/"&gt;विशाल&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://tulipsintwilight.blogspot.com/"&gt;ट्युलिप&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.ugaach-uwaach.blogspot.com/"&gt;अजित&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://bolaacheekadhee.blogspot.com/"&gt;गायत्री&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://meeakshay.blogspot.com/"&gt;चक्रपाणी&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://sahityaprakash.blogspot.com/"&gt;सुनील&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुनील यांचा &lt;a href="http://sahityaprakash.blogspot.com/"&gt;'रानातील प्रकाश'&lt;/a&gt; हा साहित्यविषयक ब्लॉग वगळता, निवडीमागे विशेष निकष असा काही नाही, फक्त दक्षिण भारत (अजित), उत्तर भारत (गायत्री) आणि तीन देश/खंड (जपान - जर्मनी - अमेरिका) असा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न केला आहे :).&lt;br /&gt;&lt;br /&gt;या खेळाडूंमार्फत तुमच्यापर्यंत ही साखळी पोचेलच, परंतु तुम्हांला त्याआधीच सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही याच धर्तीवर प्रश्नोत्तरे लिहून याची सुरुवात करू शकता. शुभेच्छा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/14936767-114673087117154477?l=marathisahitya.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html' title='पुस्तकनिष्ठांची मांदियाळी'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathisahitya.blogspot.com/feeds/114673087117154477/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=14936767&amp;postID=114673087117154477' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/114673087117154477'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/14936767/posts/default/114673087117154477'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html' title='पुस्तकनिष्ठांची मांदियाळी'/><author><name>Nandan</name><uri>http://www.blogger.com/profile/17905383694151586039</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='02910701013107611264'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>11</thr:total></entry></feed>