tag:blogger.com,1999:blog-14114520878643906812009-02-20T21:03:49.810-08:00Saathvansushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-91108683824049333892008-04-18T04:06:00.000-07:002008-04-18T05:35:31.041-07:00मीच वेडा...'अरे खुशमन,जरा बाजुच्या गल्लीत जाऊन xerox करून आण बरं..'शेटजींची हाक ऐकू आली,नि मी भानावर आलो.<br />पटकन् कागद घेऊन,मी copy काढायला गेलो.पायर्या चढतानाच समोर मोरपिशी पदर सळसळला.निळ्याशार <br />बांगड्यांनी भरलेल्या गोंडस हाताने,काचेचं दार ओढून घेत एक स्त्री अवखळपणे पायर्या उतरून गेली,नि खाली उभ्या<br />असलेल्या silver honda city मध्ये बसून,सर्रकन् निघून गेली..गाडी स्वत: चालवत !! मी चकित होऊन बघतच राहिलो. डौलात निघताना,तिने किंचित तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले का? खोडकर हसू ओठांवर येऊन, तिने ते दडवले का? की, मला भास झाला? नाही..भास कसा असेल? हो.. हसलीच ती ! ती, तीच होती !!<br />हां..,त्याचे असे झाले..मी जिथे watchman ची नोकरी करतो,ते काबरा emporium आणि axis bank शेजारी शेजारी<br />आहेत.चौक ओलांडताच, डाव्या हाताला या दोन्ही इमारती आहेत, त्यामुळे हिरवा सिग्नल मिळालेली वाहने या रस्त्या<br />वरून वेगाने पुढे जातात. आमच्या इमारती समोर जरा मोकळी जागा असल्याने, तिथे गाडी ठेवायचा मोह प्रत्येकालाच<br />होतो. खरं तर ही जागा आमच्या ग्राहकांसाठी आहे.पण bank मध्ये येणारे व आसपास कामे असणारे वाहनचालक सारखे<br />इथे गाड्या लावतातच; त्यामुळे मला फार सतर्क रहावे लागते. शक्यतो कुणाला मी गाडी ठेवू देत नाही; पण ही गाडी<br />सर्रकन् येऊन थांबली, नि चालवणारे साहेब झटकन् उतरून, झपाझप bank मध्ये गेले. बाजूला या बाईसाहेब बसलेल्या!<br />म्हणजे, जर गरज पडती, तर त्या गाडी काढू शकल्या असत्या..मी म्हंटलं, ठीक आहे,पाच मिनिटांनी बघू या..<br />पण, साहेब काही आले नाहीत. बाईसाहेब मस्त एसीची हवा खात, गाणी ऐकत बसल्या होत्या. मी वैतागून त्यांना गाडी<br />काढायची खूण केली, तर त्यांनी driving seat कडे इशारा केला.रस्त्यावर दोन्ही बाजूंनी येणार्या जाणार्या गाड्या मधूनच या गाडीमुळे अडत होत्या, नि जोरजोरात horn वाजवत होत्या; अशीच दहा-बारा मिनिटे गेली. मध्ये एकदा शेटजीही गाडी<br />काढायसाठी मला ओरडले. परत एकदा मी बाईंशी बोलायला गाडीजवळ गेलो. म्हंटलं,'काय हो बाईंजी,किती वेळ झाला?<br />traffic अडतंय ना..' त्या आपल्या काचेआड..परत मी,'पण इथे लावलीच का? मी तेव्हांच सांगत होतो ना..'मानेने<br />हो,हो, असे काहीसे सांगत त्यांनी सेल डायल केला..पण तो गाडीतच वाजला बहुतेक.. मी आपला बंद काचेवर बडबड<br />करत होतो.. मग मी काचेवर टकटक केलं; काच जराशी खाली सरकली.हातभर निळ्याशार बांगड्या खुळखुळ वाजवत<br />त्या गोंडस हाताने खुणावले, व मोरपिशी पदरामागून आवाज आला,'हमें गाडी चलाना नहीं आता जी...."<br />अरे रामा, आता करू तरी काय मी?? वैतागून मग एका लेनच्या गाड्या थांबवून, मी गाड्यांना पास दिला व रस्ता<br />मोकळा केला. तेवढ्यात कुठूनसे ते साहेब येऊन, ती गाडीही भुर्रकन् निघून गेली. बघा ! झालं? मला काही बोलताही<br />आलं नाही त्यांना.. आणि म्हणजे....त्या बाईसाहेबांनी अगदी येड्यात काढलं की हो मला...!!<br />मी अगदी किंकर्तव्यविमूढ असाच झालो होतो...आणि या madam नी आत्ता मला ओळखलं होतं,नक्कीच !!<br />त्याशिवाय का ते खोडकर हसू डोकावलं होतं??......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-9110868382404933389?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-27774474095950908952008-03-23T11:24:00.000-07:002008-03-23T11:40:13.129-07:00लघुतम कथा...शेजारच्या नानी सांगत होत्या, त्यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्हणून; तिच्या परवाच येणार्या वाढदिवसासाठी घेतलेला फ्राक फारच साधा, प्लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्हणून; म्हंटलं, माझ्याकडे पाठवा तिला..<br />ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्हंटलं, माझ्याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्हर रामचाचांना घेऊन जाते, म्हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्वास दिला, तर छान खुलून आली होती......<br />काल म्हणे, बिग बझारमध्ये, तिला चिडवणार्या नि चोरी करणार्या नऊ जणांना तिने पकडून दिले होते..<br />आत्मविश्वास वाढताच, तिच्याजवळच्या आहे त्याच शक्तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-2777447409595090895?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-35407977299522994432008-02-27T23:44:00.000-08:002008-02-27T23:48:42.386-08:00राज कपूर....Sunday, August 19, 2007<br />राज कपूर..<br /> <br />लोकसत्ता वाचत होते.निळ्या डोळ्यांचा राजपुत्र अशा शीर्षकाखाली राज कपूरच्या चित्रपटांचा महोत्सव झी सिनेमा साजरा करणार असल्याची बातमी होती.ह्यांना सांगितल,तर म्हणाले, वाच ना सगळं मोठ्याने,....<br />"त्याच्या निळ्या डोळ्यात कायम स्वप्नं तरळत असायची.कपाळावर आलेले बेफिकीर केस,तोंडात सिगरेट आणि डोळ्यात जादूभरली निळाई घेऊन तो त्याच्या स्टुडिओत तासन्तास काम करायचा.राजस वर्ण,प्रभावी व्यक्तिमत्व, मधाळ हसू आणि अथांग निळे डोळे असलेला हा जादुगार लोकांना स्वप्ननगरीत नेण्यासाठी भव्यदिव्य अस एक विश्व उभारण्यात गढलेला असायचा. मग त्या स्टुडिओतून त्याची स्वप्नं चित्रपटगृहांत झळकायची, ..आणि... आणि लोक हरखून जायचे...<br />जाने ना नजर,पह..पहचाने..ज..जिगर...द..दम..भर जो उ..उधर म..मु..मुँह फे....फेरे<br />तेवढयात हे म्हणाले, अगं,अशी काय अडखळते आहेस वाचताना... हो ना, मलाही काही उमजेना......<br />तर झालं असं की,या ओळी बिना चालीच्या कधी म्हटल्याच नाहीत.. कधी म्हणणंही शक्य नाही.....<br />जणू या शब्दांत सूर built-in च होते........बघा ना तुम्हीही वाचून!!<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-3540797729952299443?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-78280339764609821932008-02-26T22:06:00.001-08:002008-02-26T22:08:44.992-08:00असे आमचे लोकनेते...Sunday, January 27, 2008<br />असे आमचे लोकनेते..<br /> <br />कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्हत्या. त्यात दोन्ही मुलांच्या तब्येतींची कुरकुर.<br />ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना!<br />फोनाफोनी फार झाली, अन् तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्यांची-माझी कटकट झालीच!<br />ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्हे तो मी free hand दिल्यावर,<br />त्यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्यायचे नव्हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले..<br />झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले..<br />काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी<br />आल्याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्यासाठी ह्यांना घरी राहणे भाग होते.<br />सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती.<br />आता रस्ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आले की, S.T.च्या बसेस जरा जास्तच जातायत, मुंबईच्या दिशेने.. मी काही फार वेगात नव्हते,<br />त्यामुळे बर्याच बसेस रोरावत मला overtake करत होत्या.<br />तासाभरात डोळेही कोरडे झाले,नि डोकेही जागेवर आले...तर, त्या सगळ्या बसेस भारतीय जनता पार्टीने hire केल्या होत्या.साठ तरी असतील. शिवाजी पार्कवर नरेन्द्र मोदींची जाहीत सभा होती,त्यासाठी मंडळी<br />निघाली होती. बसेस,खाजगी jeeps , cars चा ताफा निघाला होता, कुणाच्या खर्चाने,कोण जाणे!<br />एव्हांना दीड वाजत आला होता.हळूहळू रस्त्यात काही ठिकाणी थर्माकोलचे पेले, अर्धवट खाल्लेले lunch-packs यांचा सडा दिसू लागला. थांबलेल्या बसेस, भोवतीने त्या राजकारणी लोकांचा गराडा,<br />अन्नाची नासाडी.... सगळेच मन विषण्ण करणारे होते..<br />आता रागही यायला लागला. हा रस्ता आता four-lane होऊ घातलाय, तो असाच घाण ठेवणार आहोत का आपण?या नेत्यांची आणि पक्ष-कार्यकर्त्यांची हीच का जबाबदारीची जाणीव? ह्या लोकांना आपण निवडून देतो, ते समाजाची सेवा करायसाठी, की माज करण्यासाठी?<br />अन्न पिकवणारा शेतकरी आज आत्महत्यांच्या भोवर्यात सापडलाय, उध्वस्त होतोय,<br />आणि आपण अन्नाची अशी नासाडी करतोय? मग, एकेक आठवत राहिले...<br />श्रावण महिन्यात, ब्रह्मगिरीच्या फेरीनंतर मार्गभर पसरलेले चहादुधाचे पेले,खिचडीचा सडा.....<br />नवरात्रात, कालिकेच्या जत्रेनंतर सगळीकडे पसरलेला कचरा....<br />अनंतचतुर्दशी नंतर गणेशमूर्तींच्या अवशेषांनी विद्रूप बनलेले किनारे....<br />६डिसेंबरच्या मेळाव्यानंतर घाणेघाण झालेले शिवाजी पार्क....<br />कुंभमेळ्यानंतरचा गोदाघाट....<br />किती नि काय काय म्हणूनआठवायचे? नि येऊन-जाऊन घाणच आठवायची ना?<br />या ताफ्यातली ४० नंबरची बस बराच वेळ माझ्या पुढेच होती.मला अंतर राखावे लागत होते, नाही तर पिचकार्या screen वर आल्या असत्या ना!!<br />एका बसवर विजय सानेंच्या नावाचा फलक होता. हे आमचे इंदिरानगरवासी..पण ती बसही कचर्याने वेढलेलीच!मनाशी ठरवलं की यावर लिहायचेच.....photo ही घ्यायचे होते, पण एकटी होते, म्हणून गाडीतून नाही उतरले..<br />परवा, द्वारका सर्कलला सहा press-reporters ना, त्यांच्या तवेरा गाडीसकट kidnap करुन झोडले ना.......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-7828033976460982193?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-74205155303317218912008-02-26T02:02:00.000-08:002008-02-26T02:05:48.958-08:00प्राण्यांवरचे प्रेम...?Monday, September 24, 2007<br />प्राण्यांवरचे प्रेम?..<br /> <br />नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्हांला बंटीने गाठले.मोठ्या खुशीने अंगावर उड्या-बिड्या मारुन त्याने आपला आनंद व्यक्त केला,नि आमच्याबरोबर walk ला येण्याचे जाहीर केले; नव्हे, आमच्यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्या पाठककाकांचा कुत्रा. आता त्याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्या गल्लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्या-गेल्यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्लीत कोणी आलेले खपत नाही त्याला मुळीच! आमच्याबरोबर चालताना,मस्त शानमध्ये चालतो.वाटेत येणार्या लहानमोठ्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्ही पाथर्डी फाट्याच्या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवणार्यांच्या हातात एखादी छडी नाहीतर फांटी असायची,त्याने कुठे तोंड लावू नये,वा साखळीला ओढ देऊ नये म्हणून; पण इथे तर चांगला दंडा होता, आणि.... आणि काय होतय हे कळायच्या आत, त्या माणसाने कच्कन तो दंडा बंटीच्या पाठीत हाणला.. आईईग्ग.. बंटीबरोबरच मीही कळवळले. खरंतर बंटी अगदी सरळसोट चालत होता; खोडीही काढली नव्हती. त्याला इतक्या जोराने मारायचे काहीच कारण नव्हते. मी तर चांगलीच खवळले.<br />त्यांना म्हणाले,'वा: वा...हा चांगला न्याय आहे.स्वत:च्या कुत्र्यावर एवढं प्रेम करता,आणि तशाच दुसर्या कुत्र्याला इतक्या जोरात मारूच कसे शकता तुम्ही??काय हा राक्षसीपणा?'<br />तो;- 'ओ बाई,तो चावला असता ना ह्याला..'<br />मी;- 'अजिबात चावला नसता.तो सरळ चालत होता..का मारलंत त्याला उगीच?'<br />तो;- 'ओ..मग सुट्टा कुत्रा घेऊन कशाला फिरता? घरी ठेवा ना...'<br />मी;- 'मग तुम्हीच ठेवा ना तुमचा कुत्रा घरी, एवढी त्याला चावायची भीती वाटते तर!! कुत्र्याच्या प्रेमाचं एवढं प्रदर्शन करता.. तर हे तुमचं प्रेम झालं का? राक्षस कुठले! काही माणुसकी आहे की नाही?'<br />मग तो आणि मी..संतापात व्हायची तेवढी सगळी तूतू-मीमी झाली....हेही मग मोठा आवाज काढून माझ्या मदतीला धावले....मग,समोरून येणार्या एका काकांच्या जोडीने,'जाऊ दे हो,नका रागावू इतके'असे आम्हांला चुचकारले.. मग परत आम्ही तिघे पुढे चालू लागलो.संतापाने घामाघूम झालो होतो अगदी;डोळेही भरून आले होते.मनात प्रश्नांचा कल्लोळ ही उठला होता.....<br />- या म्हातार्याने दाखवलेले हे प्रेम?? हे कसले प्रेम?..<br />- पाळीव प्राण्याच्या गळ्यात साखळी घालून,त्याला बंधनात ठेवणे,हे प्रेम??..<br />- जो प्राणी त्या म्हातार्याचा पाळीव प्राणी आहे,तशाच दुसर्या प्राण्याला तो इतक्या जोरात मारू शकतो,हे प्रेम??<br />- आणि शेवटी, कुणी जर चूक दाखवली, तर त्याला उलट बोलून अपमानित करणे, हे प्रेम??<br />- कुत्र्यांच्या सारखीच माणसेही पिसाळायला लागली आहेत का हल्ली??.......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-7420515530331721891?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-43168549182644769532008-02-26T01:54:00.000-08:002008-02-26T01:58:48.497-08:00अन्नदान...Tuesday, October 9, 2007<br />अन्नदान...<br /> <br />परवा गंगेच्या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्नदान येथे करता येईल.राईसप्लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्की करून...आज बरोब्बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्वच्छ स्वयंपाकघर,स्वच्छ भांडी,स्वच्छ टेबलं..त्याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्या पातेल्यामध्ये बटाट्याचा रस्सा, ३ मोठी भांडी भरून पुर्या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्न अगदी स्वच्छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्यांकडे नि आमच्याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्या सावरत भोवती फिरत होत्या.नदीवरही स्नाने करणार्यांची, कपडे धुणार्या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्या गोदाघाटावर नेहमीच फिरस्ते,प्रवासी,भिकारी यांची गर्दी असते.क्रियाकर्मे, अस्थि-विसर्जन करणारी माणसे बोडक्या डोक्यांनी फिरत असतात, स्नाने करत असतात. बाया तशाच उघड्यावर आंघोळी, कपडे आटपत असतात.त्यांच्यातल्याही काही टेबलाकडे लक्ष ठेवून होत्या.मोहमाया सोडलेले so-called भगवे साधूही कोंडाळे करून इकडेच बघत होते. हातात कमंडलू, कडीचे डबे होते. खाणावळवाल्यांची व्यवस्था झाल्यावर,वाढायचा हाकारा केल्यावर,एकच झुंबड उडाली.आधी त्यांनी मला सगळ्या भांड्यांना हात लावायला सांगितले.२ पुर्या,त्यावर भाजी व लाडू असे माझ्या हातात देऊन,नदीत सोडून यायला सांगितले. मी निघाल्यावर एक पोरगा मला गाइड करायला माझ्या बरोबर आला..सोडा ना,जाईल ते पाण्यात;आता नमस्कार करा.....<br />नमस्कार करून, परत टेबलाकडे आलो,तोवर वाढायला सुरवात झालीच होती.पोरे मला-मला करत होती,धक्का-बुक्की करत होती.मोठी माणसे जरा मागे होती.म्हातार्या बाया एकीकडे,भिंतीशी उभ्या होत्या.साधूंचे कोंडाळेही अधीर झाले होते.सर्वांच्या नजरेत तीच ती आदिम भूक,जी माणसाला पोटासाठी काहीही करायला लावते. बरेवाईट वागायला भाग पाडते; लाज-संकोचही नष्ट करते, ती भूक! गोळाभर अन्नासाठी इतकी अजिजी,हातघाई करणारी ती माणसे बघून माझ्या पोटात कालवलं अगदी! रडू यायला लागलं.डोळे घळाघळा वाहू लागले. इतकं अन्न, इतकी मुलेमाणसे बघूनही खूप अपुरं-अपुरंसं वाटायला लागलं.कोण आम्ही? कितीसं अन्न?कुणाकुणाला पुरे पडणार ते?कशी भागणार भूक?ह्यांचीही स्थिती काही वेगळी नव्हती.आधी आम्ही विचार केला होता की,आपण बनवून आणू व आपल्या हातांनी वाढू,असं. पण आता बघत होतो की, हे असं वाढणं नि इतक्या लोकांना हाताळणं आम्हांला जमलं नसतंच! आमच्याने तर हे बघवलंही जात नव्हतं..आम्ही असाही विचार केला होता की, आपण त्यातलीच पुरीभाजी खाऊन घेऊ,प्रसाद म्हणून..म्हणून बाईंना दुपारी स्वयंपाकाला नको असं सांगितलं होतं;पण, तिथे खाणंही आम्हांला शक्य वाटत नव्हतं.बघता बघता अन्न संपत आलं.माणसंही आटोक्यात आली होती.पोरं हात रिकामे करून,पुन:पुन: मागायला येत होती.४/५ साधू तिथेच घोटाळत होते. मग ह्यांनी हिशेब चुकता केला व आम्ही निघालो.साधू खिडकीजवळ आले; खाना दिया,लेकिन दक्षना किधर मिली?..झालं..ह्यांना उखडायला वेळ लागणार नव्हता. पटकन् पर्समधून ४०/५० रुपये काढून दिले नि निघालो, भरल्या मनाने,वाहत्या डोळ्यांनी आणि रिकाम्या पोटांनी.......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-4316854918264476953?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-37298418921698570422007-09-07T23:25:00.000-07:002007-09-07T23:40:25.539-07:00संध्या-सागर..वेगवेगळ्या रंगांनी तरुण बनलेल्या सागराने संध्येला विचारले,<br />"हे संध्या,तुझ्यामुळेच माझ्या सबंध शरीराचा रंग बदलतो आणि मला विलक्षण सौंदर्य प्राप्त होते.<br />मला तुला एवढेच सांगायचे आहे की,माझ्यात रूप नाही की रंग..माझा देह तरल आहे..<br />माझ्या देहाचा कण नि कण खरबरीत आहे.असे असून तू माझ्यावर का झुकतेस?"<br />संध्येने उत्तर दिले,"तू कसा आहेस हे मला सारे ठाऊक आहे.तुझ्या स्वभावाचा काही अंत नाही.<br />क्षणात वेडा होऊन नाचशील,तर क्षणात निराश होऊन बसशील.तू खारट आहेस.पण मला माहीत आहे,<br />तुझ्यापाशी फक्त दोन वस्तू आहेत.एक म्हणजे,तू सार्या जगातला कचरा एकत्र करून त्याचे अमृत बनवतोस.<br />दुसरे म्हणजे,तुझ्यात जो अफाटपणा नि मस्ती आहे,तशी कोणातही नाही.आणि म्हणून<br />मी माझे सर्वस्व तुला अर्पण करते..बोल,आणखी काही म्हणायचेय?"<br />सागर मुका झाला......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-3729841892169857042?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-11879428911742820352007-09-07T23:02:00.000-07:002007-09-07T23:18:04.139-07:00प्रकाश आणि काळोखएकदा प्रकाशाचे आणि काळोखाचे श्रेष्ठत्वावरून भांडण झाले.प्रकाशाने काळोखाला म्हंटले,<br />"काय रे,सगळे काही 'गुडुप' करणारा स्वभाव तुझा! मी बघ कसा,<br />सर्व काही 'उजळ' करणारा..सर्वांना दृष्टी देणारा"..<br />काळोख शांतपणे म्हणाला,<br />"कशाला हवास रे तू? फक्त काळे-गोरे बघायला? दृष्टी देऊन दृष्टिकोण वजा करणारा? <br />मी बघ कसा,माझ्या मिठीत सामावून घेतो सर्वांना..माझ्या उपस्थितीत सांगू शकणार का,<br />कोण काळा आणि कोण गोरा ते? ..."<br />प्रकाश निरुत्तर झाला, आणि काळोखात सामावून गेला....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-1187942891174282035?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-81500245761198386892007-08-24T03:50:00.000-07:002007-09-07T23:01:16.494-07:00कबीर...आकाशात ढग येतात.ढगांमधून शुध्द पाणी बरसू लागतं.ते पाणी जमिनीवर<br />येतं.पण जमिनीवर येता-येताच ते अशुध्द होऊ लागतं.हवेतील धुळीचे कण <br />पाण्याच्या थेंबांना चिकटतात. मग जमिनीवर पडल्यानंतर सर्व प्रकारची घाण <br />त्या थेंबांना लागते.आणि मग ते पाणी समुद्राच्या दिशेने वाहू लागतं.जसजसं<br />ते पुढे वाहू लागतं तसतशी गावांमधील,नगरांमधील.शहरांमधील घाण त्याच्यात <br />मिसळू लागते.मेघांमधून तर शुध्द जल निघालेलं होतं,परमात्म्याचं होतं...<br />पण रस्त्यामध्ये जी सगळी घाण गोळा केली आहे,ती तुमची आहे.आणि जेव्हां <br />नदी परत समुद्रामध्ये उतरेल,तेव्हां कोणत्या तोंडाने तुम्ही म्हणाल की मी <br />समर्पण करतो आहे? तेव्हां तुम्ही हेच म्हणाल,जे कबीर म्हणत आहेत.....<br />"मेरा मुझमें कुछ नहीं,जो कछु है सौ तोर,तेरा तुझको सौंपते क्या लागत है <br />मोर." ही समर्पणाची स्थिती आहे.दुर्गुण माझे आहेत,सद्गुण तुझे आहेत.<br />दोन्ही तुझ्याच पायांशी ठेवून देतो.तूच सांभाळ,जे तुला करायचं असेल ते कर.<br />आणि ज्या दिवशी माणूस अशा प्रकारे परमात्म्याशी समर्पित होऊन जातो,त्या <br />दिवशी सर्व दुर्गुण सद्गुणांच्या उपयोगी पडतात.अंधार प्रकाशाची पार्श्वभूमी बनतो.<br />क्रोध करुणेमध्ये रुपांतरित होतो.मोहाचं रूप बदलतं आणि तो प्रेम होउन जातो.<br />सर्व काही बदलून जातं.समर्पित करता क्षणी,अहंकार नष्ट होता क्षणी,सागरामध्ये<br />मिळून जाता क्षणी सर्व शुध्द होऊन जातं.पुन्हां मेघ जमू लागतात.सागरामधून <br />परम शुध्द होऊन,पुन्हां बरसण्याची तयारी होऊ लागते.जगणं,प्रयत्न नाही आहे,<br />समर्पण आहे,let go आहे,सोडून देणं आहे.जेवढं लढाल तेवढे अडचणीत याल.<br />अहंकार म्हणजे संघर्ष आहे.समर्पण ही संघर्षहीन अवस्था आहे. सीमा तर <br />अहंकाराला असते.समर्पणाला कसलीच सीमा नसते.अहंकार गळून पडता क्षणी <br />तुम्ही असीम होऊन जाता.आतापर्यंत तुम्ही भिंतींमध्ये कोंडलेलं आकाश होतात,<br /> आता तुमच्या सर्व बाजूंना पसरलेलं आकाश तुम्हीच आहात..मेरा मुझमें कुछ नहीं....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-8150024576119838689?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-65906613728073280592007-08-23T21:24:00.000-07:002007-08-24T03:50:49.773-07:00कबीर..."मन परतीत न प्रेमरस,ना कछु तनमे ढंग,ना जानौ उस पीवको,क्यों कर <br />रहसी रंग.." मनामध्ये ना काही प्रतीति आहे,ना कोणता अनुभव आहे,ना <br />कोणता प्रेमाचा रंग आहे." ना कछु तनमे ढंग" शरीरही काही सुंदर नाही.<br />कोणत्या तोंडाने तुझ्यासमोर येऊ? तुझं दार ठोठावण्यासाठी धैर्य कोठून आणू? <br />कोणत्या पात्रतेचा दावा करू? आणि, ना तुला कधी पाहिलं आहे,ना कधी <br />जाणलं आहे.प्रियकराशी कधी ओळखच झाली नाही,त्या प्रियतमाशी मीलन <br />कधी झालंच नाही,तर मला कसं समजणार की कोणता रंग,कोणतं रहस्य,<br />कोणता आनंद प्राप्त होणार आहे तुझ्या द्वारावर? कशी तयारी करू? <br />कोणत्या रंगाने स्वत:ला रंगवू? तुझ्या द्वाराशी कोणाचा स्वीकार होतो,<br />हे मला कसं कळेल? भक्ताची हीच भावना असते की,माझ्यामध्ये माझं<br />असं जर काही असेल तर ते माझे दुर्गुण आहेत..अंधार आहे.माझे सगळे<br />रोग,सगळा त्रास आहे.माझ्यामध्ये चुकीच्या गोष्टीच खूप आहेत,आणि जे <br />काही चांगलं आहे त्याच्याबद्दल मी काय सांगू? <br /> "मेरा मुझमे कुछ नहीं,जो कछु है सो तोर,<br /> तेरा तुझको सौंपते,क्या लागत है मोर..."<br />जर काही चांगलं असेल तर तो तुझा सुगंध आहे, तुझं दान आहे,ती तुझीच <br />जीवनधारा आहे, तूच आहेस.समर्पणाची हीच भावस्थिती आहे.. दुर्गुण माझे <br />आहेत,सद्गुण तुझे आहेत. आता सर्वच सोडून देतो.<br />तू स्वीकार कर.तेवढंच पुरेसं आहे....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-6590661372807328059?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-38708671079951330532007-08-23T02:45:00.000-07:002007-08-23T03:47:02.162-07:00कबीर.."अवगुन मेरे बापजी,बकस गरीब निवाज, जे मैं पूत कपूत हों, तउ पिताको <br />लाज.." मला माहीत आहे,माझ्यात अवगुण तर आहेतच! तुलाही माहीत <br />नसतील,असे दुर्गुण माझ्यात आहेत.तू मला मदत करावीस ती मी तिच्या <br />योग्य आहे,म्हणून नव्हे.मी तेवढी पात्रता कमावली आहे,म्हणून तू हात पुढे <br />कर असे मी म्हणतच नाही आहे.माझी कुठली एवढी पात्रता? पण तू गरीबांचा <br />त्राता आहेस.ज्यांच्याजवळ काहीही नाही,त्यांच्यावर तू दया करतोस.तुझी करुणा <br />अपार आहे.मी तुझ्या त्या करुणेला साद घालतो आहे.हे जे विनम्रतेचं बोलणं आहे,<br />हा जो अहंकाराचा स्पष्ट स्वीकार आहे,हेच विनम्र भक्ताचं लक्षण आहे.अहंकाराला <br />अगदी मुळापासून नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे.तपस्वी हिशोब ठेवतो किती <br />तपश्चर्या केली त्याचा.साधक हिशोब ठेवत असतो,किती उपवास केले,किती पूजा <br />केल्या,किती मंत्रजप केला,त्याचा.पण भक्ताची भावना वेगळीच असते.त्याला <br />स्वत:च्या अवगुणांची जाणीव असते.आपण ते संपवू शकलो नाही,संपवता येणार<br />नाहीत,हेही त्याला माहीत असते.मला ठाऊक आहे,सुपुत्र होण्याचा दावा मी करू <br />शकत नाही.मी कुपुत्र असण्याचीच शक्यता जास्त आहे.पण ती माझीच चूक आहे,<br />त्यात तुला लाज वाटण्यासारखे काहीच नाही.मुलगा कुपुत्र आहे की सुपुत्र आहे <br />यानेही काही फरक पडत नाही.पित्याच्या प्रेमामध्ये काहीच फरक पडत नाही.<br />आणि जर फरक पडला तर ते पित्याचे प्रेमच नाही्.उलट,कुपुत्राबद्दल पित्याच्या <br />मनात अधिक प्रेम,अधिक ममता असते.<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-3870867107995133053?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-48762660720517623392007-08-20T22:26:00.000-07:002007-08-21T05:38:13.573-07:00कबीर..."सुरति करौ मेरे सांइया,हम हैं भवजल मांहि्..आपे ही बह जाएंगे,जे नहिं पकरौ बांहि...." कबीर सांगतात की तुम्ही सुरतीने भरून जा,परमात्म्याच्या स्मरणाने भरून जा.जसजशी त्याची आठवण दाट होत जाईल ,तसतसा तुमचा अहंकाराचा भाव कमी कमी होत जाईल."प्रेम गली अति सांकरी,तांमे दो न समाहि.."ही प्रेमाची वाट फार निरुंद आहे,फार बारीक आहे. एकतर परमात्म्याचे स्मण तरी शिल्लक राहील,किंवा अहंकार तरी! दोन्ही स्मरणं एकावेळी असूच शकत नाहीत.परमात्म्याची <br />प्राप्ती हवी असेल तर स्वत:ला सोडावं लागतं.स्वत:ला पकडायचं असेल तर परमात्मा हातून सुटलाच,समजा!! पण ही सुरति साधावी कशी? कारण,अहंकार सारून सुरति साधली की.त्या सुरतीचाच एकनवीन अहंकार निर्माण होतो.कबीर पहिलं सूत्र सांगतात की,तुम्ही सुरतीने भरून जा.पण सुरतीला असं कवटाळू नका की,सुरतीमुळेच अहंकार निर्माण होईल.या अहंकाराची शकयताच सपून जावी,म्हणून कबीर दुसरं सूत्र सांगतात, " सुरति करौ मेरे सांइया" ते परमात्म्याला सांगतात की, मी तर तुझ्या स्मरणाने भरून जायचा प्रयत्न करतो आहे,पण तेवढं पुरेसं नाही.मी एकटा भवसागर पार करु शकणार नाही.मी बुडूनच जाईन.माझा त्याग,माझी पूजा,माझी साधना पुरेशी नाही.मी आंधळा,सगळ्या बाजूंनी बेचैन आणि ग्रासलेला,अंधारात तुला हाक मारतो आहे.पण माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचणार तरी आहे का ? ना तुझा पत्ता मला ठाऊक,ना तुझं घर मला माहीत.मी हाक मारतो,पण त्या हाकेतही कुठे ना कुठे माझा संदेह लपलेला असतो.मी हा असा,माझी सुरतीही पूर्ण नाही आहे.तिचेही तुकडेच तुकडे आहेत.कधी विसरून जातो,तर कधी स्मरण करतो.म्हणून,"सुरति करौ मेरे सांइया,हम हैं भवजल मांहि" हे प्रभू,तुलाही माझी आठवण करावी लागेल.समुद्र मोठा आहे,जग फर सूक्ष्म आहे.किनारा दृष्टीला पडतच नाही.तरून जाण्यापेक्षा बुडण्याची शक्यताच जास्त. स्वत:च्या सुरतीची नाव बनवून तुझ्या किनार्याला पोचून जाऊ,हे कठीण दिसतंय.म्हणून तुझा आधार हवाच.नाही तर,"आपेहि बह जाएंगे,जे नहिं पकरी बांहि" हा आपे शब्द फार छान आहे.याचे दोन अर्थ होउ शकतात.<br />एक म्हणजे,आमचे आम्हीच असलो तर वाहून जाऊ. आणि आपे चा दुसरा अर्थ अहंकार.हा जो मीपणाचा भाव आहे, त्यानेच आम्ही वाहून जाऊ. म्हणून तू हात दे......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-4876266072051762339?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-24984502671131294372007-08-19T22:29:00.000-07:002007-08-19T22:33:59.638-07:00सात शल्ये.....चंद्राला दिवसा प्रकाश नसणे,<br />ये कामिनीला जरा,<br />पद्मावीण तळे,<br />निरक्षर मुखें जो साजिरा-गोजिरा,<br />दात्याला धन नित्य,<br />वसते दारिद्र्य विद्वज्जनीं,<br />मूर्खांचा भरणा महीपतिघरी,<br />ही सात शल्ये खरी.....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-2498450267113129437?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-39724342324770944722007-08-01T23:20:00.000-07:002007-08-01T23:40:16.242-07:00हे नववर्षा..हे नववर्षा, माझं ओझं हलकं करुन<br />तू माझं सांत्वन केलं नाहीस,<br />तरी माझी तक्रार नाही;<br />ते ओझं वाहण्याची शक्ती<br />मात्र माझ्यात असावी,<br />एवढीच माझी इच्छा.....<br />..........टागोर<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-3972434232477094472?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-27583909074506365152007-08-01T23:05:00.000-07:002007-08-01T23:34:47.519-07:00चिटुकली?....मावळतीला जाताना सूर्याने प्रश्न केला,<br />"माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करील?"..<br />चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्तब्ध उभे राहिले..<br />तेव्हां एक चिटुकली पणती चटकन् पुढे होऊन म्हणाली,<br />"प्रभो,माझ्याकडून जितके होईल, तितके मी करीन......." <br /><br /> - रवींद्रनाथ टागोर<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-2758390907450636515?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-10630642278461024142007-08-01T08:27:00.000-07:002007-08-01T08:31:26.170-07:00तेजातुनी..तेजातुनी आम्ही झालो,<br />तेजातच मिसळुनी जाऊ..<br />मातीमधुनी फिरून उठता,<br />सूर्य नव्याने पाहू.....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-1063064227846102414?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-48040080164665084932007-08-01T08:10:00.000-07:002007-08-01T08:26:53.861-07:00जीवनदीप...यौवन सरले सारे आता,<br />मृगजळामागे धावता धावता..<br />आयुष्याच्या सायंकाळी,<br />आम्हां आठवे तो वनमाळी..<br />संतभक्तीरस चाखता चाखता,<br />जीवनदीप हलकेच विझावा......<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-4804008016466508493?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1411452087864390681.post-8373547965638598972007-04-15T11:52:00.000-07:002007-04-15T11:55:09.027-07:00life..Life means missing expected things and facing unexpected things..<br />When you are right,no one remembers,<br />But,when you are wrong,no one forgets..<br />This is life.....<br />Keep the lamp of Life burning with oil of Love...<br />Booz sun rises in east and sets in west,<br />But Love rises in heart and sets after death...<br />Do remember the persons who are close to your heart.<br />What makes someone special in life is,<br />Not just the happiness u feel when you have them..<br />But the pain you feel when you miss them.....<div class="blogger-post-footer"><img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1411452087864390681-837354796563859897?l=saathvan.blogspot.com'/></div>sushamahttp://www.blogger.com/profile/12325946626255003617noreply@blogger.com0